जिल्हा

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

पिरळेत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन


  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
    पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सोमवार दिनांक 17जुलै रोजी सकाळी दहा वाजता जि प शाळा परळी येथे
    ग्रामपंचायत पिरळे व द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्था यांचे संयुक्त विद्यमाने
    *भव्य रांगोळी स्पर्धा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे ब्रिलियंट संस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण क्लास घेण्यात आले होते अनेक महिलांनी या शिवण क्लास प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला होता प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच प्रमाणपत्र वाटपासोबत रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यातत आले आहे या स्पर्धेसाठी
    *प्रथम बक्षीस**
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
    द्वितीय वक्षिस*
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
    तृतीय बक्षिस*
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीस असून स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियम राहतील
    स्पर्धा नियम*
    (१) स्पर्धेसाठी रांगोळी स्वतःची आणावी.
    (२) रांगोळी काढताना त्यातून सामाजिक संदेश गेला पाहिजे
    (३) रांगोळी काढताना स्वतः चे नाव टाकायचे नाही संयोजक कडून नंबर घेउन टाकायचा.
    (४) रांगोळीचे बक्षिसाचे नंबर हे तुमच्या रांगोळीतून सामाजिक संदेश, आकृती, रंगरंगोटी कशी आहे यावर अवलंबून असते. यावर तक्रार चालणार नाही.
    *(५) रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे **
    (६) रांगोळी स्पर्धेत कोर्स करणाऱ्या महिलांनी व बाहेरील महिलांनी ही सहभाग घेऊ शकतात.
    (७) रांगोळी स्पर्धाचे परीक्षक हे बाहेरील असतील. त्यामुळे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
    दिनांक १७जुलै २०२३वार सोमवार वेळ सकाळी १०.००वाजता*
    ठिकाण :- जि.प.प्राथमिक शाळा पिरळे*
    तरी सर्वांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान पिरळे गावचे सरपंच सुनिल दडस, उपसरपंच अमोल शिंदे ,ग्रामसेवक हनुमंत वगरे द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी केले आहे.

पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे असे प्रतिपादन ऍड. डॉ.केवल उके यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्र च्या झाडे लावा झाडे जगवा, माजी वसुंधरा,जलशक्ती बेटी बचाव अभियानांतर्गत.महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.याप्रसंगी उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध शाळेला आदर्श शाळा पुरस्कार तसेच विविध संस्था आदर्श ग्रामपंचायत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते,अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी चॅनलचे संचालक  विवाह  कायदा मसुदा  समिती सदस्य महाराष्ट्र शासन एन डी एम जे राज्य महासचिवडॉ केवल उके म्हणाले की .डॉ.केवल उके बोलताना म्हणाले आम्ही हे छोटस रोपट म्हणून लावलं होतं.आता त्याचा वटवृक्ष होतानाचा दिसतोय पुढे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रची  अशाच पद्धतीने प्रगती होत राहील.


 माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र चे काम हे उल्लेखनीय आहे.त्यांनी शोध पत्रकारिते सोबत समाज उपयोगी अनेक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबवले आहेत त्यांच्या माध्यमातून दीड लाख वृक्ष लागवड झाली आहे. हे कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एम के इनामदार, एन डी एम जे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके,आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, उद्योजक विनोद जाधव तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुद्धवासी आदर्श शिक्षिका कुमारी सविता साळवे मॅडम सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी  डॉ.एम के इनामदार बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनलअतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देत आहे. ,उद्योगपती विनोद जाधव म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र ने  महाराष्ट्रात चांगले नाव केले आहे आपल्यासारखे पत्रकारमंडळी देशभरात तयार झाली पाहिजे चॅनलच्या उभारण्यासाठी ल्यापिंग ग्रुपच्या वतीने लागेल ती मदत करू.           आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, अरुण तोडकर मा.सरपंच संदीप नरोळे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पत्रकाराच्या जीवनावरतीआधारित चित्रपट अहम सिनेमा अभिनेता अमीर भाई शेख,अभिनेत्री मृणालीकुलकर्णी हे होते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष बंदिश सोनवणे,राज्य महिला संघटक पंचशिलाताई कुंभारकर,ए एस आय,शैला साळवे मॅडम,ऍड.सुमित सावंत,प्रशांत खरात,मुंबई ठाणेविभाग प्रमुख संदेश भालेराव संपादक भीमसेन उबाळे, रिपाई तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे सोनवणे सरअंगणवाडी सेविका जि.प व विविध संस्था शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, आशा स्वयंसेवीका,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेच विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शन सादर केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी केली होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी,वलेकर सर यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

आदर्श सरपंच म्हणून संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं -आ.राम सातपुते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आदर्श सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षात संदीप नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.असे प्रतिपादन माळशिरस तालुका विधानसभा आमदार आ.राम सातपुते यांनी पिरळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटन समारंभ प्रसंगी केले.
ग्रामपंचायत पिरळे येथे विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,तसेचआमदार रणजीत सिंह मोहिते-पाटीलयांच्या मार्गदर्शना खालीविविध विकास कामांचे उद्घाटन आ.राम सातपुते व शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये पिरळे ते नातेपुते सुमारे 1.5 कोटीरुपये रस्त्याच उद्घाटन तसे महादेव मंदिर सभामंडप भूमिपूजन, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 87 लाख रुपयेच्या पाण्याची टाकी, काशीविश्वेश्वर मंदिर सभामंडप लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले की
दोन वर्षाच्या कार्यकाळात नरोळे यांनी चांगलं काम केलं आहे.तसेच मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी संदीप नरोळे यांनी मुलींच्या नावे पाच हजार रुपये एफ.डी करून आदर्श निर्माण करून चांगलं काम केलं आहे.असेच सर्वांनी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.पिरळे गावाला आतापर्यंत
पंधरा कोटी निधीआला आहे.आमदार रणजीत दादा व राम सातपुते तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत.यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही.चांगलं काम केल्याबद्दल सरपंच अलका नरोळे यांचा विशेष सन्मान मान्यवरच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,गटविकास अधिकारी विनायक गुळवे,नातेपुते माजी सरपंच बी. वाय.राऊत,
उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,जिल्हा परिषद सदस्यअरुण तोडकर,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,हनुमंत पाटील,विस्तारा धिकारी विठ्ठल कोळेकर,बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी स्वस्ति मिश्रा,मा.सरपंच अलका रामलिंग नरोळे . ग्रामसेवक हनुमंत वगरे,कनिष्ठ उप अभियंता ए.एन आंबले,सचिन ननवरे,हनुमंत कुंभार, संतोष महामुनी,विजय पाटील, नाना शेंडे,अमोल गोरे, सतीश ढेकळे ,संदीप वाघ ,संजय वाघमोडे,रणजीत रूपनवर पाटील
महादेव होळकर,महादेव शिंदे,सर्वोदय प्रतिष्ठानचे कदमसर,प्रमोद डूडू,दत्तात्रेय लवटे ,दीपक शिंदे, भारत पवार,आबा शिंदे,अजित खंडागळे,विठ्ठल सुर्यवंशी, कांतिलाल माने ,सोमनाथ लवटे,कोंडीराम नरोळे,महावितरण वरिष्ठ लिपिक दत्ता रुपनवर
तालुका कृषी अधिकारी अमोल गोरे आरोग्य विभागाचे डॉक्टर सोनटक्के व डॉक्टर अशोक कारंजे माजी सरपंच अनिकेतन साळवे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक संजय ढवळे सर युवा नेतृत्व सुरज माने ,आजिनाथ होळकर सर, सुनील मोरे, प्रल्हाद साळवे गुरुजी, अशोक तोडकर, राजेंद्र नरोळे , सुनील दडस ,दशरथ लवटे, बाळू शिंदे, भीमराव वाघमोडे, राजेंद्र पाटील ,संभाजी गोरे , महादेव किर्दक प्रल्हाद नरोळे, लक्ष्मण पवार ,बाजीराव दडस, सुनील बनकर शंकर जानकर मनोज ड्डू मनोज पैलवान कॉन्ट्रॅक्टदार मुसा मुलानी, सरगर, तरटे

पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप नरोळे व आभार दीपक शिंदे यांनी व्यक्त केले.

पिरळे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा

 

पुरोगामी न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)  पिरळे तालुका माळशिरस येथे दिनांक 15 जानेवारी 23 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दलित पॅंथरचेे प्रणेते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त  दलित पॅंथर संघटनेच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या अभिवादन सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील दलित पॅंथर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले ( दलित पॅंथर प्रदेशाध्यक्ष) हे असणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ व राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन दादासाहेब शिंदे दलित पॅंथर जिल्हा अध्यक्ष यांच्यावतीने करण्यात आले आहे.तसेच चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना  कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब शिंदे व तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले यांनी केले आहे .

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा-सरपंच वीरकुमार दोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा- सरपंच वीरकुमार दोशी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते-(प्रतिनिधी) नगरपंचायत धरतीवर स्वीकृती धारक ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मध्ये नेमण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदाशिव नगरचे नवनिर्वाचित सरपंच- वीरकुमार दोशी यांनी पत्राद्वारे केले आहे पत्रात असे म्हटले आहे की
राज्यघटनेच्या नियमानुसार नगरपरिषद नगरपंचायत महाराष्ट्र ची विधानसभा देशाची लोकसभा यामध्ये राष्ट्रपती राज्यपाल यांच्या माध्यमातून खासदार आमदार निवडले जातात तर नगरपंचायतीमध्ये देखील स्वीकृती धारक नगरसेवक निवडले जातात .त्याच धर्तीवर ग्रामपंचायत , सामाजीक , विविध विकासात्मक विषयांत विषेष तज्ञ असणारे लोक अनेकवेळा राजकीय प्रवाहाबाहेर राहतात . निवडणुकांमध्ये सहभागी होत नाहीत . अशा तज्ञ लोकांची निकड ग्रामपंचायत सभागृहाला कायम भासते . अशा लोकांना स्वीकृत सदस्य पदाची संधी निळाल्यास या लोकांचा अनुभव हा ग्रामपंचायत अथवा जनहितासाठी सार्थ ठरू शकतो. त्यामुळे जर नगरपंचायत धरतीवर ज्याप्रमाणे स्वीकृत नगरसेवक . त्याचप्रमाणे स्वीकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा अधिकार नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला तर चांगल्या लोकांना देखील ग्रामपंचायत मध्ये नेतृत्व करण्याची संधी . व अशा लोकांच्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायत व जनतेला निश्चित होईल. आशा करतो की ‘ अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पारित झाल्यास याचा फायदा ग्रामपंचायत थरावर होईल यात शंका नाही . यासाठी पहिला ग्रामपंचायत ठराव आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपणास पाठवीत आहोत.सदर पत्राची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे

खडतर परिश्रमाच्या जोरावर सतीश तात्या ढेकळे यांची गरुड झेप सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
एकशिव ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथील 40-41 वर्षाचा युवक सतीश तात्या ढेकळे जिद्द,मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर त्यांनी उद्योग सामाजिक क्षेत्रात गरुड झेप घेतले आहे.
खरंतर सतीश ढेकळे गरीब कुटुंबात जन्माला आलेला व्यक्तिमत्व प्राथमिक शिक्षण एकशिव येथे तर माध्यमिक शिक्षण प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी येथे इयत्ता दहावीपर्यंत.परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम केल्याखेरीज पर्याय नव्हता म्हणून त्यांनी गाव सोडून बाहेर मजुरी करण्याचा निर्णय घेतला
व ते पेंटिंगचं काम करण्यासाठी मजूर म्हणून हैदराबाद येथे एका ठेकेदाराच्या कडे गेले सुरुवातीला काम कसं करायचं माहित नव्हतं पहिल्यांदाच घरातून बाहेर पडल्यामुळे बाहेरचं जग कसं असतं हे माहित नव्हतं पहिले चार-पाच दिवस वडापाव वर आपल्या पोटाचे भूभागवली.राहिला निवारा नव्हता म्हणून तिथेच सिमेंटच्या गोडाऊनमध्ये मुक्काम ठोकला हळूहळू एका चांगल्या व्यक्तीची ओळख झाली व त्या व्यक्तीने प्रामाणिकपणा पाहून काम दिले.
त्यानंतर सतीश तात्या ढेकळे यांनी कधीच माघार वळून पाहिलं नाही त्यांनी एक उत्तुंग गरुड झेप घेतली व आज सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली ते भाजपाचे पिरळे पंचायत समिती गणातून प्रबळ दावेदार मानले जातात.त्यांनी कोणत्याही राजकीय पदावरती नसताना अनेक लोकांना निस्वार्थ भावनेने मदत केली आहे.
एकशिव व पिरळे व इतर ठिकाणी स्वखर्चाने अनेक बोअर वेल दिले.
गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गोर गरीब गरजू लोकांना पुणे मुंबई सारख्या मोठ्या दवाखान्यामध्ये लागणारी आर्थिक मदत केली,व पेशंट ला घरी सोडण्यासाठी अँबूलन्स ला जादा पैसे देण्याऐवजी स्वतःच्या गाडीने पेशंट ला घरी पोचवणे.
कोरोना काळात अनेक गरजू लोकांना किराणा साहित्य व दवाखान्यात साठी लागणारे सर्व औषधा सहित होणार सम्पूर्ण खर्च केला.
स्वतःच्या साई एंटरप्राइजेस या व्यवसायच्या माध्यमातून अनेक तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
ज्यांना व्यवसाय करायचा आहे अशा व्यक्तींना आर्थिक सहाय्य व व्यवसाय मार्गदर्शन करून अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केले.
गावात पावसाळ्यात ज्या ठिकाणी रस्ता मध्ये चिखल होऊन चालता येत नाही अशा, एकशिव पिरळे चव्हाणवाडी बांगार्डे ठिकाणी स्वखर्चाने खडीकरण करून रस्ता करून दिला.
सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविले.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले, व शालेय विद्यार्थ्यांना शालेय प्रवेश घेऊन दिला.
तरुण मुलांना प्रेरणा देण्यासाठी अनेक क्रीडा स्पर्धा त्यामध्ये क्रिकेट स्पर्धा,आट्यापाट्या व हॉलीबॉल आशा अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. लोकांचे आरोग्य चांगले राहावं म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन.
पुणे सारख्या शहरातील आमदार व नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सहकार्याने अनेकांना गरजवंताना व्यवसाय व नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या माध्यमातून अनेक समाजकार्य ही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत सर्व समाज उपयोगी कामे उद्योजक सतीश तात्या ढेकळे यांनी केली आहे त्याचबरोबर त्यांचं कामच सर्व सामान्य लोकांना आवडत असून त्यांना अतिशय उस्फुर्त प्रतिसाद पिरळे पंचायत समिती गणातून मधून मिळत आहे त्यामुळे पिरळे पंचायत समिती गणातून उद्योजक सतीश तात्या ढेकळे हे पंचायत समिती गणाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आशा
दमदार व दिलदार मित्राला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
प्रमोद शिंदे पिरळे नातेपुत
9975903040

कळंबोली पुलावरून स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत कडून अपघात

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

कळंबोली ता माळशिरस येथील पुलावरून पहाटे च्या सुमारास टेंभुर्णी येथील एम एच 45 ए क्यू 92 93 ही स्विफ्ट गाडी चार जणांसह भरलेल्या नदीत पडून भीषणअपघात झाला आहे.हकीकत आशिकी पहाटे  चारच्या सुमारास सागर घोडके राहणार टेंभुर्णी हे टेंभुर्णी वरून कळंबोली ला पाहुण्याकडे येत असताना पहाटेच्या सुमारास एका ट्रकने गाडीला  नदीच्या पुलावर रकट मारल्यामुळे तीस्विफ्टगाडी नदी वरील अरुंद पूल व कठडा नसल्यामुळे नदीमध्ये कोसळली त्या स्वीट मध्ये चौघे प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.स्थानिकांच्या मदतीने चौघांचा जीव वाचवण्यात आला. दुसऱ्या दिवशी क्रेन च्या साह्याने गाडी बाहेर काढण्यात आली. नेहमीच या पुलावरअशा प्रकारचे अपघात होत असतात.काहींना या पुलावरून खाली पडून आपला जीव गमवावा लागला.या पुलावरून नेहमीची वर्दळ असते शाळेला व कॉलेजला जाणारे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शाळेला जाताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पूल ओलांडवा लागतो .दरवेळेस नदीवर निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे बांधले जाते व पूर आल्यानंतर ते पुराच्या प्रवाहात वाहून जातात.लवकरात लवकर पुलावरील कठडे संरक्षण भिंत चांगल्या दर्जाचे बांधण्यात यावे व पुलाची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी एन डी एम जे चे प्रमोद शिंदे  व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. लवकरात लवकर पुलाच्या कठड्याचे काम सुरू केले नाहीतर 26 जानेवारीला ग्रामस्थांसह पुलावरा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केला आहे.जर इथून पुढे एखाद्याचा अपघात होऊनअनर्थ झाला तर याला जबाबदार संबंधित विभाग असेल.व संबंधित विभागातील अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करणार.

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह( बाळ दादा) मोहिते पाटील

महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात- जयसिंह मोहिते पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे (प्रतिनिधी)शिवपुरी तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने महिला मेळाव्या चे आयोजन करण्यातले होते.या मेळाव्यात जयसिंह मोहिते पाटील हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते. तरध्यक्षस्थानी बाबाराजे देशमुख हे होते.कार्यक्रमात बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की महिलांनी ठरवलं तर त्या निश्चितपणे प्रत्येक क्षेत्रात भरारी घेऊ शकतात.त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.बचत गट मेळावाच्या माध्यमातून सतीश ढेकळे यांनी महिलांना चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.आशा कार्यक्रमाचा महिलांनी फायदा घेतला पाहिजे. भविष्यात गावच्या प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना विशेष सहकार्य केले जाईल.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले की आर्थिक दृष्ट्या बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण झालं पाहिजे पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करू. तसेच 08 मार्च रोजी नातेपुते येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते बोलत होते.या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची, उखाणे्धा घेण्यात आली व ढेकळे यांच्या वतीनेमोठ्या प्रमाणात बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.यावेळी एकशिव गावचे उद्योजक सतीश तात्या ढेकळे.मा.सरपंच शहाजी दादा धायगुडे  सरपंच सीमा संदीप नरोळे, शिल्पा रंजीत पाटील, सुरेखा विनोद हुंबे, प्रिया नितीन रुपनवर, तसेच उद्योजक संदीप नरोळे, संदीप वाघ,प्रताप पाटील,शंकर जानकर श्रीकेश वरुडे, शांतिनिकेतन साळवे,अय्याज मुलानी मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होतेकार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना रुपनवर तर सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

आपली योग्यता आहे तेवढेच आपल्याला देव देत असतो – साध्वी अनुराधा दीदी

आपली योग्यता आहे तेवढेच आपल्याला देव देत असतो –  साध्वी अनुराधा दीदी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क(नातेपुते ) आपली योग्यता आहे.तेवढेच आपल्याला देव देत असतो अशा प्रकारचे मत  नातेपुते येथे प्रवचन करताना साध्वी अनुराधा दीदी यांनी उपस्थित ताना  मार्गदर्शन करताना व्यक्त केले.नातेपुते येथे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी समारंभ कार्यक्रम सालाबादप्रमाणे घेण्यात आला आहे.या कार्यक्रमात भागवत कथा यज्ञ 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर दररोज सायंकाळी सहा ते आठ साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी  प्रवचना द्वारे भागवत कथा सांगत आहेत. कथा सांगताना भक्त सुखिया व भगवान श्रीकृष्ण यांचा दाखला देत त्या म्हणाले की त्रिलोक्याचे राज्य दिले तरी सच्चा भक्त भक्ती सोडत नाही.ज्या भक्तावर देवाचा विश्वास असतो त्या भक्ताला देव भरभरून देतो भक्ताने सत्कर्माने राहिले पाहिजे.भक्ताकडे दारिद्र्य असले तरी परमार्थिक ऐश्वर्या असले पाहिजे अशाप्रकारे अनेक दाखले त्यांनी परवचनाद्वारे उपस्थित यांना दिले.तसेच धैर्यशील भाऊ देशमुख यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तसेच नगराध्यक्ष उत्कर्षा राणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुखतसेच इतर नगरसेवक व मान्यवरांच्या हस्ते सहकुटुंबआरती करण्यात आली.ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी निमित धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाच्या आयोजन करण्यातले आहे.दिनांक 17 डिसेंबर रोजी ह भ प विलास बुवा गरवारे सिद्धेश्वर कुरोली यांचे नारदीय कीर्तन तसेच दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास  बहुसंख्येने उपस्थित राहण्याच्या आव्हान संयोजकाकडून करण्यात आले आहे.

You may have missed