Blog

बँक आणि एटीएम संदर्भात ग्राहकांना दिलासा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : करोना आणि देशभरातील लॉक डाऊनची स्थिती लक्षात घेता अर्थ मंत्रालयाने ATM आणि बँक खात्यातील किमान शिल्लकी संदर्भातील नियम शिथिल करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांवरील शुल्क कमी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. 

करदात्यांना दिलासा! रिटर्न फायलिंगला मुदतवाढ

करोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या ५०० च्या वर गेली आहे. पुढील काही दिवस देशात संचार बंदीची स्थिती राहणार आहे. यात बँकिंग यंत्रणा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेबाबत आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

शेअर कोसळला; इंड्सइंड बँकेचे गुंतवणूकदार पोळले

ग्राहकांसाठी किमान शिल्लकीची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यापूर्वीच भारतीय स्टेट बँकेने खात्यातील किमान शिल्लकीची अट रद्द केली होती. आता सर्वच बँकांसाठी हा नियम लागू झाला आहे. 

त्याचबरोबर ग्राहकांना कोणत्याही बँकेच्या ATM मधून अतिरिक्त शुल्काशिवाय पैसे काढण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना ३ ते ५ ATM व्यवहार निःशुल्क देण्यात येत होते. इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यास ग्राहकांना शुल्क द्यावे लागत होते. मात्र आता करोना आणि देशभरातील लॉक डाऊनमुळे बँकिंग नियमावलीत सूट देण्यात आली आहे. यामुळे देशातील कोट्यावधी ग्राहकांना फायदा होणार आहे. 

फोंडशिरस येथील आदित्य संतोष गोरे ची सैनिक स्कुल चंद्रपुर साठी निवड

चि आदित्य संतोष गोरे ची सैनिक स्कुल चंद्रपुर साठी निवड
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस मध्ये इ आठवी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी चि आदित्य संतोष गोरे याची सैनिक स्कूल चंद्रपुर साठी इ नववी प्रवेशासाठी निवड झाली. यामध्ये सर्व प्रवर्गातून त्याने महाराष्ट्र राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. लेखी व वैद्यकीय चाचणीदवारेे त्याची निवड झाली. ग्रामीण भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील मुलाचे सैनिक स्कूल साठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यासाठी विद्यालयाचे गणित विज्ञान शिक्षक श्री संदीप केंगार सर यांचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयसिंह मोहिते पाटील, संचालक श्री संग्रामसिंह मोहिते पाटील ,संचालिका स्वरुपाराणी मोहिते पाटील , संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे , सहसचिव हर्षवर्धन खराडे ,शाळेचे सभापती श्री हनुमान कुंभार, उपसभापती श्री शंकर वाघमोडे ,सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ ,प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण पालकर सर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

शिवामृत दूध संघास महानंदचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांची स्नेहभेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )अकलुज दि १६

  • सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या शिवामृत दूध उत्पादक संघास महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबईचे नवनिर्वाचित चेअरमन रणजीतसिंह देशमुख सह पत्नी यांनी स्नेह भेट दिली. त्यावेळी
    सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर शिवामृत दूध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. वाहिनी साहेब यांचा सत्कार संघाचे संचालीका सौ.मगर व सौ. पिसे यांनी केला
    त्यानंतर
    शिवामृत दूध संघाच्या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली, तसेच महानंदा हि महाराष्ट्र ची शिखर संस्था असून महासंघा मार्फत शिवामृत सहकारी दूध संघाला मदत करण्याबाबत,महासंघा ला दूध पुरवठा करणे बाबत चर्चा झाली तसेच कमी काळात महासंघास मोठे निर्णय घेतले आहेत त्यामुळे महासंघाला तसेच सहकारी दूध संघा ना त्याचा मोट्या प्रमाणात फायदे होणार आहे. याची माहिती महासंघाचे चेअरमन रणजित देशमुख यांनी दिली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
    संघाचे संचालक श्री हरिभाऊ मगर यांनी केले यावेळी संघाचे व्हा.चेअरमन मा. ढोपे तात्या जेष्ट संचालक भिलारे भाऊ,अवताडे तात्या, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, तसेच संघाचे संचालक संजय मोरे, नवनाथ निलटे,सचिन रणनवरे,दत्तात्रय भिलारे, भीमराव साळुंखे,हनुमंत शिंदे व खाते प्रमुख उपस्थिती होते.

मनसे करणार महसूलच्या विरोधात थाळीनाद आंदोलन- आप्पासाहेब कर्चे

मनसे करणार महसूलच्या विरोधात थाळीनाद आंदोलन- आप्पासाहेब कर्चे
पुरोगामीी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क– मौजे नातेपुते येथील गट नंबर 265 मधील फेरफार क्रमांक 67 10 प्रांताधिकारी यांनी अपिला मध्ये रद्द केला 2016 ला त्यानंतर 2017 मध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांनी प्रांत यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले त्यानंतर 2018 मध्ये अप्पर आयुक्त पुणे यांनी िल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम करत अपील अमान्य केले वरील वरिष्ठांचे तिन्ही आदेश नातेपुते येथील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही उलट त्या शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावले हे सर्व प्रकरण चालू असताना त्यामध्ये अनेक खरेदी-विक्री व्यवहार झालेले आहेत त्यांच्या नोंदी 67 घेतल्यानंतर घ्यायला पाहिजे होत्या परंतु आर्थिक लालसेपोटी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सर्व नोंदी धरून घेतल्या त्यामुळे आज त्यांच्या समोर 67 10 रद्द करताना बाकीच्या नोंदी रद्द कराव्या लागत आहेत हे सर्व गोड बंगाल हाणून पाडण्यासाठी व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार यांवर कठोरात कठोर कारवाई तसेच दप्तर दिरंगाई अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 18 तारखेला प्रांत ऑफिस अकलूज यांच्यासमोर थाळीनाद आंदोलन करणार आहे तरी सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे अहवान मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केले आहे
चौकट = नातेपुते येथील मंडल अधिकारी व तलाठी यांचेवर गुन्हे दाखल करा दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणे या सर्व गंभीर प्रकाराची दखल घेऊन गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आप्पासाहेब कर्चे

*माणिक उदागे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्यात वैभव गीते यांचा सत्कार*

*माणिक उदागे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्यात वैभव गीते यांचा सत्कार* पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून चिखली पिंपरी चिंचवड पुणे येथील गावातील गावगुंडांनी माणिक उदागे या तरुणाचा जातीयद्वेषातून अपहरण करून दगडाने ठेचून हत्या केली होती त्या जातीयवद्याना 6 वर्ष    पाठपुरवठा करूनआरोपी सागर कांन्हू खंडाळे ,सतीश दत्तात्रय बाठे, निलेश हिराजी ताटे,विशाल बाळासाहेब मेमाणे, या चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी  डॉक्‍टर केवल उके  यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न केले व माणिक उदागे चा भाऊ श्रावण उदागे यास नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले म्हणून माळशिरस तालुक्याच्या वतीने वैभव तानाजी गीते एन डी एम जे राज्य सचिव यांचा सत्कार विकास दादां धाईंजे यांच्या उपस्थित करण्यात आला या वेळी पत्रकार प्रमोद शिंदे, बाबासाहेब सोनवणे, फलटण येथील पारधी समाजाचे नेते शिंदे सर ,पंढरपूर येथील  मातंग समाजाचे नेते  धनाजी शिव पालक, दत्ता कांबळे ,प्रसिद्धीप्रमुख अनिरुद्ध गायकवाड ,पोलीस पाटील  संजय नवगिरे, संगीत नवगिरे , बाळासाहेब गायकवाड काका,  रवि झेंडे, नवनाथ भागवत ,गणेश गायकवाड ,नानासाहेब गायकवाड ,विशाल गायकवाड, व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच कारुंडे येथील वयोवृद्ध ताई बाजीराव गायकवाड व   कुटुंबीय यांच्यावतीने वैभव गीते यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी,रवींद्र झेंडे, नवनाथ भागवत  ,अनिरुद्ध बाजीराव गायकवाड बादल भागवत  ,नाना गायकवाड, गणेश गायकवाड ,विशाल गायकवाड उपस्थित होते

मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आज दिनांक 15 मार्च रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागांतर्गत तसेच शासनाच्या इतर विभागांतर्गत अनुसूचित जातीतील बांधवांचे राज्य स्तरावरील प्रश्न त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील समस्या याबाबतीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

बैठकीत महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे माजी सनदी अधिकारी श्रीयुत खोब्रागडे यांनी सविस्तर सादरीकरण करून संविधान जागृती, अंदाजपत्रकातील अनुशेष, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत मागासवर्गीय भूमिहीनांना शेतजमीन वाटप, रमाई घरकुल योजना, आरक्षणातील अनुशेष, पदोन्नतीतील आरक्षण, मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापना अशा विविध विषयांवर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मते मांडली.

वसतिगृहातील प्रलंबित बांधकामांबाबत सामाजिक न्याय विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून सदर कामात वेळ कसा येईल याकडे लक्ष पुरवावे असे मला प्रामुख्याने वाटते. जवळजवळ वीस लक्ष भूमिहीनांना बागायती शेतजमीन देणे सध्याच्या प्रचलित किमतीमध्ये शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत भूमिहीन कुटुंबांना उद्योगासाठी वित्तपुरवठा करण्याबाबत पावले उचलावीत असे वाटते.

मागासवर्गीय बांधवांच्या उद्योग-व्यवसायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्था पुढे येणे गरजेचे आहे. राज्य शासनाने त्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. तसेच मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत बरेचदा प्रतिकूल गोपनीय अहवाल अडचणीचे ठरतात. त्याचादेखील संबंधित विभागाने सर्वंकष आढावा घेणे गरजेचे आहे.

माझा अनुभव आहे की महिला अधिकारी पुरुषांपेक्षा कार्यक्षमतेबाबत कमी नाही. महिला अधिकाऱ्यांना पदस्थापना देताना मागासवर्गीय अधिकाऱ्यांचा देखील प्राधान्याने विचार करावा, ही व अशा काही विनम्र सूचना या बैठकीमध्ये पवार साहेबांनी केले राज्य शासनाला केल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुध्द विहार, भेकराईनगर, पुणे येथे जागतिक महिलादिन उत्साहात


दिनांक 8 मार्च 2020 रोजी डाँ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधिनी बुध्द विहार, भेकराईनगर, पुणे. येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित वृंदावनी बनसोडे, कल्पना पवार, शुभांगी पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर केक कापून महिला दीन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी मा. दिगंबर कदम, मा. राजेश पोळ यांनी महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. बाबासाहेब कांबळे यांनी केले.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक आयु. शिवाजी वाघमारे, अध्यक्ष राजीव प्रधान, सचिव प्रवीण नलावडे, राहुल लंकेश्र्वर, हिंदुराव कांबळे, दशरथ हावळे, अमोल जोगदंड, नितिन कांबळे, मयुर गायकवाड, सचिन नरवाडे, व संस्थेचे सर्व सदस्य उपासक, उपासिका उपस्थित होते.

माणिक अंकुश उदागे खून खटल्यातील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

डॉ.केवल उकेंच्या मार्गदर्शनात वैभव गितेंचा पाठपुरावा

विशेष सरकारी वकील बी.ए. आलूर यांनी चालवला खटला

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )माणिक अंकुश उदागेंनी मोरेवस्ती चिखली ता. हवेली जि. पुणे येथे दिनांक 14 एप्रिल 2014 रोजी- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून जातीयवादी गावगुंडानी दिनांक 01 मे 2014 रोजी पहाटे 3 च्या सुमारास राहत्या घरातून माणिक उदागे यांचे अपहरण करून मोशी दगड खान येथे नेऊन दगडाच्या ठेचून निर्घृणपणे खून केला. याबाबत एम.आय.डी.सी.भोसरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 89/2014 भा.दं.वि.कलम 364,302,201,34. मुंबई पोलीस कायदा कलम 135 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 चे कलम 3(1)(10), व 3(2)(5) तसेच नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 चे कलम 7(1 )(ड) नुसार गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले होते.आंबेडकरी जनतेने महाराष्ट्रभर आंदोलने केली होती.घटनेचे गांभीर्य पाहून तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री डॉ.नितीन राऊत,खासदार रामदास आठवले,अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी.एल.थुल, एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव डॉ.केवल उके,वैभव गिते,यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या
उदागे कुटुंबियांच्या वतीने या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून बी.ए.आलूर यांच्या नियुक्तीची मागणी केली वकिलांच्या नियुक्तीसाठी डॉ. केवलजी उके व वैभव तानाजी गिते यांनी शासनस्तरावर प्रयत्न केल्याने शासनाने बी.ए.आलूर यांची नियुक्ती झाली
सरकार पक्षाच्या वतीने सत्तावीस साक्षीदार तपासून दिनांक 13 मार्च 2020 रोजी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली
चारही आरोपींना मा.जिल्हा सत्र न्यायालय पुणे, ग्वालानी न्यायाधीश सो.यांनी भा.द.वी 302, नुसार जन्मठेपेची तर 364 नुसार पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.उदागे कुटुंबियांना पहिल्या दिवसापासून ते आरोपींना जन्मठेप होईपर्यंत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)महाराष्ट्र या संघटनेचे राज्य महासचिव अॅड.डॉ.केवल उके ,सचिव वैभव गिते,ऍड.प्रभाकर सोनवणे, पंचशीलाताई कुंभारकर,रवी बनसोडे,प्रियदर्शी तेलंग,विजय गायकवाड, रमेश ठोसर,यांनी मदत केली.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून
उदागे उटुंबियांना घटना घडल्यापासून ते आजपर्यंत सशस्त्र पोलीस बंदोबस्त होता आरोपी अपिलात जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आरोपी त्यांच्या नातेवाईकांपासून धोका होऊ नये म्हणुन उच्च न्यायालयातील अपील संपेपर्यंत पोलीस संरक्षण चालू ठेवण्याची मागणी उदागे कुटुंबियांच्या वतीने केली आहे.
आरोपींना एट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत शिक्षा न झाल्यामुळे तसेच आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी पीडित कुटुंबांच्या वतीने मा.उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याची माहीती एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गिते यांनी दिली

शिखर शिंगणापूर घाटात भाविकांच्या क्रूजरवर दरोडा नातेपुते (प्रमोद शिंदे) :फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवर सहा जण येऊन क्रुझर गाडी अडवून शिखर  शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल दरोडेखोरांनी पळवला व दरोडेखोर फरार झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की चिवरी व उमरगा गावातील लोकांना आळंदी देहू जेजुरी खर शिंगणापूर पंढरपूर अशा देव दर्शनाकरिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु आळंदी जेजुरी देवदर्शन करून  फलटण मार्गे शिखर शिंगणापूर ला जात असताना  रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर कोथळे गावाच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडी ला तीन मोटरसायकल त्यावरील सहा दरोडेखोरांनी पास करून पुढे जाऊन घाटात गाडी थांबवली व ते ड्रायव्हर ला मारहाण  करून  त्याच्या कडील क्रूजर गाडी च्या चाव्या हिसकावून घेतल्या व भाविकांना म्हणाले तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडी च्या पाठीमागे गाडी च्या काचेवर दगड  लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिला यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. व ते दरोडेखोर मोटरसायकली वरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले यामध्ये गाडीचा ड्रायव्हर चैतन्य बडुरे राहणार येवती तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्याकडील 500 रुपये किमतीच्या सॅमसंग कंपनी रंगाचा आयडिया कंपनी सिम कार्ड व गजू बाई त्रिंबक सूर्यवंशी यांचे सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व दोन हजार रुपये रोख तसेच कोंडाबाई अनिल सावंत यांचे बारा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच धोंडाबाई गोविंद वडजे त्यांचे सहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र तसेच भामाबाई भागवत कदम यांच्या आठ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच सुरेखा दिलीप शिरगिरे  यांचे मनी मंगळसूत्र 14 हजार रुपये किमतीचे सोने तसेच वनिता मधुकर शिरगिरे यांच्याकडे दीड हजार रुपये रोख तसेच सुमन ज्ञानदेव सावंत यांच्याकडील 23 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र दोन ग्रॅम ची कर्णफुले रोख नऊ हजार रुपये तसेच मंगल नागनाथ शिरगिरे यांचे चार हजार 600 रुपयांची मंगळसूत्र रोख रक्कम सहाशे रुपये तसेच काशीबाई शिवाजी वडजे यांच्याकडील चार हजार रुपये मनी मंगळसूत्र तसेच रुक्मिणीबाई आबा शिरगिरे यांच्याकडील सात हजार पाचशे रुपयाची मणी-मंगळसूत्र तसेच संगीता धनाजी सावंत यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीची काळ या महिन्यातील मणी-मंगळसूत्र तसेच घनाजी मारुती सावंत पाचशे रुपये किमतीचा स्माईल कंपनीचा मोबाइल तसेच विमल वसंत शिरगिरे यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन 6 अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 ए सी8359 या गाडीच्या काचा फोडून 1000 रुपयाचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे हे करीत आहेत. सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित भाविकांनी केली आहे.

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आज गुरुवार दि. 12 मार्च रोजी राजसभा निवडणुकीचा अर्ज भरणार




पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )मुंबई दि. 11 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे आज गुरुवार दि.12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. राज्यात भाजपशी युती असल्याने रिपाइं एन डी ए चा घटक पक्ष आहे. भाजप रिपाइं युती चे उमेदवार म्हणून ना रामदास आठवले उद्या राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार असून या वेळी त्यांच्या समवेत भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भाजप प्रदेश अध्यक्ष चांद्रकांतदादा पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील.

येत्या दि. 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 7 जागांसाठी राज्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 मार्च पर्यंत आहे. ना रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत येत्या 2 एप्रिल रोजी संपत आहे.ते यापूर्वी 2014 च्या राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून ना.रामदास आठवले यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
राज्यसभेसाठी भाजप ने मित्रपक्ष म्हणुन रिपाइं प्रमुख रामदास आठवले यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. उद्या गुरुवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ना रामदास आठवले राज्यसभा निवडणुकीचा आपला उमेदवारी अर्ज विधानभवन येथे भरणार आहेत. भाजप ने मित्रपक्ष म्हणून राज्यसभेची महाराष्ट्रातील एक जागा रिपाइं( आठवले) या पक्षाला सोडली असल्याने ना रामदास आठवले आपल्या रिपाइं च्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरणार आहेत.