आंतरराष्ट्रीय

खंडाळी येथे मातंग समाजातील तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

खंडाळी येथे मातंग समाजातील तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या

मुलांच्या शिक्षणासासह कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी वैभवजी गिते यांनी घेतली.

पीडित कुटुंबाच्या शेवटपर्यंत पाठीशी राहू.. विकास दादा धाइंजे.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज न्यूज नेटवर्क अकलूज —
मौजे खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथे दिनांक 1 मे 2020 रोजी मातंग समाजातील
रामचंद्र विठ्ठल खंडागळे या तरुणाचा खुन झाला.
या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी चळवळीचे जेष्ट नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकासदादा धाइंजे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी खंडाळी येथे भेट दिली.
खंडागळे कुटुंबाचे सांत्वन केले
मयत रामचंद्र खंडागळे यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी व दोन लहान मुले आहेत.एक भाऊ मतिमंद आहे.ही परिस्थिती लक्षात घेता वैभवजी गिते यांनी दोन लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीसह कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेण्याची घोषणा घटनास्थळीच केली.तात्काळ समाजकल्याण व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून पीडित कुटुंबास तातडीची मदत देण्याच्या सूचना दिल्या.
या घटनेत तीनही आरोपींना अटक केली असून आरोपी सध्या पोलीस कास्टडीमध्ये आहेत.विकासदादा धाइंजे यांनी कुटुंबास केसचा निकाल लागेपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सांगितले.व तहसीलदार यांची भेट घेऊन तातडीची मदत,पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले.
यावेळी एन.डी.एम.जे चे नेते बाबासाहेब सोनवणे, भगवान भोसले,दत्ता कांबळे,समीर नावगिरे,वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र साळवे,कल्याण लांडगे
खंडाळीचे ग्रामपंचायत सदस्य महादेव साबळे
बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष नागेश वाघंबरे,
आबा वाघमारे,
योगेश खंडागळे, सौरभ वाघमारे अभय वाघमारे,प्रवीण खरात, प्रकाश खरात तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
वैभव गिते व विकास दादा यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना पीडित कुटुंबास कागदपत्रे काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली.

पत्रकारांना 50 लाखांचे विमा संरक्षनासह लॉक डाऊन संपेपर्यंत 6 हजार मानधन द्यावे. ……..वैभव गिते

पत्रकारांना 50 लाखांचे विमा संरक्षनासह लॉक डाऊन संपेपर्यंत 6 हजार मानधन द्यावे. ……..वैभव गिते

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -शासनाने कोरोना विषाणूचा प्रदर्भाव रोखण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.कोरोना विषाणूशी लढताना कर्तव्य बजावताना अनेक डॉक्टर,नर्स,वार्डबॉय व पोलिस अधिकारी हे स्वतः कोरोना कोविड 19 विषाणूने संक्रमित झाल्याचे निदर्शनास येत आहे.अशा गंभीर परिस्थितीत दैनिक, साप्ताहिक,पाक्षिक,नियतकालिकांचे पत्रकार,वृत्तवाहिन्यांचे,युट्युब चॅनल व पोर्टलवर पत्रकारिता करणारे पत्रकार,विविध वर्तमानपत्रात लेख लिहणारे पत्रकार,स्तंभलेखक हे
स्वतःचा जीव धोक्यात घालून पत्रकारिता करत आहेत. समाजातील तळागळातील बातम्या देण्यासाठी पत्रकारांना अनेक ठिकाणी प्रसंगी संक्रमित विभागात जावे लागते पत्रकार हा समाजातील आरसा आहे.सत्य जनतेपर्यंत पोचवणारे माध्यम आहे.
प्रामाणिक पत्रकारिता करीत असताना जर पत्रकारांना कोरोना कोविड 19 या विषाणूची लागण झाली तर संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊ शकते.
त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला संरक्षण देणे काळाची गरज आहे ज्याप्रमाणे शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोबतच तलाठी व ग्रामसेवक यांनासुद्धा 50 लाखांचा विमा जाहीर केला आहे त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या पत्रकारांना पन्नास लाखांचा विमा घोषित करून लॉकडाउन संपेपर्यंत प्रति महिना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते माळशिरस चे माजी सरपंच विकास (दादा) धाईंजे नॅशनल दलीत फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे माळशिरस तालुका अध्यक्ष दत्ता कांबळे यांनी उपविभागीय दंडाधिकारी ताथा उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज मा.शमा पवार म्याडम यांची भेट घेऊन निवेदन सादर करून गांभीर्य लक्षात आणले एक प्रत मुख्यमंत्री यांना सुद्धा पाठवली प्रांतअधिकारी शमा पवार यांनी हे निवेदन तात्काळ कार्यवाहीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी मा. मिलिंद शंभरकर यांच्याकडे योग्य कार्यवाहीसाठी पाठवले आहे

कलावंतांना तीन महिन्यांकरीता प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान द्यावे – वैभव गिते

कलावंतांना तीन महिन्यांकरीता प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान द्यावे वैभव गिते

खेळ मांडण्यापूर्वीच मोडण्याची वेळ आली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणीप्रतिनिधी–कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे मार्च ते मे महिन्याच्या हंगामात हातावर पोट असलेले विविध घटक अडचणीत आले आहेत.यामध्ये शिव,फुले,शाहू आंबेडकर,आण्णा भाऊ यांच्या विचारांचा प्रसार प्रचार तळागळापर्यंत पोचवून अंधश्रद्धेचे निर्मूलन करणारे हजारो गायक,शाहीर,जलसाकार तसेच मार्च,एप्रिल व मे महिन्यात गावागावांमध्ये होणाऱ्या जत्रा यात्रांमध्ये रसिक मायबाप जनतेचे मनोरंजन करणारे लावणी शो,ऑर्केस्ट्रा,तमाशा मंडळांसह अनेक कार्यक्रमातील कलाकारांचा समावेश आहे.
पायाला भिंगरी बांधून स्वतःचा संसार पाठीवर बांधून कलावंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या संचासोबत जाऊन जनतेचे प्रबोधन व मनोरंजन करून मिळेल ते मानधन पदरात पाडून चटणी भाजी भाकरी खाऊन दिवस काढतात.याच मानधनावर कलावंत एक वर्षाचे गणित मांडतात उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण,औषधपाणी,देणी घेणी करतात.केंद्रसरकार व राज्यसरकार यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या रद्द केल्याने उपासमारीची वेळ आली आहे.तरीही महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेस पोवाड्याच्या माध्यमातून संदेश दिला आहे सध्या त्यांचा हा पोवाडा सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय झाला आहे.असे हे कलावंत स्वतःचे दुःख चेहऱ्यावर न दाखवता जनतेस सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत
मुख्यमंत्री सहाययता निधीत सध्या 197 कोटी निधी शिल्लक आहेत.तसेच सामाजिक न्याय व विशेष सहायय विभागाचा कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक असून यामधील निधी कलावंतांना व त्यांच्या संचास तीन महिन्यांकरिता प्रत्येकी पाच
लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात यावेत यामुळे शासनाच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही
कलाकारांपुढे खेळ मांडण्यापूर्वीच मोडण्याची वेळ आली आहे.पुरोगामी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा परखड शब्दात सांगणाऱ्या व जपणाऱ्या या घटकांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये.कलाकारांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळणे खुप गरजेचे आहे.तात्काळ निर्णय घेऊन कलावंतांची व त्यांच्या कुटुंबियांची हेळसांड थांबवावी ही विनंती

लॉकडाऊन च्या काळात मजुरांचे भुकेने हाल होऊ देणार नाही एन डी एम जे चे वैभव गिते यांनी मजुरांची घेतली जबाबदारी.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कुरबावी ता.माळशिरस जि.सोलापूर येथे परराज्यातुन आलेल्या ऊसतोडनी कामगार गरीब व गरजू व्यक्तींना ऍड.डॉ.केवलजी उके, एड. गजान चव्हाण,ऍड  अनिल कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनात गहू तांदुळ धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याचे नेते नितीन धायगुडे यांच्या उपस्थितीत कुरबावी गावचे पोलीस पाटील कुलदीप दनाने पाटील ग्रामसेवक काळे यांच्या देखरेखीखाली सर्व कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी विशाल साळवे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी लॉक डाऊन च्या काळात कोरोना विषाणू साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासनाचे व तालुका प्रशासनाचे आभार मानले.रासपचे नेते नितीन धायगुडे यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचने मजुरांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केल्याने कौतुक केले.गोरगरिबांना मदत करणे हीच खरी सेवा आहे असे म्हंटले आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते व माळशिरस गावचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे यांनी माळशिरस तालुक्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या मजुरांची हेळसांड होऊ देणार नाही महापुरुषांचा जयंती महोत्सवानिमित्त प्रत्येक गरजु व्यक्तीस अन्न धान्याचे वाटप करण्यात येणार आहे असे म्हंटले.धान्य मिळालेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले.धान्य वाटपाचे संयोजन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी केले तर प्रमोद शिंदे व दत्ता कांबळे यांनी मोलाची साथ दिली. तसेच हे वाटप सोशल डिस्टन्स चा नियम पाळून शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून करण्यात आला.

नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ठाणे जिल्हा समितीच्या वतीने कल्याण पूर्व परिसरातील गरीब कुटूंबांना अन्नदान..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )देशभर कोविड १९ या महामारिने थैमान घातलाय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक २३ मार्च पासून १४ एप्रिल २०२० पर्यन्त संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या लॉकडाउनची सर्वात जास्त झळ ही रस्त्यावर राहणारे गोरगरीब तसेच रोजंदारीने काम करणाऱ्या लोकांना सोसावी लागत असून त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे.

शासनाच्या मोफत धान्य वाटप योजनेचा फज्जा उडाला आहे आणि अनेक योजना या अद्याप कागदावरच आहेत. अशा वेळेस मदतीचा एक हात पुढे करत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या ठाणे जिल्हा समितीच्या वतीने आज दिनांक ६ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी आनंदवाडी, मिलिंद नगर, एफ कॅबिन रोड, कल्याण पूर्व या परिसरातील अपंग, बेरोजगार, रिक्षा चालक, गॅस डिलेवरी, व घर काम करणाऱ्या जवळपास २०० गरीब कुटूंबांना अन्नदान केले. संघटनेचे राज्य महासचिव अॅड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर गरजूंना विविधप्रकारे मदत केली जात आहे आणि आजच्या अन्नदानाप्रसंगी ते स्वता जातीने उपस्थित होते.

अश्या गोर-गरिबांना मदत करण्याकरीता बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हान यांनी पुढाकार घेवुन आर्थिक मदत केली आहे. तसेच मानुसकिची जान असणारे ऑल.इडिया एस.सी.एस.टी.कल्याण (ओ.एच.इ.) शाखेचे अध्यक्ष सुनिल ठेंगे याच्या सारखे अनेक लोक पुढे येत आहेत. आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या लोकांनी पुढे येवून आणखी दान करावे जेने करून अश्या असंख्य कुटुंबाची मदत करता येइल असे अव्हाहन आजचे भोजन दानाचे मुख्य संयोजक तथा एन.डी.एम.जे.संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे यांनी केले.

यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेचे जिल्हा संघटक संदेशजी भालेराव व कल्याण तालुका संघटक जितेंद्र बुकाने, प्राध्यापक संतोष बनसोडे सर तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष अमित साळवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते. अशाप्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून एनडीएमजेची टीम संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोना ग्रस्तांसाठी काम करत असल्याने जनतेतून कौतुक होत आहे.

अन्नदान करताना एन डी एम जे राज्य महासचिव डॉक्टर एडवोकेट केवल उके
अन्नदान करताना एन डी एम जे कल्याण टीम
विशेष सहकार्य मार्गदर्शन बार कौंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा चे सदस्य एड.गजानन चव्हाण साहेब
परिश्रम घेताना बंटी साळवे
अन्नदान करताना विनोद रोकडे

कोरोना पार्श्वभूमी अनुषंगाने पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे च्या वतीने पिरळे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (नातेपुते)  राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत नेशनल दलीत मोमेंत फोर जस्टाइस (एन.डी.एम.जे) महासचिव डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका,व पिरळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने  पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर रुग्ण उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे, शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे. या मुळे विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत व पुरेशी रक्तदान शिबिर होत नाहीत.म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.भविष्यात रक्त तुटवड्याचे संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले होते यावर दोन महिलांसह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. हे शिबिर  सर्व नियमांचे पालन करून  सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यात आले. या शिबिराचे  उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किर्ती सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच शिवाजी लवटे, माजी पोलीस अधिकारी ज्ञानदेव शिंदे, संदीप शेठ नरोळे, महादेव शिंदे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे कार्यकारी संपादक प्रशांत खरात, सुदाम बुधावले ,व अक्षय ब्लड बँक ,डॉ.वाघमोडे ,डॉ.मोरे व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. हे  शिबिर यशस्वी होण्यासाठी पिरळे येथील युवकांनी परिश्रम घेतले. तसेच हरिदास लवटे, भारत राहुडकर, ज्ञानदेव शिंदे ,आकाश खिलारे ,मोहन शिंदे ,प्रकाश ठवरे, सुवर्णा राहुडकर ,अनिकेत लवटे ,नाथा साळवे, उदय डूडू ,दशरथ खिल्लारे ,रोहित डूडू ,संदीप नरोळे, संतोष जाधव ,राहुल खिलारे, हनुमंत बुधावले, प्रशांत खिलारे ,सचिन खिल्लारे, अमीर मुलानी ,परशुराम लांडगे ,विठ्ठल खंडागळे, दशरथ लवटे, दुर्योधन खिलारे, रुपेश साळवे, गजानन पोटे ,योगेश खिलारे ,संतोष साळवे ,सागर खिलारे ,मयुर साळवे ,अविनाश तोडकर, सुनील साळवे, बाळा बुधावले, विजय खंडागळे ,अधिक्राव यमगर, राजाराम शिंदे ,अनिल खिलारे ,संजय नरोळे, सलीम मुलानी ,उमेश जाधव, अमोल निकम, वैभव खिलारे ,चेतन खिलारे ,विशाल खिलारे ,रामचन्‍द्र राहुडकर, रमेश पांडेचेरी, शिवाजी कांबळे ,सुनील शिंदे, महादेव राहुडकर, ओमकार किर्दक ,सूरज किर्दक ,शैलेश नरोळे ,अक्षय साळवे ,पन्नालाल पैलवान, जनार्दन शिंदे ,अनिल तोडकर ,सुनील दळवी, करीम मुलानी, या रक्तदात्यांनी सामाजिक भान ठेवून देशहितासाठी रक्तदान केले या सर्व रक्ता त्याचे पंचक्रोशीत सोशल मीडियातून कौतुक होत असून यांचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे बोलले जात आहे.

* पिरळे येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे ) राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत *पिरळे ता माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे कोरणा वायरस प्रादुर्भावामुळे रक्तपेढीत रक्त तुटवडा निर्माण होत असले कारणाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दररोज अनेक हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवर उपचार घेत असतात त्यासाठी दररोज चार ते पाच हजार रक्ताच्या पिशव्यांची अत्यंत गरज भासते परंतु कोरणा व्हायरसमुळे शाळा महाविद्यालय यांना सुट्टी आहे मुळे व विविध कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत त्यामुळे पुरेशी रक्तदान शिबिर होत आहेत म्हणून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासू लागली आहे व रुग्णांची संख्या वाढू लागली आहे भविष्यात रक्त तुटवड्याची संकट अचानक येऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. पत्रकार प्रमोद शिंदे यांनी रक्तदात्यांना रक्तदानासाठी आव्हान केले आहे बोलताना म्हणाले की रक्तदानामुळे आपण एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदान हे राष्ट्रहिताचे काम असून आहे तरी शक्य तेवढ्या लोकांनी रक्तदान करून एक समाजहिताचे काम आपल्या आपण घडले पाहिजे. हे रक्तदान शिबिर शुक्रवार दिनांक 27 मार्च 2020 रोजी सकाळी दहा वाजता मारुती मंदिर सभा मंडप ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात येणार आहे. तसेच देशात स्वराज्यात कलम 144 व संचारबंदी असल्याकारणाने का वेळेस तीन ते चार लोकांचे रक्तदान घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त  पिरळे ग्रामस्थ ,पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल व महाराष्ट्र पत्रकार संघ माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच गर्दी होऊ नये म्हणून पुढील क्रमांकांवर संपर्क साधा  पिरळे ग्रामपंचायत जवळ संपर्क पत्रकार प्रमोद शिंदे 9975903040, पोलीस पाटील औदुंबर बुधावले- + 96375 91354 सरपंच दशरथ लवटे पाटील9922524069,सुदाम बुधावले-9503993490, गणेश वाघमोडे-9049492262 गणेश दडस9960476042, प्रकाश ठावरे-96575 66395 * मोहन शिंदे.

मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आज दिनांक 15 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

बैठकीत महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे माजी सनदी अधिकारी श्रीयुत खोब्रागडे यांनी सविस्तर सादरीकरण करून संविधान जागृती, अंदाजपत्रकातील अनुशेष, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत मागासवर्गीय भूमिहीनांना शेतजमीन वाटप, रमाई घरकुल योजना, आरक्षणातील अनुशेष, पदोन्नतीतील आरक्षण, मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापना अशा विविध विषयांवर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मते मांडली.

वसतिगृहातील प्रलंबित बांधकामांबाबत सामाजिक न्याय विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून सदर कामात वेळ कसा येईल याकडे लक्ष पुरवावे असे मला प्रामुख्याने वाटते. जवळजवळ वीस लक्ष भूमिहीनांना बागायती शेतजमीन देणे सध्याच्या प्रचलित किमतीमध्ये शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत भूमिहीन कुटुंबांना उद्योगासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत पावले उचलावीत असे वाटते.

मागासवर्गीय बांधवांच्या उद्योग-व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्था पुढे येणे गरजेचे आहे. राज्य शासनाने त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. तसेच मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत बरेचदा प्रतिकूल गोपनीय अहवाल अडचणीचे ठरतात. त्याचादेखील संबंधित विभागाने सर्वंकष आढावा घेणे गरजेचे आहे.

माझा अनुभव आहे की महिला अधिकारी पुरुषांपेक्षा कार्यक्षमतेबाबत कमी नाही. महिला अधिकाऱ्यांना पदस्थापना देताना मागासवर्गीय अधिकाऱ्यांचा देखील प्राधान्याने विचार करावा, ही व अशा काही विनम्र सूचना या बैठकीमध्ये पवार साहेबांनी केले राज्य शासनाला केल्या.

माणिक अंकुश उदागे खून खटल्यातील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

डॉ.केवल उकेंच्या मार्गदर्शनात वैभव गितेंचा पाठपुरावा

विशेष सरकारी वकील बी.ए. आलूर यांनी चालवला खटला

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )माणिक अंकुश उदागेंनी मोरेवस्ती चिखली ता. हवेली जि. पुणे येथे दिनांक 14 एप्रिल 2014 रोजी- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून जातीयवादी गावगुंडानी दिनांक 01 मे 2014 रोजी पहाटे 3 च्या सुमारास राहत्या घरातून माणिक उदागे यांचे अपहरण करून मोशी दगड खान येथे नेऊन दगडाच्या ठेचून निर्घृणपणे खून केला. याबाबत एम.आय.डी.सी.भोसरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 89/2014 भा.दं.वि.कलम 364,302,201,34. मुंबई पोलीस कायदा कलम 135 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 चे कलम 3(1)(10), व 3(2)(5) तसेच नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 चे कलम 7(1 )(ड) नुसार गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते.आंबेडकरी जनतेने महाराष्ट्रभर आंदोलने केली होती.घटनेचे गांभीर्य पाहून तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री डॉ.नितीन राऊत,खासदार रामदास आठवले,अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल.थुल, एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव डॉ.केवल उके,वैभव गिते,यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या
उदागे कुटुंबियांच्या वतीने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून बी.ए.आलूर यांच्या नियुक्तीची मागणी केली वकिलांच्या नियुक्तीसाठी डॉ. केवलजी उके व वैभव तानाजी गिते यांनी शासनस्तरावर प्रयत्न केल्याने शासनाने बी.ए.आलूर यांची नियुक्ती झाली
सरकार पक्षाच्या वतीने सत्तावीस साक्षीदार तपासून दिनांक 13 मार्च 2020 रोजी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली
चारही आरोपींना मा.जिल्हा सत्र न्यायालय पुणे, ग्वालानी न्यायाधीश सो.यांनी भा.द.वी 302, नुसार जन्मठेपेची तर 364 नुसार पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.उदागे कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून ते आरोपींना जन्मठेप होईपर्यंत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)महाराष्ट्र या संघटनेचे राज्य महासचिव अॅड.डॉ.केवल उके ,सचिव वैभव गिते,ऍड.प्रभाकर सोनवणे, पंचशीलाताई कुंभारकर,रवी बनसोडे,प्रियदर्शी तेलंग,विजय गायकवाड, रमेश ठोसर,यांनी मदत केली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून
उदागे उटुंबियांना घटना घडल्यापासून ते आजपर्यंत सशस्त्र पोलीस बंदोबस्त होता आरोपी अपिलात जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आरोपी त्यांच्या नातेवाईकांपासून धोका होऊ नये म्हणुन उच्च न्यायालयातील अपील संपेपर्यंत पोलीस संरक्षण चालू ठेवण्याची मागणी उदागे कुटुंबियांच्या वतीने केली आहे.
आरोपींना एट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत शिक्षा न झाल्यामुळे तसेच आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पीडित कुटुंबांच्या वतीने मा.उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहीती एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते यांनी दिली

शिखर शिंगणापूर घाटात भाविकांच्या क्रूजरवर दरोडा नातेपुते (प्रमोद शिंदे) :फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवर सहा जण येऊन क्रुझर गाडी अडवून शिखर  शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल दरोडेखोरांनी पळवला व दरोडेखोर फरार झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की चिवरी व उमरगा गावातील लोकांना आळंदी देहू जेजुरी खर शिंगणापूर पंढरपूर अशा देव दर्शनाकरिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु आळंदी जेजुरी देवदर्शन करून  फलटण मार्गे शिखर शिंगणापूर ला जात असताना  रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर कोथळे गावाच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडी ला तीन मोटरसायकल त्यावरील सहा दरोडेखोरांनी पास करून पुढे जाऊन घाटात गाडी थांबवली व ते ड्रायव्हर ला मारहाण  करून  त्याच्या कडील क्रूजर गाडी च्या चाव्या हिसकावून घेतल्या व भाविकांना म्हणाले तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडी च्या पाठीमागे गाडी च्या काचेवर दगड  लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिला यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. व ते दरोडेखोर मोटरसायकली वरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले यामध्ये गाडीचा ड्रायव्हर चैतन्य बडुरे राहणार येवती तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्याकडील 500 रुपये किमतीच्या सॅमसंग कंपनी रंगाचा आयडिया कंपनी सिम कार्ड व गजू बाई त्रिंबक सूर्यवंशी यांचे सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व दोन हजार रुपये रोख तसेच कोंडाबाई अनिल सावंत यांचे बारा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच धोंडाबाई गोविंद वडजे त्यांचे सहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र तसेच भामाबाई भागवत कदम यांच्या आठ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच सुरेखा दिलीप शिरगिरे  यांचे मनी मंगळसूत्र 14 हजार रुपये किमतीचे सोने तसेच वनिता मधुकर शिरगिरे यांच्याकडे दीड हजार रुपये रोख तसेच सुमन ज्ञानदेव सावंत यांच्याकडील 23 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र दोन ग्रॅम ची कर्णफुले रोख नऊ हजार रुपये तसेच मंगल नागनाथ शिरगिरे यांचे चार हजार 600 रुपयांची मंगळसूत्र रोख रक्कम सहाशे रुपये तसेच काशीबाई शिवाजी वडजे यांच्याकडील चार हजार रुपये मनी मंगळसूत्र तसेच रुक्मिणीबाई आबा शिरगिरे यांच्याकडील सात हजार पाचशे रुपयाची मणी-मंगळसूत्र तसेच संगीता धनाजी सावंत यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीची काळ या महिन्यातील मणी-मंगळसूत्र तसेच घनाजी मारुती सावंत पाचशे रुपये किमतीचा स्माईल कंपनीचा मोबाइल तसेच विमल वसंत शिरगिरे यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन 6 अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 ए सी8359 या गाडीच्या काचा फोडून 1000 रुपयाचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे हे करीत आहेत. सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित भाविकांनी केली आहे.

You may have missed