माळशिरस तालुका

अनंतनागमध्ये सुरक्षा दलांची चकमक; २ दहशतवादी ठार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागम ध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली होती. या दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. श्रीनगरच्या खानयार भागातही अशाच प्रकारची चकमक सुरु आहे. या घटनेच्या काही तासांनंतर अनंतनागमध्ये चकमक सुरु झाली.दहशतवादाशी संबंधित शुक्रवारपासूनची चौथी घटना या भागात काही दहशतवादीलपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या दरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाशी संबंधित शुक्रवारपासूनची ही चौथी घटना आहे.

दसरा-दिवाळीनं सरकारची तिजोरी भरली, १.८७ लाख कोटींची वसुली, महाराष्ट्र टॉपवर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


ऑक्टोबर महिन्यात नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणांच्या निमित्तानं बाजारापेठेत मोठी उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खरेदी केल्यानं वस्तू आणि सेवा कराच्या वसुलीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात यावर्षी जीएसटी कलेक्शनमध्ये साधारणपणे ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये जीएसटीकलेक्शन १,८७,३४६ कोटींवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच ऑक्टोबर २०२३ मध्ये हे कलेक्शन १.७३ लाख कोटी रुपये होते. जीएसटी रिफंड केल्यानंतर एकूण कलेक्शनमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली असून ते १६८०४१ कोटी रुपये झालं आहे.वस्तू आणि सेवा कराचे ऑक्टोबर महिन्याची आकडेवारीजाहीर करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्याचं एकूण जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटी रुपये होतं. त्यामध्ये सीजीएसटी ३३८२१ तर एसजीएसटी ४१८६४ कोटी रुपये कोटी होतं.आयजीएसटी ५४८७८ कोटी आणि सेसे ११६८८ कोटी रुपये इतका होता. ग्रॉस डोमेस्टिक रेवेन्यूमध्ये १०.६ टक्के वाढपाहायला मिळाली. तर, इम्पोर्टसच्या बाबतीत आयजीसटी ४४२३३ कोटी रुपये आणि सेस ८६२ कोटी इतका झाला आहे. एकूण जीएसटी कलेक्शन १,८७,३४६ कोटी असूनत्यापैकी १९,३०६ कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रुपयांचा रिफंड करण्यात आला होता.१६,३३५ कोटी म्हणजे यावेळी १८.२ टक्के वाढ पाहायला मिळाली. यंदाच्या आर्थिक वर्षात १२,७४,४४२ कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जीएसटी कलेक्शन ११,६४,५११ कोटी रुपये झालं होतं म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्यांचा विचार केला असता सर्वाधिक जीएसटी कलेक्शन महाराष्ट्रात पाहायला मिळालं आहे. राज्यातील जीएसटी कलेक्शनमध्ये १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात ३१०३० कोटी रुपयांचं कलेक्शन झालं आहे. तर, गेल्या वर्षी २७३०९ कोटी रुपये झालं होतं. उत्तर प्रदेशमध्ये ९६०२ कोटी, कर्नाटकमध्ये १३,०८१ कोटी, गुजरातम ध्ये ११,४०७ कोटी, हरियाणात १००४५ कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालं आहे. या सर्व राज्यांमध्ये जीएसटी कलेक्शन वाढलं आहे. तर, हिमाचल प्रदेशमध्ये २ टक्के, मणिपूरमध्ये ५ टक्के आणि छत्तीसगडमध्ये १ टक्के कलेक्शन घटलं आहे.

डिपॉझिट वाचवायला एक षष्ठांश मते आवश्यकच

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


 विधानसभा निवडणुकीच्या सोलापूर जिल्ह्यातील
११ मतदारसंघाच्या मैदानात सद्यःस्थितीत तब्बल ३३३ उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सोमवारचाच दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी यातील कितीजण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण, प्रत्येक उमेदवाराला त्या मतदारसंघातील एकूण वैध म तांच्या एक षष्ठांश (उदा. एकूण मतदानातील एक लाख ८० हजार मते वैध असल्यास त्यापैकी ३० हजार मते पडायलाच हवीत) मते घ्यावीच लागतील, अन्यथा त्यांना डिपॉझिट परत मिळणार नाही.
जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीमध्ये तृतीयपंथी मतदार ३१० आहेत. त्यात माढा मतदारसंघात अवघे तीन तर सांगोल्यात पाच तृतीयपंधी
आहेत. २०१९च्या निवडणुकीत ६५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते, यंदा त्यात वाढ होईल, असा विश्वास विल्हा प्रशासनाला आहे. या निवडणुकीत अपक्षांची
कितीजण उमेदवारी मागे घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष, तृतीयपंथी ३१० मतदार मतदानाचा हक बजावता आला
संख्या जास्त राहिल्यास ज्या उमेदवाराला ७० हजारांपर्यंत मते मिळतील तो विजयी होऊ शकतो.
पण मतदान किती केलेले वाचन आणि निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार असणार, यावर ते समीकरण अवलंबून असणार आहे. २०१९च्या निवडणुकीसाठी एकूण ३३ लाख ९१ लाख ८१४ इतके मतदार होते. २०२४ च्या निवडणुकीत ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत
चार लाख ५७ हजार ५५ मतदार वाढले आहेत. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सवांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांकडे मतदान कार्ड असताना देखील मतदार यादीत नावे नसल्याने त्यांना
नव्हता. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक उमेदवारांनी स्वतःहून विभागनिहाय मतदार यादी तयार करून आपल्या विश्वासातील कार्यकत्यांकडे दिली आहे. आपल्याला खात्रीने पडणाऱ्यांची नावे त्यात आहेत की नाही, याची शहानिशा केली जात आहे. याशिवाय आपल्याला मागच्या निवडणुकीत कोणत्या ठिकाणी कमी मतदान झाले होते असे भाग काढून त्याठिकाणी पोचण्याचे नियोजनही उमेदवारांनी केले आहे.
जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदार मतदारसंघ पुरुष महिला एकूण
करमाळा १,७१,५१५१,५७,४६८ ३,२८,९९४ माडा १,८३,९४८ १,६८,७४० ३,५२,६९१ बार्शी १,७३,४५३ १,६४,००२ ३,३७,४९९ मोहोळ १,७३,१२१ १९,५८,३२९ ३,३१,४५८ शहर उत्तर १,६२,४६७१,६६,०५९३,२८,५७२ शहर मध्य १,७०,५०९१,७६,११५ ३,४६,६७७ अक्कलकोट १,९६,५७७ १,८६,९६४३,८३,४७९ दक्षिण सोलापूर १,९५,७५१ १,८६,९६४ ३,८२,७५४ पंढरपूर-मंगळवेढा १,९१,४६४ १,८२,१९४ ३,७३,६८४ सांगोला १,७२,७०४ १,६०,७८४ ३,३३,४९३ माळशिरस १,८०,३२२ १,६९,२१४ ३,४९,५६८ एकूण १९,७१,८३१ १८,७६,७२८ ३८,४८,८६९

लाडक्या बहिणींना चक्क देवेंद्र फडणवीस यांचा फोन

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नावानिशी लाडक्या बहिणीला फोन केला जात आहे.सदर फोन हा रेकॉर्ड फोन असून लाडक्या बहिणीला स्वतः देवेंद्र फडणवीस महिलेचं नाव घेऊन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच भाजपलाच मतदान करा असं फोनवर बोलत असल्याने या फोनबाबत सर्व महिलांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रत्येक महिला एकमेकींना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता. आणि भाजपलाच मतदान करा असं त्या फोन मधून सांगण्यात येत आहे. अशा प्रकारचा प्रचार भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.  

रश्मी शुक्ला यांची महासंचालक पदावरून बदली, रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या-नाना पटोले

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता.

निवडणूक आयोगाकडून बदली करण्याचा आदेश नाना पटोले, काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. एकीकडे या निवडणुकीची धूम चालू असताना दुसरीकडे निवडणूक आोयगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश दिला आहे. तसेच नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या असेही आरोप केले आहेत.

राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.राज्यातील एकूण मतदारांमध्ये ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला तर ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असे एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. यामध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ मतदारांमध्ये पुरुष। मतदार १२ लाख ९१ हजार ८४७, ९ लाख ३० हजार ७०४ महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १५३ इतकी आहे. २० ते २९ या वयोगटातील एकूण १ कोटी ८८ लाख ४५ हजार ००५ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी १ लाख ६२ हजार ४१२, महिला मतदार ८६ लाख ८० हजार १९९ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २३९४ इतकी आहे. ३० ते ३९ या वयोगटातील एकूण २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ११ लाख २१ हजार ५७७, महिला मतदार १ कोटी ६ लाख ९१ हजार ५८२ तरतृतीयपंथी मतदारांची संख्या २ हजार ११९ इतकी आहे. ४० ते ४९ या वयोगटातील एकूण २ कोटी ७ लाख ३० हजार ५९८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ कोटी ७ लाख ४९ हजार ९३२, महिला मतदार ९९ लाख ७९ हजार ७७६ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ८९० इतकी आहे. ५० ते ५९ या वयोगटातील एकूण १ कोटी ५६ लाख १० हजार ७९४ मतदारांमध्ये पुरुष मतदार ७८ लाख ५४ हजार ०५२, महिला मतदार ७७ लाख ५६ हजार ४०८ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३३४ इतकी आहे. ६० ते ६९ या वयोगटातील एकूण ९९ लाख १८ हजार ५२० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५० लाख ७२ हजार ३६२, महिला मतदार ४८ लाख ४६ हजार २५ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३३ इतकी आहे.वर्ष ७० ते ७९ या वयोगटातील एकूण ५३ लाख ५२ हजार ८३२मतदारांमध्ये पुरुष मतदार २६ लाख ३६ हजार ३४५, महिला मतदार २७ लाख १६ हजार ४२४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६३ इतकी आहे. ८० ते ८९ या वयोगटातील एकूण २० लाख ३३ हजार ९५८ मतदारांमध्ये पुरुष मतदार ९ लाख १५ हजार ७९८, महिला मतदार ११ लाख १८ हजार १४७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या १३ इतकी आहे. ९० ते ९९ या वयोगटातील एकूण ४ लाख ४८ हजार ३८ मतदारांमध्ये पुरुष मतदार १ लाख ९७ हजार ३२३ तर महिला मतदारांची संख्या २ लाख ५० हजार ७१५ इतकी आहे.वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या १०० ते १०९ या वयोगटातील एकूण ४७ हजार १६९ मतदारांमध्ये पुरुष मतदार २० हजार ९८३, महिला मतदार २६ हजार १८४ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या २ आहे. ११० ते ११९ या वयोगटातील एकूण ११३ मतदारांमध्ये पुरुष मतदार ५२ तर महिला मतदारांची संख्या ६१ आहे. तर १२० हून अधिक वयोगटातील ११० मतदारांमध्ये पुरुष मतदार ५६ तर महिला मतदारांची संख्या ५४ आहे. ODविशेष वयोगटामध्ये ८५ ते १५० वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदारांमध्ये ५ लाख ४२ हजार ८९१ पुरुष, ६ लाख ९८ हजार ०२२ महिला आणि ६ तृतीयपंथी मतदार आहेत. तर १०० ते १५० वयोगटामधील एकूण ४७ हजार ३९२ मतदारांमध्ये २१ हजार ९१ पुरुष, २६ हजार २९९ महिला आणि २ तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण ६ लाख ४१ हजार ४२५ दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार ३ लाख ८४ हजार ६९, महिला मतदार २ लाख ५७ हजार ३१७ तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ३९ इतकी आहे. सेवा दलातील (सर्विहस व्होटर्स) एकूण १ लाख १६ हजार १७० मतदारांमध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरुष तर ३ हजार ८५२ महिला मतदार आहेत.राज्यात मतदानासाठी एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर ! जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल

तसेच या कारवाईत प्रामुख्याने राज्य पोलीस विभागाने सुमारे ७५ कोटी रूपये, इन्कम टॅक्स विभागाने सुमारे ६० कोटी रूपये, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे ११ कोटी रूपये यांचा प्रामुख्याने सम वेिश आहे. मतदारांना आचारसंहिता भंगाचा प्रकार आढळल्यास आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ पवर तक्रार येते. या तक्रारींची माहिती सर्व अंमलबजावणी यंत्रणांना दिली जात असल्याने आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात आहे असं निवडणूक , खेड शिवापूरमध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम मुंबई अहमदाबाद मार्गावरील उधवा येथील चेक पोस्टवर कोटी २५ लाख रुपयांची रोकड: राज्यात सगळीकडे निवडणुकीचंवारं वाहत आहे. यातच राज्यात निवडणुकीसाठी पैशांचा महापूर आल्याचं चित्र प्रशासकीय कारवाईतून दिसून येते. राज्यात १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचं बिगुल वाजताच आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर प्रशासनाने कठोरपणे नाकाबंदी, तपासणी करून बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करणे सुरू केले.निवडणुकीची आचारसंहिता लागताच राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या राज्यातील विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ही कामगिरी केली आहे. विविध ठिकाणी पोलीस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं.करता आयोगाने सांगितले. पालघर ४ पोलिसांनी केली जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ही रोकड नेण्यात येत होती असं सांगण्यात आले. बँकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं पोलिसांनी ऐकले परंतु ही रोकड म हाराष्ट्र राज्याच्या बॉर्डरवर आली कशी? असा प्रश्न पालघर पोलिसांनी उपस्थित केला आहे. सध्या या रोख रकमेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध ठिकाणी रोकड, दारू जप्त करण्यात येत आहे. याआधी पुणे बंगळुरू हायवेवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ खासगी कार पोलिसांनी अडवली.

सौंदणेच्या तरूणाचा माढ्यात मर्डर

माढ्यात सशयावरून झालेल्या मारहाणीत मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील संतोष दगडू भानवसे या तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पाच जणांवर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी बापूराव दगडू भानवसे रा.सौंदणे ता मोहोळ यांनी माढा पोलिसात फिर्याद दाखल केली असून संतोष दगडू भानवसे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माढ्यातील एका महिलेच्या घरीभेटण्यासाठी गेला होता. त्याठिकाणी सोमनाथ उत्तम इतापे, सागर उत्तम इतापे, अतूल बाबुराव घाडगे, रत्नदिप महादेव शेळके, अक्षय शंकर वाळूजकर यांचे सोबत वाद झाल्याने मयत संतोष यास सोमनाथ इतापे, सागर इतापे, अतूल घाडगे, रत्नदिप शेळके, व अक्षय वाळूजकरयांनी प्लास्टिक पाइप, कमरेचा बेल्ट, व गॅसचा नळीने मारहाण केल्याने व डोक्यास मार लागल्याने उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला म्हटले आहे. याम धील संशयित आरोपींना माढा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज बुधवारी माढा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.मयत संतोष दगडू भानवसे असल्याचे फिर्यादीतया घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नेताजी बंडगर करत आहेत.

९,७०,२५,११९ महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या; निवडणूक आयोगाची माहिती

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज

नेटवर्कविधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने अद्ययावत मतदार यादी जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात ९ कोटी ७० लाखांपेक्षाही जास्त नोंदणीकृत मतदार आहेत.निवडणक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. याशिवाय ६ हजार १०१ तृतीयपंथी म तदार आहेत. महाराष्ट्रात १८ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण२२ लाख २२ हजार ४०७ मतदार आहेत. याचा अर्थ जवळपास २२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आ- हेत. आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मतदार ३०ते ३९ वर्ष वयोगटातील आ हेत. त्यांची संख्या २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ इतकी आहे. याशिवाय ८५ ते १५० वर्ष वयोगटातील १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. यापैकी १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११० मतदार आहेत. ज्यात ५६ पुरुष, तर ५४ महिला आहेत.निवडणूक आयोगाकडून विशेष उपक्रमप्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोग विशेष उपक्रम राबवले जात आहेत. तसेच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध उपक्रम घेतले जात आहे. दिव्यांग म तदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर वयोवृद्ध नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान केलं जाणार आहे.

मनोज जरांगें पाटील यांची प्रकृती बिघडली

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृतीबिघडली आहे. त्यांच्यावर अंतरवाली सराटीमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे राहत्या घरीच जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले. जरांगे पाटील यांना घरीच सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करणा- या डॉक्टरांनी सांगितले की, जरांगे पाटील यांना रात्रीपासून ताप येत होता. त्यांना तापासोबत अंगदुखी, अशक्तपणा, घशाचे इन्फेक्शन आणि कफ झाला आहे. ही सर्व व्हायरलची लक्षणे आहेत. त्यामुळे आज सकाळी त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. त्यांचे रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

You may have missed