सोलापूर

आदर्श सरपंच म्हणून संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं -आ.राम सातपुते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आदर्श सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.असे प्रतिपादन माळशिरस तालुका विधानसभा आमदार आ.राम सातपुते यांनी पिरळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटीलयांच्या मार्गदर्शना खालीविविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की
दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत
पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,
उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील
महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदमसर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर
तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, सुनील बनकर शंकर जानकर मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे

खडतर परिश्रमाच्या जोरावर सतीश तात्या ढेकळे यांची गरुड झेप सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
एकशिव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील 40-41 वर्षाचा युवक सतीश तात्या ढेकळे जिद्द,मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर त्यांनी उद्योग सामाजिक क्षेत्रात गरुड झेप घेतले आहे.
खरंतर सतीश ढेकळे गरीब कुटुंबात जन्माला आलेला व्यक्तिमत्व प्राथमिक शिक्षण एकशिव येथे तर माध्यमिक शिक्षण प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे इयत्ता दहावीपर्यंत.परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम केल्याखेरीज पर्याय नव्हता म्हणून त्यांनी गाव सोडून बाहेर मजुरी करण्याचा निर्णय घेतला
व ते पेंटिंगचं काम करण्यासाठी मजूर म्हणून हैदराबाद येथे एका ठेकेदाराच्या कडे गेले सुरुवातीला काम कसं करायचं माहित नव्हतं पहिल्यांदाच घरातून बाहेर पडल्यामुळे बाहेरचं जग कसं असतं हे माहित नव्हतं पहिले चार-पाच दिवस वडापाव वर आपल्या पोटाचे भूभागवली.राहिला निवारा नव्हता म्हणून तिथेच सिमेंटच्या गोडाऊनमध्ये मुक्काम ठोकला हळूहळू एका चांगल्या व्यक्तीची ओळख झाली व त्या व्यक्तीने प्रामाणिकपणा पाहून काम दिले.
त्यानंतर सतीश तात्या ढेकळे यांनी कधीच माघार वळून पाहिलं नाही त्यांनी एक उत्तुंग गरुड झेप घेतली व आज सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली ते भाजपाचे पिरळे पंचायत समिती गणातून प्रबळ दावेदार मानले जातात.त्यांनी कोणत्याही राजकीय पदावरती नसताना अनेक लोकांना निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.
एकशिव व पिरळे व इतर ठिकाणी स्वखर्चाने अनेक बोअर वेल दिले.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गोर गरीब गरजू लोकांना पुणे मुंबई सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये लागणारी आर्थिक मदत केली,व पेशंट ला घरी सोडण्यासाठी अँबूलन्स ला जादा पैसे देण्याऐवजी स्वतःच्या गाडीने पेशंट ला घरी पोचवणे.
कोरोना काळात अनेक गरजू लोकांना किराणा साहित्य व दवाखान्यात साठी लागणारे सर्व औषधा सहित होणार सम्पूर्ण खर्च केला.
स्वतःच्या साई एंटरप्राइजेस या व्यवसायच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींना आर्थिक सहाय्य व व्यवसाय मार्गदर्शन करून अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केले.
गावात पावसाळ्यात ज्या ठिकाणी रस्ता मध्ये चिखल होऊन चालता येत नाही अशा, एकशिव पिरळे चव्हाणवाडी बांगार्डे ठिकाणी स्वखर्चाने खडीकरण करून रस्ता करून दिला.
सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, व शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेऊन दिला.
तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा,आट्यापाट्या व हॉलीबॉल आशा अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. लोकांचे आरोग्य चांगले राहावं म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन.
पुणे सारख्या शहरातील आमदार व नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सहकार्याने अनेकांना गरजवंताना व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य ही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत सर्व समाज उपयोगी कामे उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांचं कामच सर्व सामान्य लोकांना आवडत असून त्यांना अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पिरळे पंचायत समिती गणातून मधून मिळत आहे त्यामुळे पिरळे पंचायत समिती गणातून उद्योजक सतीश तात्या ढेकळे हे पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आशा
दमदार व दिलदार मित्राला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रमोद शिंदे पिरळे नातेपुत
9975903040

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह( बाळ दादा) मोहिते पाटील

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)शिवपुरी तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने महिला मेळाव्या चे आयोजन करण्यातले होते.या मेळाव्यात जयसिंह मोहिते पाटील हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तरध्यक्षस्थानी बाबाराजे देशमुख हे होते.कार्यक्रमात बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात.त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.बचत गट मेळावाच्या माध्यमातून सतीश ढेकळे यांनी महिलांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.आशा कार्यक्रमाचा महिलांनी फायदा घेतला पाहिजे. भविष्यात गावच्या प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना विशेष सहकार्य केले जाईल.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की आर्थिक दृष्ट्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण झालं पाहिजे पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करू. तसेच 08 मार्च रोजी नातेपुते येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते बोलत होते.या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची, उखाणे्धा घेण्यात आली व ढेकळे यांच्या वतीनेमोठ्या प्रमाणात बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.यावेळी एकशिव गावचे उद्योजक सतीश तात्या ढेकळे.मा.सरपंच शहाजी दादा धायगुडे  सरपंच सीमा संदीप नरोळे, शिल्पा रंजीत पाटील, सुरेखा विनोद हुंबे, प्रिया नितीन रुपनवर, तसेच उद्योजक संदीप नरोळे, संदीप वाघ,प्रताप पाटील,शंकर जानकर श्रीकेश वरुडे, शांतिनिकेतन साळवे,अय्याज मुलानी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना रुपनवर तर सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

ना.चंद्रकांत पाटील यांचे विरोधात नातेपुते शहर कडकडीत बंद.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी): मागील चार दिवसांपूर्वी पैठण येथे झालेल्या सार्वजनिक सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा ज्योतिबा फुले,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना नातेपुते शहरात देखील सर्व बहुजन समाजातील बांधव एकत्र येऊन बंद ची हाक दिली होती.या बंद साठी नातेपुते शहरातील नागरिक तसेच सर्व व्यापारी वर्ग यांनी शंभर टक्के गाव बंद मध्ये सहभाग नोंदविला.
सकाळी नऊ वाजता युवक वर्गाने नातेपुते शहरात फेरी काढून सर्व महामानव यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी एक वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन निवेदन देण्यात आले .यावेळी बोलताना रिपाईचे जेष्ठ नेते एन के साळवे यांनी सांगितले की या महामानवानी शिक्षणाची दारे बहुजन वर्गासाठी खुली केली नसती तर चंद्रकांत पाटील आज मंत्रीपदावर नसते.
रासप नेते बशीर काझी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बहुजन युवक यांना भरकटविण्याची मोहीम सध्या चालू आहे.

महामानवांवर जे जे बोलतील त्यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन रस्त्यावर यावे मग आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ रोहित सोरटे.

प्रत्येक महामानवाने देशाला समतेची शिकवण दिली आहे तरी काही लोक अजून त्यांचा दुस्वास कसा करू शकतात विशाल सोरटे.

समतेचा विचार देणाऱ्या महामानवांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न भविष्यात कोणी केला तर आज फक्त बंद पाळला आहे जर हे प्रकार थांबले नाहीत तर याच्या पेक्षाही तीव्र आंदोलन होतील. समीर सोरटे .

संघर्ष सोरटे यांनी प्रास्ताविक करून बंद मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रणजित कसबे,लखन सोरटे,सूचित साळवे,विशाल साळवे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
शेवटी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन रिपाईचे जेष्ठ नेते युवराज वाघमारे यांनी केले.हे निवेदन शासनाच्या वतीने मंडल अधिकारी श्री.चव्हाण,गाव कामगार तलाटी प्रभाकर उन्हाळे,नातेपुते पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्वीकारले.
दलीत महासंघ यांचे वतीने देखील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले.
नातेपुते शहरातील बंद यशस्वी करण्यासाठी एन के साळवे,युवराज वाघमारे,सुनील साळवे सर, बीपीन सातपुते, नवाज सोरटे,विनोद रणदिवे,रोहित सोरटे,किरण सोरटे,दादा साळवे,दत्ता सोरटे,अभिजित वाळके,वैभव सोरटे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,संघर्ष सोरटे,सूचित साळवे,रणजित कसबे,विशाल साळवे,बाळासाहेब सोरटे ,राहुल सोरटे,विशाल सोरटे,दादा अटक, चंद्रकांत राऊत व सर्व युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

वाहतुक कौडीमुळे पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची राजकुमार हिवरकर पाटील यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रतिनिधी ) बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत याच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाप्रमुख

राजकुमार हिवरकर – पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ . तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची मागणी केली.

सोलापूर जिल्हा सरहद ते खुडूस असे पालखी महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे . त्यातच साखर कारखाने सुरु झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे . यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून , सदरचे जे . एम . म्हात्रे कंपनीचे काम ऊस गाळप हंगाम संपेपर्यंत बंद करावे. माळशिरस तालुक्यात पाच व आजू बाजूच्या तालुका मध्ये दहा साखर कारखाने आहेत . वरील कारखान्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे . तसेच सदाशिवनगर येथील श्री. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना चालू झाला आहे . त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे . मुंबई , पुणे या ठिकाणावरून पंढरपूर कडे येणारे भाविक तसेच माळशिरस कोर्ट , तहसिल ऑफिस , पंचायत समिती , अकलूज मधील दवाखाने या ठिकाणी सतत जावे यावे लागते . बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर व रेडीयम दिसत नाही . त्यामुळे साखर कारखाने बंद होई पर्यंत जे . एम . म्हात्रे आणि कंपनीची अवजड वाहतूक बंद करावी व काम थांबवावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन केली आहे .

दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी

दहिगाव हायस्कूलचे 20 नोव्हेंबरला माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन, 54 वर्षानंतर भेटणार सवंगडी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे)-

मुख्याध्यापक मुकुंद मोरे चव्हाण सर फुले सर पाटील सर माने सर निर्मळ सर सर्व शिक्षक वर्ग हे स्वतः माजी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांना निमंत्रण देत आहेत

प्रगत शिक्षण संस्थेचे
दहिगाव हायस्कूल दहिगाव यांच्यावतीने 20 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता 1968 ते 2022 या कालावधी मधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात सुवर्ण महोत्सवानिमित्त तब्बल ५४ वर्षानंतर माजी विद्यार्थी एकमेकांना भेटणार आहेत.याची उत्सुकता सर्व माजी विद्यार्थ्यांना लागली आहे.दहिगाव हायस्कूल दहिगाव ने अनेक गुणवंत विद्यार्थी समाजाला दिले आहे. या हायस्कूल मधून अनेक उच्चपदस्थ अधिकारी मोठे व्यावसायिक विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी घडवलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना 54 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे काम संस्थेने केले आहे. असे म्हणतात की “ऋणानुबंधाच्या जिथे पडल्या गाठी… भेटीत दृष्टांता मोठी!”विविध ठिकाणी व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याने माजी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. संस्थेच्या वतीने माजी शिक्षक यांचा सन्मान व सर्वांना प्रीती भोजनाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक, शिक्षक व कमिटीच्या वतीने निमंत्रित करण्यात आला आहे.

श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने आरोग्याच्या दृष्टी कोणातून चांगले काम केले आहे-डॉ श्रेणिक शहा

नातेपुते प्रमोद शिंदे-
श्री 1008 महावीर दिगंबर स्वामी जैन अतिशय क्षेत्र ट्रस्टने सलग 23 व्या वर्षी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी डॉ.श्रेणिक शहा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
बोलताना ते म्हणाले की संस्थेने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले काम केले आहे.तेवीस वर्षात अनेक रुग्णांवर उपचार संस्थेने केले आहेत.तसेच या शिबिरामुळे अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना फायदा होत आहे.भविष्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्णांना सेवा मिळेल सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित त्यांना केले.तसेच ट्रस्टी नरेंद्र गांधी बोलताना म्हणाले थोड्याच दिवसात ट्रस्टच्या वतीने ब्रह्म महती सागर आयुर्वेदिक चिकित्सालय मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणार आहे.तसेच दहिगाव येथील भारतातील सर्वात सुंदर मेरू तयार झाला आहे.सी आर दोशी सरांचे स्वप्न होते की मोठी आरोग्य सेवा ट्रस्टच्या माध्यमातून उभी करायची आहे.ही संकल्पना आपण पूर्ण करणार आहोत.रथ उत्सव हा दहिगाव चा मानबिंदू आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तेजस चंकेश्वरा यांनी केले. कार्यक्रम उद्घाटनास श्री108 शुभंकीर्ती महाराज यांचे सानिध्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे दातार व उद्घाटक हिंगणगावकर दोशी परिवार हे होते. शिबिरात रुग्ण तपासणीसाठी डॉ.श्रेणिक शहा इंदापूर,डॉ.समीर दोशी अकलूज,डॉ.भूषण चंकेश्वरा, डॉ.महावीर गांधी, डॉ उत्कर्ष गांधी,डॉ निखिल फडे,डॉ अजिंक्य होरा, डॉ.सीमा गांधी यांनी 650 रुग्णांना मोफत सेवा दिली.मेडिकल असोसिएशनच्या वतीने दीड लाख रुपयांची औषधं मोफत देण्यात आली.या कार्यक्रमास आजी माजी सरपंच,उपसरपंच सोसायटी चेअरमन पदाधिकारी सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टी,श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

मानसाला नामस्मरणाशिवाय पर्या नाही-धैर्यशील भाऊ देशमुख


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
माझा राम सखा,मी
रामाचा,यश दे रामा,नको तूझी सत्ता”फक्त यश हवे असेल तर राम नाम जपा, आजच्या वेगवाण जीवनात नामस्परणाशिवाय पर्याय नसल्याचे मत चैतन्य जपसंकूलाचै कार्याध्यक्ष तथा शिबीर प्रमूख धैर्यशील देशमूख यांनी व्यक्त केलै.
लोंढैवस्ती(कांरूडे) यैथे चैतन्य जप संकूलाच्या २२व्या राज्यस्तरीय शिबिरात ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले ,नामस्परण केल्यास सूख ,समाधान मिळते,द्बेष ,कटूता, बाजूला ठेऊन प्रेम निर्माण करावे,महात्मा गांधी सारखी सहनशीलता अंगी बाळगा,ज्ञानाची भूक कधीहीसंपत नाही.
जपकारात फक्त हिंदूच नाहीत ,तर मूस्लीम,जैन,बौद्ब,पारशी,खीश्चन,या सर्व धर्माचे जपकार आहेत,या शिबीरात महाराष्टातील सर्व जिल्हातील जपकार सहभागी झाले आहेत,जपकाराने जात,धर्म न मानता,भगवंताचे नामस्परण करावे,
या शिबीरातुन अनेकांचे संसार वाचले आहेत,दारू,गूटखा,तंबाखू हि व्यसने सोडवाण्यात जप संकूलामूळे यश मिळाले.
जपकाराचे वर्तन आदर्श असले पाहिजे,औधंचे पंतप्रतिनिधी गोंदवलेकर महाराजाचे भक्त होते,ते नित्य नियमाने महाराजाच्या दर्शनास येत असत,
या कार्यक्रमास धनजंय पवार,राजेंद्र मोरे,विजय लोंढे,सूरेश लोंढे,सौ अश्विनी देऊस्कर,सतिश बर्गे,साहेबराव देशमूख,अर्जून काटे,ज्ञानेश्वर लावंड,हनूमंत पाटिल!प्रभाकर मस्कर,यूवराज सांळूखे,संजय गोसावी,नितीन लोंढे,सतिश बडवे,संपराव पांढरे,नितीन वायाळ,तूषार पवार,दत्ताञय नागमल,दिगंबर लाळगे,सूनिल देशपांडे,रामचंद्र सलगर,महादेव जाधव,माऊली ठोंबरे,उपस्थित होते

अतिशय क्षेत्र दहिगाव येथे परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात नूतनीकरण धर्म रथाचे उद्घाटन

अतिशय क्षेत्र दहिगाव येथे परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात नूतनीकरण धर्म रथाचे उद्घाटन 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
सालाबाद प्रमाणे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र वार्षिक रथोत्सवास दहिगाव ता माळशिरस जिल्हा सोलापूर येथे  कार्तिकी वद्य पंचमी निमित्त दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी रथोत्सवाची सुरुवात झाले आहे .सकाळी नऊ वाजता परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या उपस्थितीत स्व.श्री चंद्रकांत जीवराज गांधी पिलीव यांच्या स्मरणार्थ श्रीमती प्रगती चंद्रकांत गांधी व सौ समता प्रशांत गांधी,श्री व सौ प्रज्योती शितल गांधी दहिगाव, गांधी परिवार यांच्या वतीने भगवान श्री यांचा अभिषेक होऊन तसेच मंदिरामध्ये संगीतमय भक्तामर विधान दुपारी दोन वाजता संपन्न झाला. तसेच परमपूज्य 108 मुनीश्री शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात25 वर्षानंतर नूतनीकरण केलेल्या पाच मजली लाकडी धर्म रथाचे उद्घाटन करण्यात आले आहे व श्री 1008 भगवान महावीर यांच्या पालखीची शोभायात्रा पंडितांच्या माळावर वाजत गाजत काढण्यात आली प्रसंगी पंचक्रोशीतील अनेक भाविक उपस्थित होते.

You may have missed