Blog

महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने पिरळे येथे पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती शाळा, सन 2025-26वर्ग क्रमांक 2 आयोजित करण्यात आला.

   

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10:00  वाजता मौजे पिरळे येथे (श्री. ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर यांच्या प्रक्षेत्रावर, पिरळे)* या ठिकाणी              *फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन (Hortsap) योजनेअंतर्गत डाळिंब पीक शेती शाळा, सन 2025-26* *वर्ग क्रमांक 2* आयोजित करण्यात आला.         कार्यक्रमाची प्रस्तावना पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी अमित गोरे यांनी केली,  शेतीशाळेचा उद्देश, मागील शेती शाळेचा आढावा, चालू च्या शेतीशाळेचे नियोजन सांगण्यात आले. शेती शाळेसाठी निवडलेले शेतकऱ्यांचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले व व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला .सहाय्यक कृषी अधिकारी श्री हनुमंत खरात यांनी कृषी विभागाच्या फळबाग लागवड व विविध योजनांची माहिती दिली.            सहाय्यक कृषी अधिकारी श्री लालासाहेब माने यांनी सी आर ए तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली व त्यामुळे होणारे फायदे सांगितले.         यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पांढरमिसे यांनी डाळिंब रोपवाटिकेतील रोपे निवड, घरच्या डाळिंबीवर गुटी निर्मिती तसेच निरोगी रोपे व तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोग व्यवस्थापन याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.               उप कृषी अधिकारी नातेपुते एक श्री गोरख पांढरे यांनी डाळिंब बागेतील रोग संस्कार, तेलकट डाग व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.              मंडल कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे यांनी पिन होल बोरर कीड व्यवस्थापन, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व शेत नोंदणी, डाळिंब जीआय मानांकन याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.          याच कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांकडून जी आय मानांकन अर्ज भरून घेण्यात आले.            यानंतर उत्कृष्ट डाळिंब उत्पादक शेतकरी श्री ब्रह्मदेव प्रकाश रुपनवर यांनी प्रक्षेत्रामध्ये स्वतः करत असलेले नियोजन व त्यामुळे होणारे फायदे याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.              कार्यक्रमावेळी पिरळे गावचे डाळिंब उत्पादक शेतकरी, बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, नातेपुते अधिनस्त मंडळ कृषी अधिकारी श्री मंगेश बोरुडे, उप कृषी अधिकारी श्री गोरख पांढरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री दत्तात्रय पांढरमिसे, श्री ढोबळे, श्री विश्वनाथ दुधाळ, श्री हनुमंत खरात, श्री लालासाहेब माने, श्री कांतीलाल शेंडगे, श्री गणेश जाधव उपस्थित होते.        कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना चहा, नाष्टा देण्यात आला.          कार्यक्रमाचे आयोजन पिरळे गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमित गोरे यांनी केले व आभार प्रदर्शन डाळिंब उत्पादक शेतकरी श्री यशवंत प्रकाश रुपनवर यांनी केले.

सोने-चांदीचे दर विक्रमी पातळीवर, जाणून घ्या आजची किंमत

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली देशात आणि परदेशात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची मागणी वाढत असतानाच भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे आयात महागात पडत आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर घोडदोड करीत आहेत.यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दागिन्यासाठी सोने खरेदी करणे अवघड झाले आहे.दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 2 हजार 700 रुपयांनी वाढून 1 लाख 23 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. जानेवारी महिन्यापासून सोन्याच्या दरात तब्बल 50 टक्के इतकी वाढ झाली आहे. दिल्ली सराफात चांदीचा दर सोमवारी 7,400 रुपयांनी वाढून 1लाख 57 हजार 400 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जानेवारी महिन्यापासून चांदीचा दर 75 टक्क्यांनी वाढला आहे.या दरवाढीबद्दल भाष्य करताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, डॉलर कमकुवत होत असल्यामुळे जागतिक गुंतवणूकदार सोन्याचा दर जास्त असूनही सोन्याची खरेदी करीत आहेत. रिझर्व बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली असल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ होत आहे.अमेरिकेचे प्रशासन ठप्प झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतील बेरोजगारी आणि इतर आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे गुंतवणूकदार सध्याच्या परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करीत असल्यामुळे हे दर वाढत आहेत.जागतिक बाजारात सोन्याचा दर सोमवारी दोन टक्क्यांनी वाढून 3,949 डॉलर या विक्रमी पातळीवर तर चांदीचा दर एक टक्क्यांने वाढून 48.75 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.जागतिक अनिश्चित परिस्थितीमुळे देशातील आणि परदेशातील वायदे बाजारातही सोने आणि चांदीचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात या दोन धातूचे दर स्पॉट मार्केटमध्ये वाढीव पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या फक्त गुंतवणूकदारच सोन्याची खरेदी करीत असून दागिने खरेदी कमी झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा सडकी मनुवादी प्रवृत्ती असणाऱ्या वकिलाचा प्रयत्न देशभरातून संतप्त व्यक्त

.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – 

देशाच्या न्यायप्रणालीचा सर्वोच्च स्तर मानल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाजवळ एका वकिलाने अचानक येत बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातील सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ दक्षता घेत त्या वकिलाला अटक केली.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वकिलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” असे म्हणत ही धक्कादायक कृती केली. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सरन्यायाधीशांसारख्या उच्च पदावरील व्यक्तीवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे.घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली असून, अनेक सामाजिक संघटना आणि न्यायप्रेमींनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकारावरून न्यायव्यवस्थेतील जातीय मानसिकता आणि असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.एका अनुसूचित जातीच्या सरन्यायाधीशांवर न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न होणे, हे सामाजिक समतेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि लाजिरवाणे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.सामाजिक कार्यकर्ते म्हणतात, “जर देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांवर असा हल्ला होऊ शकतो, तर सामान्य अनुसूचित जातीच्या नागरिकांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच नको.”देशात अजूनही काही ठिकाणी ब्राह्मणी मानसिकतेची खोलवर रुजलेली छाया असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली आर्थिक निकषावर चर्चा होत असताना अशा प्रकारच्या घटनांनी समाजात निर्माण झालेल्या विषमतेची पुन्हा आठवण करून दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गवई यांची फोन करून चौकशी केली.मोदी काय म्हणाले?पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश बीआर गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले की, आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक भारतीय संतापला आहे. आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडिया पोस्टमध्ये या संभाषणाची माहिती शेअर केली. ते म्हणाले की, हल्ल्याच्या प्रयत्नाला तोंड देताना न्यायाधीश गवई यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. CJI गवई यांनी केलेली वर्तणूक ही न्यायमूर्तींप्रती त्यांची वचनबद्धता आणि आपल्या संविधानाच्या भावनेला बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते पोलिसांकडून मिळालेल माहिती आशि की,
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण राहणार मोराची तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर हे फलटण = पंढरपूर रोड वरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोलपंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोलपंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH-06-CG-5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हांला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हांला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हांला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी पैसे खिशात ठेवले. व पुन्हा मी पैसे मोजत असताना ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने माझे हातातील 6200 रु हिसकावुन घेऊन पळून गेले वगैरेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 345/2025 भारतीय न्याय संहिता कलम 304 (2),3(5), अन्वये गुन्हा दाखल होता… सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री महादेव कदम नातेपुते पोलीस ठाणे हे करत होते…

सरकारचं दिवाळीत ₹२१०० खास गिफ्ट, कुणाला होणार फायदा? किटमधील २५ वस्तूंची यादी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

राज्यात यावर्षीअनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाने अगदी झोडपून काढले होता.लाखो नागरिकांचे नुकसान आहे. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले आहेत. अक्षरशः अनेकांचे संसार वाहून गेले आहेत.सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार माजला होता. १०८ गावांमध्ये पाणी शिरले होते. नदीकाठच्या जवळपास ११ हजार ८०५ घरांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील अनेक वस्तू वाहून गेल्या. अन्नधान्यांचे नुकसान झाले. या नागरिकांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या नागरिकांना शासनाकडून जीवनावश्यकवस्तूंचे किट मिळणार आहे. यामध्ये २५ वस्तू असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.दिवाळीला २१०० रुपयांच्या वस्तू भेट१८ ऑक्टोबरपासून दिवाळी सुरु आहे. त्याआधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आ हेत. मात्र, अजूनही पंचनामे सुरु आहेत त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दिवाळी चांगली जावी, यासाठी काही वस्तू पूरग्रस्त नागरिकांना दिल्या जाणार आहेत. या वस्तू २१०० रुपयांच्या असणार आहेत.पूरग्रस्त नागरिकांना दिवाळीत टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, मेणबत्ती, तेल, गहू, साखर, चने, डाळ, तेल, गूळ अशा अनेक वस्तू दिल्या जाणार आ हेत. एकूण २५वस्तू असणार आहेत. या किटची किंमती २१०० रुपये असणार आहे. याचसोबत पूरग्रस्त कुटुंबियांची दिवाळी चांगली जावी, त्यांना नवीन कपडे खरेदी करता यावे, यासाठी पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई देण्याचेही काम सुरु आहे

नातेपुते येथील सुप्रसिद्ध अजित ज्वेलर्सला आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे 
नातेपुते येथील सुप्रसिद्ध  अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ या सोने- चांदी दुकानाला विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीत-सिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. अजित ज्वेलर्स नातेपुते येथे गेली सहा सात वर्षांपसून चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्यांच्याकडून चोख सोने-चांदी व ग्राहकांना चांगली सेवा दिली जाते. ग्राहकांच्या आग्रहाखातर त्यांनी नातेपुते येथे दहिगव रोडला दुसरी शाखा काढली असून या शाखेला सुद्धा चांगल्या प्रकारचा  मिळत आहे त्याच अनुषंगाने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ या दुकानाला भेट दिली.तसेच मोहिते पाटील कुटुंबाकडून रुपनवर परिवारास पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, राजेंद्र काकडे साहेब, डॉक्टर वाघमोडे, नातेपुते नगरपंचायतचे मा.उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, माऊली सरक, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच.अजित ज्वेलर्सचे मालक अजित रुपनवर, राजू रुपनवर, महावीर रुपनवर, तसेच रुपनवर परिवाराच्या वतीने विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –
उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ” स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषयावर प्रा.डॉ.सी.एम साळुंखे यांचे व्याख्यान झाले. UNESCO (युनेस्को) च्या यादीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांची माहिती प्रा.डी.एस थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. तसेच गड किल्ल्यांचे पोस्टर प्रेझेंटेशन महाविद्यालयात करण्यात आले. “शहीद भगतसिंग जयंती” निमित्त त्यांच्या जीवनावर प्रा.तेलसंग एच.बी यांनी आपले विचार मांडले. “स्वच्छ नारी सशक्त परिवार” कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रूग्णालय, नातेपुते यांच्या सहकार्याने मुलींची ब्लड तपासणी करण्यात आले. तसेच २ ओक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त प्रा.एम.बी सावंत यांचे व्याख्यान घेण्यात आले. अशा प्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या अध्यक्षा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल च्या सदस्या मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील,महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक मा.डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, मा.सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब निकम अध्यक्षस्थानी होते. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा.जगदीशचंद्र मुळीक,प्रा.उत्तम सावंत यांनी परिश्रम घेतले.तसेच प्रा.डॉ.सुनिता सूर्यवंशी, प्रा.श्रीकांत पवार, प्रा.डॉ. डी.जी. शहाणे, प्रा.डॉ.संभाजी बनसोडे, प्रा.अजित भोपळे,प्रा.वैभव गवळी,प्रा.डॉ.कमल कांबळे, सौ.मंगल पवार,कु.दिपाली मसुगडे, प्रा.रेडेकर, मुख्यलिपिक हनुमंत वाघमोडे,श्री.नागराज करपे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस.एस स्वयंसेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

सावधान आता पावसानंतर अजून एक संकट महाराष्ट्रावर येणार चक्रीवादळाची ‘शक्ती’ धडकणार;मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते पुढील काही तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मुसळ
पुढील चार दिवस हवामान खात्याने म राठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवली आहे.
५ ऑक्टोबर रोजी पालघर ठाणे, नाशिक धुळे नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. तर परभणी, हिंगोली, धाराशिव लातूर, नांदेड तसेच धुळे, जालना, नंदुरबार जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी पालघर,
संगरा 20 पथ हेत विभासन्यू म्हणून
धार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपले. गा वागावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. शेत पाण्याखाली गेली. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ही सगळी परिस्थिती आटोक्यात येते ना येते तोपर्यंत चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्धात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात शक्ती नावाची चक्रीवादळ सक्रिय झाले असून कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट आहेत.
ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आले आहेत. तर मुंबई, रायगड, पुणे, सात  ारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जा लना, जळगाव या जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे. ८ ऑक्टोबर रोजी परभणी हिंग  ोली तसेच रत्नागिरी सातारा सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. ९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्याला येलो अलर्ट आहे.

जि प शाळा पिरळे येथील माजी मुख्याध्यापक दादासाहेब साळवे डी.एस फाउंडेशन यांच्या वतीने 23 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती संच भेट

 पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे

शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री दादासाहेब साळवे सर (D. S. फाउंडेशन) यांच्या वतीने विजयादशमी निमित्ताने जि प शाळा पिरळे येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  23 नवनीत शिष्यवृत्ती प्रश्न संच  विद्यार्थ्यांसाठी मोफत देण्यात आले नेहमीच डी एस फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कॉलरशिप पुस्तक संच दिले जातात दादासाहेब साळवे हे सध्या पाठक वस्ती या ठिकाणी कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा मोठा सहभाग असतो. तसेच पिरळे येथील प्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच संदीप शेठ नरोळे यांनी सुद्धा 6500 रुपये शिष्यवृत्ती व पुस्तक संचासाठी भेट दिले. पिरळे शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार/मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.याबद्दल सर्वांचे शाळेच्या वतीने व शिक्षण समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी जि प शाळेच्या मुख्याध्यापक मोरे मॅडम, माजी सरपंच संदीप नरोळे, अशोक आप्पा तोडकर, अध्यक्ष सुदाम बुधावले, उपाध्यक्ष श्री पांडुरंग कोकरे सामाजिक कार्यकर्ते अमोल वाघ, शिक्षक संजय ढवळे सर,हनुमंत फुले सर,शेंडगे मॅडम,राऊत मॅडम, शिंदे मॅडम,अमोल खरात सर, उदयसिंह पाटील सर, यांच्यासह सर्व स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

भारतीय महिला क्रिकेट संघाने सुद्धा पाकिस्तानला धूळ चारली

: भारतीय महिला संघाने पाकिस्तानला आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात दणदण-ीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तान संघाला १५९ धावांवर सर्वबाद केलं आणि शानदार विजय मिळवला. श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर, भारताने आता पाकिस्तानला पराभूत करून आपली बिजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या विजयासह, भारताने सलग १२ व्यांदा पाकिस्तानला पराभूत करून आपला विक्रम कायम ठेवला आहे. यासह, विश्वचषकात पाकिस्तान महिला संघावर सलग पाचवा विजयमिळवला आहे.भारतीय संघाने पाकिस्तानवरविजय मिळवल्यानंतर हरमनसह संपूर्ण संघ थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाला. यासह आशिया चषकातील सामन्यांप्रमाणे महिला विश्वचषकातही भारताच्या महिला संघाने पाकिस्तानी संघातील खे-ळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. तर नाणेफेकीदरम्यानही हरमनप्रीत कौरने फातिमा सनाशी हस्तांदोलन केलं नाही, ना नजरानजर झाली. नाणेफेकगमावल्यानंतर, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत २४७ धावांवर गारद झाला. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी महिला संघ ४३ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला आणि टीम इंडियाने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. टीम इंडियाकडून क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.भारताने दिलेल्या २४८ धाब-पंच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली आणि २६ धावांत त्यांनी तीन विकेट गमावल्या. यानंतर, सिद्रा अमीनने एका टोकाला पाय घट्ट रो-वून ठेवत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण दुसन्या टोका-कडून नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या. या सामन्यात सिद्रा अमीन-ने १०६ चेंडूत ८१ धावा केल्या. दरम्यान, आठ पाकिस्तानी खेळाडूंना डाबात दुहेरी आकडा गाठता आला नाही. नाणेफेक गमावून प्रथम फलंद-जीला उतरल्यानंतर, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. स्मृती मानधना तिच्या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकली नाही आणि २३ धावांवर बाद झाली. स्मृती लवकर बाद झाल्याने भारताच्या धावांची गती कमी झाली. त्यानंतर प्रतिका रावल ३१ धावा करत बाद झाली. हरलीन देओलने काही शानदार फटके खेळले पण ती ४६ धावांवर बाद झाल्याने तिचं अर्धशतक हुकलं. दीप्ती शर्मानेही चांगली सुरुवात केली, पण ती २५ धावांवर बाद झाली. स्नेह राणाने देखील चांगले फटके खेळले. शेवटच्या षटकांमध्ये रिचा घोषने २० चेंडूत ३५ धावांची दमदार खेळी करत भारताला २४७ धावांपर्यंत पोहोचवलं.

You may have missed