कॅनल मध्ये मास फेकणाऱ्या वर कारवाई न केल्यास पाटबंधारे अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फसणार-अनुप शहा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे


फलटण तालुक्यातील चौधरवाडी गावाच्या हद्दीमधील गो हत्या करून गोमास कॅनॉल मध्ये फेकून देण्यात आले आहे यामुळे फलटण शहर व परिसरातील शाकाहारी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे याबाबत तातडीने पाटबंधारे खात्याने भूमिका न घेतल्यास व सदरचे कृत्य कोणी केले याचा छडा न लावल्यास भारतीय जनता पार्टी फलटण शहरच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष अनुपशहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे बाबत अधिक माहिती अशी की फलटण हे मानभाव व जैन समाजाची दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्ध आहे संतांची भूमी म्हणून सुद्धा फलटणचा उल्लेख होतो परमपूज्य गोविंद महाराज उपळेकर सद्गुरु हरिभाऊ महाराज यांच्या समाधी ही फलटणमध्ये आहेत हे सर्व समाज शाकाहारी असल्याने ते आपल्या धर्माच्या परंपरेनुसार त्याचं पालन करत असतात व नगरपालिका नीरा उजवा कॅनल मधून येणाऱ्या पाण्यातून शहराला पाणीपुरवठा करत असते मात्र हा कॅनॉल तरडगाव साखरवाडी चौधरवाडी या मार्गे फलटण शहरातून पुढे पंढरपूर माळशिरस कडे जातो या कॅनॉलमध्ये काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडवण्यासाठी गोहत्या करून या गोमातेचे मांस या कॅनल मध्ये टाकल्याने जैन समाज व मानभाव पंथीय समाज तसेच मारवाडी समाज यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे हे गोमास टाकलेल्या ठिकाणाहून आलेले पाणी नगरपरिषदेने शहराला वितरित करून ते पाणी अजाणते पणे शाकाहारी समाजाच्या लोकांना प्यावं लागले आहे त्यामुळे हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे तसेच पाटबंधारे विभागाने याबाबत कारवाईची भूमिका न घेतल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासून त्याची प्रतिकात्मक गाढवावरून भेंड काढण्यात येणार आहे असा इशारा फलटण शहर भाजपा अध्यक्ष अनुप शहा यांनी पत्रकामध्ये दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed