राजकीय

रा.स.प.च्या वतीने ओबीसी आरक्षणसाठी जिल्हाधिकरी कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन

शाहिद भाई मुलांनी अल्पसंख्यांक पश्चिम महाराष्ट्र प्रभारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

उद्या विवार दिनांक 4 जुलै 2021 रोजी पूना नका सोलापुर येथे राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने ओबीसी आरक्षण संदर्भात चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहेओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रासपचे माझे दुग्ध विकास मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशावरून आणि राष्ट्रिय अध्यक्ष अक्किसागर,आमदार रत्नाकर गुट्टे (प्रदेशाध्यक्ष. रासप, बाळासाहेब दोडतले महासचिव.रासप ,यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन आयोजित केले आहे. तरी सर्व समाजबांधवांनी आपल्याहक्कसाठी पारंपरिक वेशात या आंदोलनात,कोरोनाचे सर्व नियम पाळून बहुसंख्येने सहभागी होण्याचे अवाहन राष्ट्रिय समाज पक्षाचे युवा नेते तथा पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडीचे प्रभारी शहीदभाई मुलाणी, युवक जिल्हाध्यक्ष माऊली सरक यांनी केले.

अजित पवारांनी दादागिरी करून आरक्षणाला स्टे दिलाआहे -आ.गोपीचंद पडळकर

अजित पवारांनी दादागिरी करून आरक्षणाला स्टे दिलाआहे -आ.गोपीचंद पडळकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते तालुका माळशिरस येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते.ही बैठक ओबीसी आरक्षणासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आयोजित केले होती.या बैठकीत गोपीचंद पडळकर यांनी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर आपल्या शैलीत टीका केली.ते म्हणाले की अजित दादांनी दादागिरी व मनमानी करून पदोन्नती आरक्षणाला स्टे दिलाआहे.अजित पवारां सारखा माणूस आपल्यावर अन्याय करत असेल तर सर्वांनी पेटून उठले पाहिजे.मराठा आरक्षण राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे टिकू शकले नाही. यामुळे अनेक लोकांचे नुकसान होत आहे.सरकारमधील नेत्यांनी समाजात संभ्रम निर्माण केला आहे.ओबीसीच्या आरक्षणास राज्य सरकारने फक्त तारखा घेतल्या राज्य सरकारने मागास आयोग घटित करण्यासाठी उशीर केला आहे.ओबीसीच्या 346 जाती आहेत या सर्वांचं संघटन आपण करूय.
फक्त महाराष्ट्रातच ओबीसीचे आरक्षण काढले आहे. राजकीय आरक्षण पुनर प्रस्ताव मांडला पाहिजे ही बैठक राजकीय नसून उपेक्षित वंचित लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आहे.अशा प्रकारची आपल्या शैलीतील टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.    माजी सरपंच ऍड.बी.वाय राऊत म्हणाले की ओबीसीला सारथी सारखे मोठ्या प्रमाणात अनुदान मिळाले पाहिजे.तसेच या बैठकीसाठी भाजपा नेते सोपान काका नारनवर,प्रवीण काळे,योगेश कोकरे, ज्येष्ठ पत्रकार सुनील,राऊत कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,अतुल बावकर,भैय्यासाहेब चांगण,शशी कल्याणी,नागेश वाघमोडे,अजित मासाळ,वैभव मासाळ,माऊली हळनवर,तसेच नातेपुते व परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात संतूर रांगोळी स्पर्धा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क ( सदाशिनगर) रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे आणि विप्रो एंटरप्रायझेस प्रा. लिमिटेड (संतूर) यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांत उत्सवानिमित्त महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक 7 रोजी करण्यात आले. यामध्ये एकूण 57 महिलांनी सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे प्रथम बक्षीस पैठणीसाडी- सौ. धनश्री मनोज दोशी, द्वितीय बक्षीस -टॉवर फॅन सौ.सारिका ज्ञानेश राऊत, तृतीय बक्षीस -वॉटर जीआर 15 लिटर सौ. रेश्मा वैभव दोशी यांना मिळाले व एकूण दहा स्पर्धकांना (अचल अनुप गांधी, अश्विनी दैवत वाघमोडे, निकिता ज्ञानदेव नाळे,सोनाली कर्णे, सुजाता चव्हाण,सुष्मा
थोरात , वंदना तानाजी केते, अनिता पिसे, प्रलगभा कारंडे, राजश्री राजगे ) उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून सुप्रीम चिप्सर देण्यात आले. याप्रसंगी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री अनंतलाल (दादा) दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी, मार्गदर्शिका सौ. पूनम प्रमोद दोशी, अमित पुंज उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पंकज पानसरे सर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेणुगोपाल कोंडासाहेब ,सेल्स ऑफिसर विप्रो यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर सकट ,जूनियर सेल्स ऑफिसर व आभारप्रदर्शन रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक समीर देशपांडे सर यांनी केले.

*शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही :- ना. रामदासजी आठवले*

शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही :- ना. रामदासजी आठवले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नाशिक)-दि.३- सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने ओला दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून, शेतकर्‍यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अगोदरच आलेल्या महापूराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे तसेच पशुधनाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातूनच शेतकरीवर्ग सावरतोय न सावरतोय तोच अतिवृष्टीने हंगामी पिकांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यातील शेतकरी पूर्णता हवालदिल होऊन खचला असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारता राज्यमंत्री भारत सरकार मा.ना. रामदासजी आठवले साहेब हे आज नाशिक जिल्ह्यातील निफाड व ओझर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीपिकांची पाहणी करणेसाठी आले असता म्हटले आहेत. यावेळी मोहोड येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी संजय भास्कर देशमुख यांच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. काकासाहेब खंबाळकर, नाशिक जिल्हाध्यक्ष मा. प्रकाशजी लोंढे, राज्य उपाध्यक्ष रविंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   *शेतकरी अस्वस्थ असेल तर मी स्वस्थ बसणार नाही. म्हणून लवकरच आपण केंद्रातील आमच्या सरकारच्या वतीने तसेच राज्य सरकारच्या वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव अशी मदत करणार आहोत. यावेळी नाशिक जिल्ह्यातील महसूल विभागाचे तहसीलदार, कृषी अधिकारी यांचेसह रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

     


   

माळशिरस मध्ये राम सातपुते यांचा निसटता विजय अवघ्या २५९० मतानी राम सातपुतेचा विजय

माळशिरस मध्ये राम सातपुते यांचा निसटता विजय
अवघ्या २५९० मतानी राम सातपुतेचा विजय

नातेपुते (प्रमोद शिंदे )-माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचे उत्तम जानकर व आर पी आय पुरस्कृत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा अवघ्या २ हजार ५९० मतांनी पराभव झाला असून, राम सातपुते यांचा येथे निसटता विजय झाला असून विजयानंतरही मोहीते-पाटीलांच्या मतात झालेली घट अत्मचिंतन करायला लावणारी आहे.
अत्यंत चुरशिच्या या निवडणुकीत आत्तापर्यत मोहिते-पाटिल गटाची एकहाती विजयाची परंपरा मोडीत निघाली आहे.अवघ्या २ हजार ५९० मताच्या फरकाने भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा विजय झाला .
मतमोजणीची सुरुवात सकाळी ९ वाजता झाली पहील्या फेरीचा निकाल हाती येताच राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी ५ हजार ६९ मतांची आघाडी घेतली हा आकडा वाढत जात १२ व्या फेरीत १६ हजार ५९७ मतांची आघाडी घेतली मात्र १३ व्या फेरीपासुन हा मतांचा आलेख खाली येऊ लागला अखेर २१ व्या फेरीत २ हजार ८५३ मतांनी आर पी आय पुरस्कृत भाजपाच्या राम सातपुते यांनी आघाडी घेतली २२ व २३ व्या फेरीत मताधीक्य कमी झाले २४ व्या फेरीत २ हजार ३११ मताधीक्य मिळवल तर अखेरच्या फेरीत २०६८ मतांची आघाडी मिळाली व पोस्टल ५२२ मतात आघाडी घेत २५९० मतांनी राम सातपुते विजय ठरले .
उमेदवार निहाय आकडेवारी पुढील प्रमाणे
राम विठ्ठल सातपुते (भाजप ) १०३५०७
उत्तमराव शिवदास जानकर (राष्ट्रवादी ) १००९१७ राज यशवंत कुमार ( वंचित बहुजन आघाडी ) ५५३८ ,श्रीकृष्ण ज्ञानदेव प्रक्षाळे (बसपा ) १०८१ अशोकराव सोपानराव तडवळकर -सर ( भारतीय प्रजा स्वराज्य पक्ष ) ६९५ , मकरंद नागनाथ साठे (अपक्ष ) ६८० ,उत्तम एकनाथ मोटे (अपक्ष) ५३४ , बापूराव महादेव अहिवळे (अपक्ष ) ३९० नोटा १८९९ , पोस्टल अवैध्य ७०
सुरुवातीला मोहिते-पाटलांना एकतर्फी वाटणारी माळशिरस विधानसभेची निवडणुक भाजपने बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे अत्यंत अटीतटीची झाली होती.उत्तम जानकरांनी राष्ट्रवादी पक्षातुन दिलेली लढत ही लक्षवेधी ठरली आहे.या निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी निसटत्या विजयामुळे मोहिते-पाटलांचा पराभवच म्हणावा लागेल असा निकाला या निवडणुकीत लागला आहे. राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांचा पराभव वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार राजकुमार सोनवणे यांच्यामुळेच झाला असे म्हणता येईल यांना 5538 ते पडले याचा फटका उत्तमराव जानकर यांना पडला ही जागा अनुसूचित जाती राखीव असताना उत्तम जानकर यांचा जात प्रमाणपत्र दाखला उच्च न्यायालयाने वैध ठरवल्याने व माळशिरस ची जागा ही आरपीआयला सुटली असताना तेथे उमेदवार मात्र आयात भाजपचा दिला असल्याने स्थानिक लोक नाराज होते यामुळे लोकांनी वंचित चा व नाटो चा पर्याय निवडल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांना याची किंमत मोजावी लागली याचाच परिणाम राष्ट्रवादीचा पराभव व भाजपचा निसटता विजय हा झाला.
भाजपच्या विजयानंतर तालुक्यात मोहिते-पाटील व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात गुलालाची उधळन व फटक्याची अतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.शंकरनगर येथिल शिवरत्नवर झालेल्या विजयी सभेत नुतन आमदार राम सातपुते यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,मा.खा रणजितसिंह मोहिते-पाटील,जयसिंह मोहिते-पाटील,धैर्यशिल मोहिते-पाटील,साभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील,अर्जुनसिंह मोहिते-पाटील,शिवतेजसिंह मोहिते-पाटील, के.के. पाटील ,भाजपचे राजकुमार पाटील,सोपानराव नारनवर,शिवसेनेचे नामदेव वाघमारे , बाळासाहेब सरगर , काकासाहेब मोटे , हनुमंत सुळ आरपीआयचे सोमनाथ भोसले, किरण धईंजे, मिलिंद सरतापे, तसेच कार्यकर्ते, मामा पांढरे , मिलींद कुलकर्णी , संजय देशमुख ,आदीनी शुभेच्छा दिल्या.
राम सातपुते माध्यमांशी बोलताना म्हणाले की – माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,रणजितसिंह मोहिते-पाटील व तालुक्यातील भाजपच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे कष्ट जनतेच्या अर्शिवादाने मला विजयी केले आहे त्या सर्वाना मी माझा विजय समर्पित करतो.माळशिरस तालुक्याची सेवा मी माझ्या आई प्रमाणे करीन.

माळशिरस विधानसभा उमेदवारांचे भवितव्य केले मतदारांनी मतपेटीत बंद

माळशिरस (प्रमोद शिंदे): माळशिरस विधानसभा उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी 21 तारखेला केले मतपेटीत बंद माळशिरस विधानसभा लढत ही रंगतदार होणार असून ही लढत तिरंगी लढत दिसून आली आहे. माळशिरस विधानसभा निवडणूक ही काटे की टक्कर झाले आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या अस्तित्वाची लढाई होती संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष माळशिरस विधानसभेवर असून इथे कोण जिंकणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात अनेक घडामोडी झाल्या आहेत या मतदारसंघात पवार विरुद्ध मोहिते पाटील अशीच अस्तित्वाची लढाई असल्याचे दिसून येत आहे यातच भाजपचे कट्टर समर्थक समजले जाणारे तसेच मोहिते-पाटील विरोधक मानले जाणारे उत्तम जानकर यांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी कडून तिकीट मिळवले. त्यामुळे येथील राजकीय वातावरणात बदल झाला आहे. मोहिते-पाटलांना लोकसभेला तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश केला व आपले अस्तित्व सिद्ध केले. आत्ता सुद्ध विधानसभेला तीच परिस्थिती आहे. विधानसभेला हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे ही जागा आरपीआय ला सोडण्यात आली होती परंतु उमेदवार हे मोहिते-पाटील ठरवणार असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्यामुळे येथील राजकीय वातावरण आणखीन वेगळ्या वळणावर येऊन थांबले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील राम सातपुते यांना तिकीट देण्यात आले व मोहिते पाटील कुटुंबीय राम सातपुते यांच्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली होती. त्यातच उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला वैध झाल्याने माळशिरस तालुक्यातील वातावरण आणखीन बदलले माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली होते पुन्हा फ्रंट फूट वर आली ही लढाई खरंतर राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी नसून मोहिते पाटील विरुद्ध पवार व जानकर असल्याचे दिसत आहे. रिपाईला जागा सोडून उमेदवार मात्र भाजपा आरएसएस चा दिल्यामुळे आरपीआयच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा झाली या सभेला नेते हजर पण कार्यकर्ते गैरहजर अशी परिस्थिती होती. माळशिरस येथील रामदास आठवले व विजयसिंह मोहिते पाटील यांची सभा फेल गेली त्यामुळे माळशिरस विधानसभेतची निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी ने ही नातेपुते येथील राजकुमार यांना उमेदवारी देऊन रणांगणात उभे केले त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे मतदान हे निर्णय मतदान ठरणार असून वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांमुळे कोणत्यातरी मोठ्या उमेदवाराला याचा फटका बसणार आहे. ही निवडणूक मोहिते पाटील कुटुंबीयांसाठी अस्तित्वाचा आणि महत्वाची निवडणूक असल्यामुळे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला आहेत. तसेच शरद चंद्रजी पवार साहेब यांनीही या मतदारसंघात चांगले लक्ष घातले असून राष्ट्रवादीचा उमेदवार कशाप्रकारे निवडून येईल यासाठी पूर्णपणे ताकद लावली आहे. उद्या दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निकालाची जनता आतुरतेने वाट पाहत असून जनतेने कौल कोणाच्या बाजूने दिला आहे पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. दिनांक 21 /9 /2019 रोजी माळशिरस विधानसभा गाव निहाय खालील प्रमाणे झालेले मतदान- शिंदेवाडी ३१६१ पैकी १९५८ (६३.९७%),देशमुखवाडी १३०३ पैकी ९१३ (७०.०७%),कुरबावी २१२४ पैकी १३६८ (६४.४१%),डोंबाळवाडी कु १४२० पैकी १०५७ (७४.४४%),हनुमानवाडी ९२८ पैकी ६३० (६७.८८%),धर्मपुरी ३७९३ पैकी २३६९(६२.४६%),कोथळे ११८३ पैकी ७२४ (६१.२०%),कारुंडे २९५५ पैकी २०५८(६९.६४%),गुरसाळे ३६९५ पैकी २३०५ (६२.३८%),तांबेवाडी ९९६ पैकी ६१६ (६१.८५%),एकशिव २९०० पैकी २०१५ (६९.४८%),कळबोली १०५५ पैकी ६७४ (६३.८९%),दहीगाव ७०७३ पैकी ४५०४ (६३.६८%),मोरूची ३९६० पैकी २५४० (६४.१४%),पिंपरी २८०८ पैकी १५९३ (५६.७३%),नातेपुते १३८६५ पैकी ८४९७ (६१.२८%),पिरळे २८१७ पैकी १९३३ (६८.६२%),बंगार्डे १५२२ पैकी १२२२ (८०.२९%),पळसमंडळ १९९१ पैकी १२११ (६०.८२),मोटेवाडी फोंडशिरस १२१० पैकी ७८३ (६४.७१%),कदमवाडी ९०० पैकी ६४९ (७२.११%),फोंडशिरस ६८८५ पैकी ४६६२ (६७.७१%),लोणंद १९६० पैकी १३८१ (७०.४६%),फडतरी २६३५ पैकी १६१७ (६१.६७%),नीटवेवाडी फडतरी ५५६ पैकी ३८७ (६९.६०%),लोंढेमोहितेवाढी १२०९ पैकी ८०९ (६६.९१%),गिरवी २८७६ पैकी १८४० (६३.९८%),मांडवे ५८६९ पैकी ३९७६ (६७.७१%),खुळेवाडी ११८० पैकी ८०३ (६७.७१%),तामशिदवाडी १२४३ पैकी ८५७ (६८.९५%),मारकडवाडी फो २२८४ पैकी १६९४ (७४.१७ %),उंबरे दहीगाव २१६६ पैकी १६३८ (७५.६२%),मेडद ३६३८ पैकी २३७२ (६५.२०%),सदाशिवनगर २८३० पैकी १७१० (६०.४२%),पुरंदावडे २३९२ पैकी १५२६ (६३.८०%),जाधववाडी १८१७ पैकी ११८४ (६५.११%),कण्हेर ३८१९ पैकी २३९४ (६२.६९%),भांब १४६७ पैकी ७५३ (५१.३३%),रेडे २३३१ पैकी १२९७ (५५.६४%),भांबूर्डी ३६३१ पैकी २२६५ (६२.३८%),येळीव १०८३ पैकी ७२७ (६७.१३%),कचरेवाडी २१७१ पैकी १७१५ (७९.००%),तिरवंडी २९१९ पैकी २१३१ (७३.००%),चाकोरे २३९१ पैकी १८०४ (७५.४५%),कोंढबावी २२३३ पैकी १६९५ (७५.९१%),वटफळी ८६३ पैकी ६२६ (७२.५४%),माळशिरस १५४६६ पैकी ९७९९ (६३.३६%),मोटेवाडी माळशिरस १९३९ पैकी १४०० (७२.२०%),इस्लामपूर २९३१ पैकी २१२० (७२.३३%),गोरडवाडी २५६३ पैकी १९०६ (७४.३७%),मांडकी २४४६ पैकी १३४५ (५४.९९%),जळभावी १३८६ पैकी ८०७ (५८.२३%),गारवाड १२२५ पैकी ७६७ (६२.६१%),तरंगफळ १८६४ पैकी १४७९ (७९.३५%),झंजेवाडी ५१० पैकी ५२५ (८३.३३%),डोंबाळवाडी १०९१ पैकी ६६९ (७९.६५%),पानीव २२६७ पैकी १६६२ (७३.३१%),विजयवाडी १२६९ पैकी ९४७ (७५.२२%),गिरजणी २१६३ पैकी १६१५ (७४.६६%),बागेचीवाडी २८७० पैकी १९७७ (६८.८९%),आनंदनगर २३१० पैकी १६७३ (७२.४२%),यशवंतनगर १०३८२ पैकी ६६९६ (६४.५०%),विझोरी २२८५ पैकी १५६४ (६८.४५%),खुडूस ४८३० पैकी ३५०९ (७२.६५%),चांदापुरी १७११ पैकी १३१२ (७६.६८%),पठाणवस्ती १५७२ पैकी १०३७ (६५.९७%),मगरवाडी १३१७ पैकी ७७८ (५९.०७%),सुळेवाडी २४२० पैकी १२९५ (५३.५१%),पिलीव ७७११ पैकी ५१३० (६६.५३%),झिंजेवस्ती १०७३ पैकी ७१५ (६६.६४%),कुसमोड १७०० पैकी १२१० (७१.१८%),निमगाव मगराचे ६२३४ पैकी ४५११ (७२.३६%),पिसेवाडी २८०९ पैकी २२०१ (७८.३६%),दत्तनगर ११०५ पैकी ७८० (७०.५९%),चांडेश्वरवाडी ३२२४ पैकी २३७० (७३.५१%),माळेवाडी अकलूज ३४९८ पैकी २२७० (६४.८९%),अकलूज २८५२२ पैकी १७७५५ (६२.२५%),संग्रामनगर अकलूज ५०४८ पैकी २८५३ (५६.५२%),माळीनगर ७६०५ पैकी ४४४२ (५८.४१%),सवतगव्हाण १९१९ पैकी १२३४ (६४.३०%),बिजवडी ९५३ पैकी ७०० (७३.४५%),तांबवे २६९३ पैकी १८५४ (६८.८५%),गणेशगाव १०८५ पैकी ७५३ (७०.७०%),संगम १९२४ पैकी १३८७ (७२.०९%),बाभूळगाव १४०६ पैकी १०३१ (७३.३३%),खंडाळी ४६७२ पैकी ३३६२ (७१.९%),वेळापूर १२६८५ पैकी ८६१८ (६७.९४%),मळोली ४८४१ पैकी ३२७८ (६७.७१%),साळमुखवाडी ५०६ पैकी ३९३ (७७.६७%),काळमवाडी १२३८ पैकी ९२१ (७४.३९%),बचेरीवाडी २०७९ पैकी १५७० (७५.५२%),शिंगुर्णी २२०१ पैकी १४७० (६६.७९%),कोळेगाव ३९४० पैकी २८४३ (७२.१६%),फळवणी ३१४३ पैकी २१६० (६८.७२%),तांदूळवाडी ५८५८ पैकी ३९५६ (६७.५३%),शेडेचिचं ९८२ पैकी ७५७ (७७.०९%),धानोरे १४०८ पैकी १११७ (७९.३३%),तोंडले १९३७ पैकी १३९९ (७२.२३%),द्सूर १५०४ पैकी १२६८ (८४.३१%),बोंडले १५०२ पैकी ११४१ (७५.९७%),उघडेवाडी २४३१ पैकी १९२६ (७९.२३%)

40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही गवत उपटले का ?अशी टीका शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली

40 वर्ष सत्ता तुमच्याकडे होती तुम्ही गवत उपटले का अशी टीका शरद पवार यांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली
नातेपुते (प्रमोद शिंदे )-चाळीस वर्ष सत्ता तुमच्याकडे होती मग तुम्ही काय चाळीस वर्ष गवत उपटले का अशाप्रकारे शरद पवारांनी मोहिते-पाटलांना वरती हल्लाबोल केला माळशिरस विधानसभा निवडणूक उत्तम जानकर यांच्या प्रचार सभे निमित्त शरद पवार ची सभा अकलूज येथे आयोजित करण्यात आली होती या सभेत त्यांनी भाजप व मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला ते म्हणाले की मला कुस्ती शिकू नका मी कुस्ती बोर्डाचा अध्यक्ष होतो हे लक्षात असू द्या हे लोक रात्री झोपेत सुद्धा शरद पवार, शरद पवार म्हणत असतील, मी जोपर्यंत कृषिमंत्री होतो तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाची किंमत कमी होऊ दिली नाही पुढे होऊ देणार नाही हे लोक चार वर्षांपूर्वी समुद्रात शिवस्मारक व इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करतो म्हणाले होते त्याचे भूमिपूजन हे केलं परंतु एक वीट सुद्धा लावली नाही. हे लोक किल्ल्यावरती छम छम करणार की काय किल्ल्यांना पर्यटन स्थळ करून हॉटेल उभारून शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. एका फटक्यात आम्ही सरसकट कर्जमाफी केली होती अजूनही 70 टक्के लोकांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जामुळे  शेतकरी आत्महत्या करताहेत. कारखाने उद्योगधंदे बंद पडून लोक बेरोजगार होत आहेत कोणाला टिकीट द्यायचं याचा केंद्रबिंदू अकलूज होतं आता ते राहिलेल नाही यावेळचा उमेदवार मी कधीही ऐकला नव्हता हनुमंत डोळस यांच्या मुलाला संधी होती परंतु त्याला संधी दिली नाही ही निवडणूक महत्त्वाची आहे ज्याला शेतकऱ्याचा दुःख कळत नाही त्यांना सत्तेवर ठेवायचं नाही अशा प्रकारची टीका त्यांनी केली यावेळी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले पूजन केले राफेल हे विमान अफगाणिस्तानचे होते आपलं विमान एक वर्षांनी येणार आहे भाजपला एक ही योजना व्यवस्थित करता आली नाही. धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले की ज्यांनी आम्हाला कृष्णा भीमा स्थिरीकरणाचे गाजर दाखवले त्यांना आम्ही आता मुळा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच्या पोराला बदाम घालून आपलं पोरगं पैलवान होणार आहे का? आमच्या तालुक्यात सुद्धा ऊसतोड कामगार आहेत .शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर पवार साहेबांन शिवाय पर्याय नाही अशी  टीका त्यांनी केली, तसेच बबनदादा शिंदे, उमेदवार उत्तम जानकर, सुभाष देशमुख, अविनाश काळे, बाळासाहेब धाइंजे ,किरण साठे ,आप्पा कर्चे यांनीसुद्धा भाजपवर हल्लाबोल केला यावेळी अजय सकट श्रीकांत शिंदे अण्णा शिंदे पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश सभा संपन्न *

 *नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महा जनादेश सभा संपन्न *

नातेपुते (प्रमोद शिंदे) माळशिरस विधानसभा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नातेपुते येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते .या सभेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात आमचे पैलवान तेल लावून आखाड्यात तयार आहेत परंतु समोर विरोधात पैलवान लढायला तयार नाहीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणूक चालू असताना बँकॉक ला फिरायला गेलेत राष्ट्रवादीची परिस्थिती अशी झाली आहे की आधे इधर जावो आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे अशी झाली आहे .सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक होण्याअगोदर हार मानली आहे त्यांनी जाहीरनाम्यात अवास्तव आश्वासने दिली आहेत परंतु वीस ते पंचवीस वर्ष मोदी ना कोणीही  हरवू शकत नाही. पंधरा वर्ष  काँग्रेस आणि राष्ट्रवादी  यांनी जनतेची दिशाभूल केली आहे पंधरा वर्षात त्यांनी केलेले काम  आणि आम्ही केलेल्या कामाची तुलना करा पाच वर्षात आमच्या वरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही  अशा प्रकारची टीका राष्ट्रवादी व काँग्रेस वरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सिंह मोहिते पाटील बोलताना म्हणाले की आम्ही नातेपुते  महाळुंग अकलूज  नगरपंचायत झाली पाहिजे  याची मागणी केली होती  त्याचा मन दूर झाले आहे माळशिरस तालुक्यात विकासासाठी फडणवीस साहेबांनी भरपूर निधी दिला आहे तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना झाली पाहिजे  याचा पाठपुरावा  अनेक दिवसांपासून दादा करीत आहे  ते झाले पाहिजे पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या आहेत . उमेदवार राम सातपुते  म्हणाली की  विजय दादांचे विकास रेषा  पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन तसेच राष्ट्रवादीचे आभाळ फाटले आहे ठिगळ कुठे कुठे लावायचे याकडे त्यांनी लक्ष द्यावे असे ते बोलत होते. या सभेसाठी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील,रणजितसिंह मोहिते पाटील आर पी आय चे  महात्मा फुले विकास महामंडळ अध्यक्ष  राजाभाऊ सरवदे, मदनसिंह मोहिते पाटील, खासदार रणाजितसिंह निंबाळकर, शिवामृत चे  चेअरमन धैर्यशील भैया मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, बाबाराजे देशमुख ,सरपंच भानुदास राऊत ,हनुमंत सुळ किशोर सुळ ,मामासाहेब पांढरे, माऊली पाटील, पांडुरंग देशमुख ,तसेच भाजप व महायुतीतील अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सरगर यांनी केले.

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे पवारांची “उत्तम “खेळी

माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील काळोखात पुन्हा शरद चांदणे  पवारांची “उत्तम “खेळी
 संपादक (प्रमोद शिंदे )- माळशिरस तालुक्यात लोकसभे पासूनच राजकारणाला एक वेगळे वळण लागले आहे लोकसभेला पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादी साठी मोहिते- पाटलांना डावल्या मुळे माळशिरस तालुक्याच्या राजकारणात काळोख पसरला होता मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश करून पुन्हा प्रकाश टाकला परंतु तोच प्रकाश राष्ट्रवादीसाठी काळोख ठरला त्यातच आता विधानसभेला राष्ट्रवादीकडून शरद पवारांनी भाजपचे नाराज उत्तमराव जानकर यांना टिकीट देऊन  जणूकाही  काळोखात शरदाचे चांदणे  आणले आहे व पवारांनी  राजकारणात उत्तम जानकर यांच्या माध्यमातून  उत्तम खेळी  माळशिरस तालुक्यात  केली आहे  त्यामुळे  राष्ट्रवादीला  नवसंजीवनी  मिळाली असून कार्यकर्त्या मध्ये  नवचैतन्य  निर्माण होऊन  मोहिते पाटलांन विरोधात पुन्हा एकदा मोठी फळी उभी राहिली आहे .माळशिरस तालुक्यातील  चांदापुरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व पंचायत समिती माळशिरस चे माजी उपसभापती उत्तमराव जानकर यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नुकतीच जाहीर केली असल्याने उत्तमराव जानकर गटामध्ये व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळालेली असून लोकसभेच्या वेळेला मोहिते-पाटील आणि विरोधी गट एकत्र असल्याने भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून मोठा विजय मिळवला आहे. 
माळशिरस तालुक्यामध्ये दोन्ही गट एकत्र झाल्याने माळशिरस तालुका हा पूर्वीचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा तो आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून लोकसभे पासून ओळखला जाऊ लागला त्यातच आता फूट पडली आहे व. उत्तमराव जानकर यांच्या उमेदवारीमुळे माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला नवचैतन्य निर्माण झालेले आहे. उत्तमराव जानकर यांच्यामुळे मोहिते-पाटील गटाच्या  उमेदवाराला  मोठा फटका बसू शकतो.उत्तम जानकर हे खासदार रंजीत सिंह निंबाळकर यांचे निकटवर्ती असल्यामुळे माळशिरस तालुक्यातून जानकर यांना मदत होऊ शकते का हाही मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे शरद पवारांच्या उत्तम खेळीमुळे मोहिते- पाटीलांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे का हा येणारा काळ सांगू शकेल.

राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार साहेबांचा कसलाही संबंध नसताना नाव घेण्यात आला म्हणून राजीनामा दिला अजित पवारांचा खुलासा* *पत्रकार परिषदेत अजित दादा झाले भाऊक त्यांना अश्रू अनावर झाले*

  • राज्य शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार साहेबांचा कसलाही संबंध नसताना नाव घेण्यात आला म्हणून राजीनामा दिला अजित पवारांचा खुलासा*
    पत्रकार परिषदेत अजित दादा झाले भाऊक त्यांना अश्रू अनावर झाले*
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्याचा खुलासा त्यांनी आज पत्रकार परिषे देत केला. ज्या बँकेत १० ते १२ हजार कोटी ठेवी आहेत त्या बँकेत २५ हजार कोटीचा गैरव्यवहार कसा होवू शकतो असे ते म्हणाले.
    यावेळी ते म्हणाले, आमचे बोर्ड जेव्हा बरखास्त झालो तेव्हा बिनविरोध निवडून आलेले होतो याचिकाकर्त्यांनी 25 हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याच आरोप केला. ज्या बँकेच्या ठेवी 10-12 हजार कोटी आहेत त्या बँकेत 25 हजार कोटींचा गैरव्यवहार कसा होऊ शकतो. साखर कारखाने, सूतगिरण्या विक्रीला काढण्यात आल्या. राज्य बँक ही शिखर बँक आहे. एखादा सरकारी साखर कारखाने, सूतगिरण्या दुष्काळ किंवा अन्य संकटामुळे अडचणीत येतात तेव्हा आऊट ऑफ दी वे जाऊन मदत करावी लागते. या राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीच चार कारखान्यांना मदत केली आहे. केंद्र सरकारही करते. माझ्या काळात जे कर्जवाटप झाले ते फिटलेले आहे. सरकारने हमी दिली होती. कर्ज कारखाने विका आणि कर्ज फेडण्याचे आदेश होते. यामुळे कारखाने विकण्यात आले. आज ही बँक 285 कोटी नेट प्रॉफिटमध्ये आहे. मग 25 हजार कोटींचा घोटाळा झाला तर ही बँक बुडाली नसती का, असे पवार म्हणाले. राज्य शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात शरद पवारांचा काडीचा संबंध नाही, दुरान्वये संबंध नाही. मात्र, त्यांचे नाव यात आल्याने मी अस्वस्थ झालो होतो, असे अजित पवार म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेत अजितदादा भावूक झाले होते पुढे ते म्हणाले की पवार साहेब देतील ते आदेश आम्ही पाहणार आहोत पवार साहेब हे आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांचा प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य आहे आमच्या कुटुंबांमध्ये कसलाही कलह नाही इथून पुढे पवार साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही वागू आम्हाला सोडून गेलेले लोक या लोकांना सांभाळण्यासाठी कदाचित आम्ही कमी पडला असेल म्हणून ते आम्हाला सोडून गेले परंतु यांच्यावरती आम्ही टीका केली नाही शिखर बँक घोटाळा प्रकरणी 69 जनां वरती गुन्हे दाखल आहेत परंतु अजित पवारांचं नाव याच्यात असल्यामुळे हा सगळा उठाठेव हे लोक करत आहेत असा आरोप अजित पवारांनी केला आहे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्या नसल्याचा ठामपणे अजित पवार यांनी सांगितलं

You may have missed