सोलापूर

जि प शाळा पिरळेतील शिक्षकांनी शाळेच्या परिस बागेत फुलवला भाजी पाल्यांचा मळा.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
जि प शाळा पिरळे येथील शिक्षक यांनी शाळेच्या परिसरात अनोखा उपक्रम राबवला आहे.
शाळेच्या परिसरात परिस बागेसाठी पुरेशी जागा असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग कसा केला पाहिजे याचे उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथील मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक यांनी एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवले आहे. शाळेमध्ये मध्यान भोजन योजना सुरू आहे. या यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्य अन्नासाठी दररोज बाहेरून पालेभाज्या आणाव्या लागतात. ह्या पालेभाज्या आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा बराचसा वेळ व पैसे खर्च होतात. तसेच तो भाजीपाला ऑरगॅनिक पद्धतीचा व विषमुक्त मिळत नाही. बाजारामध्ये रासायनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खरेदी करावा लागतो. यावर मुख्याध्यापक व काही शिक्षकांना एक भन्नाट संकल्पना सुचली ती म्हणजे शाळेच्या परिसरात ऑरगॅनिक पद्धतीचा भाजीपाल्याचा मळा तयार करण्याची.मुख्याध्यापक शंकर शिंगाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली. संजय ढवळे सर, हनुमंत फुले, जब्बर मुलाणी सर, अमोल खरात सर, सचिन निगडे सर, शिक्षिका, शेंडगे मॅडम, मुलाणी मॅडम, व नामदेव मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने परिश्रम घेत.शाळेच्या परिस बागेत अक्षरशा भाजीपाल्याचा मळा फुलवला.यामध्ये प्रामुख्याने शेवगा ,वांगी , टोमॅटो, दुधी भोपळा , घोसावळे , फ्लॉवर , मिरची ,कोबी, कढीपत्ता ,कोथिंबीर,मेथी , पालक , घेवडा , दोडका ,अशा ऑरगॅनिक विषमुक्त पाल्या भाज्यांचा समावेश आहे. या उपक्रमाने महाराष्ट्र भरात शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

दहिगाव येथे आ.राम सातपुते यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
दहिगाव तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील  व सामाजिक कार्यकर्ते ते माळशिरस तालुका भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त   विविध कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन  आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, पत्रकार प्रमोद शिंदे, संदीप सावंत, संभाजी फुले, तसेच दहिगाव येथील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील   कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते. 100 रक्तदात्यांनी  रक्तदान रक्तदान केले. ज्ञानदीप ब्लड बँक यांच्यावतीने रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान यशस्वी होण्यासाठी शिव शक्ती प्रतिष्ठान व बाळासाहेब कदम व संदीप सावंत  मित्र परिवार  साॅईल टच अॅग्रो बारामती  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे असे प्रतिपादन ऍड. डॉ.केवल उके यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्र च्या झाडे लावा झाडे जगवा, माजी वसुंधरा,जलशक्ती बेटी बचाव अभियानांतर्गत.महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.याप्रसंगी उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध शाळेला आदर्श शाळा पुरस्कार तसेच विविध संस्था आदर्श ग्रामपंचायत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते,अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी चॅनलचे संचालक  विवाह  कायदा मसुदा  समिती सदस्य महाराष्ट्र शासन एन डी एम जे राज्य महासचिवडॉ केवल उके म्हणाले की .डॉ.केवल उके बोलताना म्हणाले आम्ही हे छोटस रोपट म्हणून लावलं होतं.आता त्याचा वटवृक्ष होतानाचा दिसतोय पुढे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रची  अशाच पद्धतीने प्रगती होत राहील.


 माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र चे काम हे उल्लेखनीय आहे.त्यांनी शोध पत्रकारिते सोबत समाज उपयोगी अनेक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबवले आहेत त्यांच्या माध्यमातून दीड लाख वृक्ष लागवड झाली आहे. हे कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एम के इनामदार, एन डी एम जे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके,आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, उद्योजक विनोद जाधव तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुद्धवासी आदर्श शिक्षिका कुमारी सविता साळवे मॅडम सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी  डॉ.एम के इनामदार बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनलअतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देत आहे. ,उद्योगपती विनोद जाधव म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र ने  महाराष्ट्रात चांगले नाव केले आहे आपल्यासारखे पत्रकारमंडळी देशभरात तयार झाली पाहिजे चॅनलच्या उभारण्यासाठी ल्यापिंग ग्रुपच्या वतीने लागेल ती मदत करू.           आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, अरुण तोडकर मा.सरपंच संदीप नरोळे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पत्रकाराच्या जीवनावरतीआधारित चित्रपट अहम सिनेमा अभिनेता अमीर भाई शेख,अभिनेत्री मृणालीकुलकर्णी हे होते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष बंदिश सोनवणे,राज्य महिला संघटक पंचशिलाताई कुंभारकर,ए एस आय,शैला साळवे मॅडम,ऍड.सुमित सावंत,प्रशांत खरात,मुंबई ठाणेविभाग प्रमुख संदेश भालेराव संपादक भीमसेन उबाळे, रिपाई तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे सोनवणे सरअंगणवाडी सेविका जि.प व विविध संस्था शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, आशा स्वयंसेवीका,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेच विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शन सादर केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी केली होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी,वलेकर सर यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

आदर्श सरपंच म्हणून संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं -आ.राम सातपुते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आदर्श सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.असे प्रतिपादन माळशिरस तालुका विधानसभा आमदार आ.राम सातपुते यांनी पिरळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटीलयांच्या मार्गदर्शना खालीविविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की
दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत
पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,
उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील
महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदमसर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर
तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, सुनील बनकर शंकर जानकर मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे

खडतर परिश्रमाच्या जोरावर सतीश तात्या ढेकळे यांची गरुड झेप सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
एकशिव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील 40-41 वर्षाचा युवक सतीश तात्या ढेकळे जिद्द,मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर त्यांनी उद्योग सामाजिक क्षेत्रात गरुड झेप घेतले आहे.
खरंतर सतीश ढेकळे गरीब कुटुंबात जन्माला आलेला व्यक्तिमत्व प्राथमिक शिक्षण एकशिव येथे तर माध्यमिक शिक्षण प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे इयत्ता दहावीपर्यंत.परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम केल्याखेरीज पर्याय नव्हता म्हणून त्यांनी गाव सोडून बाहेर मजुरी करण्याचा निर्णय घेतला
व ते पेंटिंगचं काम करण्यासाठी मजूर म्हणून हैदराबाद येथे एका ठेकेदाराच्या कडे गेले सुरुवातीला काम कसं करायचं माहित नव्हतं पहिल्यांदाच घरातून बाहेर पडल्यामुळे बाहेरचं जग कसं असतं हे माहित नव्हतं पहिले चार-पाच दिवस वडापाव वर आपल्या पोटाचे भूभागवली.राहिला निवारा नव्हता म्हणून तिथेच सिमेंटच्या गोडाऊनमध्ये मुक्काम ठोकला हळूहळू एका चांगल्या व्यक्तीची ओळख झाली व त्या व्यक्तीने प्रामाणिकपणा पाहून काम दिले.
त्यानंतर सतीश तात्या ढेकळे यांनी कधीच माघार वळून पाहिलं नाही त्यांनी एक उत्तुंग गरुड झेप घेतली व आज सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली ते भाजपाचे पिरळे पंचायत समिती गणातून प्रबळ दावेदार मानले जातात.त्यांनी कोणत्याही राजकीय पदावरती नसताना अनेक लोकांना निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.
एकशिव व पिरळे व इतर ठिकाणी स्वखर्चाने अनेक बोअर वेल दिले.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गोर गरीब गरजू लोकांना पुणे मुंबई सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये लागणारी आर्थिक मदत केली,व पेशंट ला घरी सोडण्यासाठी अँबूलन्स ला जादा पैसे देण्याऐवजी स्वतःच्या गाडीने पेशंट ला घरी पोचवणे.
कोरोना काळात अनेक गरजू लोकांना किराणा साहित्य व दवाखान्यात साठी लागणारे सर्व औषधा सहित होणार सम्पूर्ण खर्च केला.
स्वतःच्या साई एंटरप्राइजेस या व्यवसायच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींना आर्थिक सहाय्य व व्यवसाय मार्गदर्शन करून अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केले.
गावात पावसाळ्यात ज्या ठिकाणी रस्ता मध्ये चिखल होऊन चालता येत नाही अशा, एकशिव पिरळे चव्हाणवाडी बांगार्डे ठिकाणी स्वखर्चाने खडीकरण करून रस्ता करून दिला.
सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, व शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेऊन दिला.
तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा,आट्यापाट्या व हॉलीबॉल आशा अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. लोकांचे आरोग्य चांगले राहावं म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन.
पुणे सारख्या शहरातील आमदार व नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सहकार्याने अनेकांना गरजवंताना व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य ही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत सर्व समाज उपयोगी कामे उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांचं कामच सर्व सामान्य लोकांना आवडत असून त्यांना अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पिरळे पंचायत समिती गणातून मधून मिळत आहे त्यामुळे पिरळे पंचायत समिती गणातून उद्योजक सतीश तात्या ढेकळे हे पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आशा
दमदार व दिलदार मित्राला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रमोद शिंदे पिरळे नातेपुत
9975903040

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह( बाळ दादा) मोहिते पाटील

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)शिवपुरी तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने महिला मेळाव्या चे आयोजन करण्यातले होते.या मेळाव्यात जयसिंह मोहिते पाटील हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तरध्यक्षस्थानी बाबाराजे देशमुख हे होते.कार्यक्रमात बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात.त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.बचत गट मेळावाच्या माध्यमातून सतीश ढेकळे यांनी महिलांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.आशा कार्यक्रमाचा महिलांनी फायदा घेतला पाहिजे. भविष्यात गावच्या प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना विशेष सहकार्य केले जाईल.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की आर्थिक दृष्ट्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण झालं पाहिजे पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करू. तसेच 08 मार्च रोजी नातेपुते येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते बोलत होते.या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची, उखाणे्धा घेण्यात आली व ढेकळे यांच्या वतीनेमोठ्या प्रमाणात बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.यावेळी एकशिव गावचे उद्योजक सतीश तात्या ढेकळे.मा.सरपंच शहाजी दादा धायगुडे  सरपंच सीमा संदीप नरोळे, शिल्पा रंजीत पाटील, सुरेखा विनोद हुंबे, प्रिया नितीन रुपनवर, तसेच उद्योजक संदीप नरोळे, संदीप वाघ,प्रताप पाटील,शंकर जानकर श्रीकेश वरुडे, शांतिनिकेतन साळवे,अय्याज मुलानी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना रुपनवर तर सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

ना.चंद्रकांत पाटील यांचे विरोधात नातेपुते शहर कडकडीत बंद.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी): मागील चार दिवसांपूर्वी पैठण येथे झालेल्या सार्वजनिक सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा ज्योतिबा फुले,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना नातेपुते शहरात देखील सर्व बहुजन समाजातील बांधव एकत्र येऊन बंद ची हाक दिली होती.या बंद साठी नातेपुते शहरातील नागरिक तसेच सर्व व्यापारी वर्ग यांनी शंभर टक्के गाव बंद मध्ये सहभाग नोंदविला.
सकाळी नऊ वाजता युवक वर्गाने नातेपुते शहरात फेरी काढून सर्व महामानव यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी एक वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन निवेदन देण्यात आले .यावेळी बोलताना रिपाईचे जेष्ठ नेते एन के साळवे यांनी सांगितले की या महामानवानी शिक्षणाची दारे बहुजन वर्गासाठी खुली केली नसती तर चंद्रकांत पाटील आज मंत्रीपदावर नसते.
रासप नेते बशीर काझी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बहुजन युवक यांना भरकटविण्याची मोहीम सध्या चालू आहे.

महामानवांवर जे जे बोलतील त्यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन रस्त्यावर यावे मग आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ रोहित सोरटे.

प्रत्येक महामानवाने देशाला समतेची शिकवण दिली आहे तरी काही लोक अजून त्यांचा दुस्वास कसा करू शकतात विशाल सोरटे.

समतेचा विचार देणाऱ्या महामानवांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न भविष्यात कोणी केला तर आज फक्त बंद पाळला आहे जर हे प्रकार थांबले नाहीत तर याच्या पेक्षाही तीव्र आंदोलन होतील. समीर सोरटे .

संघर्ष सोरटे यांनी प्रास्ताविक करून बंद मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रणजित कसबे,लखन सोरटे,सूचित साळवे,विशाल साळवे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
शेवटी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन रिपाईचे जेष्ठ नेते युवराज वाघमारे यांनी केले.हे निवेदन शासनाच्या वतीने मंडल अधिकारी श्री.चव्हाण,गाव कामगार तलाटी प्रभाकर उन्हाळे,नातेपुते पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्वीकारले.
दलीत महासंघ यांचे वतीने देखील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले.
नातेपुते शहरातील बंद यशस्वी करण्यासाठी एन के साळवे,युवराज वाघमारे,सुनील साळवे सर, बीपीन सातपुते, नवाज सोरटे,विनोद रणदिवे,रोहित सोरटे,किरण सोरटे,दादा साळवे,दत्ता सोरटे,अभिजित वाळके,वैभव सोरटे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,संघर्ष सोरटे,सूचित साळवे,रणजित कसबे,विशाल साळवे,बाळासाहेब सोरटे ,राहुल सोरटे,विशाल सोरटे,दादा अटक, चंद्रकांत राऊत व सर्व युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

वाहतुक कौडीमुळे पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची राजकुमार हिवरकर पाटील यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रतिनिधी ) बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत याच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाप्रमुख

राजकुमार हिवरकर – पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ . तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची मागणी केली.

सोलापूर जिल्हा सरहद ते खुडूस असे पालखी महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे . त्यातच साखर कारखाने सुरु झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे . यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून , सदरचे जे . एम . म्हात्रे कंपनीचे काम ऊस गाळप हंगाम संपेपर्यंत बंद करावे. माळशिरस तालुक्यात पाच व आजू बाजूच्या तालुका मध्ये दहा साखर कारखाने आहेत . वरील कारखान्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे . तसेच सदाशिवनगर येथील श्री. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना चालू झाला आहे . त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे . मुंबई , पुणे या ठिकाणावरून पंढरपूर कडे येणारे भाविक तसेच माळशिरस कोर्ट , तहसिल ऑफिस , पंचायत समिती , अकलूज मधील दवाखाने या ठिकाणी सतत जावे यावे लागते . बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर व रेडीयम दिसत नाही . त्यामुळे साखर कारखाने बंद होई पर्यंत जे . एम . म्हात्रे आणि कंपनीची अवजड वाहतूक बंद करावी व काम थांबवावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन केली आहे .

You may have missed