प्रमोद शिंदे

*पुन्हा एकदा खर्डा रक्ताने माखला* *खर्डा नितीन आगे खून प्रकरणातील मुख्यआरोपी रोहित गोलेकरसह इतरांनी दगडाने ठेचून आदिवासी मुलाचा केला खून*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज( प्रमोद शिंदे)-  अहमदनगर जिल्हय़ात खर्डा येथील एका पारधी इसमाचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळू बजरंग पवार (वय- 40, रा. कोष्टी गल्ली, खर्डा, ता.जामखेड) असे मृत इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खर्डा गावात तणाव परसला आहे. या प्रकरणी सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर, योगेश बलभीम वाळस्कर, रोहित उर्फ बबलू बाळासाहेब गोलेकर, गौतम राहुल तादगे (सर्व रा. खर्डा, ता. जामखेड) या पाच जणांविरोधात भादवि कलम 302, 34, 504, 506 ,तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी याप्रकरणी जामखेड पोलीसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत बाळू बजरंग पवार वय 40 याचे पैसे आरोपींकडे असल्याकारणाने मयत बाळू पवार याने घरी जाऊन पैसे मागितले म्हणून याचा राग मनात धरून आरोपीने दिनांक 29 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान बाळूच्या घरी जाऊन घरासमोर डोक्यात दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले बाळू यास उपचाराला बार्शी येथे नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. तसेच खर्डा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खर्डा येथे वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रॅकींग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल खर्डा येथे दाखल करण्यात आले आहे. तसेच या घटनेतील आकाश बाळू वाळस्कार योगेश बिभीषण वाळस्कर या दोघांना अटक केली आहे सदर घटनेचा तपास एपीआय चव्हाण करत आहेत.२०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे यांच्या खुनातील प्रकरणात मुख्य आरोपी रोहित गोलेकर यांचे नाव असून त्याने आणि इतर चार साथीदार सोबत घेऊन असाच नितीन आगे यांचा खून केला होता, नितीन आगे खून प्रकरणाने धक्का बसला होता.  उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र पुरावे कमी पडले आणि साक्ष फुटल्यामुळे खटल्यातील आरोपी सुटले होते. सदर खटल्याचे पुन्हा चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत.

विश्वसम्राट बळीराजा मिरवणूकीचे उद्या 15 वे वर्ष

विश्वसम्राट बळीराजा मिरवणूकीचे यंदा 15 वे वर्ष

पुणे (प्रतिनिधी )पुणे-सत्यशोधक प्रबोधन महासभा आणि बळीराजा गौरवसमिती,पुणे तर्फे दरवर्षी बलिप्रतिपदा दिनी दि.28ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता पुणे येथे महात्मा फुले वाडा(समता भूमी) ते लाल महाल अशी बळीराजा ची भव्य मिरवणूक काढली जाते
यंदाचे हे 15 वे वर्ष आहे.सदर मिरवणूकीत
दरवर्षी प्रमाणे हमाल पंचायत चे डॉ.बाबा आढाव यांचे शुभहस्ते फुले वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून नंतर बळीराजाला हार घालून फळ,भाजीपाला,
धनधान्याने, सजविलेल्या बैल गाडीतून धनधान्य फळे,भाजीपाला, वाटत वाटत फुले वाडा ते वस्ताद लहुजी साळवे तालीम कडून,लाल महाल पोहचणार आहे..लाल महालातील मॉं जिजाऊ साहेब यांना बळीराजा झालेले रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल.त्यानंतर समारोप होताना प्रबोधन पर भाषणे आणि पानसुपारी चा कार्यक्रम होईल.
तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्यने या विश्वसम्राट बळीराजा मिरवणुकीत सामील होऊन ईडा पिडा टळो बळीचं राज्य येवो ,तसेच नव्या रूपातील वामनी विचार गाडण्यासाठी नक्की सहभाग घ्यावा आणि आपल्या परिसरात बलिप्रतिपदा दिनी खरा शेतकरी राजा बळीराजा यांची सर्वत्र भव्य मिरवणुक काढावी असेआवाहन प्रा.प्रतिमा परदेशी, तोडकर,किशोर ढमाले,सचिन बगाडे, आकाश ढोक,प्रतीक परदेशी यांनी केले आहे

विधानसभा निवडणुक निकाल २०१९ महाराष्ट्र नूतन आमदार

विधानसभा निवडणुक निकाल २०१९

मुंबई

कुलाबा – राहुल नार्वेकर, भाजप
धारावी – वर्षा गायकवाड काँग्रेस
भायखळा – यामिनी जाधव, शिवसेना
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, भाजप
माहिम – सदा सरवणकर, शिवसेना,
मुंबादेवी -अमिन पटेल, काँग्रेस
वडाळा – कालिदास कोळंबकर, काँग्रेस
वरळी – आदित्य ठाकरे, शिवसेना
शिवडी – अजय चौधरी, शिवसेना
सायन कोळीवाडा – कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप
अंधेरी पश्चिम – अमित साटम, भाजप
अंधेरी पूर्व – रमेश लटके, शिवसेना
अणुशक्ती नगर – नवाब मलिक, राष्ट्रवादी
कलिना – संजय पोतनीस, शिवसेना
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर, भाजप
कुर्ला – मंगेश कुडाळकर, शिवसेना
गोरेगाव – विद्या ठाकूर, भाजप
घाटकोपर पश्चिम – राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व – पराग शाह, भाजप
चांदिवली – दिलीप लांडे, शिवसेना
चारकोप – योगेश सागर, भाजप
चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, शिवसेना
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर
दहिसर – मनिषा चौधरी, भाजप
दिंडोशी – सुनील प्रभू, शिवसेना
बोरीवली – सुनील राणे, भाजप
भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, शिवसेना
मागाठणे – प्रकाश सुर्वे, शिवसेना
मानखुर्द शिवाजीनगर – अबू आझमी, सपा
मालाड पश्चिम – अस्लम शेख, काँग्रेस
मुलुंड – मिहीर कोटेचा, भाजप
वर्सोवा – डॉ. भारती लव्हेकर, भाजप
वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, भाजप
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी, काँग्रेस
विक्रोळी – सुनील राऊत, शिवसेना
विले पार्ले – पराग अळवणी, भाजप

ठाणे आणि कोकण

पालघर

डहाणू – विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड – सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर – श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर -राजेश पाटील, बविआ
नालासोपारा – क्षितीज ठाकूर, बविआ
वसई – हितेंद्र ठाकूर, बविआ

ठाणे

भिवंडी ग्रामीण – शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व – रईस शेख, सपा
शहापूर – दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड – किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ – डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर – कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व – गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम – विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण – प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली – रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर – गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे – संजय केळकर, भाजप
ऐरोली – गणेश नाईक, भाजप
बेलापूर – मंदा म्हात्रे, भाजप

सिंधुदुर्ग

सावंतवाडी – दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण – वैभव नाईक, शिवसेना
कणकवली-देवगड – नितेश राणे, भाजप

रत्नागिरी

राजापूर – राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी – उदय सामंत, शिवसेना
चिपळूण – शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर – भास्कर जाधव
दापोली – योगेश कदम, शिवसेना

रायगड

महाड – भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन – अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग – महेंद्र दळवी, शिवसेना
पेण – रवीशेठ पाटील, भाजप
उरण – महेश बाल्दी, अपक्ष
कर्जत – महेंद्र थोरवे, शिवसेना
पनवेल – प्रशांत ठाकूर

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, राष्
इंदापूर – दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
कसबा – मुक्ता टिळक, भाजप
कोथरुड – चंद्रकांत पाटील, भाजप
खडकवासला – भिमराव तापकीर, भाजप
खेड-आळंदी – दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
चिंचवड – लक्ष्मण जगताप, भाजप
जुन्नर – अतुल बेनके, राष्ट्रवादी
दौंड – राहुल कुल, भाजप
पर्वती – माधुरी मिसाळ, भाजप
पिंपरी – अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
पुणे छावणी – सुनील कांबळे, भाजप
पुरंदर – संजय जगताप, काँग्रेस
बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी
भोर – संग्राम थोपटे, काँग्रेस
भोसरी – महेश लांडगे, भाजप
मावळ – सुनील शेळके, राष्ट्रवादी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
शिरुर – अशोक पवार, राष्ट्रवादी
शिवाजीनगर – अनिल शिरोळे, भाजप
हडपसर – चेतन तुपे, राष्ट्रवादी

कोल्हापूर

इचलकरंजी – प्रकाश आवडे, अपक्ष
करवीर – पी एन पाटील, काँग्रेस
कागल – हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील, काँग्रेस
चंदगड – राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी
राधानगरी – प्रकाश आबिटकर, शिवसेना
शिरोळ – राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले – राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी – विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगली

इस्लामपूर – जयंत पाटील, राष्ट्रवादी
खानापूर – अनिलभाऊ बाबर, शिवसेना
तासगांव-कवठे महांकाळ – सुमन पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव – विश्वजीत कदम, काँग्रेस
मिरज – डॉ.सुरेश खाडे, भाजप
शिराळा – मानसिंग नाईक, राष्ट्रवादी
सांगली – धनंजय गाडगीळ, भाजप
जत – विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

सातारा

कराड उत्तर – बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
कोरेगाव – महेश शिंदे, शिवसेना
पाटण – शंभूराजे देसाई, शिवसेना
फलटण – दीपक चव्हाण, राष्ट्रवादी
माण – जयकुमार गोरे, भाजप
वाई – मकरंद जाधव, राष्ट्रवादी
सातारा – शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूर

अक्कलकोट – सचिन शेट्टी
करमाळा – संजय शिंदे अपक्ष
पंढरपूर – भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी – राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा – बबन शिंदे, राष्ट्रवादी
माळशिरस -राम सातपुते, भाजप-रिपाइं
मोहोळ – यशवंत माने, राष्ट्रवादी
सांगोला – शाहजी बापू पाटील, शिवसेना
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजप
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे

अहमदनगर

अकोले – डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
अहमदनगर शहर – संग्राम जगताप, राष्ट्रवादी
कर्जत-जामखेड – रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव – आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा – शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा – प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव – मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते, भाजप
श्रीरामपूर – लहू कानडे, काँग्रेस
संगमनेर – बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर – निलेश लंके, राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक

इगतपुरी – हिरामन खोसकर, काँग्रेस
कळवण – नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय
चांदवड – राहुल अहेर, भाजप
दिंडोरी – नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी
देवळाली – सरोज अहिरे, राष्ट्रवादी
नांदगाव – सुहास कांदे, शिवसेना
नाशिक पश्चिम – सीमा हिरे, भाजप
नाशिक पूर्व – राहुल ढिकळे, भाजप
नाशिक मध्य – देवयानी फरांदे, भाजप
निफाड – दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
बागलाण – दिलीप बोरसे, भाजप
मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना
मालेगाव मध्य – मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम
येवला – छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर – माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

धुळे

साक्री – मंजुळा गावित, अपक्ष
धुळे ग्रामीण – कुणालबाबा पाटील, काँग्रेस
धुळे शहर – शाह फारुक अन्वर, एमआयएम
शिंदखेडा – जयकुमार रावल, भाजप
शिरपूर – काशिराम पवार, भाजप

नंदुरबार

अक्कलकुवा – केसी पाडवी, काँग्रेस; आमशा पाडवी, शिवसेना;
शहादा – राजेश पाडवी, भाजप
नंदुरबार – विजयकुमार गावित, भाजप
नवापूर – शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

जळगाव

अमळनेर – अनिल पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल – चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव – मंगेश चव्हाण, भाजप
चोपडा – लताबाई सोनावणे, शिवसेना
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव शहर – सुरेश भोळे, भाजप
जामनेर – गिरीश महाजन, भाजप
पाचोरा – किशोर पाटील, शिवसेना
भुसावळ – संजय सावकारे, भाजप
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील, अपक्ष
रावेर – मधुकरराव चौधरी, काँग्रेस

विदर्भ

बुलडाणा

खामगाव – आकाश फुंडकर, भाजप
चिखली – श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद – संजय कुटे, भाजप
बुलडाणा – संजय गायकवाड, शिवसेना
मलकापूर – राजेश एकाडे, काँग्रेस
मेहकर – संजय रायमुलकर, शिवसेना
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

अकोला

अकोट – प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व – रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर – संग्राम गावंडे, राष्ट्रवादी
मूर्तिजापूर – हरीश पिंपळे, भाजप

वाशिम

कारंजा – राजेंद्र पाटनी, भाजप
रिसोड – अमित झनक, काँग्रेस
वाशिम – लखन मलिक, भाजप

अमरावती

अचलपूर – बच्चू कडू, प्रहार
अमरावती – सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा – यशोमती ठाकूर, काँग्रेस
दर्यापूर – बळवंत वानखडे, काँग्रेस
धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड, भाजप
बडनेरा – रवी राणा, अपक्ष
मेळघाट – राजकुमार पटेल, प्रहार
मोर्शी – देवेंद्र भुयार स्वाभिमानी पक्ष

वर्धा

आर्वी – दादाराव केचे, भाजप
देवळी – रणजीत कांबळे, काँग्रेस
हिंगणघाट -समीर कुनावार, भाजप
वर्धा – डॉ. पंकज भोयर, भाजप

नागपूर

काटोल – अनिल देशमुख, राष्ट्रवादी
सावनेर – केदार छत्रपाल, काँग्रेस
हिंगणा – समीर मेघे, भाजप
उमरेड – राजू पारवे, काँग्रेस
नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण – मोहन मते, भाजप
नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, भाजप
नागपूर मध्य – विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम – विकास ठाकरे, काँग्रेस
नागपूर उत्तर – नितीन राऊत, काँग्रेस
कामठी – सुरेश भोयर, काँग्रेस
रामटेक – आशिष पेंडम, अपक्ष

भंडारा

तुमसर – राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
भंडारा – अरविंद भलाधरे, भाजप
साकोली – नाना पटोले, काँग्रेस

गोंदिया

अर्जुनी-मोरगाव – मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
तिरोरा – विजय रहांगडले, भाजप
गोंदिया – गोपालदार अग्रवाल, भाजप
आमगाव – सहसराम कोरोटे, काँग्रेस

गडचिरोली

आरमोरी – कृष्ण गजबे, भाजप
गडचिरोली – देवराव होली, भाजप
अहेरी – धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

चंद्रपूर

चंद्रपूर – किशोर जोर्गेवार, अपक्ष
चिमूर – बंटी भांदडिया, भाजप
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजप
ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजुरा – सुभाष धोटे, काँग्रेस
वरोरा – सुरेश धानोरकर, काँग्रेस

यवतमाळ

वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप
राळेगाव – अशोक वोईके, भाजप
यवतमाळ – मदन येरावार, भाजप
दिग्रस – संजय राठोड, शिवसेना
आर्णी – संदीप धुर्वे, भाजप
पुसद – इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
उमरखेड – नामदेव सासणे, भाजप

मराठवाडा

औरंगाबाद

औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य – प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड – उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर – प्रशांत बंब, भाजप
पैठण – संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री – हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर – रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड – अब्दुल सत्तार, शिवसेना

हिंगोली

वसमत – चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
कळमनुरी – संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली – नाजी मुटकुळे, भाजप

परभणी

जिंतूर – मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी – डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड – रत्नाकर गुट्टे, रासप
पाथरी – सुरेश वरपुडकर, काँग्रेस

जालना

परतूर – बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी – राजेश टोपे, राष्ट्रवादी
जालना – कैलास गोरंट्याल, काँग्रेस
बदनापूर – नारायण कुचे, भाजप
भोकरदन – संतोष दानवे, भाजप

उस्मानाबाद

उमरगा – ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर – राणाजगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद – कैलास पाटील, शिवसेना
परांडा – तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड

किनवट – भिमराव केराम, भाजप
देगलूर – रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर, शिवसेना
नांदेड दक्षिण – मोहनराव हंबर्डे, काँग्रेस
नायगाव – राजेश पवार, भाजप
भोकर – अशोक चव्हाण, काँग्रेस
मुखेड – डॉ. तुषार राठोड, भाजप
लोहा – शामसुंदर शिंदे, शेकाप
हदगाव – माधवराव पवार, काँग्रेस

लातूर

अहमदपूर – बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
उदगीर – संजय बनसोडे, राष्ट्रवादी
औसा – अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर – अमित देशमुख, काँग्रेस

बीड

गेवराई – लक्ष्मण पवार, भाजप
परळी – धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
माजलगाव – प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
केज – नमिता मुंदडा, भाजप
बीड – संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
आष्टी – बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

माळशिरस मध्ये राम सातपुते यांचा निसटता विजय अवघ्या २५९० मतानी राम सातपुतेचा विजय

माळशिरस मध्ये राम सातपुते यांचा निसटता विजय
अवघ्या २५९० मतानी राम सातपुतेचा विजय

नातेपुते (प्रमोद शिंदे )-माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचे उत्तम जानकर व आर पी आय पुरस्कृत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा अवघ्या २ हजार ५९० मतांनी पराभव झाला असून, राम सातपुते यांचा येथे निसटता विजय झाला असून विजयानंतरही मोहीते-पाटीलांच्या मतात झालेली घट अत्मचिंतन करायला लावणारी आहे.
अत्यंत चुरशिच्या या निवडणुकीत आत्तापर्यत मोहिते-पाटिल गटाची एकहाती विजयाची परंपरा मोडीत निघाली आहे.अवघ्या २ हजार ५९० मताच्या फरकाने भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा विजय झाला .
मतमोजणीची सुरुवात सकाळी ९ वाजता झाली पहील्या फेरीचा निकाल हाती येताच राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी ५ हजार ६९ मतांची आघाडी घेतली हा आकडा वाढत जात १२ व्या फेरीत १६ हजार ५९७ मतांची आघाडी घेतली मात्र १३ व्या फेरीपासुन हा मतांचा आलेख खाली येऊ लागला अखेर २१ व्या फेरीत २ हजार ८५३ मतांनी आर पी आय पुरस्कृत भाजपाच्या राम सातपुते यांनी आघाडी घेतली २२ व २३ व्या फेरीत मताधीक्य कमी झाले २४ व्या फेरीत २ हजार ३११ मताधीक्य मिळवल तर अखेरच्या फेरीत २०६८ मतांची आघाडी मिळाली व पोस्टल ५२२ मतात आघाडी घेत २५९० मतांनी राम सातपुते विजय ठरले .
उमेदवार निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे
राम विठ्ठल सातपुते (भाजप ) १०३५०७
उत्तमराव शिवदास जानकर (राष्ट्रवादी ) १००९१७ राज यशवंत कुमार ( वंचित बहुजन आघाडी ) ५५३८ ,श्रीकृष्ण ज्ञानदेव प्रक्षाळे (बसपा ) १०८१ अशोकराव सोपानराव तडवळकर -सर ( भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष ) ६९५ , मकरंद नागनाथ साठे (अपक्ष ) ६८० ,उत्तम एकनाथ मोटे (अपक्ष) ५३४ , बापूराव महादेव अहिवळे (अपक्ष ) ३९० नोटा १८९९ , पोस्टल अवैध्य ७०
सुरुवातीला मोहिते-पाटलांना एकतर्फी वाटणारी माळशिरस विधानसभेची निवडणुक भाजपने बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे अत्यंत अटीतटीची झाली होती.उत्तम जानकरांनी राष्ट्रवादी पक्षातुन दिलेली लढत ही लक्षवेधी ठरली आहे.या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी निसटत्या विजयामुळे मोहिते-पाटलांचा पराभवच म्हणावा लागेल असा निकाला या निवडणुकीत लागला आहे. राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा पराभव वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार राजकुमार सोनवणे यांच्यामुळेच झाला असे म्हणता येईल यांना 5538 ते पडले याचा फटका उत्तमराव जानकर यांना पडला ही जागा अनुसूचित जाती राखीव असताना उत्तम जानकर यांचा जात प्रमाणपत्र दाखला उच्च न्यायालयाने वैध ठरवल्याने व माळशिरस ची जागा ही आरपीआयला सुटली असताना तेथे उमेदवार मात्र आयात भाजपचा दिला असल्याने स्थानिक लोक नाराज होते यामुळे लोकांनी वंचित चा व नाटो चा पर्याय निवडल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांना याची किंमत मोजावी लागली याचाच परिणाम राष्ट्रवादीचा पराभव व भाजपचा निसटता विजय हा झाला.
भाजपच्या विजयानंतर तालुक्यात मोहिते-पाटील व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळन व फटक्याची अतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.शंकरनगर येथिल शिवरत्नवर झालेल्या विजयी सभेत नुतन आमदार राम सातपुते यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,मा.खा रणजितसिंह मोहिते-पाटील,जयसिंह मोहिते-पाटील,धैर्यशिल मोहिते-पाटील,साभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील,अर्जुनसिंह मोहिते-पाटील,शिवतेजसिंह मोहिते-पाटील, के.के. पाटील ,भाजपचे राजकुमार पाटील,सोपानराव नारनवर,शिवसेनेचे नामदेव वाघमारे , बाळासाहेब सरगर , काकासाहेब मोटे , हनुमंत सुळ आरपीआयचे सोमनाथ भोसले, किरण धईंजे, मिलिंद सरतापे, तसेच कार्यकर्ते, मामा पांढरे , मिलींद कुलकर्णी , संजय देशमुख ,आदीनी शुभेच्छा दिल्या.
राम सातपुते माध्यमांशी बोलताना म्हणाले की – माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,रणजितसिंह मोहिते-पाटील व तालुक्यातील भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे कष्ट जनतेच्या अर्शिवादाने मला विजयी केले आहे त्या सर्वाना मी माझा विजय समर्पित करतो.माळशिरस तालुक्याची सेवा मी माझ्या आई प्रमाणे करीन.

श्री नारायणदास रामदास विद्यालयात फटाके मुक्त दिवसळी उत्सहात

 * श्री नारायणदास रामदास  विद्यालयात फटाके मुक्त दिवाळी *नातेपुते(प्रमोद शिंदे)श्री नारायणदास रामदास प्राथमिकविद्यामंदिर मध्ये फटाके मुक्त दिवाळी विद्यार्थी व शिक्षक  यांनी सामुदायिक शपथ घेतली यावेळी मुख्याध्यापिका श्रीम्. आगरखेड मॕडम म्हणाले,की आपण सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी केली पाहिजे परंतु ही दिवाळी साजरी करत असताना हवेत होणारे प्रदूषण पण रोखता आले पाहिजे तसेच पर्यावरणाची हानी होणार नाही,माणसांना  श्वसनाचे ञास होणार  नाहीत,झाडे,वेली,फुले,पशु,पक्षी यावर ही परिणाम होणार नाही,तसेचआपणास कोणतीही ईजा होणार नाही,म्हणून आपण फटाके न उडविता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करु या  !दिवाळी साजरी करत असताना शिक्षकांनी दिलेला अभ्यासही पुर्ण करावा.वाचन दिन आपण साजरा केला आहे त्याचे एखादे तरी गोष्टीचे पुस्तक वाचन करावे. तसेच दिवाळी उत्सव आनंदाने साजरा करा पर्यावरणाची हानी म्हणजेच आपल्या भविष्याची हानी तसेच विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छ दिल्या . त्यानंतर विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्ताने खाऊवाटप करण्यात आला शिक्षक  यावेळी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यी उपस्थित होते .
 शपथ वाचन नजमा पठाण यांनी केले.

माळशिरस विधानसभा उमेदवारांचे भवितव्य केले मतदारांनी मतपेटीत बंद

माळशिरस (प्रमोद शिंदे): माळशिरस विधानसभा उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी 21 तारखेला केले मतपेटीत बंद माळशिरस विधानसभा लढत ही रंगतदार होणार असून ही लढत तिरंगी लढत दिसून आली आहे. माळशिरस विधानसभा निवडणूक ही काटे की टक्कर झाले आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या अस्तित्वाची लढाई होती संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष माळशिरस विधानसभेवर असून इथे कोण जिंकणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अनेक घडामोडी झाल्या आहेत या मतदारसंघात पवार विरुद्ध मोहिते पाटील अशीच अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे यातच भाजपचे कट्टर समर्थक समजले जाणारे तसेच मोहिते-पाटील विरोधक मानले जाणारे उत्तम जानकर यांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी कडून तिकीट मिळवले. त्यामुळे येथील राजकीय वातावरणात बदल झाला आहे. मोहिते-पाटलांना लोकसभेला तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला व आपले अस्तित्व सिद्ध केले. आत्ता सुद्ध विधानसभेला तीच परिस्थिती आहे. विधानसभेला हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे ही जागा आरपीआय ला सोडण्यात आली होती परंतु उमेदवार हे मोहिते-पाटील ठरवणार असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्यामुळे येथील राजकीय वातावरण आणखीन वेगळ्या वळणावर येऊन थांबले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील राम सातपुते यांना तिकीट देण्यात आले व मोहिते पाटील कुटुंबीय राम सातपुते यांच्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली होती. त्यातच उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला वैध झाल्याने माळशिरस तालुक्यातील वातावरण आणखीन बदलले माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली होते पुन्हा फ्रंट फूट वर आली ही लढाई खरंतर राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी नसून मोहिते पाटील विरुद्ध पवार व जानकर असल्याचे दिसत आहे. रिपाईला जागा सोडून उमेदवार मात्र भाजपा आरएसएस चा दिल्यामुळे आरपीआयच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा झाली या सभेला नेते हजर पण कार्यकर्ते गैरहजर अशी परिस्थिती होती. माळशिरस येथील रामदास आठवले व विजयसिंह मोहिते पाटील यांची सभा फेल गेली त्यामुळे माळशिरस विधानसभेतची निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी ने ही नातेपुते येथील राजकुमार यांना उमेदवारी देऊन रणांगणात उभे केले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे मतदान हे निर्णय मतदान ठरणार असून वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांमुळे कोणत्यातरी मोठ्या उमेदवाराला याचा फटका बसणार आहे. ही निवडणूक मोहिते पाटील कुटुंबीयांसाठी अस्तित्वाचा आणि महत्वाची निवडणूक असल्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला आहेत. तसेच शरद चंद्रजी पवार साहेब यांनीही या मतदारसंघात चांगले लक्ष घातले असून राष्ट्रवादीचा उमेदवार कशाप्रकारे निवडून येईल यासाठी पूर्णपणे ताकद लावली आहे. उद्या दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालाची जनता आतुरतेने वाट पाहत असून जनतेने कौल कोणाच्या बाजूने दिला आहे पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. दिनांक 21 /9 /2019 रोजी माळशिरस विधानसभा गाव निहाय खालील प्रमाणे झालेले मतदान- शिंदेवाडी ३१६१ पैकी १९५८ (६३.९७%),देशमुखवाडी १३०३ पैकी ९१३ (७०.०७%),कुरबावी २१२४ पैकी १३६८ (६४.४१%),डोंबाळवाडी कु १४२० पैकी १०५७ (७४.४४%),हनुमानवाडी ९२८ पैकी ६३० (६७.८८%),धर्मपुरी ३७९३ पैकी २३६९(६२.४६%),कोथळे ११८३ पैकी ७२४ (६१.२०%),कारुंडे २९५५ पैकी २०५८(६९.६४%),गुरसाळे ३६९५ पैकी २३०५ (६२.३८%),तांबेवाडी ९९६ पैकी ६१६ (६१.८५%),एकशिव २९०० पैकी २०१५ (६९.४८%),कळबोली १०५५ पैकी ६७४ (६३.८९%),दहीगाव ७०७३ पैकी ४५०४ (६३.६८%),मोरूची ३९६० पैकी २५४० (६४.१४%),पिंपरी २८०८ पैकी १५९३ (५६.७३%),नातेपुते १३८६५ पैकी ८४९७ (६१.२८%),पिरळे २८१७ पैकी १९३३ (६८.६२%),बंगार्डे १५२२ पैकी १२२२ (८०.२९%),पळसमंडळ १९९१ पैकी १२११ (६०.८२),मोटेवाडी फोंडशिरस १२१० पैकी ७८३ (६४.७१%),कदमवाडी ९०० पैकी ६४९ (७२.११%),फोंडशिरस ६८८५ पैकी ४६६२ (६७.७१%),लोणंद १९६० पैकी १३८१ (७०.४६%),फडतरी २६३५ पैकी १६१७ (६१.६७%),नीटवेवाडी फडतरी ५५६ पैकी ३८७ (६९.६०%),लोंढेमोहितेवाढी १२०९ पैकी ८०९ (६६.९१%),गिरवी २८७६ पैकी १८४० (६३.९८%),मांडवे ५८६९ पैकी ३९७६ (६७.७१%),खुळेवाडी ११८० पैकी ८०३ (६७.७१%),तामशिदवाडी १२४३ पैकी ८५७ (६८.९५%),मारकडवाडी फो २२८४ पैकी १६९४ (७४.१७ %),उंबरे दहीगाव २१६६ पैकी १६३८ (७५.६२%),मेडद ३६३८ पैकी २३७२ (६५.२०%),सदाशिवनगर २८३० पैकी १७१० (६०.४२%),पुरंदावडे २३९२ पैकी १५२६ (६३.८०%),जाधववाडी १८१७ पैकी ११८४ (६५.११%),कण्हेर ३८१९ पैकी २३९४ (६२.६९%),भांब १४६७ पैकी ७५३ (५१.३३%),रेडे २३३१ पैकी १२९७ (५५.६४%),भांबूर्डी ३६३१ पैकी २२६५ (६२.३८%),येळीव १०८३ पैकी ७२७ (६७.१३%),कचरेवाडी २१७१ पैकी १७१५ (७९.००%),तिरवंडी २९१९ पैकी २१३१ (७३.००%),चाकोरे २३९१ पैकी १८०४ (७५.४५%),कोंढबावी २२३३ पैकी १६९५ (७५.९१%),वटफळी ८६३ पैकी ६२६ (७२.५४%),माळशिरस १५४६६ पैकी ९७९९ (६३.३६%),मोटेवाडी माळशिरस १९३९ पैकी १४०० (७२.२०%),इस्लामपूर २९३१ पैकी २१२० (७२.३३%),गोरडवाडी २५६३ पैकी १९०६ (७४.३७%),मांडकी २४४६ पैकी १३४५ (५४.९९%),जळभावी १३८६ पैकी ८०७ (५८.२३%),गारवाड १२२५ पैकी ७६७ (६२.६१%),तरंगफळ १८६४ पैकी १४७९ (७९.३५%),झंजेवाडी ५१० पैकी ५२५ (८३.३३%),डोंबाळवाडी १०९१ पैकी ६६९ (७९.६५%),पानीव २२६७ पैकी १६६२ (७३.३१%),विजयवाडी १२६९ पैकी ९४७ (७५.२२%),गिरजणी २१६३ पैकी १६१५ (७४.६६%),बागेचीवाडी २८७० पैकी १९७७ (६८.८९%),आनंदनगर २३१० पैकी १६७३ (७२.४२%),यशवंतनगर १०३८२ पैकी ६६९६ (६४.५०%),विझोरी २२८५ पैकी १५६४ (६८.४५%),खुडूस ४८३० पैकी ३५०९ (७२.६५%),चांदापुरी १७११ पैकी १३१२ (७६.६८%),पठाणवस्ती १५७२ पैकी १०३७ (६५.९७%),मगरवाडी १३१७ पैकी ७७८ (५९.०७%),सुळेवाडी २४२० पैकी १२९५ (५३.५१%),पिलीव ७७११ पैकी ५१३० (६६.५३%),झिंजेवस्ती १०७३ पैकी ७१५ (६६.६४%),कुसमोड १७०० पैकी १२१० (७१.१८%),निमगाव मगराचे ६२३४ पैकी ४५११ (७२.३६%),पिसेवाडी २८०९ पैकी २२०१ (७८.३६%),दत्तनगर ११०५ पैकी ७८० (७०.५९%),चांडेश्वरवाडी ३२२४ पैकी २३७० (७३.५१%),माळेवाडी अकलूज ३४९८ पैकी २२७० (६४.८९%),अकलूज २८५२२ पैकी १७७५५ (६२.२५%),संग्रामनगर अकलूज ५०४८ पैकी २८५३ (५६.५२%),माळीनगर ७६०५ पैकी ४४४२ (५८.४१%),सवतगव्हाण १९१९ पैकी १२३४ (६४.३०%),बिजवडी ९५३ पैकी ७०० (७३.४५%),तांबवे २६९३ पैकी १८५४ (६८.८५%),गणेशगाव १०८५ पैकी ७५३ (७०.७०%),संगम १९२४ पैकी १३८७ (७२.०९%),बाभूळगाव १४०६ पैकी १०३१ (७३.३३%),खंडाळी ४६७२ पैकी ३३६२ (७१.९%),वेळापूर १२६८५ पैकी ८६१८ (६७.९४%),मळोली ४८४१ पैकी ३२७८ (६७.७१%),साळमुखवाडी ५०६ पैकी ३९३ (७७.६७%),काळमवाडी १२३८ पैकी ९२१ (७४.३९%),बचेरीवाडी २०७९ पैकी १५७० (७५.५२%),शिंगुर्णी २२०१ पैकी १४७० (६६.७९%),कोळेगाव ३९४० पैकी २८४३ (७२.१६%),फळवणी ३१४३ पैकी २१६० (६८.७२%),तांदूळवाडी ५८५८ पैकी ३९५६ (६७.५३%),शेडेचिचं ९८२ पैकी ७५७ (७७.०९%),धानोरे १४०८ पैकी १११७ (७९.३३%),तोंडले १९३७ पैकी १३९९ (७२.२३%),द्सूर १५०४ पैकी १२६८ (८४.३१%),बोंडले १५०२ पैकी ११४१ (७५.९७%),उघडेवाडी २४३१ पैकी १९२६ (७९.२३%)

महायूती व महाआघाडीत माळशिरस तालूक्यात चुरस

खडूस (रजनी साळवे) देशात व राज्यात सत्ता परिवर्तन होताना सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालूक्यातही विधानसभेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाची लाट टिकेल की , राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाची लाट टिकेल , म्हणजेच दुसऱ्या शब्दात माळशिरस तालूक्याच्या मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहितेपाटील व नरेद्रमोदीच्या प्रतिमेलाच मते दिली . तशीच ती स्थानिक पातळीवर आता विधानसभा निवडणूकीतही देतील का ? ., या प्रश्नाच्या उत्तरावरच माळाशिरस तालूक्याच्या आमदारपदाची सूत्रे कोणाकडे जाणार ते ठरणार आहे .
या प्रश्नाचे उत्तर होकार अर्थी आलेतर भाजपाच्या अगदी नवख्या काल , परवा पक्षात
आलेल्या उमेदवाराकडूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाजलेल्या उमेदवाराचा सहज आश्चर्यकारकरीत्या पराभव होईल आणि भारतीय जनता पक्ष हा शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मदतीने माळशिरस तालुक्‍यात पुन्हा सत्तेवर बसेल आणि ते उत्तर नकारार्थी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर सत्ता हस्तगत करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अकलूज येथे ज्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली त्या उमेदवाराने विजय मिळविला. त्यातही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या स्वतःचे हक्काचे मतदान ही जमेची बाजू ठरली होती आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणूक विजयानंतर माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात पक्षसंघटना मजबुतीकरण करण्यास लक्ष घातले आणि मजबूत करण्याचा एक भाग म्हणून विधानसभा निवडणूक पार झाली आणि पक्ष मजबूत करण्याचा मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थेट पाचारण करण्यात आले या विधानसभा निवडणुकीत उमेदवार भाजपलाच निवडून द्या व एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच निवडून द्या असे साकडे गल्लीतही व वाड्या-वस्त्यांवरही मतदार राजांना घालण्यात आले माळशिरस मतदार नेमका काय करेल तो पुन्हा नमो नमहा म्हणत भाजप पक्षाला एकतर्फी विजय मिळवून देईल का ? की स्थानिक पातळीवर वेगळा विचार करून ग्रामीण भागात सहकार क्षेत्रावर वरचष्मा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून देईल .याची उत्सुकता आता लागली आहे या निवडणुकीतील प्रमुख पक्षांमधील फोडाफोडी सुरू झाली ती काही गोष्टी गृहीत धरूनच त्यानंतर उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यात मात्र भाजप पक्षाने अकारण चुकीच्या खेळी केल्या बाहेरून आयात उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली आणि त्यातही पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून तालुका बाहेरील व्यक्तीस उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवार हा मुद्दाही पक्ष प्रतिमेला मारक ठरला त्याचा विपरीत परिणाम पार्श्वभूमीचे उमेदवार दिलेल्या प्रभागात नव्हे तर सर्व तालुक्यात झाला दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागल्याने हबकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी निश्चितीच्या टप्प्यात खूपच कौशल्य वापरल्याचे दिसून आले स्थानिक आणि प्रभावी उमेदवार निश्चित केला गेला . ग्रामीण भागातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी पक्षाचा वर्चस्व असल्याकारणाने वर्चस्व प्रस्थापित करीत खणखणीत प्रभावी उमेदवार दिला गेला त्यामुळे प्रचारात अन्य मुद्दे यापेक्षा भाजप उमेदवार हाच मुद्दा केंद्रस्थानी राहिला .भाजपने मात्र विकासाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजवटीतील कमकुवत मुद्देही मांडले अर्थात कार्यकर्ता हा मोहिते-पाटलांचा आत्मा असल्याने प्रदीर्घकाळ सत्तेची सूत्रे सांभाळलेल्या मोहिते-पाटील घराण्याची अस्तित्वाची लढाई आहे मतदार गृहीत धरून आखाडे बांधले तर तोंड पोळून घ्यायची वेळ येते .हे या पूर्वीच्या अनुभवावरून दिसून आले आहे त्यामुळे आयात उमेदवार व स्थानिक उमेदवार यामध्ये कोणाची सरशी होणार यावरच येणारा निकाल अवलंबून आहे.

पुंगळी काढून बेशिस्त गाडी चालवल्यास नातेपुते पोलिसांकडून केला जाणार गुन्हा दाखल

नातेपुते (प्रमोद शिंदे)* नातेपुते पोलीस ठाणेकडून यांच्याकडून सर्व नागरिकांना व तरुणांना आवाहन करण्यात आले आहे,*
दिनांक 24/ 10/19 रोजी मत मोजणी प्रक्रिया असून निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजा मध्ये फटाके वाजवणे ,गुलाल उधळणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात. त्यामुळे मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे वाईट परिणाम शहरातील व ग्रामीण भागातील लोकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात.

🛑 पुंगळ्या काढून मो/सा फिरवणाऱ्याचे मोटर सायकल वर कठोर कायदेशीर कारवाई करून मोटरसायकल संबंधित सर्व गुन्हे अशा लोकांवर दाखल करण्यात येतील.

🛑 आगामी दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये जेलमध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

🛑 गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही भविष्यकाळातील फायदेही मिळणार नाहीत

🛑 शांततेत विजय साजरा करणे गुन्हा नाही परंतु पुंगळ्या काढून मो/सा फिरवणे, विरोधकांच्या घरासमोर फटाके वाजविणे, बेकायदेशीररित्या वाद्य लावून मिरवणूक काढणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने विरोधकांना चिथाविणे देणें, समाजातील शांतता बिघडविणे, मागील वादावरून भांडण करणे, वाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरणे, आवाजाचे प्रदूषण करणे हे गंभीर गुन्हे आहेत.. अशांवर सक्त कारवाई करण्यासाठी आम्ही तयारीत आहोत…

🙏🏼 आतापर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यास सर्व नातेपुते व ग्रामीण भागाचे नावाला साजेसे असे प्रशासनास सहकार्य केल्याबद्धल सर्व नातेपुते व ग्रामीण भागातील जनतेचे सोलापूर ग्रा जिल्हा पोलीस दल तर्फे आभारी व्यक्त करण्यात आले आहे, याप्रमाणेच मतमोजणी प्रक्रियाही शांततेत पार पाडण्याचा आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी केले आहे

 

नारायण दास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर येथे दीपावलीनिमित्त विविध उपक्रम

इंदापूर ( प्रतिनिधि )💐🏨🌹🏨👭👬👭👬आज दिनांक १९/१०/१९ श्री . नारायणदास रामदास प्राथमिकविद्यामंदिर प्रशालेत बालवाडी विभाग आणि इ. १ली ते ४थी विद्यार्थ्यांनी दिपावालीनिमित्त आयोजित विविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला . बालवाडी मधील मुलांनी रांगोळी काढणे, रंगीत कागदाचे आकाशकंदिल 🏮बनविणे यात सहभाग घेतला . पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध 🌷🌹🌸🌺फुलांचे हार स्वतः बनविले तर दुसरीच्या मुलांनी टाकाऊ📿 लेस,🎨 रंगीत खडे, डाळी अशा साहित्याचा वापर करत भेटकार्ड🧧 बनविण्याचा आनंद घेतला. इयत्ता तिसरी च्या विद्यार्थी वर्गाने जुन्या पणत्या रंगवून विविध साहित्य वापरून सजावट करुन त्या पणत्या नविन बनविल्या तसेच हार बनविण्याचा आनंद घेतला . इयत्ता ४ थी मुलींनी फुलांची रांगोळी रेखाटली आणि रंगीत आकाशकंदिल 🏮🏮स्वतः गोटीव कागदापासून तयार केले . अशाप्रकारे आज मुले विविध उपक्रमात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले . शालेय सर्व सहकारी स्टाफने सहकार्य केले . सदर उपक्रमास मुख्याध्यपिका आगरखेड मॕडम यांनी मार्गदर्शन केले . 💐🏨👭👬🙏🏻🙏🏻

फोंडशिरस येथे पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या पेट्रोल टँकर च्या डिक्स टायर ची धाडशी चोरी

फोंडशिरस येथे पेट्रोल टँकर च्या डिक्स टायर ची धाडशी चोरी
नातेपुते (प्रमोद शिंदे) फोंडशिरस  तालुका माळशिरस येथे इंडियन ऑइल च्या बाणलिंग पेट्रोल पंप येथील पेट्रोल टँकरच्या डिक्स टायरची धाडसी चोरी करण्यात आली हकिकत आशिकी दिनांक 19 /10 /2019 रोजी रात्री बारा ते पहाटे सहा दरम्यान MH -AF45-1000 या पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या टँकरचे सात डिक्स सह टायर तसेच दोन बॅटऱ्या केबिन मधील इंजिन कव्हर जवळपास 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मुद्दामून लबाडीने चोरून त्याची तक्रार फिर्यादी महादेव सुखदेव बनकर राहणार फोंडशिरस यांनी नातेपुते पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास पोलीस नाईक राऊत करत आहेत. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सद्या निवडणुकीचे वातावरण असून सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तसेच ठिकठिकाणी पोलीस चौकी व सीसीटीव्ही कॅमेरे फोंडशिरस व नातेपुते परिसरात असून सुद्धा आशा धाडसी चोरी प्रकार होत आहे. याअगोदर दोन दिवसापूर्वी नातेपुते येथेही दोन घरफोड्या झाल्याचे उघड झाले आहे. सध्या निवडणूक तसेच दिवाळी जवळ आल्याने चोरांचं चांगलं फावत आहे. नेहमीच नातेपुते व परिसरात चोऱ्या होतात. तसेच चोऱ्यांचे प्रमाण ही वाढत आहे या चोरांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.

You may have missed