सारोळा खुण प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त करण्यासाठी डिवायएसपिंनी पाठवला न्यायालयात अहवाल

सारोळा खुण प्रकरणातील आरोपींना दोषमुक्त करण्यासाठी डिवायएसपिंनी पाठवला न्यायालयात अहवाल

दोषारोपपञ न्यायालयात पाठवण्या ऐवजी आरोपींना वाचवण्यासाठी पाठवला दोषमुक्तीचाच अहवाल

जवळा नि प्रतिनिधी: आजिनाथ राऊत
उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा (बुद्रुक) येथील बौध्द समाजातील सहदेव कठारे यांची 19 आक्टोंबर 2019 रोजी पन्नास रुपये देण्याच्या कारणावरुन दांडक्याने जबर मारहाण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती,
सदर कुटुंबाला नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस संघटणेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी भेट देऊन घटनेची सखोल माहिती घेतली होती.तसेच पिडीतांसह जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,तपास अधिकारी डी.वाय.एस.पी,ना.ह.स.पोलीस अधिकारी,यांना भेटून सर्व बाबी तपासात घेऊन सखोल तपास करण्याची मागणी करुन लेखी निवेदनसुंध्दा देण्यात आले होती.
परंतु तपास अधिकारी यांनी घटणेला पाच महिने उलटुन गेले आहेत तरीसुध्दा आरोपींवर दोषारोपपञ विशेष न्यायालयात दाखल केलेले नाही याउलट खुन प्रकरणातील आरोपींना वाचवण्याच्या हेतुने खुनाच्या गुन्ह्यातुन दोषमुक्त करण्यासाठी जिल्हासञ न्यायालयात अहवाल पाठवला आहे.मा.न्यायालयाने पिडीतास बाजु मांडण्यासाठी 3 मार्च 2020 हि तारीख नेमण्यात आली होती,पिडीतांना मदत करण्यासाठी एन.डी.एम.जे.संघटना जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत तसेच अँड.बालीका बनसोडे-राऊत हे उपस्थित होते मा.न्यायालयात पिडींताची बाजु मांडण्यासाठी अँड.बालीका बनसोडे-राऊत यांनी काम पाहुन प्रभावीपणे बाजु मांडली पिडीतांना त्यांची बाजु मांडण्यासाठी पुढील 17 मार्च 2020 हि तारीख नेमण्यात आली आहे.
या घटनेचा तपास योग्यरीत्या केलेला नाही,मयताच्या अंगावरील रक्ताचे डाग पडलेले कपडे तपासात न घेता घरातील दुसरेच कपडे तपासात घेतले असल्याचे या घटणेतील मयताचे नातेवाईक सांगत आहेत.
या खुन प्रकरणाला नाट्यमय वळन लागल्याने जनतेतुन उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत सद्या तपास करत असलेल्या तपास अधिकारी डी.वाय.एस.पी.यांनी केलेल्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे तसेच डि.वाय.एस.पी. आरोपींना पाठीशी घालुन त्यांना वाचवण्याच्या उद्देशाने आरोपींच्या बाजुनेच तपास केला असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.
हे खुण प्रकरण मंञालय विधान भवन येथे घेऊन जाऊन सदर कुटूंबास न्याय मिळवुन देण्यासाठी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस(NDMJ) या संघटणेच्या वतीने आवाज उठवणार असल्याचे संघटणेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्रभर दलीतांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारात न्यायालयीन बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ बी.जी.बनसोडे साहेब उपस्थित होते तसेच मयत सहदेव कठारे कटुंबातील मयताची मुलगी,पत्नी, मुले उपस्थित होते

You may have missed