माळशिरस तालुका

मुस्लिम समन्वय समिती च्या वतीने विशालगड व गजापुर येथे अन्नधान्याची मदत

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिनांक १४/०७/२०२४ रोजी झालेल्या विशालगड, गजापूर येथे झालेल्या मुसिल बांधव  हल्ल्यात येथील मुस्लिम बांधवांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यांचेवर उपवास मारीची वेळ आल्यामुळे समस्त मुस्लिम समाज व माळशिरस तालुका तसेच मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने विशालगड व गजापुर येथे अन्नधान्य किट मदत म्हणून देण्यात आले. यावेळी मुस्लिम समन्वय समिती प्रदेश अध्यक्ष रशिद भाई शेख,  ,संपर्क प्रमुख शाहबाझ  शेख, मिडिया प्रमुख सलमान शेख फिरोजरजा तंबोली,मुबारक तंबोली, मुजफ्फर सय्यद, अशरफ मुल्ला, मुख्तार तंबोली, अंसार तांबोळी, ह. सय्यद मलिक रेहान ,मिरासाहेब दर्गा विशालगड चे ट्रस्टी व गजापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

शासनाने सामाजिक न्याय विभागाचा वळवलेला निधी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वापरण्यात यावा-वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाने बौद्ध अनुसूचित जातींचा प्रगतीचा निधी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यासाठी वळविला असलेने राज्य शासनाचा निषेध करून
सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता शिष्यवृत्तीसाठी वापरण्यात यावा अशी मागणी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्यसचिव वैभव गीते यांनी शासनाकडे केली आहे.

सामाजिक न्याय व विशेष विभाग हा मागासवर्गीय बौद्ध मातंग चर्मकार होणार या समाजांसह अनुसूचित जातींच्या 59 जातींच्या प्रगतीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी असलेला विभाग आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, वंचित घटकातील गोरगरिबांच्या प्रगतीचा उन्नतीचा निधी धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी व वारकरी सांप्रदाय यांच्यासाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या दिंडीसाठी देणे हे राज्य शासनाला शोभणार नाही. वंचित घटकांना अनुसूचित जातीच्या नागरिकांना दलितांची प्रगती उन्नती होऊ द्यायची नाही त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणी करायची नाही सुधारित कोणतीही योजना आणायची नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेवर द्यायची नाही. उच्च शिक्षणात भेदभाव करायचा आणि उरला सुरला त्यांच्या प्रगतीचा असणारा निधी देखील इतर विभागांना धार्मिक स्थळे पाहण्यासाठी देऊन टाकायचा म्हणजे मागासवर्गी यांवरती हा दुहेरी अत्याचारच आहे.
वंचित घटकातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना व वारकऱ्यांना एकमेकांच्या झुंजवत ठेवून भांडणे लावण्याचाच प्रकार यातून दिसत आहे.आमचा विरोध हा वारकरी किंवा वारकरी महामंडळास नाही. वारकऱ्यांच्या अडी अडचणी सुटल्या पाहिजेत.वारकऱ्यांची प्रगती झालीच पाहिजे.परंतु शासनाच्या इतर विभागातून त्यांना निधी दिला पाहिजे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू . अशा मागणी चे निवेदन वैभव गिते मुख्यमंत्री यांना दिले आहे निवेदनावरती.ऍड. डॉ.केवल उके
राज्य महासचिव एन डी एम जे,
वैभव तानाजी गिते राज्य सचिव ,पी. एस. खंदारे राज्य सहसचिव, शिवराम दादा कांबळे
राज्य कोषाध्यक्ष,पंचशीला कुंभारकर राज्य संघटक,दिलीपआदमाने राज्य निरिक्षक ,प्रमोद शिंदे
राज्य प्रसिध्दी प्रमुख यांच्या सह्या आहेत.

       नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन. डी.एम.जे) महाराष्ट्र राज्य या संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत बौद्ध मातंग चर्मकार होलार यांच्यासह अनुसूचित जातींच्या नागरिकांची प्रगतीसाठी खर्च करण्यात येणारा निधी राज्य सरकारने वळवण्याचा म्हणजे हा निधी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयांमधील साठ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे.तसेच महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा शासन निर्णय 14 जुलै 2024 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केलेला आहे. हे शासन निर्णय मा.मंत्री मंडळाच्या 11 जुलै 2024 च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात आला आहे. शिवाय वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीसाठी प्रत्येकी 30 हजार रूपये देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा वापरण्यात येणार आहे.

अक्षता म्हात्रे यांची हत्या करणाऱ्या तीन वासनांध बलात्कारी पुजाऱ्यांना फाशी होण्यासाठी संघर्ष करणार…. वैभव गिते , राज्य सचिव (एन.डी.एम. जे )

[पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क:संदेश भालेराव]
ठाणे डायघर – घरगुती भांडण झाल्याने विवाहित महिला वैतागली होती. शांतता मिळावी म्हणून ही विवाहित तरूणी ठाणे जिल्हयातील डायघरजवळील शीळ फाटा गणेश घोळ मंदिरात गेली होती. येथे मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर घृणास्पद पद्धतीने आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी तीस वर्षीय महिला घरगुती ताणतणाव कंटाळून सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात शांती मिळवण्यासाठी गेली होती. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली चहा प्यायल्यानंतर महिलेच शुद्ध हरपली. या दरम्यान या तीन नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटली आणि तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला.
दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले. मात्र पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली. दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन आरोपींना ताब्यात घेतले.अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत.

आज आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने डायघर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन तपासाची माहिती घेतली.
तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटुन कडक कारवाई करण्यासाठी चर्चा केली. यावेळी मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनवणे व सामजिक कार्यकर्ते भाऊराव तायडे हे उपस्थित होते.

महिला कोनत्या जातीची आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नसुन ती महिला आहे व तिच्यावर अन्याय झाला आहे एवढंच आमच्यासाठी महत्वाचे आहे. अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवत राहणारच…वैभव तानाजी गिते

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी नातेपुते नगरीत प्रशासनाची जोरदार तयारी


प्रशासनाच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- (प्रमोद शिंदे)
 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा  सोलापूर जिल्ह्यात येत आहे.  जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते तालुका माळशिरस येथे होत आहे. त्याच अनुषंगाने पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून व नातेपुते करांकडून संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. तसेच नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालय येथे पोलीस प्रशासनाकडून पोलीस फौज फाटा बोलवण्यात आला असून ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे  सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक १, पोलीस उपअधीक्षक ४, पोलीसनिरीक्षक ११, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर ४७, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस सब इन्स्पेक्टर ३. पुरुष पोलीस अंमलदार ३२२, महिला पोलीस ९२, वाहतूक पोलीस ५०, आरटीपीसी १०, गामा २१०, व्हिडिओग्राफर होमगार्ड पुरुष ३२५, महिला होमगार्ड ७०, एसआरपीएफ २५, पुरुष बॉम्ब शोध पथक २० व पुरुष ६३ असा पोलिसांचा ताफा तैनात आहे.तसेच महसूल प्रशासन, नातेपुते नगरपंचायत, आरोग्य विभाग, यांच्याकडून सुद्धा स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच विद्युत महावितरण अधिकारी यांच्याकडून ए बी केबल टाकण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून. ठिकठिकाणी चार्जिंग पॉइंट करण्यात आले आहेत. तसेच महावितरण च्या वतीने पाच अधिकारी व 80 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिरळे येथे संत बाळू‌मामा आषाढी एकादशी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –
श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर यांच्यावतीने संत बाळूमामा आषाढी एकादशी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन पिरळे येथे समता माध्यमिक विद्यालय भव्य प्रांगणात करण्यात आले आहे. कार्यक्रमाची रोपरेषा पुढीलप्रमाणे.*दि.०९/०७/२०२४* २. बाळूमामा बग्गा नन ४ चे आगमन सायं. किर्तन ७ ते ९ व बाळूमांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. भाऊसाहेब महाराज भिसे
दि.१०/०७/२०२४ आपला वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. हनुमंत महाराज फुले
*दि.११/०७/२०२४ आपला वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. श्रीराम गुलदगड महाराज
* दि.१२/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. ओवी ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद महाराष्ट्र केसरी शाहिर सत्यवान गावडे (महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यु-ट्युब चॅनल वरिल ओविकार)
*दि.१३/०७/२०२४ आपण वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प.बाळुमामा भक्त मेजरसाहेब
* दि.१४/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. वैभव महाराज सुरवसे
* दि.१५/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद
सायं. ओवी ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद
ओवीकार मंडळ वडूज यांची बाळूमामावर आधारित ओवी कार्यक्रम
*दि.१६/०७/२०२४ आपण वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प.
* दि.१७/०७/२०२४ सकाळी ९ वा. बाळूमामाची आरती व महाप्रसाद सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प. चोपडे महाराज रूकडीचा वालुग* दि.१८/०७/२०२४ सकाळी १९ वा. बाळूमामाची आरती व सायं. किर्तन ७ ते ९. व बाळूमामांची आरती व महाप्रसाद किर्तन सेवा ह.भ.प.गणेशानंद महाराज पिडियार भिगवन महाप्रसाद सदर कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ पिरळे त्यांच्या वतीने करण्यात आले आले आहे.बग्णा नं ४चे कारभारी बाळू शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाल सुरू.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त य.स.दा.संस्थेच्या वतीने विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूमहाराज यांच्याजयंतीनिमित्त
डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शना खाली
य.स.दा.संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप करून जयंती उत्साहात साजरी……

कल्याण तालुक्यातील रायते गावातील जिल्हा परिषद शाळेतील जवळपास १०० विद्यार्थीना
शालेय साहित्य वाटप करण्यात
आले

[पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क :संदेश भालेराव]

यसदा संस्था महाराष्ट्र राज्य, मैत्री कट्टा आणि भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड यांच्या विद्यमाने काल कल्याण ग्रामीण मधील जिल्हा परिषद शाळा रायते येथे गरजू आणि गरीब मुलांना तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळा रायते या शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व फुलांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कल्याण परिमंडळ २ महावितरण अधीक्षक दिलीपजी भोळे सर, एडूको इंडिया प्रकल्प आधिकारी सुकांतजी बेहेरा सर, सेवानिवृत्त आयकर अधिकारी के.पी. सोमकुवर सर तसेच यावेळी यसदा संस्थेचे अध्यक्ष ॲड.डॉ. केवलजी ऊके सर, य स.दा संस्थेचे सचिव शशिकांतजी खंडागळे, य.स.दा संस्थेचे सदस्य बंदीशजी सोनवणे, जिल्हा परिषद रायते शाळेच्या सौ. चित्रा प्रेमचंद बोंडे (मुख्याध्यापिका)
सौ. सीमा सुनिल जाधव ( सहशिक्षिका)
सौ. अर्चना राजेंद्र राठोड (सहशिक्षिका)
रायते गावच्या सरपंच स्मिता संतोष सुरोशी, रायते गावचे माजी सरपंच संतोष सुरोशी ,समाजसेवक विकास खंडागळे, उपक्रम समन्वयक भरत दळवी,
पत्रकार संदेश तुकाराम भालेराव, कुमारी खुशी केवल उके व अदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विशेष योगदान गुरुनाथ पाल्ये,विजय घडशी, अनिल भिवा पाल्ये , हरिश्चंद्र कुवळेकर, अनिल पाल्ये यांचे होते. या कार्यक्रमासाठी रायते गावातील शिक्षण प्रेमी नरेश सुरोशी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमात रायते शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शाळेच्या वतीने यसदा संस्था आणि मैत्री कट्टाकडे शाळेसाठी आवश्यक वस्तूंची मागणी करण्यात आली. शाळेला वह्या वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा रायते यांनी यसदा संस्था, मैत्री कट्टा आणि भरत दळवी युवा विकास मंच यांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.

य.स.दा सामाजिक संस्था, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड यांच्या संयोजनाने चासोळे गावात आरोग्य शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रतिनिधी संदेशभालेराव
मुरबाड तालुक्यातील टोकावडे विभागातील चासोळे गावात काल यसदा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड लाईफलाईन हॉस्पिटल कल्याण यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थ मंडळ चासोळे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले .हे शिबिर चासोळे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते .या शिबिराला चासोळे गावातील आणि परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात बीपी तपासणी, डायबिटीज तपासणी ,ईसीजी तपासणी, डोळे तपासणी तसेच रक्तदान शिबिर आणि इतर तपासण्या झाल्या. जवळजवळ शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी सहाय्यक आयुक्त नागपूर सुरेश कांबळे, मुख्य प्रबंधक मुंबई स्वप्निल सोमकुवर, यसदा संस्थेचे सचिव शशिकांत खंडागळे, उद्योजक विनोद जाधव, विकास खंडागळे तसेच चासोले गावातील सामाजिक कार्यकर्ते अरुण राऊत, विनोद राऊत ,आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद चासोळे शाळेचे शिवाजी तुंगार गुरुजी आणि त्यांचे शिक्षक उपस्थित होते. भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड अध्यक्ष पत्रकार भरत दळवी यांनी यावेळी उपस्थिती लावली. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यसदा संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील काही मुख्य गावांत डॉक्टर केवलजी उके साहेब यांच्या मार्गदर्शनात आरोग्य शिबीरांचे आयोजन केले जात आहे, तसेच काही सामाजिक उपक्रमसुद्धा राबविले जात आहेत , यसदा संस्थेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात भविष्यात आरोग्य उपक्रमाबरोबरच इतर अनेक सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी भरत दळवी यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रामस्थ मंडळ चासोळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी वैद्यकीय अधिकारी यांचेही स्वागत करण्यात आले . यावेळी मांडे सर, तुंगार सर, महेश राऊत सर, काकाजी थोरात, किसन आलम, दाजी राऊत, संभाजी आलम, शिवाजी निमसे, शकील शेख, मोहम्मद शेख, विशाल थोरात, मनीषा थोरात, किसन राऊत, विलास राऊत, धनाजी निमसे, एकनाथ निमसे, अनघुले सर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहीत आमचे प्रतिनिधि.संदेश भालेराव यांनी दिली

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागपत्रांची अडवणूक केल्यास ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होणार -वैभव गिते.

विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांचे सर्व प्राचार्यांना आदेश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्य महासचिव ऍड.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते, राज्य कोषाध्यक्ष शिवराम दादा कांबळे, राज्य संघटक पंचशीला कुंभारकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव तायडे,विकी शिलवंत यांच्या नेतृत्वात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे साहेबांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी सर्व अधिष्ठाता/संचालक/प्राचार्य/रजिस्ट्रार (सर्व), कनिष्ठ/वरीष्ठ/व्यावसायिक/विगर व्यावसायिक/तंत्र महाविद्यालये, पुणे जिल्हा यांना खालील आदेश दिले आहेत.

सामाजिक व विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णय दि. ७ ऑगस्ट २०१७ अन्वये सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासुन अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / शिक्षण फी परिक्षा फी या योजनेंतर्गत MAHADBT प्रणालीमार्फत लाभ देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत महाडीबीटी प्रणालीवरील (Pool account) व PFMS या प्रणालीव्दारे शिष्यवृत्तीचे निधी वितरण सुरु असून विदयार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. सदरील रक्कम PFMS या प्रणालीव्दारे वितरीत होत असल्याने, १. नॉन आधार अर्ज नोदणी केलेल्या अर्जामध्ये आधारक्रमांक अदयावत नसणे, २. विदयार्थ्यांचे आधार क्रमांक त्याच्या बँक खात्याशी संलग्न नसणे, ३. विदयार्थ्यांचे आधार क्रमांक इन अॅक्टीव्ह असणे, ४. विदयार्थ्यांनी व्हाउचर रिडीम न करणे, ५. विदयार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बँकेतील खाते बंद असणे, ६. विदयार्थ्यांचे आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे, ७. दुस-या हप्त्यासाठी महाविदयालय स्तरावर विदयार्थ्यांची उपस्थिती अदयावत करण्याकरीता अर्ज प्रलंबित असणे, इत्यादी बाबी विद्यार्थ्यांच्या आधार व बँक खात्याशी निगडीत असल्याने सदर बाबतीत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे किंवा कसे याबाबत महाविदयालयाने खातरजमा करून विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्याथ्यर्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम महाविद्यालयास प्राप्त न झाल्याने महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे देण्यास नकार दिल्याच्या अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत सदरील बाब ही उचित नाही. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची शिक्षण फी वसूल करू नये. तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असे आदेश शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत.विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती रक्कमेबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे शासन निर्णय, परिपत्रके च वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच याबाबत जिल्हयातील सर्व महाविद्यालयांना यापूर्वीच आवश्यक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तरीही महाविदयालये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क भरण्याकरीता सतत तगादा लावत असलेबाबत तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यास अडवणुक करीत असल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त होत आहेत.
त्या अनुषंगाने कळविण्यात येते की, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थीची शैक्षणिक कागदपत्रे तात्काळ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावीत व केलेल्या कार्यवाही अहवाल या कार्यालयास सादर करावा. शैक्षणिक कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर निश्चित करण्यात येईल, तसेच महाविद्यालयांकडुन पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अडवणुक केल्याची तक्रार कार्यालयास प्राप्त झाल्यास अशा महाविद्यालया विरूध्द अनुसुचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये कारवाई करण्यात येईल याची गांभर्भीयपूर्वक नोंद घ्यावी.असे पत्र कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असनारे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी पूणे विशाल लोंढे यांनी अधिष्ठाता/संचालक/प्राचार्य/रजिस्ट्रार (सर्व), कनिष्ठ/वरीष्ठ/व्यावसायिक/विगर व्यावसायिक/तंत्र महाविद्यालये, पुणे जिल्हा. यांना दिनांक 21 जुन 2024 रोजी काढले असल्याने सर्व प्रकारच्या महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहेत अशी चर्चा जनतेमध्ये पूणे जिल्हयात सुरू आहे.
शिवाय या पत्रासारखे आदेश राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये देण्यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी सर्व जिल्हा अध्यक्षांना आदेश दिले आहेत.

रत्नत्रय संस्थेकडून गरीब विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या शिक्षण संस्थेकडून मांडवे .यांच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे.      यामध्ये  २०२४ – २५ वर्षाकरिता गरीब व गरजू  हुशार विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना रत्नत्रय स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे . त्यासाठी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी स.नगर ,विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात आलेली आहे. यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सातारांकडून केला जाणार आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल दोशी व सचिव प्रमोद दोशी यांच्याकडून योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत अनेक दातारांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरवले आहे.यामध्ये सौ सुनीता अनिल दोशी – माढा १ विद्यार्थी दत्तक घेतलाश्री सचिन केंगार- सांगोला* १ विद्यार्थी दत्तक,श्री मिहीर बाहुबली गांधी – अकलूज* १ विद्यार्थी दत्तक,  चंद्रशेखर हरि थोरात- गोवा १ विद्यार्थी दत्तकअश्विनी गांधी- वेळापूर  विद्यार्थी दत्तक,आणि गुप्त दान करून सुद्धा पाच विद्यार्थी दत्त घेण्यात आले आहे. या दत्तक योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांना लाभ होणार असून. दानशूर दातारांनी यात दत्तक योजनेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे सचिव प्रमोद भैया जोशी यांनी केले आहे. रत्नत्रय विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये सहभागी झालेल्या  दातारांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे. दत्तक योजनेसाठी संपर्कप्रमोद अनंतलाल दोशी 989006352,मिहीर गांधी,वैभव शहा, अभिजीत दोशी , अभिजीत दोभाडा,रामदास  गोपने अमित पाटील ..

जिजाऊ सावित्रीची लेक असल्याचा अभिमान असला पाहिजे…. राजकुमार हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
शिवसेना भवन येथे नातेपुते पंचक्रोशीतील दहिगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत केला यावेळी महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे श्री अविनाश सुरवसे शिवसेनेचे नेते संतोषजी गोरे दहीगाव शहर प्रमुख विजय सरवदे उपप्रमुख दत्ता बोडरे नातेपुते शहरप्रमुख पोपटराव शिंदे भाजपचे मनोज जाधव भाजपचे सुनील बनकर अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे नातेपुते महिला शहर प्रमुख
यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले एकविसाव्या शतकात देशामध्ये स्त्री पुरुष समानता कायदा आणून समाजात महिलांना हक्क प्राप्त झाल्याची दिसून येते त्याचाच प्रत्येक म्हणून आज आजच्या कार्यक्रमाला सासू पण आहे सून पण आहे मुलगी पण आहे स्वतः पण उपस्थित आहेत म्हणजे मुलींमध्ये कुठेही भेदभाव असल्याचे दिसून येत नाही जिजाऊंनी जर बलिदान दिलं नसतं तर स्वराज्य घडलं नसतं आणि सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जर जातीपातीच्या भिंती पाडून स्त्री शिक्षणावर काम केलं नसतं तर कदाचित आज आपण एकमेकांच्या समोर या शिवसेना-भवना मध्ये प्रवेश करताना दिसला नसता म्हणून आपण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचार आचरणात आणला पाहिजे.
तालुकाप्रमुख महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे म्हणाल्या आज मला खरं भाग्य माझ्या माता माझ्या भगिनी वेगवेगळ्या कुटुंबातून असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्यामुळे त्यांच्या कोणत्याही दुःखाच्या सुखाच्या प्रसंगात मी स्वतः शिवसेनेचे रणरागिनी म्हणून सहभागी होईन.
यावेळी अनेक महिलांना शिवसेनेची नियुक्तीपत्र देण्यात आली दहिगाव महिला शाखाप्रमुख म्हणून स्वप्नाली केंगार सीमा अनिल कांबळे जिल्हा परिषद गट प्रमुख राणी अनिल राणी माने शाखा संघटक रेशमा बेंद्रे उपशाखाप्रमुख प्रणाली वेदपाठक तालुका उपप्रमुख रूपाली कांबळे कार्यकारणी सदस्य कोमल सरवदे सर्कार्यकारणी सदस्य रोहिणी सोनवणे. दहिगांव कार्यकारणी सदस्य श्रीमती विद्या भोसले सदस्य.अमृता सरवदे गोडसेवस्ती प्रमुख. सोनाली सोनवणे पंचायत समिती गणप्रमुख ज्योती चिकणे उपशहर प्रमुख नातेपुते अमृता सरवदे शाखाप्रमुख गोडसे वस्ती माया ढेकळे शाखाप्रमुख गोडसे वस्ती मनीषा माने कार्यकारी सदस्य स्नेहा बोडरे कार्यकारणी सदस्य सीमा आईवळे सदस्य कार्यकारणी सदस्य दिपाली झेंडे कार्यकारणी सदस्य साधना पावणे गोडसे वस्ती कार्यकारणी सदस्य रंजना शेंडे कार्यकारणी सदस्य धोंडाबाई ढेकळे कार्यकारणी सदस्य अनिता सोनवणे शेअर संघटक नातेपुते अलका शेंडे सदस्य सरस्वती शेंडे सदस्य राणी माने शाखा संघटक दहेगाव काजल झेंडे सदस्य रोहिणी झेंडे सदस्य कुमारी सानिया काटे तालुका मीडिया प्रमुख महिला आघाडी ची नियुक्तीपत्र शिवसेनेच्या रणरागिनींना देण्यात आली खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेनेविषयीच हक्काचे व्यासपीठ म्हणून हक्काचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येत आहे यावेळी सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे यांनी केलं.

You may have missed