कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्यावर शासनाकडून अन्याय होत असल्याने आजपासून काम बंद आंदोलन

कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्यावर शासनाकडून अन्याय होत असल्याने आजपासून काम बंद आंदोलन
चौकट- भाजप सरकार असताना समायोजना संदर्भात कमिटी स्थापन केली होती तसेच लेखी आश्वासन दिले होते पहिले एन आर एच एम च्या लोकांचे समायोजन केले जाईल नंतर बाकीच्यांचा विचार केला नाही परंतु या सरकारने विनाअट भरतीची भरती ची घोषणा केली आहे शासनाने प्रथम आमचे समायोजन करावे नंतर नवीन लोकांना घ्यावं अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडू संस्थापक अध्यक्ष- नंदकिशोर कासार
नातेपुते प्रतिनिधी( प्रमोद शिंदे)- गेली दहा ते पंधरा वर्षे पासून एन.आर.एच.एम.कंत्राटी आरोग्य कर्मचारी या मध्ये आरोग्य सेविका ,परिचारिका,आधीरिचारिका, डॉक्टर,तालुका,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, फार्मासिस्ट,प्रयोगशाळातंत्र, लेखापाल, 25 हजारापेक्षा जास्त कर्मचारी अविरत दिवस-रात्र सेवा देत आहेत. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता कर्मचारी वाटेल ते अंगावर पडेल ते काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.परंतु त्या मोबदल्यात त्या कर्मचाऱ्यांची शासनाकडून वारंवार हेळसांड होतअसल्याचे दिसून येत आहे.अनेक दिवसापासून या कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्याआहेत परंतु शासनाकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते या कंत्राटी कामगार कामगारांना कायम सेवेत करून घ्यावे ही मागणी गेली दहा वर्षापासून कंत्राटी कामगारांकडून होत आहे.परंतु राज्यात येणारे सरकार या कर्मचाऱ्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे कोरोना प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्व जबाबदारी या कंत्राटी कामगारांवर टाकण्यात आली आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून ते सेवा देत आहेत.परंतु त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही.त्यांना मास्क, सनीटायझर ही दिले जात नाही कर्मचारी बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना कोरणटाईन करत आहेत स्वतःच्या हाताने जीव धोक्यात घालून शिक्के मारत आहेत तुटपुंज्या मानधनात शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमात तन-मन-धनाने जीव धोक्यात घालून काम करताना दिसतात या आरोग्य कर्मचाऱ्यांना 8 ते 10 हजार इतकेच मानधन दिले जाते कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा जास्त काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शासन व अधिकारी करून घेत आहेत.परंतु त्याच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा विचार केला जात नाही काही कर्मचाऱ्यांचे वय होत आले आहे तरीसुद्धा त्यांना शासनाने काय करून घेतले नाही मोठी शोकांतिका आहे काही तसेच अन्यायकारक बाब आहे. काही कर्मचाऱ्यांचे वय 45 ते 50 च्या दरम्यान आहे या कर्मचाऱ्यां चे भविष्य अंधारमय झाले असून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा व त्यांचा विचार करून या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले पाहिजे. या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा मोर्चे आंदोलने केली तरीसुद्धा शासनाला घाम फुटला नाही आता शासनाने आरोग्य खात्यात 30 हजर कर्मचारी धरण्याची घोषणा केली आहे. पहिले 25 हजार कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेत करून घ्यावे अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेकडून होत आहे. अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचेआंदोलन छेडले जाईल असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तेच दिनांक 18 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनआरोग्य कंत्राटी कामगारांकडून सुरू करण्यात आले आहे.

You may have missed