आंतरराष्ट्रीय

कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

कांदा निर्यातीवरील बंदी  तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)कांद्याच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजून पावसाळी कांदा शेतकऱ्यांचा  बाजारात आलेला नाही तोवरच कांदा निर्यातीवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सध्या कांद्याला मिळणारा चांगला दर थांबला आहे. केंद्र शासनाने भारतात कांद्याचे दर वाढत असल्याने तसेच भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.परंतु या कांदा निर्यात बंदी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.यावर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकांदा निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर त्या निर्णयास विरोध करून केंद्रीय व्यापार वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांना तात्काळ संपर्क साधत व पत्रव्यवहार करून कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी  दिनांक 15 सप्टेंबर रोजी पत्राद्वारे केली आहे. या पत्रातील मागणीमुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

https://www.shakkyalegal.com/

https://www.shakkyalegal.com/

कोरोना संदर्भात नागरिकांनी गाफील न राहता सतर्क रहावे- सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- covid-19 कोरोना संदर्भात नातेपुते व परिसरातील लोकांनी गाफील न राहता सतर्क राहावे असे आव्हान रत्नत्रय इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज संचालक, महावीर इलेक्ट्रिक चे मालक, सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा यांनी केले आहे.कारण नातेपुते आणि परिसरात कोरणा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे नातेपुते ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे नातेपुते आणि परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते एकमेकांचा संपर्कही मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव पसरण्यासाठी वेळ लागणार नाही. तसेच नातेपुते आणि परिसरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच मृत्यूची संख्या ही वाढत आहे.त्यामुळे नातेपुते बाजारपेठेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, सँनीटायझर वापर हा नियमित करावा नाही तर येणारा काळ हा अतिशय भयंकर असेल. प्रत्येक घरांमध्ये कोविंड रुग्ण सापडू शकतो. सध्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड शिल्लक नाही ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच काळजी स्वतः घ्यायला हवी तसेच नातेपुते येथे शासकीय ऑक्सीजन बेड सह कोविड सेंटर लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणीदेखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा नातेपुते

पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांना लाडका भाचा सुरज वनसाळे यांचे सोशल मीडियाद्वारे पत्र

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
प्रिय दत्तामामा भरणे
सविनय जयभीम
पुन्हा काही दिवसांसाठी वाढत्या कोरोनाचे कारण देत आपल्या प्रशासनाने तालुका लाॅकडाऊन केला.
मामा,
या लाडक्या भाच्याची विनंती आहे की,
१) काही महिलांना(तालुक्यातील आपल्या काही बहीनींना) शेतात कामाला जावे लागते. कारण नवरा कामाला जाताना पोलीस कार्यवाही ला सामोरे जावे लागते.प्रसंगी मारही खावा लागतो किंवा आर्थिक झळही सोसावी लागते. लहान लहान मुले, लग्नाला आलेली मुलगी,अचानक उद्भवणारा दवाखाना ,शेती महामंडळाच्या पडक्या घरांची डागडुजी यासाठी फक्त २०० रुपये मध्ये रोजंदारीवर कामाला जावे लागते आहे. तुमच्या लाॅकडाऊन चे त्यांना घेणे देणे नाही. कधीतरी मरायचेच आहे असे महिलांचे म्हणणे आहे. कृपया त्यांची दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३३ वाजता शेळगाव येथे गाडी अडवून पोलीसांनी पावती केली आहे मोठा भाऊ म्हणून आपण त्यांना पैसे परत करा.(उद्या पुन्हा पावती होणार आहे! वालचंदनगरला तसा दम मिळाला आहे.)
२) कोरोना वाढण्यास गोरगरीब, सामान्य कार्यकर्ते, गवंडी, मजुर, यांचा काहीच संबंध नाही. सुशिक्षित बेरोजगार यांचाही संबंध नाही त्यांची लग्न मोडत आहेत. कुठे काम नाही, त्यामुळे व्यसनाधीनता वाढत आहे….वय वाढत आहे.त्यांचा आत्महत्या करण्याचा विचार आहे. त्यांना कोरोनाने मेल्यामुळे काही फरक पडणार नाही असे बेरोजगार मुलांचे म्हणने आहे. कृपया काम बघा, जमत नसेल तर मुलगी बघा. त्यांचे काही महिन्यांपासून आलेले नैराश्य जाईल.
काही गोष्टी अपवाद असतात. योग्य कामात आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही.काही बाबींमध्ये आम्ही दुर्लक्ष करतोच ना?…… तसेच आपल्या कार्यकर्ते यांनी गावागावात अडीचशे रुपयाचे दिलेले कीट दोन महिन्यापूर्वीच दोन दिवसात संपले. शासनाने दिलेले पाचशे रुपये कुठे गेले ते आता सांगणार नाही. पावसाने चांगलेच झोडपले आहे किरकोळ आजारांनी व त्याला आलेल्या खर्चांनी सामान्य माणूस खचून गेला आहे. त्यामुळेच राबराब राबणाऱ्या महिलांना १ रुपया महत्त्वाचा आहे.मामा आपले,शासनाचे, पोलीस यंत्रणेचे काम खुप चांगले चालले आहे. निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश येवून कोरोना आटोक्यात येईल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तसेच मामा, काही खाजगी डाॅक्टरांनी औषधे चोरली ते खरे आहे का ? त्यांच्यावर गुन्हे दाखल केलीत का ?
असो, निश्चित या भाच्याला आपण नाखुश करणार नाही.तसेच कोरोनापासुन तब्ब्येतीची काळजी घ्या. पोलिस बांधवांना या आजारापासून तब्बेत जपण्यास सांगा. अन् तेवढे पैसे द्या. त्या सर्व १८ महिलांना आपल्या घरी फाडलेल्या पावतीचे पैसे नेण्यास पाठवु का ?
कळावे

आपला लाडका भाचा
सुरज वनसाळे
लाडका भाचा सुरज वनसाळे अध्यक्ष मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना

संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून राज्यशासनाने आरेमधील आदिवासी कुटुंबांचे घर आणि शेतीचे अधिकार हिसकावू नयेत यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आरेतील आदिवासींच्या पाठीशी

    
संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून राज्यशासनाने आरेमधील आदिवासी कुटुंबांचे घर आणि शेतीचे अधिकार हिसकावू नयेत यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आरेतील आदिवासींच्या पाठीशी

आरे तील आदिवासींचे हक्क वाचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार – सुमित वजाळे

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क मुंबई( प्रमोद शिंदे) दि. 14 – आरेच्या जंगलाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आरेतील ६०० एकर जमीन आता वनासाठी राखीव ठेवत संरक्षित वनक्षेत्र जाहिर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरून या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.अरे ला संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून त्यातील आदिवासी कुटुंबांचे शेती आणि निवासाचे पिढीजात अधिकार राज्यशासनाने हिसकावून घेऊ नयेत यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या झोपडपट्टी महासंघाने अभ्यास दौरा करुन राज्य शासनाला निवेदन द्यावे त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे यांनी दिली आहे.

या पाश्वभूमीवर आरेमधील श्रमिक मुक्ती संघटनेने आयोजित कालच्या बैठकीत मा.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून आरेमधील आदिवासी पाड्यांची पाहणी करण्यासाठी व सध्य स्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यासगट तयार करण्यात आला आहे.
आरे मधील ज्या जमिनीवर आदिवाशींची घरे आहेत,जी जमीन ते शेतीसाठी कसत आहेत ती जमीन गावठाण म्हणून घोषित करावी.
आरे मधील ६०० एकर जमीन वन घोषीत करण्याबाबत घेतलेला निर्णय हा पर्यावरणासाठी योग्य आहे. मात्र आदिवासींचे हक्क अबाधित राहावेत ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.
हा निर्णय घेण्याआधी शासनाने आदिवाशींचा विचार करणे आवश्यक आहे.आदिवासींचे हक्क अबाधित राहावेत यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे आदिवासींच्या पाठीशी आहेत.
आरे मधील आदिवासी कुटुंबाना बेघर होऊ देणार नाही.अशी भूमिका रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुमित वजाळे यांनी काल झालेल्या खांबाचा पाडा आदिवासी गावठाण येथील बैठकीत मांडला.

केंद्रीय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले अभ्यासगटाचा अहवाल पाहून या विषयी मुख्यमंत्री यांच्याशी भेटून बैठक घेतील.
खांबाचा पाडा येथे झालेल्या बैठकीत सुमितभाऊ वजाळे, अध्यक्ष रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ, मा.ऍड.क्रांती एल.सी.,इंडिया सेन्टर फॉर हुमन राईट, मा.नलिनीताई भुजड, मुंबई अध्यक्षा श्रमजिवी संघटना, मा.अशोकराव खांडवे, २७ पाडे प्रमुख, मा.रवींद्र दोडीये अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी संघटना, मा.कृष्णा पांगे, अध्यक्ष खांबाचा पाडा, मा.अंकुश भोईर अध्यक्ष श्रमिक मुक्ती संघ, मा.राजू वळवी खांबाचा पाडा प्रमुख, व रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस रतन स.अस्वारे, भीमराव कांबळे, संतोष थोरात, गुलाब गुप्ता, गौतम मोरे, विनोद सोनावणे,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते
.

     

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा 12 वा वर्धापन दिन उत्स्फूर्तपणे साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (मांडवे),प्टेंं रत्नत्रय शैक्षणिक संकुलात मंगलमय सूर, आकर्षक सजावट, लक्षवेधी रांगोळी, आशा चैतन्यदायी वातावरणात रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचा 12 वा वर्धापनदिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित उत्स्फूर्तपणे पार पडला. संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी यांच्या अध्यक्षतेखाली व रत्नत्रय पतसंस्था चेअरमन विरकुमार दोशी,
रत्नत्रय इंग्लिश स्कूल, व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद भैय्या दोशी, प्रशाला कमिटी सदस्य संतोष गुरव, बाहुबली दोशी, आनंद शेंडगे, ज्ञानेश राऊत, दत्ता भोसले, यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरवात भगवान महावीर व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. अध्यक्षीय भाषणात बोलताना दादा म्हणाले ” शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होवू शकणार नाही. या ससंस्थेतील विद्यार्थी यशाची विविध शिखरे पादाक्रांत करेल आशा प्रकारचे काम सर्व शिक्षकानीं करावे ” त्या नंतर त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा दिला. चेअरमन प्रमोद दोशी म्हणाले ” रत्नत्रय ही विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून चालणारी शिक्षण संस्था आहे. म्हणूनच ही संस्था अल्पवधितच विश्वासास पात्र झाली आहे.
पुढे ते म्हणाले सर्व शिक्षकांनी पालकांच्या अपेक्षा पूर्ती साठी काम करावे. तसेच सर्व शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैवत वाघमोडे सर, सूत्रसंचालन माधवी रणदिवे मॅडम तर आभार प्रदर्शन पिसाळ मॅडम यांनी केले.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन : अनंतलाल दादा दोशी

वाशीम येथे एन.डी.एम.जे ची कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशिम – नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस च्या वतीने वाशिम जिल्ह्यातील एनडीएमजे कार्यकर्ता आढावा व नियोजन बैठक एनडीएमजे चे वाशिम जिल्हा अध्यक्ष समाधान सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सहसचिव पी एस खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मौजे झोडगा खुर्द येथे एनडीएमजे चे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष भागवत गवई यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या आढावा व नियोजन बैठकीत पुढील विषयावर चर्चा घडवून आणली गेली या मध्ये जिल्हा स्तरावर एनडीएमजे चे जनसंपर्क कार्यालय सुरू करणे, दर पंधरा दिवसांनी विविध कायदे विषयक एक कार्यशाळा प्रत्येक तालुक्यात आयोजित करणे,दर महिन्याच्या शेवटच्या रविवार ला मासिक बैठक/चर्चा सत्र/विचारविनिमय, आढावा बैठक आयोजित करणे,एनडीएमजे संघटनेत बौद्ध मंडळी सह इतरही अनेक जाती जमाती चा सहभाग वाढवणे व क्रियाशील सदस्य, पदाधिकारी यांची नेमणूक करणे, महिला व युवा सहभाग वाढवणे, अनुसूचित जाती आणि जमाती च्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी जिल्हा स्तरावर धरणे, मोर्चा अंदोलन निश्चित करणे, कोरोणा व्हायरस च्या प्रादुर्भावात प्रभावीत/संकटात सापडलेल्या व्यक्ती ला मानसिक व सामाजिक आधार व धिर देने,अनुसूचित जाती आणि जमाती च्या व्यक्तीवर होणारे अन्याय अत्याचारात न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे आदी सह विविध विषयांवर सामुहिक चर्चा घडवून आणली गेली.
बैठकीला महादेव कांबळे, भीमराव खरात, रामदास वानखेडे, अनिल साळवे, बबन खरात, प्रकाश सरकटे, नारायण सरकटे, विश्वास कांबळे, साईनाथ कांबळे, स्वप्निल सरकटे, वसंतराव वानखेडे, चित्रलेखा सरकटे, शिंदुबाई सरकटे, शोभाताई सरकटे, संगिता वानखेडे, किरण गवई, भागवत गवई, संदिप खडसे, संदिप सावळे, सुमेध वानखेडे, ज्ञानबा सरकटे, मधुकर ताजणे, कुलदीप सरकटे, रामकिसन खिल्लारे, गौतम गवई आदी उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचालन महादेव कांबळे यांनी तर आभार रामदास वानखेडे यांनी मानले…
पुढील रविवार ला सकाळी अकरा वाजता जांब अढाव येथे विविध कायदे विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे रिसोड तालुका अध्यक्ष बबन खरात यांनी जाहीर केले आहे.
उपस्थित सर्वांचे आभार मानुन आजची आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली….
वृत संकलन नारायण सरकटे यांनी केले.

न्य्य

पी एस खंदारे साहेब यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता काढावा बैठक संपन्न

एन.डी.एम.जे. दिल्ली की ओर से “क्वेस्ट फॉर जस्टिस” पुस्तक का ऑनलाइन प्रकाशन

  • पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क (प्रमोद शिंदे )नेशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस (NDMJ), NCDHR और नेशनल फेडरेशन ऑफ एट्रोसिटीज़ लॉ एम्पावरमेंट ने एक ऑनलाइन रिपोर्ट में अंग्रेजी रिपोर्ट बुक “आस न्यायकी”, “क्वेस्ट फॉर जस्टिस” प्रकाशित की है। जनरल सेक्रेटरी रमेश नाथन, नेपाल के सांसद मिनी विश्वकर्मा, विश्वविद्यालय अनुदान आयोग के अध्यक्ष प्रोफेसर सुखदेव थोरात, एशिया फोरम के अध्यक्ष पॉल दिवाकर, भारतीय दलित अध्ययन संस्थान छत्तीसगढ़ की सुश्री ममता कुजूर, तमिलनाडु के पीपल्स वॉच के कार्यकारी निदेशक दलित आर्थिक उन्नयन के महासचिव बिना पॉल्पिकल, एडवोकेट राहुल सिंह।साथ ही कई गणमान्य व्यक्तियों की ऑनलाइन उपस्थिति में “क्वेस्ट फॉर जस्टिस” रिपोर्ट बुक का प्रकाशन संपन्न हुआ । यह किताब (रिपोर्ट)या अहवाल दलितों और आदिवासियों के खिलाफ हिंसा की प्रकृति और सीमा पर आधारित है। यह पिछले दस वर्षों में अत्याचारों के समग्र कार्यान्वयन को प्रस्तुत करता है। कार्यक्रम का प्रस्ताविक रमेश नाथन द्वारा किया गया। माननीय पूर्व न्यायमूर्ति बी.जी. बालकृष्णन ने हवाला की तलाश के लिए एन.डी.एम.जे. और एन.सी.डी.एच.आर.की प्रशंसा की और कहा कि इस कानून का दुरुपयोग किया जा रहा है। एट्रोसिटी कानून में शिक्षा का प्रमाण बहुत कम है! इसलिए शिकायतकर्ता और गवाह इन पर दबाव डाला जा रहा है । आपराधिक, न्यायिक प्रशासनिक व्यवस्था को गंभीरता से नहीं लिया जाता है। उन पर एफआईआर दर्ज करने की आवश्यकता है। जो पुलिस पीड़ित व्यक्ति तरफ ध्यान नहीं देते हैं अपने कर्तव्य के प्रति ईमानदार नहीं है ऐसे लापरवाही बरतने वाले पुलिस अफसरों पर कार्यवाही होनी चाहिए,इसकी माँग की !और अदालती मामलों की लड़ाई बढ़ती जा रही है,इस पर चिंता व्यक्त की ! माननीय न्यायमूर्ति बी.जी. बालकृष्णन उन्होंने इस कार्यक्रम में उपस्थित रहनेवालों सांसदों को धन्यवाद दिया। नेपाल के सांसद मिनी विश्वकर्मा, डॉ। रमेश नाथन, डॉ। पॉल दिवाकर, सलाहकार राहुल सिंग सहित कई गणमान्य लोगों ने इस आयोजन पर अपने विचार व्यक्त किए। इस कार्यक्रम मे नेपाल, भारत, महाराष्ट्र, तमिलनाडु, दिल्ली, बिहार, राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश और कई अन्य राज्यों के एन.डी.एम.जे.के गणमान्य पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे।
एन.डी.एम.जे. के जनरल सेक्रेटरी रमेश जी नाथन की ओर से “क्वेस्ट फॉर जस्टिस” पुस्तक का ऑनलाइन प्रकाशन
पुर्व न्यायमूर्ती बी जी बालकृष्ण आपणा मनोगत व्यक्त करते हुए
नेपाल के सांसद मिनी विश्वकर्मा आपणा मनोगत व्यक्त करते हुए
एडवोकेट राहुल सिंग आपनी बात रखते हुए
प्राध्यापक सुखदेव जी थोरात मनोगत व्यक्त करते
महाराष्ट्रा से कार्यक्रम मे सहभाग एडवोकेट केवल ओके
सांसद डॉक्टर तिरु मालवालावन
Quest for Justice boock

हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन *

*हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन *

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली (मोहन दिपके) जवळा बाजार जिल्हा हिंगोली येथे भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक यांची खातेनिहाय चौकशीकरून निलंबित करा या मागणीसाठी
भीमशक्त संघटनेने अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन केले
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील व्यवस्थापक हे दलालां कडून चिरीमिरी घेऊन व पुढार्यांच्या सांगण्यावरूनच विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्ज प्रकरणे करत असून सामान्य माणसाना जाचक अटी लावून सतत टाळाटाळ करून दलालांच्या मार्फत अवैधरित्या मायपुंजी जमा करण्यात गुंग आहेत असा आरोप भीमशक्ती संघटना व नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस अध्यक्षांनी केली आहे. या आंदोलनात बँक व्यवस्थापक यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. बँक व्यवस्थापकांना त्यांनी चक्क गाढवाची उपमा देऊन “गाढव आंदोलन” जवळा बाजार एसबीआय बँक समोर करण्यात आले. सामान्य माणसाना अडथळा निर्माण व कामचुकारपणा केल्यास पुढील परिणामास बँक व्यवस्थापक जबाबदार राहतील याची असे भीम शक्ती युवा तालुका उपाध्यक्ष प्रमोद कुलदीपके यांनी सांगितले. मोर्चा त्यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. या मोर्चास भीमशक्ती मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे, युवा जिल्हा अध्यक्ष विशाल इंगोले, , सागर दिपके, रवी दिपके,. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस.NDMJ चे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष जगदीप दीपके, जिल्हा अध्यक्ष मोहन दिपके. व सर्व NDMJ टीम हिंगोली.सिद्धार्थ भारशंकर, सुमेध मुळे आशिष भैया परीहार, दिलीप भंडारे, अनिल भंडारे , संदीप कुलदीपके, , राहुल घोडके, अनुराधा किर्तन, राहुल वाळवंटे, विलास ठगे, बालाजी पवार, विवेक जमदाडे, जगन धबडगे, महेश कदम , संदीप सुर्यवंशी, काशिनाथ गायकवाड, आशाताई किर्तन, समीर शेख, अमोल सोनवणे, जगन धबडगे, भीमशक्ती सामाजिक संघटना ,नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस. संघटना व कार्यकर्ते करते उपस्थित होते

हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे अनोख्या पद्धतीने गाढव आंदोलन *

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शने

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शने

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि.10 – लॉकडाऊन नंतर आता अनलॉक सुरू झाले आहे. राज्यात सर्व गाड्या; दुकाने;मॉल सुद्धा सुरू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या नियमांचे पालन करीत;सुरक्षित अंतर राखून सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत या मागणी साठी आज मुंबईत चैत्यभूमी येथे केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. खुली करा खुली करा चैत्यभूमी खुली करा अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर हे उपस्थित होते.
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी राज्यभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले ) यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्या अंतर्गत आज मुंबईत चैत्यभूमी येथे आंदोलन करण्यात आले. चैत्यभूमी हा आंबेडकरी जनतेचा आत्मीयतेचा श्रद्धास्थान आहे. असे न रामदास आठवले म्हणाले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करू नये.मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख नसून ते राज्याचे प्रमुखआहेत. कंगना या दुखावलेल्या आहेत. त्यांना भेटून मी समजूत काढणार आणि त्यांना पाठिंबा देणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शने

*अभिनेत्री कंगना राणावतच्या रक्षणासाठी आज मुंबई विमानतळावर रिपाइं कार्यकर्ते सज्ज राहणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- दि. 8- अभिनेत्री कंगना राणावत या उद्या बुधवार दि 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहेत. त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संरक्षण देण्यासाठी रिपाइं चे कार्यकर्ते निळे झेंडे घेऊन मुंबई विमानतळ येथे दुपारी 12 वाजल्यापासून सज्ज राहतील. तसेच कंगना राणावत यांच्या घराला ही रिपाइं कार्यकर्ते संरक्षण देतील.असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. कंगना राणावत यांनी नुकताच ना रामदास आठवले यांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून आपण महाराष्ट्राची भक्त असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे कंगना ला महाराष्ट्रद्रोही म्हणण्याचा कांगावा शिवसेने ने आता करू नये. अभिनेत्री महिला असणाऱ्या कंगणाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे.भारतीय राज्य घटने ने सर्वांना विचारस्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कंगना च्या संरक्षणासाठी उद्या दि. 9 सप्टेंबर रोजी रिपाइं चे  राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर;  जिल्हा अध्यक्ष विवेक पवार ; सिद्धार्थ कासारे; किशोर मासुम  यांच्या नेतृत्वात रिपाइं कार्यकर्ते मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सज्ज राहणार आहेत अशी माहिती रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांनी दिली आहे. 

 * * *अभिनेत्री कंगना राणावतच्या रक्षणासाठी आज  मुंबई विमानतळावर रिपाइं कार्यकर्ते सज्ज राहणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले* 

You may have missed