Blog

फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी च्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, ग्रामस्थ करणार धरणे आंदोलन

फोंडशिरस -सदाशिवनगर तीन कोटी च्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, स्थ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –  फोंडशिरस -सदाशिवनगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत तीन कोटी रुपये इस्टिमेट बजेटच्या रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे. हे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे निदर्शनास येत आहे.रस्ता पूर्ण होण्याअगोदरच या रस्त्या मध्ये खड्डे पडले असून नवीन रस्ता हातानी उकरत आहे.या रस्त्यामध्ये डांबर अतिशय कमी प्रमाणात वापरल्याने रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे. या संदर्भात फोंडशिरस येथील ग्रामस्थांकडून रस्त्याचे काम सुरू असताना उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रार केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतल्याचे दिसून येत नाही. या पाठी मागचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. संबंधित ठेकेदाराला निकृष्ट काम करण्यासाठी अधिकारीच पाठीशी घालतात असे ग्रामस्थांकडून आरोप केले जात आहेत. मा.उप अभियंता यांना इस्टिमेट प्रमाणे काम झाले का हे विचारलं असता उपअभियंता व संबंधित अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचाही आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.यासंदर्भात चौकशी करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व डोळेझाक अपने बिल काढणाऱ्या अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदार व धिकार्‍यावर कारवाई न झाल्यास दिनांक 5 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथे  बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात,जमीर मुलानी ग्रामपंचायत सदस्य दिनेश भोसले यांनी मा.उपविभागीय प्रांत अधिकारी ,मा. तहसीलदार माळशिरस, अकलूज पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे.या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काल एका चार चाकी वाहनाचा अपघात सुद्धा झाला आहे. फोंडशिरस सदाशिवनगर रस्त्याला मोठ्या प्रमाणात वर्दळ असते विद्यार्थी,शेतकरी व अनेक लोक या रस्त्याने ये-जा करतात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचेही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामांचा निधी येत असतो व त्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन कामे निकृष्ट दर्जाचे होतात याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे ही दिसून येत आहे.

फोंडशिरस-सदाशिवनगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यावर अपघात चार चाकी गाडीची पलटी
फोंडशिरस सदाशिवनगर रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याकारणाने रस्ता इस्टिमेट प्रमाणे करण्यात यावा अन्यथा धरणे आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात ,ग्रामपंचायत सदस्य दिनेश भोसले, जमीर मुलानी बांधकाम विभाग अधिकारी घनवट यांना निवेदन देताना

लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केल्याचे आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस प्रमोद शिंदे.
फोंडशिरस (ता. माळशिरस जि.सोलापुर)येथील कुंभारमळा शिवारात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेला मागील भांडणाचा राग मनात धरून लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केल्याचे आरोपातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश माळशिरसचे प्रथमवर्ग ज्युडिशिअल मँजिस्ट्रेट मा. पी.पी.कुलकर्णी यांनी दिले.

लोखंडी गज डोक्यात मारून जखमी केल्याचे आरोपातून फोंडशिरस येथील तीन आरोपींची निर्दोष मुक्तता
आरोपी तर्फे युक्तिवाद करणारे वकील ॲडव्होकेट सुमित राजू सावंत माळशिरस कोर्ट

या बाबत सविस्तर माहिती अशी की,
सन – २०१४ मध्ये नातेपुते पोलीस ठाण्याचे हद्दीत,फोंडशिरस,कुंभारमळा येथील, एका महिलेला लोखंडी गज डोक्यात मारून रक्ताची जखम केल्याबाबत तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्या बाबत फोडशिरस येथिल विजय भोसले, सुनिल भोसले, अतुल ढावरे यांचे विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याबाबत माळशिरस येथील फौजदारी न्यायालयात सहा वर्ष केस चालली होती.
सदर केसकामी सरकारी पक्षाने एकुन सहा साक्षीदार तपासले, सर्व साक्षीदार यांच्या साक्षी,महत्वपूर्ण झाल्याने या केस कडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आरोपींतर्फे ॲड.सुमित सावंत यांनी तपासलेले बचाव पक्षाचे साक्षीदार आणि फिर्यादीच्या जखमा, पंचनाम्यात असलेली तफावत, आणि तपासादरम्यान तपासीय अधिकारी यांचे कडून राहिलेल्या त्रुटींवर प्रभावशाली केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती श्री.पी.पी. कुलकर्णी, कोर्टाने तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
सरकारी वकील म्हणून ॲड. किरण सोनवणे यांनी काम पाहिले.

नातेपुते पोलीस स्टेशन येथे तणावमुक्त जीवन जगण्यासाठीची कार्यशाळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क प्रमोद शिंदे-

नातेपुते पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांसाठी तनाव मुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या काळात अनेक कामामुळे पोलिस  कर्मचाऱ्यांना तणावात जीवन जगावे लागते हेच ताणतणावाचे जीवन तणावमुक्त होऊन सुखकर होण्यासाठी.रयतकल्याण फाऊंडेशन’ अध्यक्ष- प्रणव थोरात यांच्या संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अक्षय व्यवहारे सर हे होते.’ तणाव मुक्त व्यवस्थापण’या विषयावर अक्षय व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले.तणावमुक्त व्यवस्थापन  कशा पद्धतीने करावे याचं त्यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय मनोज सोनवलकर हे होते. तसेच या कार्यक्रमास पत्रकार प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, तसेच नातेपुते पोलिस स्टेशन चा सर्व स्टाफ आणि इतर अधिकारी सदर उपस्थित होते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नातेपुते पोलिसांनी केले गुन्हे दाखल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधीनातेपुते येथे आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दिलेल्या नियमांचे पालन न करणा-यांवर नातेपुते पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या कोरोनाविषाणू चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून तो रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याचा एक भाग म्हणून मा.सोलापूर जिल्हा अधिकारी गर्दी टाळण्यासाठी दिनांक 25/3/2021 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्य क्षेत्रांमध्ये असणारी सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळून सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.त्यानंतर जमावबंदीचे आदेश ही दिले आहेत. त्याचप्रमाणे शनिवार-रविवार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु दिनांक 26 3 2021 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान स्वतः नातेपुते पोलीस स्टेशन येथील ए.पी.आय.मनोज सोनवलकर व त्यांच्यासोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल /16-26 सचिन वाघ, 813 तळेकर ,1788  कदम, पोलीस नाईक/1533 बबलू गाडे,1788 पाटील,पोलीस कॉन्स्टेबल 12 घाडगे,2139 कापसे असे सरकारी वाहनाने गस्त करत असताना माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना सत्यजित परमिट रूम जवळ असलेली पानटपरी चालक गणेश बाळासाहेब डफळ रा.नातेपुते हा निर्बंध घातलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ ग्राहक करताना मिळून आला आहे.तसेच नातेपुते वालचंद नगर रोड लगत बोडरे कॉम्प्लेक्स मधील गाळ्यांमध्ये फिटनेस जिम अँड प्रोटीन शॉप मध्ये जाऊन पाहणी केली असता सदर जिम मध्ये 8 ते10 इसमे एकत्र येऊन व्यायाम करत असल्याचे दिसून आल्यानंतर जिमचे मालक माऊली कांतीलाल पोटे रा.नातेपुते तसेच नातेपुते ग्रामपंचायत येथील भेळीचे गाडे जास्त वेळ चालू ठेवून ग्राहक करत असताना भेळ गाडीचे मालक दिपक मधुकर पद्मन व अक्षय निवृत्ती पिसे आढळून आल्याने या सर्वांविरुद्ध भादवि कलमान्वये आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगामी काळात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती,संस्था,संघटना यांच्यावर भादवि कलम 188 मधील तरतुदी नुसार कायदेशीर  आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.                               

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नातेपुते पोलिसांनी केले गुन्हे दाखल

नेहमीच गजबजलेल्या नातेपुतेत शुकशुकाट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन सर्वत्र कडकडीत बंद
अण्णाभाऊ साठे चौक परिसर नातेपुते
सुंधा स्वीट होम परिसर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर
नातेपुते येथील प्रमुख बाजारपेठ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व शासनाच्या आदेशानुसार नेहमीच गजबजलेली  प्रमुख बाजारी  व्यापारपेठ नातेपुते व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. मा.जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांचे दिनांक 25 मार्च रोजीचे आदेश असून या आदेशाचे पालन करण्यात आले. फौजदारी प्रक्रिया संहिता 1993 चे कलम 144 नुसार जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेबाबत शासनाच्या आदेशान्वये प्रतिबंध कायदा 1897 मधील तरतुदीनुसार covid-19 नियंत्रित आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांना शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहे.  त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंतच चालू राहतील हे निर्बंध अत्यावश्यक सेवा वगळता करण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवेमध्ये मनुष्य व प्राणीमात्रांना साठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला,फळे,किराणा,दूध,वृत्तपत्र वितरण या बाबींना निर्बंध लाभ राहणार नाही.प्रत्येक शनिवारी व रविवारी सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहतील त्यादिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना निर्बंध असेल सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार व जनावरांचे बाजार बंद राहतील.खाद्यगृह हे परमिट रूम/बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत कोरोना चे मार्गदर्शक तत्वे पालन करून 50% क्षमतेने सुरू राहतील, किचन व पार्सल रात्री दहा पर्यंत सुरू राहतील, सामूहिक स्पर्धा, कार्यक्रम बंद राहतील. जिम,व्यायाम शाळा,स्पोर्ट,कॉम्प्लेक्स,जलवितरण, वैयक्तिक राहतील.सर्व धार्मिक स्थळे मंदिरे सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत चालू राहतील.        तसेच मास्क वापरणे, सानी टायझर, सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक राहील.या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 45 ऑफ 1860 कलम 188 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र करण्यात येईल 2005 साथरोग नियंत्रण तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे आदेश सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. यावर नातेपुते व परिसरात कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे परंतु या बंदमुळे दररोज छोटे-मोठे व्यवसाय करणारे व मजूर हातावर पोट भरणारे यांचे हाल होताना दिसत आहेत.

खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नातेपुते स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – माळशिरस तालुक्यातील शेती पंपाचा बंद केलेला विद्युत पुरवठा परत चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. जिल्हाध्यक्ष भीमराव फुले यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नातेपुते येथे रास्ता रोको व महावितरण कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात आले.
मागील आठ ते दहा दिवसापासून माळशिरस तालुक्यातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्वसूचना न देता विज बिल वसुलीसाठी खंडित करण्यात आला. तो वीजपुरवठा त्वरित चालू करण्यासाठी व शेतकऱ्यांचे एचपी प्रमाणे नोंद करून वाढीव बिल दुरुस्त करून, बिल आकारण्यात यावे या मागणीसाठी मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नातेपुते येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे करण्यात आले.आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमरसिंह कदम,भीमराव,फुले हरिदास थिटे,दत्ता भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे यांनी तात्काळ तोडलेला विद्युत पुरवठा जोडून देऊन शेतकऱ्यांना सर्वे करून कमी एचपी प्रमाणे बिले दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी विनंती केले आहे. तसेच हे आंदोलन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मध्यस्थीने माघार घेण्यात आले. या आंदोलनास महादेव सावंत ,नारायण सावंत प्रशांत पवार अरुण ढगे मानसिंग पाटील,अंकुश बनकर,मुरलीधर सावंत, तुकाराम किर्दक कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष भीमराव फुले मनोगत व्यक्त करताना
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमरसिंह कदम उपस्थितांना मार्गदर्शन करताना
दत्ता भोसले मनोगत व्यक्त करताना

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी कार्यकारी उपअभियंता किरण डोईफोडे व दत्ता रुपनवर पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आश्वासन देताना

नातेपुते येथील महावितरणच्या कार्यालयास शेतकऱ्यांचा घेराव

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी

राज्यपाल कोषारी यांना निवेदन देताना एडवोकेट प्रकाश आंबेडकर


  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी  – ॲड. प्रकाश आंबेडकर.
  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी राज्यपालांची भेट घेत हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ह्यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली आहे. तसेच त्यांनी राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी निवेदन दिले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की पोलीस अधिकारी सांगत आहेत की राजकीय व्यवस्थेने आम्हाला वसुलीचे आदेश दिले आहेत त्याचे पत्र सुद्धा प्रसिद्ध केले आहे.शंभर कोटीच्या प्रकरणात एक मंत्री असू शकत नाही हा निर्णय एका मंत्र्याचा की पार्टी स्तरावर झाला आहे. याचा शोध घेतला पाहिजे आणि हे सर्व पुढे आणायचे असेल तर राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. तसेच मनसुख हिरेन ,सुशांत सिंह,पूजा चव्हाण यांना सुसाईड  दाखवण्यात आले आहे हे सुसाईड आहे त का? मर्डरत आहेत? हे लोकांमध्ये शंका आहे.अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या सोबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ.धनराज वंजारी  तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर ह्या उपस्थित होत्या.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी 

माळशिरस येथे वीज कनेक्शन कट करण्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रास्ता रोको

निवेदन देताना भाजप आमदार राम सातपुते व भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील,बाळासाहेब सरगर, बाजीराव काटकर व कार्यकर्ते
आंदोलनात मनोगत व्यक्त करताना आमदार राम सातपुते
मोर्चादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर

माळशिरस येथे वीज कनेक्शन  कट  करण्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रास्ता रोको 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे– माळशिरस येथील अहिल्या देवी चौक येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने वीज कनेक्शन कट करण्याच्या निषेधार्थ व गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या यावेळी माळशिरस चे आमदार राम सातपुते भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की हे सरकार लाईट बिलाच्या नावाखाली  जनतेची लूट करत आहे तात्काळ शेतकऱ्यांची पिळवणूक  थांबवा तसेच धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की कोरोना  व नैसर्गिक संकटामुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी सक्तीची विजवल वीज बिल वसुली तात्काळ थांबवा तोडलेले कनेक्शन तात्काळ चालू करावी, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर असलेला शंभर कोटी रुपये वसुली च्या आरोपाचा निपक्षपाती तपास होण्यासाठी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा.अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी.अशाप्रकारे त्यांनी आंदोलनात मागणी केली. हे आंदोलन  विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते तसेच धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर, के.के पाटील तालुकाअध्यक्ष बाजीराव काटकर, रचिटणीस संजय देशमुख, अतुल सरतापे, मारुती वाघमोडे दादासाहेब खरात दामोदर पालवे हनुमंत दुधाळ सर, शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, शहर उपाध्यक्ष राजेन्द्र वळकुंदे,सुनील बनकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

एन.डी.एम.जे ने दिल्ली में दलित मानवाधिकार कार्यकर्ताओं के लिए चार दिवसीय अंतर्राष्ट्रीय कार्यशालाका आयोजन किया


  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क दिल्ली– नेशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस ने दलित और आदिवासी बच्चों के अधिकारों और सुरक्षा पर चार दिवसीय अंतर्राष्ट्रीय कार्यशाला का आयोजन किया और भारतीय सामाजिक संस्थान, नई दिल्ली में न्याय के लिए राष्ट्रीय दलित आंदोलन की ओर से सोशल मीडिया का उपयोग कैसे किया जाए? 17 से 20 मार्च 2021। देश के विभिन्न राज्यों के कार्यकर्ता अपने-अपने राज्यों का प्रतिनिधित्व करने के लिए उपस्थित थे। उनमें से राज्य महासचिव एडवोकेट डॉक्टर केवलजी उके, सचिव वैभवजी गीते, सहाय्य सचिव पीएस खंदारे, महिला राज्य संगठक पंचशीला ताई कुंभकार, अहमदनगर जिला अध्यक्ष प्रेरणा ढेंडे शामिल थे। महाराष्ट्र का प्रतिनिधित्व किया। महाराष्ट्र में दलितों पर अत्याचार की गंभीर घटनाओं पर भी चर्चा हुई। कार्यशाला में महिलाओं की उपस्थिति महत्वपूर्ण थी।
  बच्चों की देखभाल कैसे करें, ये बच्चे हमारे देश का भविष्य हैं, इसलिए हमें उन पर विशेष ध्यान देने की आवश्यकता है। लेकिन वर्तमान में, बच्चों के यौन शोषण की दर में वृद्धि हुई है, इसलिए सभी को बच्चों पर विशेष ध्यान देना चाहिए और देना चाहिए उन्हें अच्छे स्पर्श, बुरे स्पर्श के बारे में ज्ञान है।  उनमें नेतृत्व की गुणवत्ता विकसित की जानी चाहिए। इस पर कार्यशाला में मार्गदर्शन दिया गया। इसके अलावा, दलित मानवाधिकार कार्यकर्ताओं ने सोशल मीडिया का इस्तेमाल किया।
  कार्यक्रम का समन्वयन डॉ। वीए रमेश नाथन, अधिवक्ता राहुल सिंह, जूडिथ ऐनी, देबजानी साहू, सलाहकार नवीन गौतम ने किया।

एन डी एम जे ने दिल्ली में दलित मानवाधिकार कार्यकर्ताओं के लिए चार दिवसीय अंतर्राष्ट्रीय कार्यशालाका आयोजन किया था उसी दरम्‍यान राष्ट्रीय महासचिव श्री रमेश नाथनजी और समन्वयक एडवोकेट राहुल सिंग महाराष्ट्र के महासचिव अडवोकेट डॉक्टर केवलजी उके सचिव वैभव जी गीते और अन्य कार्यकर्ता

दिल्ली येथे एन डी एम जे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय चार दिवसीय दलित मानवाधिकार कार्यकर्त्यांची कार्यशाळा संपन्न

दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत दरम्यान राष्ट्रीय सचिव श्री रमेश नाथन समन्वयक एडवोकेट राहुल सिंग यांच्यासमवेत महाराष्ट्र सचिव केवलजी उसके वैभवजी गिते सहसचिव पी एस खंदारे पंचशीला ताई कुंभारकर प्रेरणा धेंडे व इतर राज्यातील कार्यकर्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्लीदिनांक १७ ते २० मार्च २०२१ रोजी न्यु दिल्ली येथील इंडियन सोशल इन्स्टिट्यूट येथे नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस च्यां वतीने दलीत मानवाधिकार कार्यकत्यांची  चार दिवसीय दलीत व आदिवासी मुलांचे हक्क व संरक्षण आणि सोशल मीडिया चा वापर कसा करायचा याविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये देशातील विविध राज्यातील कार्यकर्ते आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित झाले होते.त्यामध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याचे महासचिव ॲड.डॉ. केवल जी उके,सचिव वैभव जी गीते,सहसचिव पी.एस.खंदारे,महिला राज्य संघटक पंचशीला ताई कुंभारकर,अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रेरणा धेंडे यांनी महाराष्ट्र च्या वतीने प्रतिनिधित्व केले.तसेच महाराष्टातील घडलेल्या दलीत अत्याचाराच्या गंभीर घटनावर देखील चर्चा झाली.कार्यशाळेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.लहान मुलांचे संगोपन कसे करायचे,हीच मुले उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.परंतु सद्यस्थितीत लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी सर्वांनी लहान मुलांवर विशेष लक्ष द्यायला हवे त्यांना गूड टच, बड टच याविषयी चे ज्ञान द्यायला हवे.त्यांच्या मध्ये लीडर शिप क्वालिटी विकसित करायला हवी.याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच दलीत मानवाधिकार कार्यकत्यांनी सोशल मीडिया चा वापर कसा करायला हवा याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले   कार्यक्रमाचे संयोजन डॉ.व्ही.ए.रमेश नाथन, ॲड.राहुल सिंह, जुडिथ ॲने, देबजनी साहू, ॲड नवीन गौतम यांनी केले.

You may have missed