आंतरराष्ट्रीय

नातेपुते परिसरातील शाळांचा बारावीचा निकाल 100% टक्के.

— पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे (नातेपुते) महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला.  यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के इतका लागला आहे. त्यात नातेपुते परिसरातील बऱ्याच शाळेचा शंभर टक्के निकाल लागल आहे त्यामध्ये नातेपुते एज्युकेशन सोसायटी बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला सर्वात मोठी शाळा असून शंभर टक्के निकाल लागला आहे  निकाल पुढील प्रमाणे. शास्त्र100%,वाणिज्य 100%,कला 99.47%शाखा निहाय निकाल शास्त्र शाखा1)साक्षी सुनील निकम  82.77%2) सरगर छाया महादेव 82.46%3) सोरटे दीपाली शिवाजी  82.31%वाणिज्य शाखा1) पाठक प्राची प्रताप84.30%, 2)मोरे पूजा बाळासाहेब82.77%,3) राऊत वैष्णवी नितीन 82.15%,कला शाखा 1)निर्मळ कोमल कैलास86.46%2) जाधव संदीप बाळू 80.76%3) शिंदे सुनीता सोमनाथ79.23%उपप्राचार्य श्री भारत पांढरे व विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी केले आहे तसेच  सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय यांचा निकाल निकाल-94.23% लागला असूनशास्त्र शाखा – 94. 23 %,वाणिज्य शाखा-87.50%,
 कला शाखा-66.66%, शास्त्र शाखेमध्ये1) रणजीत मल्‍हारी एकतपुरे 79. 53%,2) समीक्षा कुंडलिक सस्ते 72.30%,3) प्रतिक्षा संपत आवळे70.30%, वाणिज्य 1)योगिता किसन ननवरे79.23%, निकिता किसन नवरे77.38%, सानिका नाथा चव्हाण72.% कला शाखा- स्वाती महादेव शिंगाडे 71.84%, रविराज पोपट माने63.53%, राम कृष्ण तुकाराम वसेकर62.46%, असा निकाल असून पद्मजा देवी मोहिते-पाटील व धवलसिंह मोहिते-पाटील यांनी प्राचार्य सी बी कोळेकर व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समता माध्यमिक विद्यालय व भिवाई देवी ज्युनियर कॉलेज पिरळे  यांचा 100 टक्के निकाल लागला आहे.  कॉलेज तसेच चंद्रकांत घुगरदरे प्रशाला ज्युनियर कॉलेज यांचा निकाल 91.86% लागला आहे. शास्त्र विभाग 98.7%, कला विभाग82.35%, शास्त्र शाखेमध्ये 1)हिमांशू प्रताप जाधव 80.30%,2) वंदना राजू मेत्रे 70.30%,3) माया बाजीराव रुपनवर69.23%, कला शाखा -ऐश्वर्या जीवन सोरटे64%, प्रदीप कर्चे59.7%, उत्कर्ष बाळासाहेब किर्दक58%,. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील जुनिअर कॉलेज नातेपुते. कला शाखा निकाल 86.49 1)निकिता प्रभाकर मस्कर 70.76 %2)वैशाली प्रभाकर कर्चे 69.84%,3) रोशनी असिफ शेख 68.30 %यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील व प्रशाला समिती सभापती मा.श्री. राजाभाऊ लव्हाळे यांनी केले. रत्नात्रे इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे यांचा सलग दुसऱ्यांदा 100% निकाल असून चेअरमन प्रमोद दोशी व संचालक मंडळ यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.

तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची धडक कारवाई नियम मोडणाऱ्यांकडुन हजारोंचा दंड वसुल

तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची धडक कारवाई नियम मोडणाऱ्यांकडुन हजारोंचा दंड वसुल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -आजिनाथ राऊत उस्मानाबाद जवळा नि प्रतिनिधी
जवळा नि येथे कोरोना विषाणूस प्रतिबंध करण्यासाठी तालुका दंडाधिकारी अनिलकुमार हेळकर, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद, तालुका आरोग्य अधिकारी सय्यद साहेब, या परांडा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी यांनी जवळ्याचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांना सक्त सुचना देत सोबत घेऊन धडक मोहीम राबविली.
तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी पोपट खटकाळे सरपंच नवजीवन चौधरी, उपसरपंच अशोक गवारे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत नियम मोडणाऱ्या शेकडो नागरीकांकडुन दंड वसुल केला.
त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत. संचारबंदीच्या काळात गरज नसतानाही बाजारात व चौकाचौकात फिरणाऱ्यांवर वरील सर्व अधिकारी यांनी संयुक्तरीत्या कारवाईचा बडगा उगारला असून, अनेक ठिकाणी धडक मोहीम हाती घेतली आहे. जवळा नि गावातील बाजार चौकासह विविध ठिकाणी पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांचेसह तालुका विभागातील अधिकारी यांनी चौकाचौकात बिनकामाचे बसण्यास बंदी घातल जवळा भांडगाव मार्गे बार्शीला जानारा रस्ता बंद करीत कारवाई केली.
अनेकजण गरज नसताना बाजारात फिरत होते. तर काही जण मास्क शिवाय फिरताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई तालुका प्रशासनातील पोलीस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी या पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत विना मास्क प्रत्येकी २०० रुपये तर चार चाकी नियम मोडून फिरणाऱ्यांकडुन प्रत्यकी ५०० रुपये असा दंड वसूल करण्यात आला. पोलीस आणि इतर प्रशासनाच्या वतीने दिवसभर हि कारवाई सुरू होती.

कारवाई करताना प्रशासकीय अधिकारीवर्ग

दोन दिवसीय विशेष पावसाळी अधिवेशन घेऊन अनुसूचित जमाती जातीच्या बजेटचा कायदा पारित करावा. एन डी एम जे

महाविकास आघाडी सरकारचा सामाजिक न्याय विभागाच्या अखर्चित निधीवर दरोडा

दलितांचा निधी वळवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध…रमाताई आहिरे

दोन दिवसीय विशेष पावसाळी अधिवेशन घेऊन बजेटचा कायदा पारित करावा….. वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सात कोटी चौऱ्यानव लाख एकोननव्वद हजार दोनशे आडोतीस एवढा प्रचंड प्रमाणातील अखर्चित निधी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव रवींद्र गुरव यांच्या सहीने दिनांक 9 जुलै 2020 रोजी विशेष बाब म्हणून खर्च करण्यास शासनाची मान्यता दिली आहे.असे पत्र महाविकास आघाडीच्या अधिकृत फेसबुक पेज वरून प्रसारित केली गेली आहे.
हा निधी सारथी संस्था पुणे साठी वर्ग केला आहे.सारथी या संस्थेतर्फे मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण व मदत दिली जाते मराठा समाजातील युवकांच्या व नागरिकांच्या विरोधात आम्ही नाही मराठा समाजाची प्रगती झालीच पाहिजे.त्यासाठी शासनाकडे अनेक प्रकारचा निधी शिल्लक आहे त्यामधून सारथी या संस्थेसाठी निधी द्यावा.परंतु सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाच्या निधी वळवू नये.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून बौद्ध मातंग चर्मकार यांच्यासह अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींच्या प्रगतीसाठी त्यांच्या विविध योजनांसाठी हा निधी वापरण्यात येतो महाराष्ट्रातील बौद्ध दलित आदिवासींची परिस्थिती आजही खूप हालाखीची आहे लाखो लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगताहेत बहुतांश लोक भूमिहीन असून मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करतात अशी परिस्थिती असताना त्यांच्या हक्काचा निधी मराठा समाजाच्या साठी कार्यरत असलेल्या सारथी संस्थेला देणे न्यायोचित वाटत नाही शिवाय बौद्ध दलित आदिवासींवर हा एक प्रकारचा अन्याय अत्याचारच आहे
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेला निधी यापूर्वीच्या सरकारच्या काळांमध्ये सुद्धा वळवला आहे तसेच अखर्चित ठेवला आहे त्यामुळे वारंवार संस्था-संघटनांच्या वतीने अनुसूचित जाती व जमातींचा प्रगतीचा निधी वळवू नये किंवा खर्च ठेवू नये म्हणून बजेटचा कायदा करावा अशी मागणीही झालेली आहे यासाठी विधान भवनात विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न सुद्धा उपस्थित झाले आहेत प्रश्न उपस्थित करणारे सध्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बसलेले आहेत बौद्ध अनुसूचित जाती जमातींच्या प्रगतीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेला निधी वळवू नये तसेच अखर्चित ठेवू नये म्हणून शासनाने दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलावून त्यामध्ये बजेटचा कायदा पारित करावा अन्यथा शासनाला बौद्ध दलित आदिवासींच्या रोषाला व आंदोलनाला सामोरे जावे लागेल असे निवेदन नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना पाठवण्यात आले आहे निवेदनावर राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके,राज्य विधी सल्लागार ऍड.अनिल कांबळे, राज्य सचिव वैभव गिते,राज्य समन्वयक रमाताई अहिरे,राज्य सहसचिव पी.एस खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे,राज्य व्यवस्थापक अम्पल खरात,राज्य सहकोषाध्यक्ष शरद शेळके,राज्य संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या सह्या आहेत.

*बेशिस्त वाहनचालकांवर नातेपुते पोलिसांकडून कार्यवाही सुरू *

नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे बेशिस्त वाहनचालकांवर स्वतः कारवाई करताना
ट्राफिक हवालदार लोकांना नियम संदर्भात सांगताना

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते (प्रमोद शिंदे )-नातेपुते आणि परिसरात बेशिस्त पणे व covid-19 च्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या  नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती नातेपुते पोलिसांच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे.सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांनी दिनांक 5 जुलै रोजी कोरणा विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून काही नियमावली आखून दिली आहे.या नियमावलीचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणाऱ्या लोकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस प्रशासन व इतर प्रशासकीय यंत्रणा यांना दिले आहेत. या आदेशाचे पालन नातेपुते पोलीस प्रशासनाच्या वतीने काटेकोरपणे करण्यात येत आहे.नातेपुते येथे दुचाकीवर डबलसीट,ट्रिपल सीट विनाकारण फिरणारा वर व मास्क विना फिरणारा वर दंडात्मक खडक कारवाई सुरू केली आहे. सदर कारवाई मास्क न वापरल्यास  100 रुपये दंड,दुचाकीवर दोघे प्रवास केल्यास 500 रुपये दंड, चार चाकी व तीनचाकी तीन व्यक्तींनी पेक्षा जास्त व्यक्ती बसल्यास प्रत्येकी 500 रुपये,निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवल्यास1000 रुपये दंड, अत्यावश्यक सेवा वगळून साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मालक किंवा नोकर  दुकानात आढळल्यास सात दिवस दुकान आदिवस दुकान सील करण्यात येणार असून होम कारण टाईम न पाळल्यास 1000 रुपये, दंड  सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 200 रु ,दुकानात पाच पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास 500 रु, सार्वजनिक सार्वजनीक दारू,पान,तंबाखू सिगरेट चे सेवन केल्यास 500 रु, फळविक्रेते भाजीवाले मास्क न वापरल्यास 100 रूपये,अशाप्रकारे दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार आहे दिवसभरात 47 लोकांवरती कारवाई करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.तरी पोलीस प्रशासनाकडून परिसरातील लोकांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आव्हान करण्यात आले आहे नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल येईल असा इशारा देण्यात आला आहे.

महा विकास आघाडी सरकारच्या काळात दलितांवर वाढत असलेल्या अत्याचारा निषेधार्थ रिपाईचे आंदोलन- रामदास आठवले

  *महा विकास आघाडी सरकारच्या काळात दलितांवर वाढत असलेल्या अत्याचारा निषेधार्थ रिपाईचे आंदोलन- रामदास आठवले 

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे (नातेपुते) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकार च्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत. लॉक डाऊन च्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे; घरे जाळल्याचे; दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत. दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.बौद्ध आणि  दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी  तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ येत्या दि.11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालय; तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. 
हे निषेध  आंदोलन फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळून आणि मास्क घालून  करण्याची सूचना रिपब्लिकन कार्यकर्त्यांना दिली असून आंदोलन करताना गर्दी न करण्याची सूचना ही देण्यात आली आहे असे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे. 
राज्यात दलितांवरील वाढत्या  अत्याचाराच्या प्रश्नावर निषेध   आंदोलन करण्यासाठी दि. 11 जुलै ही तारीख निवडण्यात आली आहे.दि.11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट  गोळीबार  करण्यात आला. त्यात 11 जण शाहिद झाले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.11 जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते तसेच या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ  आंदोलन करते. त्यामुळे दि. 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार आहेत अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी माध्यमांना दिली आहे. 

बौध्द अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा निधी कोरोना साठी वळवू नये*

वळवल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा एन डी एम जे चा इशारा

प्रमोद शिंदे (नातेपुते शासनाकडील बौद्ध अनुसूचित जाती जमाती हक्काचा निधी कोरोना साठी वळवू नये वळवल्या महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उप विभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य विकास दादा धाइंजे व एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून दिला आहे.
माजिक न्याय व विशेष सहायय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती,बौद्ध घटकांकरिता व त्यांच्या प्रगतीचा असलेला कोट्यवधी रुपयांचा निधी (बजेट) कोरोना covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोरोना कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी,महसूल,सार्वजनिक बांधकाम,आरोग्य व वनविभागाचा हजारो कोटी रुपये निधी शासनाकडे आहे
कोरोनाच्या कोविड 19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बौद्ध अनुसूचित जातीच्या नागरिकांची परिस्थिती हालाखीची झाली आहे उदरनिर्वाहाचे साधन फक्त मजुरी असल्याने दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडली असून अनेक कुटुंब फक्त भात खाऊन उपाशी झोपत आहेत.अनेक कुटुंब उपासमारीने आत्महत्या करीत आहेत.तर अन्याय अत्याचाराने परमोच्च बिंदू गाठला आहे.
त्यामुळे बौद्ध,अनुसूचित जातीतील नागरिकांचे व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हक्काचा व त्यांच्या योजनांसाठी वापरण्यात येणारा अर्थसंकल्पीत निधी महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणू किंवा अन्य कारणे सांगून वळवू नये
याउलट सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाअंतर्गत असणाऱ्या सर्व योजना प्रभावीपणे राबवाव्यात विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्या वेळेवर द्याव्यात,मिनी ट्रॅक्टर ऐवजी मोठे ट्रॅक्टर द्यावेत, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची व्याप्ती वाढवून चालू बाजारभावाप्रमाणे जमिनी विकत घेऊन अथवा शासनाच्या ताब्यातील जमिनी भूमिहीनांना द्याव्यात.एट्रॉसिटीऍक्ट अंतर्गत अत्याचारात बळी पडलेल्या पीडितांना तात्काळ अनुदान वितरीत करावे. प्रत्येक तालुक्यात दलित वस्ती सुधार योजनेचा,रमाई आवास योजनेचा निधी वर्ग करावा .
माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर वर्ग करावी
कोरोना कोविड 19 या विषाणूचे कारण देत जर बौद्ध,अनुसूचित जाती,जमातींचा (दलित-आदिवासींचा)प्रगतीचा निधी वळवण्याचा प्रयत्न केला किंवा जाणूनबुजून अखर्चित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस व सर्व पुरोगामी विचारांच्या संस्था संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार राहील याची असा इशारा वैभव तानाजी गिते
विकास दादा धाइंजे उपविभागीय दक्षता समिती सदस्य, वैभव तानाजी गीते राज्य सचिव एन डी एम जे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदन वर विकास धाईंजे, वैभव गिते, राज्य प्रसिद्धीप्रमुख तथा एम पी पी एस जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे, सोलापूर जिल्हा सचिव वैभव काटे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ताा कांबळे आदींच्या सह्या आहेत.

विकास दादाधाइंजे सदस्य उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती माजी सरपंच माळशिरस
वैभव तानाजी गीते राज्य सचिव एन डी एम जे
अनुसूचित जाती जमाती बौद्ध घटकांचा निधी कोणासाठी वळवू नये त्यासंदर्भात एनडीएचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

कोकणातील वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करावी – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई( प्रमोद शिंदे) दि. 3 – निसर्ग चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणवासीयांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी असून त्या मदतीत वाढ करावी. मागील महिन्यात दि.3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला त्यात कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले.त्यां पैकी बहुतांश ठिकाणी अद्याप मदत पोहोचली नसल्याने राज्य सरकार वर कोकणवासीयांनी बाळगलेल्या अपेक्षांचाभंग झाला आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने घरांचे नुकसान झलेल्यांना केवळ दीड लाख रुपये मदत जाहीर केली असून ती रक्कम अल्प असून त्यात वाढ करून 3 लाख रुपये घर बांधणीसाठी द्यावेत. तसेच या वादळात रायगड जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासीयांना केवळ 4 लाख रुपये सांत्वनपर मदत म्हणून देण्यात आले असून त्यात वाढ करून 10 लाख रुपयांची मदत देण्यात यावी. घरांची अल्प पडझड झलेल्यांना केवळ 15हजार मदत जाहीर केली असून त्यात वाढ करून 40 हजार मदत देण्यात यावी.भातशेती सारख्या पिकांना हेक्टरी 50 हजार अल्प मदत जाहीर करण्यात आली असून त्यात वाढ करून 1 लाख रुपये नुकसान भरपाईसाठी मदत देण्यात यावी. तसेच आंबा; सुपारी; नारळ या बागांना वृक्षनिहाय नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच बागांची नुकसान भरपाई देताना केवळ 1 वर्षाचा विचार न करता वृक्षनीहाय किमान 3 वर्ष ते 10 वर्षांचा विचार करून बागांची नुकसान भरपाई राज्य शासनाने द्यावी.निसर्गचक्रीवादळाने कोकणाला तडाखा देऊन 1 महिना झाला तरी आद्याप वादळग्रस्तांना पुरेशी मदत न मिळणे म्हणजे महाविकास आघाडी सरकार कोकणवासीय वादळग्रस्तांची राज्य शासनाने उपेक्षा केल्याचे द्योतक आहे असा आरोप ना रामदास आठवले यांनी राज्य सरकार वर केला आहे.

         

कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते) प्रमोद शिंदे- कोथळे घाट तालुका माळशिरस येथे भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
उमरगा व चिवरी ता तुळजापूर येथील महिलाभाविक भक्त जेजुरी येथील देवदर्शन करून शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शन करण्यासाठी चाललेली असताना नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीतील फलटण ते शिंगणापूर रोडवरती मौजे कोथळी ता.माळशिरस कोथळे घाटात दिनांक 11 मार्च 2020 रोजी संध्याकाळी दहा च्या सुमारास भाविकांची क्रूजर गाडी अडवून अनोळखी सहा इसमांनी गाडीच्या काचा फोडून गाडीतील महिलांना व पुरुषांना शिवीगाळ दमदाटी करून एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत नातेपुते पोलिसात चैतन्य सखाराम बडूरे 30 गाडी ड्रायव्हर राहणार यवती ता.तुळजापूर याचे फिर्यादीवरून भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 80/ 20 भादवि कलम 395,341,327,504,506 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
यावर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण चे मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे सूचनेप्रमाणे अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे एपीआय युवराज खाडे हे करीत होते.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय बातमीदार मार्फत व तांत्रिक माहिती मिळून सदर गुन्हा करणारे संशय हे फलटण तालुक्यातील गोखळी गावात वीटभट्टीवर काम काम करत असले बाबत माहिती मिळाली सदर ठिकाणी चौकशी करता आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील असल्याचे समजले सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशन येथील पथक तयार करून आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले, आरोपींचा शोध घेत असताना संशयित इसमनामे राहुल आप्पासाहेब माळी वय 19 राहणार मुसळवाडी ता.राहुरी जिल्हा अहमदनगर, राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्वे 22 पडेगाव ता.श्रीपुर संदीप सुरेश पिंगळे वय 22 वर्ष मानेगाव ता.सिन्नर यांना ताब्यात घेऊन त्‍यांच्‍याकडे पोलीस खाक्या दाखवत तपास केला असता सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर साथीदाराच्या मदतीने केला असल्याचे कबूल केले आहे.सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपींना दिनांक 6/7/2020 पर्यंत पोलिस कस्टडी व रिमांड मंजूर केले असून गुन्ह्याचा अधिक तपास युवराज खाडे हे करीत आहेत उर्वरित चार आरोपींचा शोध चालू आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय युवराज खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गडदे, शरद कदम,राहुल रणवरे ,राकेश लोहार,पोलीस नाईक महेश पाटील,सायबर शाखेचे रवी हातकीले,आर.एम.लांडगे,गोपनीय विभाग शिवकुमार मदभावी,बबलू गाडे यांनी कामगिरी केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास युवराज खाडे करीत आहे. या कामगिरीमुळे परिसरातील लोकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोथळे घाटात दरोडेखोरांनी चिवरी येथील भाविकांची गाडी फोडून भाविकांना दमदाटी करून सोन्याचे दागिने व पैसे लंपास केले
हेच ते भाविक

सौ विध्याताई आदमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी -आप्पासाहेब कर्चे मनसे माढा लोकसभा अध्यक्ष

सौ विध्याताई आदमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी -आप्पासाहेब कर्चे मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -काल राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेडची महत्वपुर्ण ऑनलाईन मिटींग संस्थापक अध्यक्ष किशोर शेठे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली त्यावेळी युवा आघाडी पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी ओबीसी कोट्यातून विध्याताई अदमाने यांना विधानपरीषदेची उमेदवारी मिळावी व तशी मागणी शासन दरबारी करणार असल्याचे कर्चे यांनी सांगीतले त्यास राष्ट्रीय ओबीसी बिग्रेडच्या वतीने सर्वांनी सहमती दाखवून एकमाते मंजूरी दिली त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष किशोर शेठे साहेब यांनी विध्याताईचा अल्पपरीचय थोडक्यात दिला
सौ.विद्याताई आदमाने ( पोटदुखे ) यामुळच्या चंद्रपुरच्या असून त्या विदर्भकन्या म्हणून प्रसिद्ध आहेत व सध्या त्या मुंबईत वास्तव्यास आहेत व तसेच मा. कै.श्री. शांतारामजी पोटदुखे (माजी राज्य ऊर्जामंत्री ) यांची नात असून मिसेस नवी मुंबई ही सौंदर्य स्पर्धा जिंकलेली असून अनेक विविध सामाजिक मंडळाच्या कार्यात सहभागी होतात व त्या विविध मंडळाच्या आयोजित स्पर्धामध्ये सहभाग नोंदवून
स्पर्धा देखील जिंकलेल्या आहेत व तसेच त्यांनी अनेक सौदर्यस्पर्धा देखील सहभाग नोंदविला असून त्या सर्वांच्या आवडत्या सामाजिक महिला नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत ! तसेच त्या राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड ( महाराष्ट्र राज्य ) या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षापदी कार्यरत आहेत ! त्यांनी बऱ्याच सामाजिक संघटनेला आर्थिक मदतही केलेली आहे ! आणि त्यांना सामाजिक कार्याची मनापासून आवड असून त्यांचा मुंबई व चंद्रपूर या भागात जनसंपर्क गाढा असून पुढे येणाऱ्या विधान परिषदेवर भावी आमदारपदी उमेदवारी मिळावी अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड या सामाजिक संघटनेनी लावून धरलेली आहे

खामगाव बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील 70 वर्षीय सुपरआजी चक्क सायकलवर खामगाव तालुक्यातून भारत भ्रमंतीला निघाली आहे. आता पर्यंत या सुपरआजीने माहूरगड, तसेच वैष्णव देवी पर्यंतचा तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवासी मागील दोन वर्षात पूर्ण केला असून यावर्षी वैष्णोदेवी च्या पुढे जाऊन अमरनाथची यात्रा सायकल ने पूर्ण करणार आहे.
रेखा जोगळेकर अस या सुपरआजीच नाव असून समाजात सुपर आदर्श घडवत आजीबाईने M.A. B. ed. पर्यंतच शिक्षण केलेल आहे. अगोदर पासूनच संसाराची धुरा सांभाळत जिल्हा परिषद ला तब्बल 30 वर्ष केंद्र प्रमुख म्हणून काम सुद्धा या सुपर आजीने केलं आहे. त्यामुळे संसाराचा गाढा यशस्वीरित्या ओढून झाल्यानंतर आपल्या निवृत्ती नंतर काहीतरी अनोखं करण्याची जिद्द घेऊन ह्या सुपरआजी गेल्या 3 वर्षापासून हा त्यांचा भारत भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे. ह्या वयात काहीतरी हटके करून दाखवण्याची प्रेरणा आजीबाईंना त्यांच्या आई कडून मिळाली असल्याचं आजीबाई सांगतात..
अगदी 70 व्या वर्षी ठणठणीत दिसणाऱ्या सुपरआजीचा आदर्श प्रत्येक नवंयुवतींनी घ्यावा अस या सुपरआजीला वाटते, आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार 70 व्या वर्षी केला आहे.
नाथ प्लॉट खामगाव येथील रहिवासी असलेले योगेश जोगळेकर हे आजीचे एकमेव चिरंजीव आहेत,ते सध्या यवतमाळ येथे mseb मध्ये ठेकेदारी करतात
आजी 21 जून रोजी निघाल्या आणि साधारण 22 जुलेला पोहचणार आहेत

अगदी पावसाळ्याचा सुरवातीला हा भारत भ्रमंतीला प्रवास सुरु होऊन पुढे अनेक राज्य पार करत आजी दररोज शरीर साथ देईल तितका प्रवास करत असतात, व रात्री एखादी मौक्याची जागा पाहत विश्रांती घेतात, प्रत्येक गावात या सुपर आजीचं स्वागत केल्या जातं, ठिकठिकाणी या सुपर आजीला मदतही मिळत असते, त्यामुळे तब्बल 2000 किलोमीटर चा हा सायकल प्रवास आजीबाईंना आनंददायी असाच वाटतो…

प्रवासाला निघत असताना सकाळ पासूनच आजीबाईचे घरात पूजन करण्यात आले व आजीबाईंना निरोप देण्यासाठी वाजंत्री सोबत वाजतगाजत गावातून पुष्पहार घालून स्वागत करत आजीबाईंना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या , आजीबाईचा हा खडतर प्रवास त्यांना सुखाचा जाओ अशी प्रार्थना करण्यात आली. अनेकांनी आजीबाईंना भेटून आजीबाईंचे दर्शन घेऊन आजीबाईंना आर्थिक मदतही केली..
हि सुपर आजी केवळ आपले परिधान करावयाचे कपडे आणि काही उनपावसापासून सुरक्षेचे साहित्य घेऊन हि सुपरआजी भारत भ्रमंतीला निघाली आहे. वाटेत मिळेल तिथे मिळेल ते खाऊन आजी आपला हा प्रवास करणार आहे

रेखा जोगळेकर नामक या सुपर आजींचा हा प्रवास सुखकर होवो.

You may have missed