आंतरराष्ट्रीय

लॉकडाऊन च्या काळात मजुरांचे भुकेने हाल होऊ देणार नाही एन डी एम जे चे वैभव गिते यांनी मजुरांची घेतली जबाबदारी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे परराज्यातुन आलेल्या ऊसतोडनी कामगार गरीब व गरजू व्यक्तींना ऍड.डॉ.केवलजी उके, एड. गजान चव्हाण,ऍड  अनिल कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनात गहू तांदुळ धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे नेते नितीन धायगुडे यांच्या उपस्थितीत कुरबावी गावचे पोलीस पाटील कुलदीप दनाने पाटील ग्रामसेवक काळे यांच्या देखरेखीखाली सर्व कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी विशाल साळवे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी लॉक डाऊन च्या काळात कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे व तालुका प्रशासनाचे आभार मानले.रासपचे नेते नितीन धायगुडे यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचने मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केल्याने कौतुक केले.गोरगरिबांना मदत करणे हीच खरी सेवा आहे असे म्हंटले आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी माळशिरस तालुक्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या मजुरांची हेळसांड होऊ देणार नाही महापुरुषांचा जयंती महोत्सवानिमित्त प्रत्येक गरजु व्यक्तीस अन्न धान्याचे वाटप करण्यात येणार आहे असे म्हंटले.धान्य मिळालेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले.धान्य वाटपाचे संयोजन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी केले तर प्रमोद शिंदे व दत्ता कांबळे यांनी मोलाची साथ दिली. तसेच हे वाटप सोशल डिस्टन्स चा नियम पाळून शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून करण्यात आला.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा समितीच्या वतीने कल्याण पूर्व परिसरातील गरीब कुटूंबांना अन्नदान..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )देशभर कोविड १९ या महामारिने थैमान घातलाय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक २३ मार्च पासून १४ एप्रिल २०२० पर्यन्त संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या लॉकडाउनची सर्वात जास्त झळ ही रस्त्यावर राहणारे गोरगरीब तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांना सोसावी लागत असून त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाच्या मोफत धान्य वाटप योजनेचा फज्जा उडाला आहे आणि अनेक योजना या अद्याप कागदावरच आहेत. अशा वेळेस मदतीचा एक हात पुढे करत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या ठाणे जिल्हा समितीच्या वतीने आज दिनांक ६ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी आनंदवाडी, मिलिंद नगर, एफ कॅबिन रोड, कल्याण पूर्व या परिसरातील अपंग, बेरोजगार, रिक्षा चालक, गॅस डिलेवरी, व घर काम करणाऱ्या जवळपास २०० गरीब कुटूंबांना अन्नदान केले. संघटनेचे राज्य महासचिव अॅड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर गरजूंना विविधप्रकारे मदत केली जात आहे आणि आजच्या अन्नदानाप्रसंगी ते स्वता जातीने उपस्थित होते.

अश्या गोर-गरिबांना मदत करण्याकरीता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हान यांनी पुढाकार घेवुन आर्थिक मदत केली आहे. तसेच मानुसकिची जान असणारे ऑल.इडिया एस.सी.एस.टी.कल्याण (ओ.एच.इ.) शाखेचे अध्यक्ष सुनिल ठेंगे याच्या सारखे अनेक लोक पुढे येत आहेत. आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या लोकांनी पुढे येवून आणखी दान करावे जेने करून अश्या असंख्य कुटुंबाची मदत करता येइल असे अव्हाहन आजचे भोजन दानाचे मुख्य संयोजक तथा एन.डी.एम.जे.संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे यांनी केले.

यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे जिल्हा संघटक संदेशजी भालेराव व कल्याण तालुका संघटक जितेंद्र बुकाने, प्राध्यापक संतोष बनसोडे सर तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष अमित साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. अशाप्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून एनडीएमजेची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोना ग्रस्तांसाठी काम करत असल्याने जनतेतून कौतुक होत आहे.

अन्नदान करताना एन डी एम जे राज्य महासचिव डॉक्टर एडवोकेट केवल उके
अन्नदान करताना एन डी एम जे कल्याण टीम
विशेष सहकार्य मार्गदर्शन बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हाण साहेब
परिश्रम घेताना बंटी साळवे
अन्नदान करताना विनोद रोकडे

कोरोना पार्श्वभूमी अनुषंगाने पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे च्या वतीने पिरळे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते)  राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत नेशनल दलीत मोमेंत फोर जस्टाइस (एन.डी.एम.जे) महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका,व पिरळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने  पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर रुग्ण उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे, शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे. या मुळे विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत व पुरेशी रक्तदान शिबिर होत नाहीत.म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.भविष्यात रक्त तुटवड्याचे संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले होते यावर दोन महिलांसह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर  सर्व नियमांचे पालन करून  सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात आले. या शिबिराचे  उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी लवटे, माजी पोलीस अधिकारी ज्ञानदेव शिंदे, संदीप शेठ नरोळे, महादेव शिंदे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे कार्यकारी संपादक प्रशांत खरात, सुदाम बुधावले ,व अक्षय ब्लड बँक ,डॉ.वाघमोडे ,डॉ.मोरे व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. हे  शिबिर यशस्वी होण्यासाठी पिरळे येथील युवकांनी परिश्रम घेतले. तसेच हरिदास लवटे, भारत राहुडकर, ज्ञानदेव शिंदे ,आकाश खिलारे ,मोहन शिंदे ,प्रकाश ठवरे, सुवर्णा राहुडकर ,अनिकेत लवटे ,नाथा साळवे, उदय डूडू ,दशरथ खिल्लारे ,रोहित डूडू ,संदीप नरोळे, संतोष जाधव ,राहुल खिलारे, हनुमंत बुधावले, प्रशांत खिलारे ,सचिन खिल्लारे, अमीर मुलानी ,परशुराम लांडगे ,विठ्ठल खंडागळे, दशरथ लवटे, दुर्योधन खिलारे, रुपेश साळवे, गजानन पोटे ,योगेश खिलारे ,संतोष साळवे ,सागर खिलारे ,मयुर साळवे ,अविनाश तोडकर, सुनील साळवे, बाळा बुधावले, विजय खंडागळे ,अधिक्राव यमगर, राजाराम शिंदे ,अनिल खिलारे ,संजय नरोळे, सलीम मुलानी ,उमेश जाधव, अमोल निकम, वैभव खिलारे ,चेतन खिलारे ,विशाल खिलारे ,रामचन्‍द्र राहुडकर, रमेश पांडेचेरी, शिवाजी कांबळे ,सुनील शिंदे, महादेव राहुडकर, ओमकार किर्दक ,सूरज किर्दक ,शैलेश नरोळे ,अक्षय साळवे ,पन्नालाल पैलवान, जनार्दन शिंदे ,अनिल तोडकर ,सुनील दळवी, करीम मुलानी, या रक्तदात्यांनी सामाजिक भान ठेवून देशहितासाठी रक्तदान केले या सर्व रक्ता त्याचे पंचक्रोशीत सोशल मीडियातून कौतुक होत असून यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे बोलले जात आहे.

* पिरळे येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे ) राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत *पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे मुळे व विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत त्यामुळे पुरेशी रक्तदान शिबिर होत आहेत म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे भविष्यात रक्त तुटवड्याची संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले आहे बोलताना म्हणाले की रक्तदानामुळे आपण एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान हे राष्ट्रहिताचे काम असून आहे तरी शक्य तेवढ्या लोकांनी रक्तदान करून एक समाजहिताचे काम आपल्या आपण घडले पाहिजे. हे रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक 27 मार्च 2020 रोजी सकाळी दहा वाजता मारुती मंदिर सभा मंडप ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात येणार आहे. तसेच देशात स्वराज्यात कलम 144 व संचारबंदी असल्याकारणाने का वेळेस तीन ते चार लोकांचे रक्तदान घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त  पिरळे ग्रामस्थ ,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल व महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच गर्दी होऊ नये म्हणून पुढील क्रमांकांवर संपर्क साधा  पिरळे ग्रामपंचायत जवळ संपर्क पत्रकार प्रमोद शिंदे 9975903040, पोलीस पाटील औदुंबर बुधावले- + 96375 91354 सरपंच दशरथ लवटे पाटील9922524069,सुदाम बुधावले-9503993490, गणेश वाघमोडे-9049492262 गणेश दडस9960476042, प्रकाश ठावरे-96575 66395 * मोहन शिंदे.

मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आज दिनांक 15 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

बैठकीत महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे माजी सनदी अधिकारी श्रीयुत खोब्रागडे यांनी सविस्तर सादरीकरण करून संविधान जागृती, अंदाजपत्रकातील अनुशेष, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत मागासवर्गीय भूमिहीनांना शेतजमीन वाटप, रमाई घरकुल योजना, आरक्षणातील अनुशेष, पदोन्नतीतील आरक्षण, मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापना अशा विविध विषयांवर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मते मांडली.

वसतिगृहातील प्रलंबित बांधकामांबाबत सामाजिक न्याय विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून सदर कामात वेळ कसा येईल याकडे लक्ष पुरवावे असे मला प्रामुख्याने वाटते. जवळजवळ वीस लक्ष भूमिहीनांना बागायती शेतजमीन देणे सध्याच्या प्रचलित किमतीमध्ये शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत भूमिहीन कुटुंबांना उद्योगासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत पावले उचलावीत असे वाटते.

मागासवर्गीय बांधवांच्या उद्योग-व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्था पुढे येणे गरजेचे आहे. राज्य शासनाने त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. तसेच मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत बरेचदा प्रतिकूल गोपनीय अहवाल अडचणीचे ठरतात. त्याचादेखील संबंधित विभागाने सर्वंकष आढावा घेणे गरजेचे आहे.

माझा अनुभव आहे की महिला अधिकारी पुरुषांपेक्षा कार्यक्षमतेबाबत कमी नाही. महिला अधिकाऱ्यांना पदस्थापना देताना मागासवर्गीय अधिकाऱ्यांचा देखील प्राधान्याने विचार करावा, ही व अशा काही विनम्र सूचना या बैठकीमध्ये पवार साहेबांनी केले राज्य शासनाला केल्या.

माणिक अंकुश उदागे खून खटल्यातील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

डॉ.केवल उकेंच्या मार्गदर्शनात वैभव गितेंचा पाठपुरावा

विशेष सरकारी वकील बी.ए. आलूर यांनी चालवला खटला

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )माणिक अंकुश उदागेंनी मोरेवस्ती चिखली ता. हवेली जि. पुणे येथे दिनांक 14 एप्रिल 2014 रोजी- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून जातीयवादी गावगुंडानी दिनांक 01 मे 2014 रोजी पहाटे 3 च्या सुमारास राहत्या घरातून माणिक उदागे यांचे अपहरण करून मोशी दगड खान येथे नेऊन दगडाच्या ठेचून निर्घृणपणे खून केला. याबाबत एम.आय.डी.सी.भोसरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 89/2014 भा.दं.वि.कलम 364,302,201,34. मुंबई पोलीस कायदा कलम 135 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 चे कलम 3(1)(10), व 3(2)(5) तसेच नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 चे कलम 7(1 )(ड) नुसार गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते.आंबेडकरी जनतेने महाराष्ट्रभर आंदोलने केली होती.घटनेचे गांभीर्य पाहून तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री डॉ.नितीन राऊत,खासदार रामदास आठवले,अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल.थुल, एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव डॉ.केवल उके,वैभव गिते,यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या
उदागे कुटुंबियांच्या वतीने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून बी.ए.आलूर यांच्या नियुक्तीची मागणी केली वकिलांच्या नियुक्तीसाठी डॉ. केवलजी उके व वैभव तानाजी गिते यांनी शासनस्तरावर प्रयत्न केल्याने शासनाने बी.ए.आलूर यांची नियुक्ती झाली
सरकार पक्षाच्या वतीने सत्तावीस साक्षीदार तपासून दिनांक 13 मार्च 2020 रोजी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली
चारही आरोपींना मा.जिल्हा सत्र न्यायालय पुणे, ग्वालानी न्यायाधीश सो.यांनी भा.द.वी 302, नुसार जन्मठेपेची तर 364 नुसार पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.उदागे कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून ते आरोपींना जन्मठेप होईपर्यंत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)महाराष्ट्र या संघटनेचे राज्य महासचिव अॅड.डॉ.केवल उके ,सचिव वैभव गिते,ऍड.प्रभाकर सोनवणे, पंचशीलाताई कुंभारकर,रवी बनसोडे,प्रियदर्शी तेलंग,विजय गायकवाड, रमेश ठोसर,यांनी मदत केली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून
उदागे उटुंबियांना घटना घडल्यापासून ते आजपर्यंत सशस्त्र पोलीस बंदोबस्त होता आरोपी अपिलात जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आरोपी त्यांच्या नातेवाईकांपासून धोका होऊ नये म्हणुन उच्च न्यायालयातील अपील संपेपर्यंत पोलीस संरक्षण चालू ठेवण्याची मागणी उदागे कुटुंबियांच्या वतीने केली आहे.
आरोपींना एट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत शिक्षा न झाल्यामुळे तसेच आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पीडित कुटुंबांच्या वतीने मा.उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहीती एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते यांनी दिली

शिखर शिंगणापूर घाटात भाविकांच्या क्रूजरवर दरोडा नातेपुते (प्रमोद शिंदे) :फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवर सहा जण येऊन क्रुझर गाडी अडवून शिखर  शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल दरोडेखोरांनी पळवला व दरोडेखोर फरार झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की चिवरी व उमरगा गावातील लोकांना आळंदी देहू जेजुरी खर शिंगणापूर पंढरपूर अशा देव दर्शनाकरिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु आळंदी जेजुरी देवदर्शन करून  फलटण मार्गे शिखर शिंगणापूर ला जात असताना  रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर कोथळे गावाच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडी ला तीन मोटरसायकल त्यावरील सहा दरोडेखोरांनी पास करून पुढे जाऊन घाटात गाडी थांबवली व ते ड्रायव्हर ला मारहाण  करून  त्याच्या कडील क्रूजर गाडी च्या चाव्या हिसकावून घेतल्या व भाविकांना म्हणाले तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडी च्या पाठीमागे गाडी च्या काचेवर दगड  लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिला यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. व ते दरोडेखोर मोटरसायकली वरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले यामध्ये गाडीचा ड्रायव्हर चैतन्य बडुरे राहणार येवती तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्याकडील 500 रुपये किमतीच्या सॅमसंग कंपनी रंगाचा आयडिया कंपनी सिम कार्ड व गजू बाई त्रिंबक सूर्यवंशी यांचे सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व दोन हजार रुपये रोख तसेच कोंडाबाई अनिल सावंत यांचे बारा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच धोंडाबाई गोविंद वडजे त्यांचे सहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र तसेच भामाबाई भागवत कदम यांच्या आठ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच सुरेखा दिलीप शिरगिरे  यांचे मनी मंगळसूत्र 14 हजार रुपये किमतीचे सोने तसेच वनिता मधुकर शिरगिरे यांच्याकडे दीड हजार रुपये रोख तसेच सुमन ज्ञानदेव सावंत यांच्याकडील 23 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र दोन ग्रॅम ची कर्णफुले रोख नऊ हजार रुपये तसेच मंगल नागनाथ शिरगिरे यांचे चार हजार 600 रुपयांची मंगळसूत्र रोख रक्कम सहाशे रुपये तसेच काशीबाई शिवाजी वडजे यांच्याकडील चार हजार रुपये मनी मंगळसूत्र तसेच रुक्मिणीबाई आबा शिरगिरे यांच्याकडील सात हजार पाचशे रुपयाची मणी-मंगळसूत्र तसेच संगीता धनाजी सावंत यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीची काळ या महिन्यातील मणी-मंगळसूत्र तसेच घनाजी मारुती सावंत पाचशे रुपये किमतीचा स्माईल कंपनीचा मोबाइल तसेच विमल वसंत शिरगिरे यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन 6 अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 ए सी8359 या गाडीच्या काचा फोडून 1000 रुपयाचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे हे करीत आहेत. सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित भाविकांनी केली आहे.

नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र

नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची वैभव गिते यांनी भेट घेऊन निवेदन दिले

नितीन आगे खून खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात मा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या यशस्वी आंदोलनांमुळे शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या खटल्यात सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती अद्याप झालेली नाही
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाने नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच अचानक शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवले आहे.वकिलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर प्रश्नचिन्ह आहे.
मा.उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव तानाजी गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रालय शास्त्रीभवन दिल्ली येथे जाऊन भेट घेऊन नितीन आगे खून प्रकरणात मंत्रालयीन अधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यासाठी निवेदन दिले यावर मा.मंत्री रामदासजी आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना गृह विभाग,विधी व न्याय विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यासाठी पत्र लिहले आहे यावेळी रिपाई (आठवले) राज्य सचिव हरेष भाई देखणे व एन.डी. एम.जे चे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे हे उपस्थित होते.

गटविकास आधिकारयांच्या आदेशाला ग्रामसेवकांकडुन केराची टोपली

गटविकास आधिकारयांच्या आदेशाला ग्रामसेवकांकडुन केराची टोपली…

शेकडो दिव्यांगासह एन.डि.एम.जे. संघटना करनार आंदोलन…

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -हिंगोली जिल्ह्यातिल औंढा नागनाथ तालुक्यामध्ये जवळ जवळ 101 ग्रामपंचायती आहेत, व तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांची संख्या मोठ्या प्रमानात आहे, ग्रामपंच्यायतिच्या स्थानिक निधी मधुन व चौदावा वित्त आयोगातुन मिळनारया निधी पैकी ५ टक्के निधी आपंगावर खर्च करने बंधनकारक असुन देखिल तालुक्यातिल एकाही ग्रामपंचायतिने आपंगावर/दिव्यांगावर मागिल ५ वर्षापासुन निधी खर्च केलेला नाही तालुक्यातिल सर्व ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवक व सर्व सरपंच जानुन बुजुन दिव्यांगाच्या सर्वांगिन विकासासाठी आसलेला हक्काचा निधी खर्च करन्यास टाळाटाळ करत आहेत या पुर्वी देखील नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने तालुक्यातिल सर्व दिव्यांगाचा/आपंगाचा हक्काचा निधि खर्च करून दिव्यांगाचा सर्वांगिन विकास साधावा अशी मागणी अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ यांच्याकडे केरन्यात आली होती त्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी जे.एम.शाहु यांनी तालुक्यातिल सर्व ग्रांमपंचायतिंना अपंगांच्या सर्वांगिन विकासासाठी निधी खर्च करावा असे आदेश दिले होते,
परंतु तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतिंनी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दिली आहे,
अपंगांना हक्काचा निधी आपंगावर खर्च होत नसल्याने एन डि एम जे संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकार्यांनी अपंगांना सोबत घेउन मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व तात्काळ आपंगावर होनारा निधी अपंगांच्या कल्ल्यानासाठी खर्च करावा अन्यथा दिनांक १९/०३/२०२० रोजी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर बोंबाबोंब आंदोलन करन्यात येईल असा इशारा देखिल निवेदनाद्वारे देन्यात आला आहे, सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हानिरिक्षक अ हाफिज अ हादी, जिल्हा संघटक विजय आनंता दिपके, प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, समाधान किसन कोकाटे, संगिता बाई सखाराम धाबे, व ईत्तर अपंग बांधवांच्या स्वक्षर्या आहेत…

सारोळा खुण प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त करण्यासाठी डिवायएसपिंनी पाठवला न्यायालयात अहवाल

सारोळा खुण प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त करण्यासाठी डिवायएसपिंनी पाठवला न्यायालयात अहवाल

दोषारोपपञ न्यायालयात पाठवण्या ऐवजी आरोपींना वाचवण्यासाठी पाठवला दोषमुक्तीचाच अहवाल

जवळा नि प्रतिनिधी: आजिनाथ राऊत
उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा (बुद्रुक) येथील बौध्द समाजातील सहदेव कठारे यांची 19 आक्टोंबर 2019 रोजी पन्नास रुपये देण्याच्या कारणावरुन दांडक्याने जबर मारहाण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती,
सदर कुटुंबाला नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस संघटणेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी भेट देऊन घटनेची सखोल माहिती घेतली होती.तसेच पिडीतांसह जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,तपास अधिकारी डी.वाय.एस.पी,ना.ह.स.पोलीस अधिकारी,यांना भेटून सर्व बाबी तपासात घेऊन सखोल तपास करण्याची मागणी करुन लेखी निवेदनसुंध्दा देण्यात आले होती.
परंतु तपास अधिकारी यांनी घटणेला पाच महिने उलटुन गेले आहेत तरीसुध्दा आरोपींवर दोषारोपपञ विशेष न्यायालयात दाखल केलेले नाही याउलट खुन प्रकरणातील आरोपींना वाचवण्याच्या हेतुने खुनाच्या गुन्ह्यातुन दोषमुक्त करण्यासाठी जिल्हासञ न्यायालयात अहवाल पाठवला आहे.मा.न्यायालयाने पिडीतास बाजु मांडण्यासाठी 3 मार्च 2020 हि तारीख नेमण्यात आली होती,पिडीतांना मदत करण्यासाठी एन.डी.एम.जे.संघटना जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत तसेच अँड.बालीका बनसोडे-राऊत हे उपस्थित होते मा.न्यायालयात पिडींताची बाजु मांडण्यासाठी अँड.बालीका बनसोडे-राऊत यांनी काम पाहुन प्रभावीपणे बाजु मांडली पिडीतांना त्यांची बाजु मांडण्यासाठी पुढील 17 मार्च 2020 हि तारीख नेमण्यात आली आहे.
या घटनेचा तपास योग्यरीत्या केलेला नाही,मयताच्या अंगावरील रक्ताचे डाग पडलेले कपडे तपासात न घेता घरातील दुसरेच कपडे तपासात घेतले असल्याचे या घटणेतील मयताचे नातेवाईक सांगत आहेत.
या खुन प्रकरणाला नाट्यमय वळन लागल्याने जनतेतुन उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत सद्या तपास करत असलेल्या तपास अधिकारी डी.वाय.एस.पी.यांनी केलेल्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे तसेच डि.वाय.एस.पी. आरोपींना पाठीशी घालुन त्यांना वाचवण्याच्या उद्देशाने आरोपींच्या बाजुनेच तपास केला असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
हे खुण प्रकरण मंञालय विधान भवन येथे घेऊन जाऊन सदर कुटूंबास न्याय मिळवुन देण्यासाठी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस(NDMJ) या संघटणेच्या वतीने आवाज उठवणार असल्याचे संघटणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्रभर दलीतांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारात न्यायालयीन बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ बी.जी.बनसोडे साहेब उपस्थित होते तसेच मयत सहदेव कठारे कटुंबातील मयताची मुलगी,पत्नी, मुले उपस्थित होते

You may have missed