आंतरराष्ट्रीय

टोकावडे येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क
संदेश भालेराव

…..य.स.दा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य ,ग्रामस्थ मंडळ टोकावडे, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून काल मुरबाड तालुक्यातील टोकावडे गावात जी प्लस हार्ड हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे वन विभाग कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बीपी, डायबीटीस, इसीजी तपासणी, डोळे तपासणी, हाडांची तपासणी तसेच यावेळी रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते .या शिबिरासाठी यसदा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर केवल ऊके तसेच यसदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे , भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा अध्यक्ष भरत दळवी सर, तसेच एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य सचिव वैभवजी गिते
टोकावडे येथील श्रमजीवी संघटनेचे युवा कार्यकर्ते दिनेश नंदकर, तसेच एन.डी.एम.जे.संस्थेचे मुंबई ठाणे विभाग अध्यक्ष बंदीश सोनवणे , सिव्हिल इंजिनियर सतेश तायडे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे पत्रकार संदेश भालेराव आदी उपस्थित होते. सामाजिक महिला कार्यकर्त्या गौरी गीते व एन.डी.एम.जे. कल्याण डोंबिवली सचिव संदिप घुसळे सर उपस्थित होते .यावेळी ग्रामस्थ मंडळ टोकवडे यांच्या वतीने यसदा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच जी प्लस हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचेही स्वागत करण्यात आले. अनेकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डोळे तपासणीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. लाईफ लाईन ब्लड बँक बापगाव यांच्या माध्यमातून अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले .पुढच्या आठवड्यात २२ जून २०२४ रोजी चासोळे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एन.डी.एम.जे.महाराष्ट्र महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके यांनी संपूर्ण मुरबाड ,कल्याण ,बदलापूर, अंबरनाथ या ग्रामीण भागात यशदा संस्थेच्या माध्यमातून या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना होणार आहे असे सांगितले. भरत दळवी यांनी यावेळी सांगितले की मुरबाड, कल्याण ,बदलापूर ,अंबरनाथ या ग्रामीण भागामध्ये यशदा संस्थेच्या माध्यमातून आरोग्य आपल्या दारी ,दवाखाना आपल्या दारी या उपक्रमावर भर दिला जाणार आहे. आरोग्य आपल्या दारी ही मोहीम यशस्वी होणार आहे .यावेळी यावेळी हेही उपस्थित होते. या शिबिराला डॉक्टर योगेश राठोड आणि डॉक्टर योगेश गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी चेतन मानधने ,जगदीश शिवदे, अशोक ठाकरे, अभय नंदकर, किशोर साबळे , हरीचंद्र पवार, सुशील चकवा तसेच टोकावडे गावातील सर्व युवा कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले
.

तब्बल सत्तावीस वर्षांनी जुन्या आठवणी घेऊन भेटले दहिगावचे मित्र-मैत्रिणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दहावीची परीक्षा दिली की अनेक विद्यार्थी आपापल्या करिअरच्या शोधात सोयीनुसार आपल्या जुन्या सवंगड्यांना सोडून गगन भरारी घेण्यासाठी नव्या दिशा शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यानंतर उच्च शिक्षण, नोकरी,व्यवसाय, नंतर कुटुंबाची जबाबदारी त्याचबरोबर सामाजिक कार्यात सामील होता होता कसे भरभर दिवस निघून जातात कळतच नाही. त्यात अनेक वर्षांनी जुन्या मित्रांची कुठेतरी भेट होते. आणि ठरतं सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र यायचं असेच दहिगाव हायस्कूल दहिगाव चे 1997 इयत्ता दहावी चे सर्व  माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्नेह मेळावा व शिक्षकांचा कृतज्ञता मिळावा चैतन्य कार्यालय शिंदेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात माजी शिक्षक श्री चंद्रकांत दीक्षित सर, क्षीरसागर सर, नामदेव राऊत सर, निर्मळ सर , मुकुंद मोरे सर ,श्रीमती ढोबळे मॅडम, अंकुश राऊत सर, ढोबळे सर, पानसरे सर तसेच बनकर मामा, सुळके मामा यांना  फेटा,  शाल ,सन्मान चिन्ह आठवणीचे आंब्याचे रोप आणि पुष्पगुच्छ गुरूंचा सन्मान करण्यात आले.यावेळी जुन्या मित्र-मैत्रिणींच्या खूप सार्‍या गप्पा झाल्या.तो / ती सध्या काय करते? मुलं काय करतात? माझं बरं चाललंय,तुझं कसं आहे? अशा अनेक गोष्टी झाल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.या स्नेह मेळाव्यास ५५ विद्यार्थी उपस्थित होते.तसेच दत्ता कदम ,गीतांजली दीक्षित , दादा किर्दक यांनी मनोगत व्यक्त केले.किसन ढोबळे सर , क्षिरसागर सर व दीक्षित सर यांनी मार्गदर्शन केले. उमेश खिलारे यांनी दोस्ती वर गीते गायली.या कार्यक्रमासाठी शहाजान शेख ,नितीन पाटील ,संतोष फुले, वैशाली सोरटे यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि प शिक्षिका दिलशाद काझी यांनी केले.आभार प्रदर्शन भिमराव नरळे सर यांनी केले .

राज्यघटना मोडली तर राष्ट्र कोलमडेल : डॅा. रावसाहेब कसबे

संदेश भालेराव मुंबई पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फूले आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव

भारतीय स्वातंत्र्याच्या पर्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना भारत देशाने स्वीकारली. त्यामुळेच आज अठरापकड जाती, धर्माचे १४० कोटी लोक एकत्र नांदत आहेत व आपला देश एक संघ आहे. विविध प्रांत, चालिरीती, भाषा, प्रथा, परंपरा सांभाळून आपण एक आहोत. जर का, राज्यघटनेत छेडछाड केली, तर आपले राष्ट्र कोलमडेल असे परखड मत प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी मंत्रालयात झालेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त संयुक्त जयंती उत्सव समिती २०२४ द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.
अनुसूचित जाती / जमाती / भज-विजा / इमाव / विमाप्र शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई च्या विद्यामाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून संयुक्त जयंती उत्सव समिती २०२४ च्या वतीने मा. श्री. सिद्धार्थ खरात सहसचिव, गृह विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.२६ एप्रिल, २०२४ रोजी मंत्रालय, मुंबई येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य ज्योतिबा फूले आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मा. डॉ. श्री नितीन करीर, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व मा. श्रो. दिनेश वाघमारे प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण उपस्थित होते. बाबासाहेब व महात्मा गांधी यांचे वैचारीक मतभेद होते. बाबासाहेबांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मंजूर झाली. गोलमेज परिषदेत भारतासाठी जो कायदा तयार करण्यात येत होता त्या कायद्याच्या स्ट्रक्चरल कमीटीचे डॉ. बाबासाहेब अध्यक्ष होते. सन १९३५ मध्ये हा कायदा भारतात अंमलात आला. बाबासाहेबांच्या कायदेविषयक ज्ञानाची माहीती महात्मा गांधी यांना होती. भारताला स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना निर्मितीचे काम सुरू होते. महात्मा गांधी यांच्यासमोर बाबासाहेबांचे नाव होते. भारतीय संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा सहभाग असायला हवा याबद्दल त्या काळात ब्रिटीश विदुषी म्युरियल लेस्टर यांनी बाबासाहेब व महात्मा गांधी यांच्या दरम्यान मध्यस्थीची भूमीका पार पाडल्याचे सांगून त्या वेळी पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचे वर्णन प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. शेवटी संविधानातील समता, बंधुता व भातृभावाचे तत्व समजून घेऊन सामाजिक जबाबदारीची भूमीका मंत्रालय व शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता, महात्मा फुले यांचा दलित, अस्पृश्य व शेतक-यांसाठीचा संघर्ष तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य हे गुण घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.. संविधानामुळेच आपण सर्वजण जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती करू शकलो असे सांगून महापुरूषांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. तसेच प्रधान सचिव मा. श्री. दिनेश वाघमारे यांनी बाबासाहेबांनी केलेल्या खडतर विद्यार्थी जीवनाची माहिती सांगितली. विपरीत परिस्थितीतही उच्च शिक्षणाच्या पदव्या मिळविण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. त्यांचे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या मंत्राने अस्पृश्यांचे जीवन बदलले. गुणवत्ता हा बाबासाहेबांचा मुख्य गुण असून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तो अंगीकारावा असे प्रतिपादन त्यांनी केले. संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण, उच्च शिक्षण, गुणवत्ता, चारित्र्य, स्वाभिमान व राष्ट्राभिमान ही गुणवैशिष्ट्ये आहेत असे सांगून ते सिम्बॅाल ॲाफ नॅालेज आहेत असे सांगितले. तसेच महात्मा फुले हे समता व समानतेबाबत लेव्हल फिल्डींगचा आग्रह धरणारे होते. तर ध्येय , निती, शौर्य आणि रयतेचा विचार छत्रपती यांनी मांडलेला असून महाराष्ट्र ही संतांची व महापुरुषांची भूमी आहे, मंत्रालय, पॅावर हाऊस मधून त्यांचे विचार आणि वारसा आपण चालवला पाहिजे असे विचार व्यक्त केले आणि संघटनेच्या कार्याचा गौरव केला.
अनुसूचित जाती / जमाती / भज-विजा / इमाव / विमाप्र शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई चे अध्यक्ष भारत वानखेडे, यांनी राज्यभर कार्यरत असलेल्या संघटनेच्या कार्याची माहीती देऊन दरवर्षी घेण्यात येत असलेल्या संयुक्त जयंती कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहीती दिली. डॅा. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी देण्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या प्रयत्नांची व त्यानंतर मिळालेल्या यशाची माहीती सांगितली. तसेच गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मा. सुजाता सौनिक मॅडम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्याची व पुस्तक विक्रीला प्रचंड प्रतिसादा मिळालेल्याबद्दल ची माहीती दिली…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती .शिल्पा नातू यांनी केले, पाहुण्यांचा परिचय श्री. संतोष साखरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन करताना श्री. सी. आर. निखारे यांनी महापुरुषांचा विचाराचा प्रचार व प्रसारही करण्याचे कार्य संघटनेच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून करीत असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी सुभाष गवई, अंबादास चंदनशिवे, भास्कर बनसोडे, सुबोध भारत, विजय नांदेकर, सी.आर. निखारे, एन. डी. पाटील, सविता शिंदे,, प्रिया रामटेककर, डी.के.खाडे, , श्रीम. चि. नि. सूर्यवंशी, अशोक आत्राम, राजेंद्र सवणे, अजित तायडे, रामदास शेळके, सुनील सरदार, गोपीनाथ कांबळे, नितीन सुर्वे, मनोहर बंदपट्टे, सविता साळुंखे, विकास थोरात, राजेश साळुंके, , प्रशांत सदांशिवे, देविदास भगुरे, रवींद्र पेटकर, सुनील सामंत, पूजा भोसले, विलास थोरात,सपना चव्हाण, राजेंद्र खरात, रविंद्र पवार, दयानंद कांबळे, रसिक खडसे, , मनोज कांबळे, , अरुण कसबे, ,संजय जाधव, विशाल घाडगे, विशाल जोंधळे, विलास थोरात, , विलास धायजे, विकास कांबळे, रविंद्र बोर्डे, संजय कुऱ्हे, बिकेन ठाकूर, विजय अंभोरे, तुषार पैठणकर, , , दीपक बैले मुरलीधर आढाव, , गजानन सारुकते, नरेंद्र शेजवळ, अश्विनी मेंढे, सुनील जाधव, योगेश वासनिक, विजय भोसले, प्रभू कदम, सुनील खाडे, मनीषा जमदाडे,महेश वालदे, प्रदीप खडसे, , , संध्या सोनवणे, श्रीराम गवई, मारुती फड, रोहित गमरे, भारती कोरगावकर, नितीन साखरे, अभिजीत कांबळे, , मिलिंद कांबळे, संदीप कांबळे, मनोज जोगदंड, विजय भोसले, मदन सोंडे, राजेंद्र बच्छाव, , सुरेंद्र सोनकांबळे, सुशील कांबळे विनायक कांबळे, कैलास मुंगरे, प्रकाश जाधव, , अमोल जल्हारे, कैलास शेलार, अशोक जाधव, रत्नप्रभा बेले, संभाजी जाधव, प्रविण पवार, संतोष साखरे, सुगंधा पवार, निलिमा मेश्राम, ज्ञानेश्वर पाटमासे, , डी. के. खाडे, किरण गावतुरे, दिलीप देशमुख, रवींद्र मिठबावकर, इत्यादी पदाधिकारी तसेच इतरही मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीच्या देवगड हापूस आंब्याचे नातेपुते मध्ये आगमन .

कर्नाटक राज्यांतील कमी दर्जाचा हापूस ग्राहकांना स्वस्तात मिळत असल्याने देवगड, रत्नागिरीच्या हापूसची मागणी घटून उत्पादकांना दर कमी मिळतोय. परंतु देवगड आणि रत्नागिरी भागातील हापूस आंब्याची चव ग्राहकांना आकर्षित करत आहे…

वामान बदलामुळे राज्यातील हापूस आंबा बागायतदार समस्येच्या गर्तेत बुडाले आहेत. या हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे आंब्याचे सर्वसाधारण उत्पादन मिळविण्यासाठी उत्पादकांना कीडनाशके, खते यांवर वाढीव खर्च करावा लागतोय. या वर्षी कोकणातील हापूससाठी सुरुवातीला वातावरण अनुकूल आहे, असे वाटत होते. त्यामुळे यंदा हापूस आंबा लवकर सुरू होईल, उत्पादनही चांगले मिळेल, अशी भाकिते वर्तविली होती. परंतु हापूसला मोहर लागल्यानंतर सततच्या ढगाळ वातावरण आणि आता वाढत्या उष्णतामानाने फळगळ होतेय. फळाची वाढ आणि पक्वतेतही अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच या वर्षी हापूस आंबा लवकर येऊनही उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही. दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र हापूसचे दर वाढलेलेच आहेत. अर्थात, ग्राहक पातळीवर होणाऱ्या अधिक दराचा फायदा हा मधस्थ, व्यापाऱ्यांच्या खिशात जातोय. हापूसला योग्य दर न मिळण्याचे एक कारण कर्नाटक, गुजरात येथून येणारा हापूस आंबादेखील आहे. बाहेरील राज्यांतून येणाऱ्या या तुलनात्मक कमी गुणवत्तेच्या हापूस आंब्याचा धुडगूस पणनच्या हापूस आंबा महोत्सवात पण पाहायला मिळतो. एवढेच नाही तर पुणे, मुंबई या शहरांबरोबर आता अलिबाग, रत्नागिरी, चिपळूणपर्यंत बाहेरचा हापूस जाऊन पोहोचला आहे. बाहेरच्या राज्यांतील हापूस स्वस्तात मिळत असल्याने देवगड, रत्नागिरीच्या हापूसची मागणी घटून त्यास दरही कमी मिळतोय. समस्या केवळ हापूस आंबा फळविक्रीतच नाही, तर कॅनिंगमध्ये देखील आहे.

दरवर्षी , बारामती,सांगोला, सांगली, सोलापूर, फलटण, या भागात शाली ट्रेड अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत देवगड – रत्नागिरी भागातील हापूस आंबे विक्री साठी आणले जातात …यंदाही येत आहेत. पूर्ण उन्हाळ्यापर्यंत हा आंब्याचा हंगाम चालणार असल्याची माहिती शाली ट्रेड अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर शोएब तांबोळी,सलमान काझी , सैफ अली तांबोळी यांनी दिली.

गेल्या वर्षी राज्यात हापूस आंब्याचे उत्पादन कमी होते. त्यामुळे आंब्याचे तसेच पल्पचे दरही अधिक होते. या वर्षी मात्र हापूस आंब्याचे उत्पादन अधिक असल्याने दर कमी आहेत. त्यामुळे पल्पचे दरही कमी होत आहेत. त्यातच गेल्या वर्षीचा २५०० कंटेनर पल्प शिल्लक असल्याने कॅनिंग व्यावसायिकांना तो कमी दरातच विकावा लागतोय, आंबा पल्प प्रामुख्याने आंबा बर्फीसह इतरही प्रक्रियायुक्त उत्पादनांना वापरला जातो. बाजारात आंबा बर्फीचे दर वाढले असून, ते काजू कतलीबरोबर आले आहेत. ग्राहक आंबा बर्फीऐवजी काजू कतलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आंबा बर्फीची पर्यायाने पल्पची मागणी घटली आहे. असेच आंब्याच्या प्रत्येक प्रक्रियायुक्त पदार्थांबरोबर झाले आहे. त्यामुळे हापूस आंबा प्रक्रिया उद्योजक, कॅनिंग व्यावसायिकांचे अर्थकारणही कोलमडले आहे. हापूस आंबा पल्पची मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. निर्यातीसाठी पुन्हा कर्नाटक, गुजरातच्या हापूसचा पल्प कमी दराने उपलब्ध होतोय. बाहेर देशातील ग्राहक रत्नागिरी, देवगड हापूसचा पल्प का कर्नाटक-गुजरातच्या हापूसचा पल्प एवढे बारकाईने पाहत नाहीत. त्यांना फक्त आंबा पल्प हवा असतो. म्हणून कर्नाटक-गुजरातच्या आंबा पल्पची निर्यातही वाढत आहे. कोकणात पल्पच्या माध्यमातून हजार कोटींच्या वर उलाढाल होत असताना त्यासही चांगलाच फटका बसत आहे. एकंदरीत काय तर रत्नागिरी, देवगड हापूसचा गोडवा कायम ठेवायचा असेल तर कर्नाटक, गुजरात येथून येणाऱ्या आंब्याची सरमिसळ थांबविली पाहिजे. कर्नाटक, गुजरात येथून राज्यात आंबा यायला काही हरकत नाही. परंतु त्याची ओरिजनल हापूस म्हणून राज्यात होत असलेली विक्री थांबली पाहिजेत. यासाठी कृषी, पणन विभागासह राज्य शासनाने काळजी घ्यायला हवी. कोकणातील हापूस आंबा उत्पादकांनी बागेवरील आपला उत्पादन खर्च कमी करायला हवा. त्याचबरोबर रत्नागिरी आणि देवगड हापूसची थेट विक्री तसेच मूल्यसाखळी उत्पादकांनीच विकसित करायला हवी. असे केल्यास यात होत असलेली भेसळ कमी होऊन हापूसचा प्रिमीयम दर उत्पादकांच्या हातात पडणार आहे .

मोटरसायकल व मंगळसूत्र चोरास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या


पुगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -प्रमोद शिंदे
नातेपुते आणि परिसरात वारंवार मोटर सायकल चोरी करणारा व मंगळसूत्र चोरणाऱ्या संशयत चोरास नातेपुते पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की,
नातेपुते पोलीस ठाणे येथे दि, 25 /03/2024 रोजी फिर्यादी नामे. अभिनंदन अरविंद जोशी रा. नातेपुते यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की त्यांची मोटरसायकल MH 45 B 1117 हिरो होंडा कंपनीची सीडी डाऊन 25,000/ रुपये किमतीची अक्षय शिक्षण संस्था नातेपुते येथे गेट समोर लावलेली असता दि. 18/03/2024 रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 99/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पोलीस हवालदार धोत्रे हे करत होते तसेच 13/03/2024 रोजी फिर्यादी नामे – सौ कमल बाळासाहेब घनवट रा. नातेपुते ह्या नातेपुते ते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी एसटी स्टँड नातेपुते येथून प्रवासाठी बस मध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील 10,000/ रुपये किमतीचे दोन डोरले असलेले मुळे मंगळसूत्र कुणीतरी आज्ञा चोरट्याने चोरून नेले बाबत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2024 IPC 379 अन्वये आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याचा तपास पोलीस हवालदार /718 भगत हे करत होते तसेच यापूर्वी दहिगाव चौक नातेपुते येथून 10,000/ रू किमतीची मोटरसायकल चोरी झाले बाबत तक्रारदार नामे – दशरथ सिद्धू शिंदे रा. दहिगाव यांची तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वारंवारं होणाऱ्या मोटरसायकल चोरी बाबत , सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरिश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग नारायण शिरगावकर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली
नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे, पोलीस हवालदार धोत्रे, अमित भगत, अमोल वाघमोडे, नितीन तळेकर,पोलीस कॉन्स्टेबल, रणजीत मदने, सोमनाथ मोहिते यांनी वरिष्ठांच्या प्राप्त सूचना मार्गदर्शन व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक व विश्लेषण करून 2 आरोपी यांचेकडून 3 गुन्हे उघड झाले असून त्यामधील दोन मोटरसायकल व दोन डोरले असलेले मनी मंगळसूत्र असे एकूण किंमत 45,000/ रुपये किमतीचा चोरीतील मुद्देमाल आरोपी उमेश पोपट लोंढे राहणार बरड ता.फलटण जिल्हा सातारा यास अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रीमांड मध्ये असुन गुन्ह्याचा तपास चालू आहे.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविषयी गुन्हे घडू नये यासाठी पोलिस पेट्रोलिंग मध्ये वाढ करण्यात आलेले आहे…
त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांन कडून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

जि प शाळा पिरळेतील शिक्षकांनी शाळेच्या परिस बागेत फुलवला भाजी पाल्यांचा मळा.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
जि प शाळा पिरळे येथील शिक्षक यांनी शाळेच्या परिसरात अनोखा उपक्रम राबवला आहे.
शाळेच्या परिसरात परिस बागेसाठी पुरेशी जागा असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग कसा केला पाहिजे याचे उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथील मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक यांनी एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवले आहे. शाळेमध्ये मध्यान भोजन योजना सुरू आहे. या यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्य अन्नासाठी दररोज बाहेरून पालेभाज्या आणाव्या लागतात. ह्या पालेभाज्या आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा बराचसा वेळ व पैसे खर्च होतात. तसेच तो भाजीपाला ऑरगॅनिक पद्धतीचा व विषमुक्त मिळत नाही. बाजारामध्ये रासायनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खरेदी करावा लागतो. यावर मुख्याध्यापक व काही शिक्षकांना एक भन्नाट संकल्पना सुचली ती म्हणजे शाळेच्या परिसरात ऑरगॅनिक पद्धतीचा भाजीपाल्याचा मळा तयार करण्याची.मुख्याध्यापक शंकर शिंगाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली. संजय ढवळे सर, हनुमंत फुले, जब्बर मुलाणी सर, अमोल खरात सर, सचिन निगडे सर, शिक्षिका, शेंडगे मॅडम, मुलाणी मॅडम, व नामदेव मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने परिश्रम घेत.शाळेच्या परिस बागेत अक्षरशा भाजीपाल्याचा मळा फुलवला.यामध्ये प्रामुख्याने शेवगा ,वांगी , टोमॅटो, दुधी भोपळा , घोसावळे , फ्लॉवर , मिरची ,कोबी, कढीपत्ता ,कोथिंबीर,मेथी , पालक , घेवडा , दोडका ,अशा ऑरगॅनिक विषमुक्त पाल्या भाज्यांचा समावेश आहे. या उपक्रमाने महाराष्ट्र भरात शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

तब्बल 25 वर्षानंतर दहिगाव हायस्कूलचे मित्र -मैत्रिणी एकत्र भेटले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेदहिगाव हायस्कूल दहिगाव विद्यार्थी मित्र-मैत्रिणी तब्बल पंचवीस वर्षानंतर भेटले.दहिगाव हायस्कूल दहिगाव 1998-99 इयत्ता दहावी च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी इ.10 वी पूर्ण होऊन 25 वर्षपूर्ती तसेच रोप्य महोत्सवानिमित्त एकत्र येण्याचा निर्णय घेतला.माजी शिक्षक यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कोरोना काळात कोरोनाशी लढताना शहीद झालेला वर्गमित्र महेश किर्दक याससामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच मजी शिक्षक,इ.10 वी 1999 बॅचमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैशाली कदम, दुतीय क्रमांक उत्तरा शिराळकर,तृतीय क्रमांक अतुल लुंगारे, वर्गातील भारतीय सैन्य दलातून देश सेवा करून निवृत्त झालेले जवान मेजर अजिनाथ फुले, शंकर बनकर, महेश चिकणे, शिवाजी दडस, यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्याआठवणींना उजाळा देत हास्य कल्लोळा सह मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रसाद फुले,सुनील कदम,अंबरनाथ किर्दक ,पांडुरंग मोरे,राजेंद्र पाटील,मल्हारी ऐवळे ,महेश चिकने ,अनंत साळवे ,शंकर खडे व सर्व सहकारी मित्र-मैत्रीण यांनी केले होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हभप दीक्षित सर, किर्दक सर,नगणे सर, क्षीरसागर सर, मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर, निर्मळ सर,पानसरे सर, ढोबळे सर, चव्हाण सर, आदी शिक्षक होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी  होते.संजय किर्दक-पांडुरंग सुतार/मोरे – शंकर खाडे- महेश गुजर-सुप्रिया पानसे उत्तरा शिराळ सुवर्णा खाडे संदीप काकडे-सुजाता चिकणे आशा शिराळकर,आप्पा बुधावले,अतुल लुंगारे, ताहेर शेख-अजित पाटी अजय कदम सुनिल सुळके सोपान मोरे,राम सरवदे, वैशाली सावंत-मोरे,सतीश नाकुरेउमेश पाटील-गणेश पाटील,सचिन शिंदे ,सारिका मोरे ,शितल सोरटे,वैशाली कदम,शरद नलवडे-शिवाजी दडस,कैलास मोरे शंकर चिकणे,महेश चिकणे,किरण चिकणे -आजिनाथ फुले, भारत फुले -1999 इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वकील संघटनेच्या वतीने जागर संविधानाचा ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


26 जानेवारी भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त माळशिरस तालुका वकील संघटनेच्या वतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या दरम्यान माळशिरस वकिल बांधवांनी यांच्यावतीने  आयोजित केलेला जागर संविधानाचा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2023 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी अकलूज येथिल लक्ष्मी बालाजी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर वक्तृत्व स्पर्धा ही ऑनलाइन घेण्यात आली, यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता, महाराष्ट्रातील अमरावती, धाराशिव, अहमदनगर, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड , सिंधुदुर्ग , मुंबई भागातील स्पर्धक सहभागी झाले होते.सदर स्पर्धेमध्ये क्रमांक पटकविलेल्या स्पर्धकांना  मा. , निवृत जिल्हा न्यायाधीश तथा डायरेक्टर ऑफ प्रोसेक्युशन सोपानराव निकम तसेच सरकारी वकील महेश कोळेकर, आक्काताई बडरे,  संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल,प्रमोद शिंदे, शंकर बागडे, हेड, स्मायल एफ एम अकलूज, आणि ॲड. नागनाथ शिंदे, अध्यक्ष, माळशिरस वकिल संघटना यांचे हस्ते देण्यात आले. सदर स्पर्धेची रूपरेषा आणि संकल्पना प्रास्ताविकेच्या माध्यमातून ॲड. सुमित सावंत यांनी मांडली. स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचित्रा कांबळे, गोरेगाव, मुबई, यांना मिळाला असून 11,111/- रुपये, द्वितीय क्रमांक प्रगती गेंड, भांबुर्डी, माळशिरस यांना 7,777/- रुपये, , तृतीय क्रमांक ॲड. अल्ताफ आतार, अकलूज यांना रक्कम रुपये 5,555/- , सर्वांना प्रमाणपत्र  सन्मानचिन्ह  देण्यात आले .तसेच दोन उतेजनार्थ पारितोषिक हर्षद पुडेगे, सोलापूर आणि आदित्य विलांकर, डोंबिवली, मुम्बई यांना प्रत्येकी रक्कम रुपये 3000,  देण्यात आले आहेत.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा.देविदास गेजगे यांनी काम पाहिले.या कार्यक्रमास परसरतील वकिल , विविध  क्षेत्रातील समजिक, राजकीय पक्षांतील  कार्यकर्ते  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲड. रजनी गाडे, ॲड. सुनिता सातपुते, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. धनंजय बाबर, ॲड. भारत गोरवे, ॲड. सुमित सावंत, ॲड. वैभव धाईंजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड.नितीन भोसले, ॲड. धर्याशिल भोसले, ॲड. मनोज धाईंजे यांनी प्रयत्न केले.

नातेपुते शहराला सीसीटीव्ही सर्वे लाईन ने जोडणार- आमदार राम सातपुते

पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-(प्रमोद शिंदे)

नातेपुते शहराला सीसीटीव्ही सर्वे लाईन ने जोडणार असल्याचे प्रतिपादन सुंन्धा स्वीटस अँड रेस्टॉरंट च्या उद्घाटन प्रसंगी आमदार राम सातपुते यांनी केले. नातेपुते शहराला 25 खेडी जोडलेली आहेत व्यापार व गावची सुरक्षितात  महत्वाची आहे.त्या साठी 1.5 कोटीची तरतूद तसेच सर्व रत्यांवर दिवे लवण्याठी 2.65 कोटी तरतूद केली आहे.काम लवकरच सुरू होईल.राव परिवाराने नातेपुते शहराला चांगले रेस्टॉरंट दिली आहे. माजी आमदार अर.जी.रुपणवर  बोलताना म्हणाले की राव कुटुंबाने हॉटेल सुरू करून लोकांची चांगली सोय केली आहे.या प्रसंगी मा.जी. प. उपाध्यक्ष राजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, डॉ.मोरे,रघुनाथ कावितके, मा.जी.प.सदस्य शरद मोरे, पं.स.सदस्य माऊली पाटील, नगराध्यक्ष अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,न.पं. बा.सभापती अतुल पाटील, रणवीर देशमुख, सर्व नगरसेवक, पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित.कार्यक्रमाचे आयोजन फत्तेसिंह राव,शैलेश राव,यांनी केले होते.

पिरळे ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी पालखी दिंडी सोहळा उद्घाटन संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
 पिरळे तालुका माळशिरस येथे श्री दत्त जयंती निमित्त  पिरळे ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्याचे सलग सातवे वर्ष असून या सोहळ्यात शेकडो भाविक सामील होतात.या सोहळ्याचे उद्घाटन माझी पंचायत समिती उपसभापती किशोर भैय्या सुळ, व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.19 डिसेंबर रोजी पादुका आगमन व 20 डिसेंबर रोजी पादुका पूजन, विना तुळस ग्रंथ पूजन करण्यात आले. तसेच डीजे, लेझीम, हालगी , टाळ, मृदुंग व पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखीची भव्य मिरवणूक काढून गाव  प्रदक्षणा करण्यात आली.याप्रसंगी सरपंच गणेश दडस, सरपंच अमोल दादा, माजी सरपंच, ज्ञानदेव शिंदे,संदीप नरोळे, महादेव शिंदे, दत्ता रुपनवर, पत्रकार प्रमोद शिंदे, धनंजय महाराज कदम, सुनील माने,अजित महाराज खंडागळे, भाऊसाहेब भिसे सर, हनुमंत फुले सर, दत्ता लवटे, नाथा लवटे, व भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिंडी सोहळ्याचे आयोजन मामासाहेब लवटे, सचिन सूर्यवंशी, काशिनाथ लवटे, यांनी केले.सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केले.याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले.

You may have missed