Blog

प्रख्यात समाजसेवक अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस थाटात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज संदेश भालेराव- महाराष्ट्र तील कर्तव्यनिष्ठ व्यक्ती, संकट काळी पीडितांच्या मदतीला धाव घेणारे, गरजूंना मायेचा हाक देणारे, अन्याला वाचा फोडणारे, मरेल पण अन्याय-अत्याचाराच्या घटनेत कधीही तडजोड न करणारे, कुठल्याही अमिषाला कधीही बळी न पडणारे, सर्व धर्म समभाव अशी भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे, महाराष्ट्र तील अभ्यासू व्यक्तिमत्व, सामजिक पत्रकारितेमध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे, स्वबळावर पत्रकारांची टीम निर्माण करणारे, सोशल न्युज नेटवर्क च्या माध्यमाने सरकार ला धारेवर धरणारे कर्तव्य निष्ठ पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनल चे संचालक नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस चे राज्य महासचिव

तसेच आपल्या लेखणी ने भ्रष्ट अधिकारी यांची झोप मोडणारे कार्य सम्राट आंतरजातीय विवाह कायदा मसुदा समिती सदस्य नॅशनल दलित मूव्हमेन्ट फॉर जस्टीज चे राज्य महासचिव आपल्या कार्याने ने ओळखले जाणारे, मानवधर्म पाळून लोक हित जपणारे, शेकडो हृदयाचा पाठीराखा, अन्याय अत्याचार ग्रस्त पत्रकारांच्या व वंचित समाजातील गरजु पिडीतांच्या हाकेला धाव घेणारे कायदेतज्ज्ञ सुधारित ॲक्ट्राॅसिटी ॲक्ट २०१५ चे जनक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व्यापार, कला क्षेत्रात बदल घडवणारे कर्तव्य निष्ठ आमचे आदर्श गरजू वंतांना प्रगतीचे मार्ग धाकवणारे , महाराष्ट्र तील नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे राज्य महासचिव अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचा वाढदिवस समग्र महाराष्ट्रात थाटात संपन्न झाला.

अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेब यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न होवो ! आयुष्याच्या या पायरीवर त्यांच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येवो, त्यांच्या इच्छा, आकांक्षा उंच-उंच भरारी घेऊ दे, यांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय धार्मिक, व्यापार , कला क्षेत्रात प्रगती होवो तसेच तयांच्या कडून शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचे थोर विचार समाजात रुजवावे व आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच तथागता चरणी मंगलमय सदिच्छा व्यक्त करत राज्यच न्हवे तर संपूर्ण देशातुन समाजमाध्यमांवर शुभेच्छाचा वर्षाव होत होता.

कल्याण पश्चिमेतील सावित्रीबाई फुले सभागृहात त्याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम देखिल आयोजित करण्यात आला होता. याला नॅशनल दलित मुव्हमेनट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क वंचित बहुजन आघाडी नॅशनल रेल्वे यूनियन चे कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य एन डी एम जे राज्य समन्वयक रमाताई आहिरे
एन.डी.एम.जे. मुंबई ठाणे प्रदेशचे पदाधिकारी ज्यामध्ये अध्यक्ष बंदिश सोनवणे, सचिव शशिकांत खंडागळे, संघटक शशिकांत वाघ तसेच ठाणे जिल्हा पदाधिकारी अध्यक्ष विजय कांबळे, उपाध्यक्ष प्राध्यापक बनसोडे सर, जिल्हा सचिव विनोद रोकडे, जिल्हा सह सचिव सुनिलजी ठेंगे, जिल्हा संघटक संदेश भालेराव, कल्याण डोंबिवली एन. डी.एम.जे.
अध्यक्ष ॲड.प्रविण बोदडे, सचिव संदीप घुसळे, संघटक कोंगळे, कल्याण पुर्व अध्यक्ष जितेंद्र बुकाने आणि
पत्रकार मंडळी डॉ.आदर्श भालेराव, राहुल सावंत, प्रमोद सावंत, गायक व कवी दिलीपनंद गायकवाड, गौतमराजे कायदेतज्ञ ॲड.अनिल काबंळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्व प्रथम बद्ध वंदना घेउन आणि वाढदिवसाचा केक कापुन शाल व फुलांचा गुछ देऊन वाढदिवस संपन्न झाला. मनोरंजनात्मक कार्यक्रम, काव्य, गायन,चारोळी व प्रबोधानपर भाषने सुद्धा झालीत.

कार्यक्रमाचे औचित्य साधून शहापुर तालुक्यातील कार्यकारिनि तयार करून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटना तयार करून दिलीप थोरात, गुरुनाथ कशिवले,सागर रोकडे अन्य कार्यकर्त्यां ना नियुक्तीपत्र दिले
व सुञसंचालक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी मधुकर घुसळे (गीत सोनिया चि उगवली सकाळ फेम )यांचे चिरंजीव एन डी एम जे कल्याण डोंबिवली सचिव संदीप घुसळे यांनी केले आपल्या काव्य च्यां माध्यमातून ॲड.डॉ.केवल उके साहेबांन चा वाढदिवसा चा कार्यक्रम संपन्न झाला.

पिरळे ग्रामपंचायतीवर महिलाराज सरपंच अलका नरोळे तर उपसरपंच कमल खिलारे

पिरळे ग्रामपंचायतीवर महिलाराज सरपंच अलका नरोळे तर उपसरपंच कमल खिलारे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)पिरळे ग्रामपंचायतीची नुकतेच सरपंचपदाची निवडणूक झाली असून या निवडणुकीत ग्रामपंचायतीवर महिलाराज आले असून सरपंच पदी अलका रामलिंग नरोळे तर उपसरपंच पदी कमल दादा खिलारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या व निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथम निवडणुका झाल्या व नंतर सरपंच आरक्षण जाहीर झाले.यात पिरळे ग्रामपंचायतीवर उद्योजक संदीप संदीप नरोळे यांच्या आई अलका नरोळे या सरपंच पदी तर सामाजिक कार्यकर्ते उमेश खिल्लारे यांच्या आई कमल खिलारे उपसरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. निवडी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी आर.एस रणवरे, ग्राम विकास अधिकारी रमेश जमदाडे,सदस्य अमोल बाळू शिंदे, रेश्मा सुनील दडस, विद्या दशरथ लवटे, वर्षा भिमराव वाघमोडे,सुनिता आबा शिंदे,सुशीला रघुनाथ वाघ, व कर्मचारी उपस्थित होते.सरपंच व उपसरपंच यांची निवड झाल्यानंतर गावात आनंदाचे वातावरण झाले असून सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा ग्रामस्थांच्या वतीने पवार वस्ती,नरोळे वस्ती व अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. तसेच पार्टी प्रमुख संदीप नरोळे,अशोक तोडकर,बाळू शिंदे,गणेश दडस,उमेश खिल्लारे, दत्तात्रेय लवटे व इतर लोकांचा अकलूज येथे जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील,धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील,अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. पार्टी प्रमुख संदिप नरोळे बोलताना म्हणाले की आम्ही सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत कारभार पारदर्शक होण्यासाठी शपथ घेतली आहे नेहमीच गावच्या विकासासाठी काम करत राहू.

सरपंच अलका रामलिंग नरोळे उपसरपंच कमल दादा खिलारे
जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार्टी प्रमुखांचा सत्कार
कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पार्टी प्रमुखांचे सत्कार
धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते
उपसभापती अर्जूनसिंह मोहिते पाटील व पंचायत समिती यांच्या वतीने येथील पार्टी प्रमुखांचे सत्कार करण्यात आले
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने पिरळे गावचे नूतन सरपंच यांचा सत्कारकरण्यात आला
पुरोगामी न्यूज परिवाराच्या वतीने उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला

मालवण येथे दलित मानवाधिकार कार्यकर्ता कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

मालवण येथे दलित मानवाधिकार कार्यकर्ता कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र -प्रमाणे शिंदे-

.नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र यांच्यावतीने मालवण येथील सेफ्राॅन हाॅटेल येथे 20 व 21 दोन दिवसीय राज्य स्तरीय मानवाधिकार कार्यकर्ता दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मानव अधिकार व अत्याचार पीडित या वर होणारे अन्याय अत्याचार तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट  कायद्या संदर्भात दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे राज्य महासचिव तथा आंतरजातीय विवाह मसूदा कायदा समिती सदस्य ॲड डॉ केवल उके, तसेच दिल्ली येथील राष्ट्रीय समन्वयक ॲड नवीन गौतम यांच्या हस्ते व उच्च न्यायालय मुंबई चे ऍड बि जी बनसोड,नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टीज महाराष्ट्र संघटनेचे  कार्यकारणीतसेच राज्य कार्यकारणी यांच्या उपस्थितीत करण्यात आला तसेच दिल्ली येथून एडवोकेट राहुल सिंग, ॲड देब जाणी मुंबई एडवोकेट तनय गांधी यांनी ऑनलाइन गूगल मीट च्या माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या शाळेसाठी सोलापूर,लातूर, पुणे, रायगड, मुंबई ,हिंगोली, वाशिम ,रायगड सिंधुदुर्ग व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग येथील रिपाईचे नेते तानाजी कांबळे, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज महाराष्ट्र चे राज्य सचिव वैभवजी गिते,प्रा.रमाताई अहिरे, राज्य सहसचिव पि एस खंदारे,बि पी लांडगे, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे, आदींची उपस्थित होती.
पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्याचे मनोबल वाढवावे व कार्यकर्त्यां कशा तणाव पूर्ण कशा कार्य करेल.तसेच कार्यकर्त्यांवर येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी दिल्लीवरून आलेले श्री नवीन गौतम, अॅड डॉ केवलजी उके, वैभव गिते,प्रा.रमाताई अहिरे,पि एस खंदारे, प्रमोद शिंदे आदींनी पहिल्या दिवशी प्रशिक्षणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले

नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील फोंडशिरस येथील आरोपीस एक वर्ष श्रम कारावासाची शिक्षा

नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील फोंडशिरस येथील आरोपीस एक वर्ष श्रम कारावासाची शिक्षा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते -प्रमोद शिंदे- नातेपुते तालुका माळशिरस पोलिस ठाणे हद्दीत फोंडशिरस येथील दोघांना मारहाण केल्या प्रकरणी आरोपीना एक वर्षाचा श्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा माळशिरस कोर्टाने सुनावले आहे.यासंदर्भात हकीकत अशी की फोंडशिरस येथील  फिर्यादी वसंत वाघमोडे व त्याच्या आई विमल वाघमोडे दोघेही राहणार फोंडशिरस तालुका माळशिरस शेतामध्ये पिकात पाणी धरत असताना दिनांक 24/1/2013 रोजी सकाळी 11 वा. सुमारास शेतीच्या वादातून आरोपी बालचंद्र कोडलकर,वसंत कोडलकर या दोघांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन शिव्यागाळी केली. त्यामुळे आरोपींविरुद्ध नातेपुते पोलीस ठाणे येथे भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 14 /2013 भादवि कलम  325,323, 504,34 अन्वये फिर्याद दाखल करण्यात आला आली होती.सदर गुन्ह्यातील साक्षीदार फिर्यादी पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांचा साक्ष पुराव याकामी महत्त्वाच्या ठरल्या. दिनांक 3/2 /2021 रोजी मे.जी.एम.नदाफ सो प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माळशिरस यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपींना भादवि कलम 325 कलमान्वये दोषी ठरवून आरोपींना एक वर्ष सश्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये द्रव्य दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.सदर गुन्ह्याचे कामकाज सरकारी वकील श्री एस.एन.तरळगट्टी व नातेपुते पोलीस ठाण्याचे कोर्ट ऑडली पोलीस हेड कॉन्स्टेबल 394 शिवाजी घाडगे व तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार कंते यांनी कामकाज पाहिले.

नातेपुते येथे विविध मागण्यांसाठी एक दिवशीय आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी )नातेपुते ता.माळशिरस येथे एन.डी.एम.जे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागास वर्गीय.बहु संस्था, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने नातेपुते येथे धरणे आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन विविध मागण्यांसाठी करण्यात आले होते या आंदोलनात1)सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील सन 2011पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकुल करण्यात यावीत 2)गायरान, गावठाण, शेती महामंडळ ई जागेवरील अतिक्रमणे कायम करावीत 3)ज्या ग्रामसेवकांनी अतिक्रमण सर्वे व्यवस्थित केला नाही त्या ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी 4)गायरान, गावठाण, शेती महामंडळ येथील फेरसर्वे करण्यात यावा 5)पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी या या मागण्या साठी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी  एन.के साळवे, विकास(दादा) धाईजें,समीर सोरटे, उमाजी बोडरे,प्रमोद शिंदे,अजित शिरतोडे, प्रशांत खरात,सोमा भोसले, गुरू करचे,बाबा ननवरे,संतोष देवकाते,अनिल काळे,प्रेम देवकाते,अजित पांढरे,दत्ता कांबळे,सचिन झेंडे, विशाल झेंडे, रवी झेंडे,अप्पा गाडे, नितीन मोरे, प्रशांत साळवे,विशाल गायकवाड, नाना गायकवाड,धर्मअशोक सावंत,ठोंबरे रियाज भाई, बाळासो चव्हाण ई सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. हे निवेदन मंडल अधिकारी चव्हाण साहेब,तलाठी उन्हाळे भाऊसाहेब यांनी स्वीकारले. आंदोलनाचे आयोजन  समाजीक कार्यकर्ते विशाल साळवे,सागर बिचुकले, सुनील ढोबळे, रणजित कसबे, अनिल लांडगे व कार्यकर्त्यानी केले होते.

दहिगाव नजिक वालचंद नगर रोडवर मोटरसायकल भीषण अपघातात तीन युवक जागीच ठार

नातेपुते पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे) : इसार दहिगाव पेट्रोल पंप येथून पिरळे कडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने या भीषण अपघातात पिरळे ता. माळशिरस येथील दोन युवक व इंदापूर तालुक्यातील हघारेवाडी येथील एक युवक असा तीन जणांचा जागीच मृत्यू झाला सविस्तर हकीकत अशी की हघारेवाडी तालुका इंदापूर येथील संग्राम राजाराम जाधव हा आपल्या सासुरवाडीला म्हणजे मोरोची येथे जात असताना ईसार पेट्रोल पंप दहिगाव येथून पिरळे येथे राहणारे सोन्या उर्फ विशाल शशिकांत बुधावले वय 23 राहणार पिरळे व दीपक विठ्ठल बुधावले वय 25 राहणार पिरळे दहिगाव येथीलआयटीआय कॉलेज समोर रात्री साडेनऊच्या सुमारास जात असताना संग्राम राम जाधव हा रॉंग साईड ने भरधाव वेगाने येऊन बुधावले यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली व दोन्ही मोटरसायकलचे धडक बसल्याने जोराचा अपघात झाला दीपक व विशाल मोटर सायकल वरती शेतासाठी प्लास्टिक कॅनमध्ये डिझेल घेऊन जात होते जोराचा अपघातामुळे डिझेल गाडीवरती पडून आग लागली  व आगीचा भडका उडाला त्या आगीत तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे.रात्री साडेदहा वाजता तिघांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे आणण्यात आले तेथील डॉक्टर  नम्रता व्होरा यांनी त्यांना मृत घोषित केले पुढील तपास एपीआय मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश इंगळे हे करीत आहेत. सदर घटना ही रस्त्याच्या चाललेल्या संत गती कामामुळे झाले असल्याची चर्चा रंगली आहे सदर नातेपुते ते वालचंद नगर रोड च्या कामाची मुदत संपली असून हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे यामुळे रस्त्यात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत रस्त्यातून प्रवास करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो व अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या झालेल्या अपघाताला ठेकेदार जबाबदार आहेत असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. संबंधित ठेकेदारावर ती गुन्हा दाखल करण्याची मागणी ही सामाजिक संघटनेकडून होत आहे.  सदर अपघातास नातेपुते वालचंद नगर रोड संत  गतिने करणारे डी पी जे कंपनीचे ठेकेदाराच आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हनुमंत बुधावले माजी तंटामुक्ती अध्यक्ष पिरळे.यांनी माध्यमांसमोर केली आहे या घटनेमुळे पिरळे आणि परिसरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.

मयत दिपक बुधावले
मयत सोन्या उर्फ विशाल बुधावले
सदर अपघातास नातेपुते वालचंद नगर रोड संत गतिने काम करणारे डी पी जे कंपनीचे ठेकेदाराच आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हनुमंत बुधावले माजी तंटामुक्ती अध्यक्ष पिरळे.यांनी माध्यमां समोर केली आहेत
अपघातात जागीच मृत पावलेले युवक

चोरीस गेलेले २१ मोबाईल कर्नाटकातून हस्तगत.पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी .

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर/ प्रतिनिधी

पंढरपूर येथे मध्यवर्ती ठिकाणाहून दसऱ्याच्या सणासाठी फुल खरेदी करताना गर्दीचा फायदा घेऊन चोरीस गेलेला मोबाईल पंढरपूर पोलिसांना तपासादरम्यान सापडला कर्नाटक राज्यातील एका जिल्ह्यात आणि चौकशीदरम्यान मिळाले २ लाख १७ हजार किमतीचे एकूण २१ मोबाईल. पंढरपूर पोलिसांची कामगिरी.

पंढरपूर येथे दसऱ्याच्या सणासाठी १० ऑक्टोबर २०१९ रोजी फुल खरेदीसाठी गेले आसता गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी झाल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलीसात येथील  ओंकार सतीश कळसकर यांनी दिली होती. याबाबत पंढरपूर पोलिसांकडून तपास सुरू होता. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल हा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात नेटवर्क दाखवत असल्याचे सायबर पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व टिमकडून  कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात जाऊन तपास केला असता. फिर्यादीचा मोबाईल विधी संघर्षग्रस्त बालकाकडे मिळून आला. सदर मोबाईल जप्त करून विधिसंघर्षग्रस्त बालकाकडे अधिक चौकशी केली असता. कर्नाटक राज्यातील शिमोगा व हवेली जिल्ह्यातून २ लाख १७ हजार किमतीचे एकूण २१ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

हि कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण पवार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक आर.जे गाडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल-शरद कदम, बिपिन ढेरे, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोलिस नाईक-गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण,पोलिस कॉन्स्टेबल-सिध्दनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनील बनसोडे, अन्वर आतार तसेच सायबर पोलिसांच्या साह्याने सदरची कामगिरी केली आहे.

पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी .

कै.अन्सार शौकत सय्यद यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख (5000000) रुपये सानुग्रह सहाय्य मंजूर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –विकास धाइंजे व वैभव गिते ही जोडी जनतेच्या हाकेला धावून आली केली जबरदस्त कामगिरी
मा
.जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय करमाळा यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले कर्मचारी कै.अन्सार शौकत सय्यद यांचा covid-19 संबंधित कर्तव्य पार पाडताना कोरोना विषाणू संसर्गाने दिनांक 18/7/2020 रोजी मृत्यू झाला होता. विभागीय आयुक्त पुणे यांनी कै.अन्सार शौकत सय्यद मंडळ अधिकारी यांच्या कुटुंबीयांना वित्त विभागाच्या शासन निर्णय 29/5 2020 नुसार 50 लाख इतके सानुग्रह सहाय्य मंजुरीचा प्रस्ताव शासनास पाठवला होता. कै.अन्सार शौकत सय्यद हे covid-19 च्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने “प्रतिबंध” सध्याचे कर्तव्य बजावत होते. आणि ते रूग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या तारखेपूर्वी 14 दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर होते असे जिल्हाधिकारी,सोलापूर यांनी प्रमाणित केले आहे. तसेच मंडळ अधिकारी कर्मचार्‍याचा मृत्यू हा covid-19 या रोगाची संबंधित आहे असे संबंधित सरकारी महानगरपालिका,प्राधिकृत खाजगी रुग्णालय,प्रयोगशाळा यांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अधिपत्याखालील तहसील कार्यालय करमाळा यांच्या आस्थापनेवर कार्यरत कर्मचारी कै.अन्सार शौकत सय्यद यांच्या कुटुंबियांना 50 लाख इतकी रक्कम सानुग्रह सहाय्यक म्हणून प्रदान करण्यास महसूल व वनविभागाच्या दिनांक 29 जानेवारी 2021 याद्वारे मंजुरी आहे. नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेचे राज्य सचिव मॅन्युअल स्कॅवेंजिंग ऍक्ट कमिटी सोलापूर सदस्य वैभव तानाजी गिते व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे व इतर संबंधित विभागांकडे covid-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना covid-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यास 50 लाख रुपयांचा विमा संरक्षण देऊन कुटुंबीयांना सानूग्रह सहाय्य म्हणून 50 लाख रुपये देण्याची निवेदनाद्वारे मागणी करून मंत्रालयीन पाठपुरावा केला होता.अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे राज्यात कोरोना covid-19 या विषाणूच्या संसर्गामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आंबेडकरी चळवळीचे शिलेदार अभ्यासू मा. विकासदादा धाईंजे व वैभव गिते
या जोडीने प्रामाणिक कर्तव्य बजावून हा निधी मंजूर करून आणला असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात चालू आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 29 जानेवारी 2021 रोजीच्या शासननिर्णयानुसार कै.अन्सार शौकत सय्यद यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये मंजूर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्राप्त झाले आहेत.

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

रत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्करत्नत्रय शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मयुरजी गांधी (माजी अध्यक्ष सन्मती सेवादल) तर प्रमुख पाहुणे म्हणून सन्मती सेवादलाचे संस्थापक श्री मिहीरजी गांधी उपस्थित होते. मिहिर गांधी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना मिहीर गांधी म्हणाले ” लॉकडाऊन काळात आरोग्य, पोलिस , सफाई कर्मचारी, भाजीपाला विक्रेते व किराणामालाचे दुकानदार यांनी दिलेल्या सेवा बद्दल त्यांचे आभार मानले. तसेच रत्नत्रय शिक्षण संस्थेची होणारी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी या शैक्षणिक संकुलसाठी भरीव निधी मिळवून देण्याच आश्वासन दिले.”
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंतलाल (दादा) दोशी म्हणाले ” आपला देश राज्यघटना व लोकशाही मुळे सुरक्षित आहे. त्यासाठी राज्यघटना व लोकशाही टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
चेअरमन मा. श्री. प्रमोदभैय्या दोशी म्हणाले ” लॉकडाऊन काळात सर्व शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.
तसेच संस्थेच्या पुढील शैक्षणिक धोरण व योजना स्पष्ट केल्या.”
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंतलाल दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन श्री विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय चेअरमन प्रमोद दोशी, उपाध्यक्ष तुषार गांधी, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदस्य श्री रामदास कर्णे, प्रशाला कमिटी सदस्य सतीश बनकर, दत्ता भोसले, अक्षय गांधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक दैवत वाघमोडे सर सूत्रसंचालन माधुरी रणदिवे मॅडम व श्री सतिश हांगे सर,तर आभार प्रदर्शन श्री.अमित पाटील सर यांनी केले.

कल्याण येथील पत्री पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

         

पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क संदेश भालेराव-

कल्याणरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री_पुलाचे लोकार्पण
आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे मा. पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब तसेच मा. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या लोकार्पण सोहळ्यासमयी मा. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेत्तृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेण्याकरिता अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत अहोरात्र मेहनत करणारे एमएसआरडीसी विभाग तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, कंत्राटदार आणि कामगार यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.
कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
याप्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रमोद पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते…..

पुुुु

You may have missed