मुंबई

२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार

२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार

समाजरक्षक वैभवजी गीते साहेबांच्या खडतर पाठपुराव्याला यश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- संविधान सन्मान महोत्सव आयोजित करण्यासाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना भेटून निवेदन दिले तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या सचिवांना भेटून निवेदन देऊन चर्चा केली होती.याची दखल घेत शासनाने शासन निर्णयानुसार

भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा व संधीची समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने दि. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण केलेली आहे. सदर राज्यघटना ही दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आलेली आहे. त्यानुषंगाने ज्या संविधानाने कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने राज्यात दरवर्षी दिनांक २६ नोंव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे दिनांक ६ डिसेंबर हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांभिर्याने पालन करावयाचा दिवस असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने दिनांक २६ नोव्हेंबर, २०२२, संविधान दिन ते ६ डिसेंबर, २०२२, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत “समता पर्व” आयोजित करण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाणे शासन निर्णय काढला आहे यामध्ये खालील कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यक्रम राबविणारी यंत्रणा
दि.२६ नोव्हेंबर २०२२, संविधान दिन ते दि. ६ डिसेंबर, २०२२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीतील समता पर्वामध्ये आयोजित कार्यक्रमाबाबत पत्रकार,राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, समाज कल्याण आयुक्तालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे परिषदेचे आयोजन व कार्यक्रमास प्रसिध्दी देणे.
२६ नोव्हेंबर
Walk for Constitution / प्रभात फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, राज्यातील सर्व अनुदानित, विना अनुदानित महाविद्यालये, सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेले सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालये, दिव्यांग शाळा, अनुदानित वसतिगृहे इ.संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन
राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये,जिल्हा परिषदा,पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायती, महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,जिल्हास्तरावर पालकमंत्री,
लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा तथा कार्यक्रमाचे आयोजन निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा,लेखी परिक्षा,
२७ नोव्हेंबर २०२२,२८ नोव्हेंबर २०२२,२९ नोव्हेंबर,३० नोव्हेंबर २०२२ राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये, सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालये, दिव्यांग शाळा, अनुदानित इ. राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,संविधानविषयक व्याख्याने (विषय- अधिकार व कर्तव्ये) सामाजिक न्याय भवनात पत्रकारांची कार्यशाळा ( विषय सामाजिक न्याय : विभागाची नवी दिशा) संविधान या विषयावर भित्तीपत्रक,पोस्टर्स, बॅनर इत्यादी बाबत जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे
समाजसेवी प्रतिनिधी,कर्मचारी वर्ग यांची कार्यशाळा विषय : अनुसूचित जाती उत्थान : दशा व दिशा
१ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर युवा गटांची कार्यशाळा
२ डिसेंबर २०२२ रोजी
स्थळ भेट : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी
जिल्हयातील विविध तालुक्यात जेष्ठ नागरीक,दिव्यांग, तृतीयपंथी व ३ डिसेंबर २०२२ रोजी
वृध्द यांच्यासाठी माहितीची कार्यशाळा समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त,सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थीना विविध लाभाचे वाटप, बक्षिस वितरण
४ डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र आयोजन राज्यातील सर्व तालुकास्तरावर राज्यातील सर्व तहसिलदार,गट विकास अधिकारी
५ डिसेंबर ६ डिसेंबर २०२२ संविधान जागर व येणाऱ्या ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनाच्या संदर्भात अभिवादनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन, व समता पर्वाचा समारोप राज्यस्तरीय कार्यक्रम चैत्यभूमीवरील कार्यक्रम
अभिवादन रॅली राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद पडताळणी समिती
योजनांच्या माहितीची कार्यशाळा अधिकारी व कृषी अधिकारी
राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे,दिनांक २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर, २०२२ या कालावधी दरम्यान होणाऱ्या समता पर्व कार्यक्रमाच्या सनियंत्रणाकरीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेअंतर्गत कार्यरत समतादूत उपलब्ध करून देण्याबाबत आदेश काढावेत.कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी त्या त्या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांची राहील व कार्यक्रमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पर्यवेक्षणाची
जबाबदारी संबंधित प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण यांची राहील.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांची राहील असे शासनाने आदेश दिले आहेत.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांनी संविधान सन्मान महोत्सव साजरा करण्यासाठी मंत्रालयीन पाठपुरावा केला.संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी सहसचिव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,राज्य महिला संघटक यांनी पंचशीला कुंभारकर
राज्य निरीक्षक दिलीप आदमाणे,राज्य खजिनदार शरद शेळके,राज्य निरीक्षक बी.पी.लांडगे,राज्य व्यवस्थापक अम्पल खरात यांनी शासनाचे अभिनंदन करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.

संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे……वैभव गिते

संविधान दिन साजरा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करावे……वैभव गिते

संविधान दिनाची अंमलबजावणी न करणारा देशद्रोहीच…..पंचशीला कुंभारकर

             
                                      नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्यावतीने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची  भेट घेऊन निवेदन दिले आहे.निवेदनात 26 नोव्हेंबर हा दिन संविधान दिवस  म्हणून साजरा करावा आणि जो अधिकारी कर्मचारी प्राचार्य,मुख्याध्यापक टाळाटाळ करील त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर 2008 च्या शासननिर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी.याकरिता राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये जिल्हा परिषद पंचायत समित्या,नगरपालिका,महानगर पालिका,ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधान दिवस पुढीलप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व शासकीय निमशासकीय विभागांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात यावे.
संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालयांमार्फत त्या दिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी.व त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका मूलभूत हक्क,कर्तव्य,व जबाबदाऱ्या, इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळक रित्या दिसतील असे बॅनर, पोस्टर वापरावेत.
याबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध/भित्तीपत्रके/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.शासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने,कार्यक्रम आयोजित करावेत.संपूर्ण कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल व्हिडिओ शूटिंग,फोटो,5 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठवावा.
ज्याप्रमाणे केंद्रसरकार व राज्य सरकार तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले आहे.त्याचप्रमाणे हर घर संविधान असे अभियान प्रत्येक घरोघरी राबविण्यात यावे.अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयीन प्रमुख,महाविद्यालयांचे प्राचार्य,शाळांचे मुख्याध्यापक,26 नोव्हेंबर दिनी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून संविधान दिन साजरा करीत नाहीत.शासनाच्या आदेशानुसार संविधान दिन साजरा करीत नाहीत अशा कार्यालयीन प्रमुखांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी.सर्व विभागांचा वस्तुनिष्ठ अहवाल संविधान दिन साजरा केल्याचा व्हिडीओ चित्रीकरण करावे म्हणून आदेश देण्यात यावेत.ज्या शाळा संविधान यात्रा प्रभात फेरी काढणार नाहीत अशा शाळांची मान्यता रद्द करावी.शासकीय अधिकाऱ्यांनी कसुरी केल्यास देशद्रोही समजून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे.यामध्ये कसुरी केल्यास संघटनेच्या माध्यमातून जे कार्यालयीन प्रमुख संविधान दिन साजरा करणार नाहीत अशांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल तसेच आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी.असा इशारा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने राज्य सचिव मा.वैभव गिते यांनी दिला आहे.हे निवेदन सामान्य प्रशासनाच्या प्रधान सचिवांना,शासनाच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहे.निवेदनावर राज्य संघटक पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम दादा कांबळे,राज्य महिला संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांच्या सह्या आहेत.

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

बीडमध्ये शेतीच्या वादातून झालेल्या पारधी समाजातील तिहेरी हत्याकांडाचा तीव्र निषेध – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -मुंबई दि. 15 – बीड मधील केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून पारधी समाजातील एकच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या तिहेरी हत्याकांडाचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केला आहे.
पारधी समाजातील तीन जणांची शेती च्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या तिहेरी हत्याकांडाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत बीड चे जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी त्याच प्रमाणे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी आपण संपर्क साधणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष पप्पू कागदे याप्रकरणाकडे लक्ष ठेऊन असून पीडित कुटुंबाची रिपाइं चे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे तसेच गौतम बचुटे; बाळासाहेब ओव्हाळ या रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तात्काळ भेट घेतली आहे. अन्यायग्रस्त पारधी समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा असून गरीब शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी शोषित समुहाला रिपब्लिकन पक्ष कायम साथ देत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

        

मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मुजोरांना आवाहन

मजुरांनी चालत आपल्या घरी जाऊ नये रामदास आठवले यांचे मुजोरांना आव्हान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – (प्रमोद शिंदे) लॉक डाऊन मुळे देशातील व महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून देशातील व महाराष्ट्रातील मजूर पर्याय नसल्याने आपल्या गावी चालत जाण्यासाठी निघाली आहेत त्यामुळे अपघात व अनेक घटना घडत असून मजूर वर्गाने चालत आपल्या घरी जाऊ नये असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मजुरांना केले आहे
 तसेच ते म्हणाले की शासनाने रेल्वे व बस ची सुविधा सुरू केली आहे. मजुरांनी रेल्वे व बसनेच आपल्या घरी गेले पाहिजे. सरकारने मजुरांना मास्क, सानीटायझर व सुरक्षेची साधने दिली पाहिजेत. औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या 16 मजुरांना प्रत्येकी 25 लाख रुपये सरकारने द्यावेत
 अशी मागणी सुद्धा रामदास आठवले यांनी केले आहे.



आपल्या घरी पायी निघाले मुजोर
शासनाने मजुरांसाठी रेल्वेची सुविधा केली आहे
औरंगाबाद रेल्वे अपघात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या वारसास प्रत्येकी 25 लाख रुपये द्या आठवले यांची मागणी

मदर्स डे निमित्तानेआई अनुसायाची यशोगाथा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क-साधारणतः 1982 साली नीराब्रिज , एकशिव , तालुका माळशिरस ,जिल्हा सोलापूर .येथील रहिवाशी गुलाब आनंदा बनसोडे यांची जेष्ठ कन्या अनुसया हिचा वयाने 16 वर्ष मोठा असलेल्या मुंबईस्थित पोलीस मुलाशी विवाह झाला खरा . परंतु मुंबईत आल्यापासून तिचे वनवासाच सुरु झाले . त्रास सुरु झाला . नवरा पोलीस असल्यामुळे इतरांचे काही चालत नसे . परंतु लग्नानंतर मुलीचे सासर हेच सर्वस्व असते त्या प्रमाणे तिने अगदी खंभीर पणे आहे त्या प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. आस्यातच 10-12 वर्ष निघून गेली , 3 मुलींच्या पाठीवर 1 मुलगा झाला . तरीही त्रास चालू होता .उलट या चिमुरड्यांमुळे तिची दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली . परंतु या परिस्तितीत मुलांमुळं तिला जगण्याचं बळ आलं.अन वेळप्रसंगी घरचा , मुलांचा शाळेचा खर्च भागवण्यासाठी , मुलींच्या हॉस्टेल मध्ये काम करुन , तेथील मुलीना जेवणाचे डबे पूरवून परिस्थितीला न घाबरता जोमाने,जिद्दीने,चिकाटीने खंबीरपणे सामोरे जाऊन , मुलांना शिक्षण देऊन, उच्च शिक्षित बनवले, त्याच बरोबर , सुसंस्कृत बनवून धम्माचे अनुयायी बनवले . आज त्याचेच फळ म्हणून मोठी मुलगी मंजुषा सौदी अरेबिया येथे उच्च पदावर कार्यरत आहे . तर दुसरी मुलगी आणि मुलगा सुद्धा मुंबई मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत .
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्याच्यामुळे हा सर्व त्रास सहन करावा लागला तो नवरा म्हातारपणी जेंव्हा आजारी पडला तेंव्हा सुद्धा धम्माच्या नितीप्रमाणे सर्व माफ करुन त्याची 2वर्ष अविरत सेवा केली . ज्या वडिलांनी कधी डोक्यावरून मायेने हाथ फिरवला नाही त्या वडिलांची एव्हडी सेवा या उच्च sikshit मुलांनी केली आहे तशी मुले क्वचितच आजच्या युगात भेटतील .व्हिडीओ पाहून कदाचित तुमच्या लक्षात येईल . हे सर्व फक्त आणि फक्त त्या अडाणी आईच्या कष्टचे, त्यागचे फळ आहे . म्हणूनच तिने हा संसाररुपी रथ एकहाती purntwas आणून सोडला आहे . अत्यंत बिकट परिस्तिथीवर खंबीरपणे जिद्दीने लढून विजय मिळवनाऱ्या या आईला mothers day च्या लक्ष लक्ष शुभेच्छा . 💐💐💐

You may have missed