Blog

नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचावसाठी एल्गार

नागपूर : २ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने

काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने हा काळा जीआर या रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसींच्या हक्काला धक्का लावाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांच्या कट्टर समर्थकाने अकोला येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आत्म हत्या केल्याचे वृत्त आहे.ओबीसींचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात २ सप्टेंबरला राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैदराबाद संस्थानातील गॅझेटमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हीच वाव पारंपरिक ओबीसी समाजाच्या असंतोषाचे कारण ठरली आहे. ओबीसी नेत्यांचा ठाम आरोप आहे की, मराठा समाज सामाजिकदृष्टया मागास नाही आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात साम ावणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे.

तरुणांनी आदर्श घ्यावा असे तरुणाईचे प्रेरणास्थान एडवोकेट राहुल , व आनेश वाघमोडे -पाटील बंधूंच्या कार्याची होतेय सर्वत्र चर्चा

माळशिरस तालुक्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरलेले उपमुख्यमी एकनाथ शिंदे यांचे पी.एस.ओ. अॅड. राहुल वाघमोडे पाटील, बंधू अनेश वाघमोडे-पाटील ही जोडी तालुक्याच्या प्रत्येक भागात चर्चेचा विषय ठरली -आहे.दोन्ही बंधूनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, औद्योगिक व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. तसेच नव्या योजनांना चालना मिळत आहे.तसेच माळशिरस शहरात संघर्ष करिअर अॅकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो तरुणांना महाराष्ट्र पोलीस, आर्मी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक इत्यादी अनेक क्षेत्रात घडविण्याचे काम या २ बंधूच्या माध्यमातून झाले आहे. तसेच अॅड. राहुल वाघमोडे-पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणाईसाठीविविध शाळा, कॉलेज, तसेच स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी, सामाजिक संस्थेमध्ये हजारो प्रेरणादायी व्याख्याने घेऊन तरुणाईचे भविष्य उज्वल करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला.माळशिरस तालुक्याची माती व माणसांशी असलेले त्यांचे आत्मीय नातं, जनतेप्रती असलेली बांधिलकी आणि तरुणांसाठीअसलेली प्रेरणादायी भूमिका यामुळे वाघमोडे-पाटील बंधू तालुक्यातील तरुणाई, महिला, शेतकरी व कामगार वर्गाचे खरे आकर्षण बनले आहेत. अशाच प्रकारे माळशिरस तालुक्याचा विकास, तरुणांचे नेतृत्व, उज्वल भविष्यासाठी कार्यरत राहो अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

बाळूमामाचं चांगभलं,चा जयघोष करत आजी-माजी आमदार यांच्या उपस्थितीत कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते शेंडगे कापड दुकानाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न.

नातेपुते येथे कपड्यासाठी प्रसिद्ध असणारे शेंडगे कापड दुकान,टेक्सटाईल मार्केट या भव्य दोन मजली कापड दुकान शोरूमचे उद्घाटन
बाळूमामा भक्त श्री विठ्ठल बिरदेव व श्री सिद्धनाथ भाकणूक कथाकार मानकरी कृष्णात ढोणे महाराज यांच्या हस्ते व आमदार उत्तमराव जानकर, माजी आमदार रामहरी रुपनवर,माजी आमदार रामभाऊ सातपुते, व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात व उत्साहात संपन्न झाला. यावेळी कृष्णात ढोणे महाराज बोलताना म्हणाले की शेंडगे बंधू हे अतिशय प्रामाणिक असे बाळूमामाचे भक्त आहेत त्यांच्यावर बाळूमामा चा कृपा आशीर्वाद राहणार आहे. परंतु आपल्याला विनंती आहे नडलेला ग्राहक तुमच्याकडे आला तर त्याला मदत करा त्याच्या रूपाने तुमच्याकडे देव सुद्धा येऊ शकतो.असं केल्यास आजूबाजूच्या पंचवीस गावात आपली दुकान होतील.तसेच माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की शेंडगे यांचं भव्य दिव्य कापड दुकान असून अतिशय कष्टाने व मेहनतीने दुकान उभ केला आहे.तसेच उत्तमराव जानकर यांनी शेंडगे यांची यशोगाथा सांगत शुभेच्छा दिल्या.तसेच रामभाऊ सातपुते व ह भ प अमोल सूळ बोलताना म्हणाले की सुरेश शेंडगे व शंकर शेंडगे या दोघांनीही कधी ही प्रामाणिकपणा सोडला नाही प्रामाणिक व नम्रतेच्या जोरावर यश संपादन केले आहे. तसेच सर्वांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच बी वाय राऊत, एपीआय महारुद्र परजणे साहेब,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, धैर्यशील भाऊ देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य,माऊली पाटील, उपसभापती,किशोर सुळ,बाळासाहेब सरगर, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मधुकर पाटील, बाळू महाराज नरोटे, ऋतुजा ताई मोरे, संदीप ठोंबरे, सतीश सपकाळ, बाहुबली शेठ चंकेश्वराअतुल शेठ बावकर, बाळूमामा संस्थानातील महाराज व महंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजक सुरेश शेठशेंडगे व शंकरशेठ शेंडगे व शेंडगे परिवार यांनी सर्वांचा सन्मान केला.

सौ ऋतुजाताई मोरे व शरद मोरे यांच्या शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व व मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न

दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 2 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : ग्रामपंचायत कार्यालया समोर, मांडवे ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री.शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमामध्ये
1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियावरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 900 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.
यावेळी गावचे सरपंच श्री.तात्यासाहेब शिंदे, इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.उपस्थिती : मा.श्री.शरद (बापु) मोरे,
मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, डॉ.दिपाली देसाई, तात्यासाहेब शिंदे (सरपंच), कुमार बबन पाटील (मा.सरपंच), दिपक माने-देशमुख (चेअरमन),
सुनील खुडे (ग्रा.पं.सदस्य), विलास ननवरे, रामभाऊ गायकवाड (मा.डिप्यूटी सरपंच) तानाजी पालवे (मा.पंचायत समिती सदस्य), विजय कोल्हाळे, आनंदा पालवे, गुणवंत ढोबळे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

एनएचएम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ !

शासनाच्या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंदोत्सव

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी भरघोस मानधन वाढ देण्यात येणार आहे. त्याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून, राज्यभरातील पन्नास हजारावर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून आरोग्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.कर्मचाऱ्यांचा आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना एक शासनवेळची बाब म्हणून सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे.कर्मचाऱ्यांचा गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, सन २०१६-१७ पूर्वी सेवेत आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असून पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.सद्यस्थितीत राष्ट्रीयआरोग्यआरोग्य मिशन, महाराNHMअभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. पंधरा टक्के पैकी पाच टक्के मानधन वाढ सरसकट लागू होणार असून उर्वरित मानधन वाढ ही कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यांकन (परफॉर्मन्स रिपोर्ट) नुसार करण्यात येणार आहे.एनएचएम कर्मचाऱ्यांचा आरोग्यसार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत अनेक पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची गेले अनेक वर्षापासून भरीव मानधन वाढीची मागणी होती. तेसच त्यासाठी राज्याव्यापी कामबंद आंदोलनही केले होते. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यंत्रणा बळकटी करणात महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्याबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दहा वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे सम ायोजन, एनएचएम कर्मचाऱ्यांना अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे. कर्मचाऱ्यांचाळे गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधीउभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्याच्या बाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत पुढील कार्यवाही सुरु आहे. या निर्णयाम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणाम कारक होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४९० कोटींचा निधी

मुंबई/वृत्तसंस्था : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभाथ्यांना सप्टेंबर महिन्याचा देण्यासाठीसामाजिक न्याय विभागा-चा ४१०.३० कोटींचा निधी बळता करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभाथ्यांस-ाठी हा निधी वापरण्यात याव्यात अशा सूचना केली आहे. सामाजिकन्याय विभागांतर्गत येणान्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मात्र लाडकी बहीण योजनांचा लाभमिळणार नाही. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधीसंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभा गाअंतर्गत ३९६० कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे. त्यानंतर वित्त विभागाने सप्टेंबरमहिन्यातील पात्र लाभार्थी महिल-पात्रांना हप्ता देण्यासाठी एक पत्र काही हप्ता दिवसांपूर्वी पाठवित निधी वितरणा-ची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहाय्यक अनुदानामधील ४१०.३० कोटी इतका निधी महिला व बालविकास कल्याण विभागाला वित्त विभा-गाने बुधवारी मंजुरी दिली आहे. या निधीला मंजुरी देताना सामाजिक न्याय विभागाने महत्त्वपूर्ण सूचना महिला व बालविकास विभागाला केली आहे. ज्यानुसार महिला व बालविकास विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करुन देण्याची सूचना यावेळी केली आहे. त्याचबरोबर उपलब्ध निधी हा वापर हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभाथ्यांसाठी होईल याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय विभा-गाअंतर्गत संजय गांधी निराधर योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजने अंतर्गत पात्र लाभाथ्यांना लाडकी बहीण योज-नेचा हत्या मिळणार नाही, दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली आहे.

आरक्षणाच्या रक्षणासाठी कुणबी रस्त्यावर, आझाद मैदानावर धडक! मराठ्यांना आमच्यात वाटेकरी करू नका!!

राठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी कुणबी समाजाने आज रस्त्यावर उतरून थेट आझाद मैदानावर धडक दिली. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी करीत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.’ओबीसी आरक्षण अबाधित ठेवा’, ‘मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करू नका’, ‘मराठ्यांना आमच्यात वाटेकरी करू नका’ अशा गगनभेदी घोषणांनी मैदान दणाणून गेले.मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले होते. यावेळी लाखो मराठा बांधव मुंबईत धडकले होते. यानंतर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करीत हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य शासनाने 2 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय (जीआर) जारी केला. त्यानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 58 लाख मराठी कुणबी नोंदी सापडल्याने 58 लाख मराठे ओबीसीत समाविष्ट होणार आहेत, मात्र ओबीसी समाजातून या निर्णयाला विरोध होत आहे. ओबीसी प्रवर्गात 350 पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच स्तरांवर स्पर्धा वाढेल अशी भीती ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली आहे, दरम्यान ओबीसी प्रवर्गातील मूळ कुणबी समाजानेही या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.कुणबी समाजाचे नेते अशोक वालम यांनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. ‘ज्या दिवशी हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय काढला तो 2 सप्टेंबरचा काळा दिवस आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास नसतानासुद्धा 58 लाख मराठ्यांना कुणबी नोंदींमध्ये दिलेले बोगस जातीचे दाखले तत्काळ रद्द करण्यात यावेत. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आणि मराठ्यांच्या दबावाखाली पुनः पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तत्काळ बरखास्त करण्यात यावी,’ अशी मागणी वालम यांनी केली.गांधी टोप्या आणि पारंपरिक वेशभूषाकुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे कुणबी समाजाने आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिह्यांतील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. काही कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर ‘जय कुणबी’ लिहिलेल्या गांधी टोप्या घालून, हातात निषेधाचे फलक घेऊन मैदानावर दाखल झाले. आझाद मैदानावर मोठं व्यासपीठ आणि मंडप उभारण्यात आला होता.सरकारने घेतली आंदोलनाची दखलया आंदोलनाची सरकारला अखेर दखल घ्यावी लागली. काwशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आझाद मैदानात जाऊन सरकारच्या वतीने आंदोलकांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेतली असून येत्या आठ दिवसांत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री लोढा यांनी आंदोलकांना यावेळी दिले.अशा आहेत मागण्यासरकारने शोधलेल्या 58 लाख मराठा–कुणबी नोंदी तत्काळ रद्द कराव्यात.मराठा-कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती बरखास्त करा.ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करून नोकऱ्यांमधील अनुशेष भरा.जात आधारित जनगणना करून जात दाखले आधार कार्डशी लिंक करा.कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणारा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल! – अनिल नवगणे, अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ

पुढील ४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी – यादी पाहून थक्क व्हाल!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवामान थोडं बदलणार आहे. हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे की ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२५ या चार दिवसांत राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण काही भागांत हवामान कोरडे आणि उन्हाळे राहील.तज्ज्ञांच्या मते, या काळात हवेचा दाब १०१० हेप्टापास्कलपर्यंत वाढेल. जेव्हा हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा पावसाची शक्यता कमी होते. त्यामुळे आकाशात ढग दिसले तरी पाऊस फारसा पडणार नाही. त्याचबरोबर सकाळच्या वेळी थोडी थंडी जाणवेल, कारण किमान तापमानात घट होऊ लागली आहे.राज्याच्या वेगवेगळ्या भागांनुसार पावसाचा अंदाज असा आहे –कोकण विभागात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे-पालघर):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते २५ मिलीमीटर पाऊस पडू शकतो.
रत्नागिरी आणि ठाणे-पालघर जिल्ह्यात ५ ते १५ मिलीमीटर,
तर रायगडमध्ये ५ ते १० मिलीमीटर पावसाची शक्यता आहे.दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर):
या भागात ५ ते २० मिलीमीटर इतका हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये मात्र ३ ते १० मिलीमीटर इतका हलका पाऊस अपेक्षित आहे.उत्तर महाराष्ट्रात (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव):
येथे पावसाचे प्रमाण कमी असेल.
नाशिक आणि धुळे येथे ५ ते १५ मिलीमीटर,
तर नंदुरबार आणि जळगाव येथे ३ ते १० मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे.विदर्भ भागात (पूर्व, पश्चिम आणि मध्य विदर्भ):
इथे फारसा पाऊस होणार नाही.
पूर्व विदर्भात १ ते २ मिलीमीटर,
तर पश्चिम आणि मध्य विदर्भात फक्त १ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे.एकूण अंदाज असा आहे की, पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर खूपच कमी राहील. काही ठिकाणी थोडा पाऊस होईल, पण बहुतांश भागांत हवामान ढगाळ पण कोरडे राहील. सकाळी थंड वारा आणि थोडी थंडावा जाणवणारे वातावरण असेल.

तिसरी झाली आता लवकरच चौथी मुंबई तयार होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील नागरिकांना या विमानतळाच्या उद्घाटनाची प्रती-क्षा होती आणि आज बुधवारी (ता. ८ ऑक्टोबर) पंतप्रधान मोदींनी त्याचे उद्घाटन केले आहे यावेळी, महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते या विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना एक महत्त्याची घोषणा केली. फडणवीसांनी वाढवणजवळ चौथी मुंबई होणार असल्याचीघोषणा केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या विमानतळाची उभारणी चार टप्प्यात होणार आहे. या विमानतळावरून प्रवासी बाह-तूक आणि कार्यों वाहतूक सुरू होण्यास साधारण दोन महिन्यांचावेळ लागू शकतो. पण या उद्घाटनावेळी केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले देवेंद्र फडणवीस ज्या प्रमाणे तुम्ही नेहमी महाराष्ट्रासोबत उमे असता, तसे कायम उभे राहा, अशी विनंती सुद्धा यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींना केली. तर, आजचा दिवसस्वप्नपूर्तीचा दिवस आहे, कारण गेली १० वर्ष मोदींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत, त्या प्रत्यक्ष या ठिकाणी लोकार्पित होत आहेतही खन्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. हे विमानतळ नब भारताचे प्रतीक आहे, कारण या विमानतळाची संकल्पना ही ९० च्या दशकातील होती. आम्हीजेव्हा मुंबई पुणे प्रवास करायचो, तेव्हा केवळ विमानतळाचा बोर्ड पाहात होतो.पण कोणतेच काम होत नव्हते, असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. याचवेळी भाषण करताना शेवटी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला प्रगतीप थावर नेण्यासाठी मी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाचेही आभार मानतो. नागरी उड्डाण मंत्री के. नायडू मघाशी म्हणाले, ‘आपलं पुढचं लक्ष्य हे वाढवण बंदर असेल’ हे बंदर मोदी यांनी आपल्याला भेट म्हणून दिले आहे. तिथेच देशातील पहिले ऑफशोर विमानतळ उभारणार आहोत. आपल्या नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होणार आहे. तर, त्यानंतर आता बाढ़वणजवळ चौथी मुंबई होईल, असा विश्वास मी यानिमित्ताने तुम्हाला देऊ इच्छितो, असे म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे चौथ्या मुंबईची सुद्धा घोषणा केली आहे. त्यामुळे आता फडणवीस या चौथ्या मुंबईबाबत आणखी काय माहिती देतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

मेस्मा’ लागू, वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला असतानाच दुसरीकडे व्यवस्थापनाकडून चर्चा व आवाहन करूनही संयुक्त कृती समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आल्याने हा संप बेकायदेशीर ठरला आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. महावितरणने राज्यभरातील यंत्रणा सज्ज गंभीर ठेवली आहे. तव घेतलेल्या कारणास्तवरजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याची सूचना देण्यात आली आहे. संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये यांचावीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांसाठी वाहन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यांची सेवा एक वर्षापेक्षा कमी झाली आहे किंवा ज्यांची नुकतीच थेट भरती प्रक्रियेत निवड झाली आहे ते संपात सहभागी झाल्यास त्यांची सेवा तात्काळ संपुष्टात येणार आहे. तसेच सुरवातीचे तीन वर्ष कंत्राटी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा, संपात सहभागी झाल्यास रद्द होणार आहे. नियमित झालेले कर्मचारी सेवेत सहभागी झाल्यास त्यांच्या सेवेत खंड देण्याच्या कारवाईची तरतूद आहे.