जिल्हा

आदर्श सरपंच म्हणून संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं -आ.राम सातपुते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आदर्श सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.असे प्रतिपादन माळशिरस तालुका विधानसभा आमदार आ.राम सातपुते यांनी पिरळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटीलयांच्या मार्गदर्शना खालीविविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की
दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत
पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,
उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील
महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदमसर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर
तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, सुनील बनकर शंकर जानकर मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

पिरळे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा

 

पुरोगामी न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)  पिरळे तालुका माळशिरस येथे दिनांक 15 जानेवारी 23 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दलित पॅंथरचेे प्रणेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त  दलित पॅंथर संघटनेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या अभिवादन सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील दलित पॅंथर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले ( दलित पॅंथर प्रदेशाध्यक्ष) हे असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब शिंदे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे व तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले यांनी केले आहे .

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे

खडतर परिश्रमाच्या जोरावर सतीश तात्या ढेकळे यांची गरुड झेप सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
एकशिव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील 40-41 वर्षाचा युवक सतीश तात्या ढेकळे जिद्द,मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर त्यांनी उद्योग सामाजिक क्षेत्रात गरुड झेप घेतले आहे.
खरंतर सतीश ढेकळे गरीब कुटुंबात जन्माला आलेला व्यक्तिमत्व प्राथमिक शिक्षण एकशिव येथे तर माध्यमिक शिक्षण प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे इयत्ता दहावीपर्यंत.परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम केल्याखेरीज पर्याय नव्हता म्हणून त्यांनी गाव सोडून बाहेर मजुरी करण्याचा निर्णय घेतला
व ते पेंटिंगचं काम करण्यासाठी मजूर म्हणून हैदराबाद येथे एका ठेकेदाराच्या कडे गेले सुरुवातीला काम कसं करायचं माहित नव्हतं पहिल्यांदाच घरातून बाहेर पडल्यामुळे बाहेरचं जग कसं असतं हे माहित नव्हतं पहिले चार-पाच दिवस वडापाव वर आपल्या पोटाचे भूभागवली.राहिला निवारा नव्हता म्हणून तिथेच सिमेंटच्या गोडाऊनमध्ये मुक्काम ठोकला हळूहळू एका चांगल्या व्यक्तीची ओळख झाली व त्या व्यक्तीने प्रामाणिकपणा पाहून काम दिले.
त्यानंतर सतीश तात्या ढेकळे यांनी कधीच माघार वळून पाहिलं नाही त्यांनी एक उत्तुंग गरुड झेप घेतली व आज सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली ते भाजपाचे पिरळे पंचायत समिती गणातून प्रबळ दावेदार मानले जातात.त्यांनी कोणत्याही राजकीय पदावरती नसताना अनेक लोकांना निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.
एकशिव व पिरळे व इतर ठिकाणी स्वखर्चाने अनेक बोअर वेल दिले.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गोर गरीब गरजू लोकांना पुणे मुंबई सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये लागणारी आर्थिक मदत केली,व पेशंट ला घरी सोडण्यासाठी अँबूलन्स ला जादा पैसे देण्याऐवजी स्वतःच्या गाडीने पेशंट ला घरी पोचवणे.
कोरोना काळात अनेक गरजू लोकांना किराणा साहित्य व दवाखान्यात साठी लागणारे सर्व औषधा सहित होणार सम्पूर्ण खर्च केला.
स्वतःच्या साई एंटरप्राइजेस या व्यवसायच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींना आर्थिक सहाय्य व व्यवसाय मार्गदर्शन करून अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केले.
गावात पावसाळ्यात ज्या ठिकाणी रस्ता मध्ये चिखल होऊन चालता येत नाही अशा, एकशिव पिरळे चव्हाणवाडी बांगार्डे ठिकाणी स्वखर्चाने खडीकरण करून रस्ता करून दिला.
सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, व शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेऊन दिला.
तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा,आट्यापाट्या व हॉलीबॉल आशा अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. लोकांचे आरोग्य चांगले राहावं म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन.
पुणे सारख्या शहरातील आमदार व नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सहकार्याने अनेकांना गरजवंताना व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य ही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत सर्व समाज उपयोगी कामे उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांचं कामच सर्व सामान्य लोकांना आवडत असून त्यांना अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पिरळे पंचायत समिती गणातून मधून मिळत आहे त्यामुळे पिरळे पंचायत समिती गणातून उद्योजक सतीश तात्या ढेकळे हे पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आशा
दमदार व दिलदार मित्राला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रमोद शिंदे पिरळे नातेपुत
9975903040

कळंबोली पुलावरून स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत कडून अपघात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

कळंबोली ता माळशिरस येथील पुलावरून पहाटे च्या सुमारास टेंभुर्णी येथील एम एच 45 ए क्यू 92 93 ही स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत पडून भीषणअपघात झाला आहे.हकीकत आशिकी पहाटे  चारच्या सुमारास सागर घोडके राहणार टेंभुर्णी हे टेंभुर्णी वरून कळंबोली ला पाहुण्याकडे येत असताना पहाटेच्या सुमारास एका ट्रकने गाडीला  नदीच्या पुलावर रकट मारल्यामुळे तीस्विफ्टगाडी नदी वरील अरुंद पूल व कठडा नसल्यामुळे नदीमध्ये कोसळली त्या स्वीट मध्ये चौघे प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.स्थानिकांच्या मदतीने चौघांचा जीव वाचवण्यात आला. दुसऱ्या दिवशी क्रेन च्या साह्याने गाडी बाहेर काढण्यात आली. नेहमीच या पुलावरअशा प्रकारचे अपघात होत असतात.काहींना या पुलावरून खाली पडून आपला जीव गमवावा लागला.या पुलावरून नेहमीची वर्दळ असते शाळेला व कॉलेजला जाणारे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळेला जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पूल ओलांडवा लागतो .दरवेळेस नदीवर निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे बांधले जाते व पूर आल्यानंतर ते पुराच्या प्रवाहात वाहून जातात.लवकरात लवकर पुलावरील कठडे संरक्षण भिंत चांगल्या दर्जाचे बांधण्यात यावे व पुलाची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी एन डी एम जे चे प्रमोद शिंदे  व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. लवकरात लवकर पुलाच्या कठड्याचे काम सुरू केले नाहीतर 26 जानेवारीला ग्रामस्थांसह पुलावरा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केला आहे.जर इथून पुढे एखाद्याचा अपघात होऊनअनर्थ झाला तर याला जबाबदार संबंधित विभाग असेल.व संबंधित विभागातील अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करणार.

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह( बाळ दादा) मोहिते पाटील

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)शिवपुरी तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने महिला मेळाव्या चे आयोजन करण्यातले होते.या मेळाव्यात जयसिंह मोहिते पाटील हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तरध्यक्षस्थानी बाबाराजे देशमुख हे होते.कार्यक्रमात बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात.त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.बचत गट मेळावाच्या माध्यमातून सतीश ढेकळे यांनी महिलांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.आशा कार्यक्रमाचा महिलांनी फायदा घेतला पाहिजे. भविष्यात गावच्या प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना विशेष सहकार्य केले जाईल.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की आर्थिक दृष्ट्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण झालं पाहिजे पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करू. तसेच 08 मार्च रोजी नातेपुते येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते बोलत होते.या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची, उखाणे्धा घेण्यात आली व ढेकळे यांच्या वतीनेमोठ्या प्रमाणात बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.यावेळी एकशिव गावचे उद्योजक सतीश तात्या ढेकळे.मा.सरपंच शहाजी दादा धायगुडे  सरपंच सीमा संदीप नरोळे, शिल्पा रंजीत पाटील, सुरेखा विनोद हुंबे, प्रिया नितीन रुपनवर, तसेच उद्योजक संदीप नरोळे, संदीप वाघ,प्रताप पाटील,शंकर जानकर श्रीकेश वरुडे, शांतिनिकेतन साळवे,अय्याज मुलानी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना रुपनवर तर सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

आपली योग्यता आहे तेवढेच आपल्याला देव देत असतो – साध्वी अनुराधा दीदी

आपली योग्यता आहे तेवढेच आपल्याला देव देत असतो –  साध्वी अनुराधा दीदी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(नातेपुते ) आपली योग्यता आहे.तेवढेच आपल्याला देव देत असतो अशा प्रकारचे मत  नातेपुते येथे प्रवचन करताना साध्वी अनुराधा दीदी यांनी उपस्थित ताना  मार्गदर्शन करताना व्यक्त केले.नातेपुते येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी समारंभ कार्यक्रम सालाबादप्रमाणे घेण्यात आला आहे.या कार्यक्रमात भागवत कथा यज्ञ 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर दररोज सायंकाळी सहा ते आठ साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी  प्रवचना द्वारे भागवत कथा सांगत आहेत. कथा सांगताना भक्त सुखिया व भगवान श्रीकृष्ण यांचा दाखला देत त्या म्हणाले की त्रिलोक्याचे राज्य दिले तरी सच्चा भक्त भक्ती सोडत नाही.ज्या भक्तावर देवाचा विश्वास असतो त्या भक्ताला देव भरभरून देतो भक्ताने सत्कर्माने राहिले पाहिजे.भक्ताकडे दारिद्र्य असले तरी परमार्थिक ऐश्वर्या असले पाहिजे अशाप्रकारे अनेक दाखले त्यांनी परवचनाद्वारे उपस्थित यांना दिले.तसेच धैर्यशील भाऊ देशमुख यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तसेच नगराध्यक्ष उत्कर्षा राणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुखतसेच इतर नगरसेवक व मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंबआरती करण्यात आली.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यातले आहे.दिनांक 17 डिसेंबर रोजी ह भ प विलास बुवा गरवारे सिद्धेश्वर कुरोली यांचे नारदीय कीर्तन तसेच दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास  बहुसंख्येने उपस्थित राहण्याच्या आव्हान संयोजकाकडून करण्यात आले आहे.

ना.चंद्रकांत पाटील यांचे विरोधात नातेपुते शहर कडकडीत बंद.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(प्रतिनिधी): मागील चार दिवसांपूर्वी पैठण येथे झालेल्या सार्वजनिक सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील,महात्मा ज्योतिबा फुले,घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली.चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असताना नातेपुते शहरात देखील सर्व बहुजन समाजातील बांधव एकत्र येऊन बंद ची हाक दिली होती.या बंद साठी नातेपुते शहरातील नागरिक तसेच सर्व व्यापारी वर्ग यांनी शंभर टक्के गाव बंद मध्ये सहभाग नोंदविला.
सकाळी नऊ वाजता युवक वर्गाने नातेपुते शहरात फेरी काढून सर्व महामानव यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी एक वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेऊन निवेदन देण्यात आले .यावेळी बोलताना रिपाईचे जेष्ठ नेते एन के साळवे यांनी सांगितले की या महामानवानी शिक्षणाची दारे बहुजन वर्गासाठी खुली केली नसती तर चंद्रकांत पाटील आज मंत्रीपदावर नसते.
रासप नेते बशीर काझी यांनी सांगितले की महाराष्ट्रातील बहुजन युवक यांना भरकटविण्याची मोहीम सध्या चालू आहे.

महामानवांवर जे जे बोलतील त्यांनी आपली सुरक्षा बाजूला ठेऊन रस्त्यावर यावे मग आम्ही काय करू शकतो ते दाखवून देऊ रोहित सोरटे.

प्रत्येक महामानवाने देशाला समतेची शिकवण दिली आहे तरी काही लोक अजून त्यांचा दुस्वास कसा करू शकतात विशाल सोरटे.

समतेचा विचार देणाऱ्या महामानवांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न भविष्यात कोणी केला तर आज फक्त बंद पाळला आहे जर हे प्रकार थांबले नाहीत तर याच्या पेक्षाही तीव्र आंदोलन होतील. समीर सोरटे .

संघर्ष सोरटे यांनी प्रास्ताविक करून बंद मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रणजित कसबे,लखन सोरटे,सूचित साळवे,विशाल साळवे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.
शेवटी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन रिपाईचे जेष्ठ नेते युवराज वाघमारे यांनी केले.हे निवेदन शासनाच्या वतीने मंडल अधिकारी श्री.चव्हाण,गाव कामगार तलाटी प्रभाकर उन्हाळे,नातेपुते पोलिस स्टेशन चे सहा पोलिस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्वीकारले.
दलीत महासंघ यांचे वतीने देखील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले.
नातेपुते शहरातील बंद यशस्वी करण्यासाठी एन के साळवे,युवराज वाघमारे,सुनील साळवे सर, बीपीन सातपुते, नवाज सोरटे,विनोद रणदिवे,रोहित सोरटे,किरण सोरटे,दादा साळवे,दत्ता सोरटे,अभिजित वाळके,वैभव सोरटे,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,संघर्ष सोरटे,सूचित साळवे,रणजित कसबे,विशाल साळवे,बाळासाहेब सोरटे ,राहुल सोरटे,विशाल सोरटे,दादा अटक, चंद्रकांत राऊत व सर्व युवक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची  शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील निवेदनाद्वारे केली आहे. माळशिरस तालुक्याचा उपविभागीय अधिकारी यांचा तात्पुरता चार्ज इतर विभागातील अधिकाऱ्यांकडे दिला जातो. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे दाखले शेतकऱ्यांच्या शेतीच्या केसेस व इतर अन्य प्रशासकीय बाबी वेळेवर होत नसल्याने लोकांचे गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ माळशिरस तालुक्यात कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्यावा अशी मागणी राजकुमार हिवरकर यांनी केले आहे.

अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महागाई भत्यासह दरमहा 5000 रु पेन्शन मंजूर

अजिनाथ राऊत यांनी केलेल्या लढ्याला ऐतिहासिक यश

अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना महागाई भत्यासह दरमहा 5000 रु पेन्शन मंजूर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.
उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2019 ते 2022 या तीन वर्षांत अॅट्रोसिटी अंतर्गत जातीय अत्याचारात खुन झालेल्या सात पिडीत कुटुंबातील व्यक्तींना नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत व त्यांच्या जिल्हा टिमने शासनाच्या विविध कार्यालयांना पत्रव्यवहार करुन गेली तीन वर्षांपासून केलेल्या खडतर पाठपुराव्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत यांनी राज्य शासकीय कर्मचारी यांना लागु असलेल्या महागाई भत्यासह दरमहा 5,000 रु पेन्शन मंजुर केल्याचा आदेश पारीत करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय दलीत न्याय आंदोलन या सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव अॅड. डॉ. केवलजी ऊके, राज्य सचिव वैभवजी गिते यांनी दिलेल्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी उपाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, जिल्हा सचिव काशिनाथ कांबळे, कोषाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, जिल्हा युवकाध्यक्ष आकाश चव्हाण यांच्या सहकार्याने मंत्रालयात संबंधित विभाग, विधानभवन, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी उस्मानाबाद यांचेकडे गेली तीन वर्षांपासून वेळोवेळी कायदेशीर पत्रव्यवहार करुन आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता अखेर त्यांनी जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कचेरीसमोर दि. 6 डिसेंबर 2022 रोजी स्वतः आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता त्यानंतर त्याच दिवशी जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त यांनी तात्काळ पिडीतांच्या पुनर्वसनाची पावले उचलत जिल्ह्यात अॅट्रोसिटी अंतर्गत खुन झालेल्या सात कुटुंबातील व्यक्तींना पेन्शन मंजूर करुन उर्वरीत खुन प्रकरणात पुढील जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मासिक बैठकीत मंजुर करण्याचे आश्वासन अजिनाथ राऊत यांना दिले आहे. पेन्शन मंजुर केल्याचा आदेश मिळाल्याने व पुढील खुन प्रकरणातील वारसांचे पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने राऊत यांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा मागे घेतला आहे. अत्याचार पिडीत व्यक्तींच्या वारसांना पेन्शन मंजूर केल्याने राऊत यांचेवर सामाजिक, राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रातून कौतुक करुन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

You may have missed