प्रमोद शिंदे

जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या 8 तासात मुसक्या आवळल्या वालचंद नगर पोलिसांची कामगिरी

जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या 8 तासात मुसक्या आवळल्या वालचंद नगर पोलिसांची कामगिरी सोबत पोलिस अधिकारी दिलीप पवार व कर्मचारी
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे)-जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या वालचंद नगर पोलिसांनी आठ तासात मुसक्या आवळून जेरबंद केले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 23/12/ 2020 रोजी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांच्या दरम्यान मौजे आनंदनगर, इंदापूर.जि.पुणे येथील जनाबाई मंगल कार्यालयाबाहेर फिर्यादी उदय गणपत देशमुख यांच्या पत्नी उज्वला देशमुख रा.आनंदनगर ता. इंदापूर या जनाबाई मंगल कार्यालयाच्या बाहेर थांबलेल्या असताना अचानकपणे एक मोटर सायकल वरून आलेले दोन अनोळखी इसम सौ.मंगल देशमुख यांचे गळ्यातील सोन्याचा गळ्यातील गंठण 80 ग्रॅम वजनाचा तीन लाख वीस हजार रुपये किमतीचा तो सोन्याचा गंठण दोन अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसका मारून तोडून चोरून नेला होता. सदर बाबत वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.527/2020 भा.द.वि.कलम 392/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.   सदर गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अभिमान देशमुख यांनी गुन्हा तात्काळ उघड करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी चक्र फिरवत इसम नामे शुभम आनंद किर्ते वय 24 वर्ष रा.आनंद इंदापूर ,जित बापू भोसले वय 24 रा. आनंदनगर, इंदापूर, या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरी झालेले फिर्यादीचे सोन्याचे 80 ग्रॅम वजनाचे तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे गंठण गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,70000 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पुणे अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती, उपविभागीय अधिकारी नारायण शीरगावकर बारामती, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार मोहन ठोंबरे,पोलीस नाईक,लक्ष्मण साळवे, पोलीस शिपाई जगन्नाथ कळसाईत,यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. आठ तासात चोरट्यांना बेड्या ठोकल्यामुळे परिसरात वालचंदनग पोलिसांचे व अधिकारी यांचे कौतुक होत आहे.

भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने साहेब यांनी घेतली धाव कंपने मालकाच्या मुजोरपणामुळे उपोषण कर्त्यांची तब्येत खालावली , उपचारास कामगारांचा नकार.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव_ ठाणेमुरबाड, धानिवली येथील मे. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लि._ कंपनीने पॉवर प्लँट अचानक बंद केल्याने ६० ते ७० स्थानिक कामगारांवर बेकारीची कुह्राड कोसळली आहे. हा पाॅवर प्लँट सुरू करतांना कंपनी व्यवस्थापनाने धानिवली गाव बचाव संघर्ष सिमित सोबत अटी शर्तींच्या अधिन करार केला होता . मात्र या कराराला बारा वर्षांनी फाट्यावर मारुन, कोरोना कालावधीतल्या लॉकडाऊनची वेळ साधून अचानक हे पाऊल उच्चल्याने या कामगारांना कामावर घेण्याच्या मागणी साठि गेट समोर या कामगारांनी आमरण उपोषण सुर केले असुन सहा दिवसानंतरही कंपनी मालकाने कोणतीही सहानूभूती दाखवली नसुन आज मात्र कामगारांची परिस्थिती हथाबहेर गेली असतानही कामगारांनी कोणते हि उपचार घेण्यास नकार दिला असुन न्याय मिळाला नही तर आम्ही मरन पत्करु पण उपोषण मागे घेणार नहीत असा कामगारांनी पवित्रा घेतला आहे.

मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील टेक्नोक्राफ्ट ही नावाजलेली कंपनी असून, कंपनी साठी लागणारी वीज कंपनीने स्वमलकीचा पावरप्लँट उभा करुन निर्माण केली होती. गेली बारा वर्षे हा प्लँट व्यवस्थीत सुरु होता. या प्लँट मुले धानिवली ग्रामंस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल म्हणूण गाव बचाव समिती स्थापून ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला होता. परंतू कंपनीने समितिशी योग्या त्या वाटाघाटी करुन उत्पादन सुर केले. या वाटाघाटीत स्थनिक तरुणांना रोजगर देण्याचा वादा केला होता. परंतू बारा वर्षांनी कंपनी व्यवस्थापनाने अचानक पॉवर प्लँट बंद करुन या स्थनिक कामगारांवर उपसमारीची वेळ आणली आहे. यासाठी कंपनीने केन्द्रचा कामगार कायदा व कोरोनचा लॉकडाउनची वेळ साधली आहे. यामुळे कामगार वर्गात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. या कामगारांनी उपोषण करु नये म्हणूण कंपनीचे मेनेजर आमोल म्हात्रे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. परंतू या कामगारांशी चर्चा करण्याचा अधिकार मला नही असे त्यांच्याकडून सांगितले जाते.

*टेक्नॉक्रॉफ लि. मुरबाड जिल्हा ठाणे येथील स्थानिक कामगाराना कामावरून तडकाफडकी कमी केल्यामुळे त्यांतील चार कर्मचाऱ्याने “आमरण उपोषण” सुरू केले आहे. आज सहावा दिवस असून काल एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली होती. उपोषणास पाठिंबा व भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने साहेब यांनी घेतली ठोस भुमिका. ठोस भूमिका घेऊन प्रशासनाला जागे केले. सोमवारी दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी कामगार उपयुक्त भोसले यांच्या कडे बैठकींचे आयोजन केले आहे. उपोषण सुरूच आहे.

*पिरळे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या पुरोगामी महाराष्ट्र न्यूज यांच्याकडून एक लाख रुपयांचे बक्षीस*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कग्रामपंचायत निवडणूक 2021 ही निवडणूक ग्रामपंचायत पिरळे येथे बिनविरोध झाल्यास पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल संपादक प्रमोद शिंदे यांच्याकडून एक लाख रुपयाचे बक्षीस ग्रामपंचायतस जाहीर करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवार आणि प्रशासन यांचा पैसा आणि वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो याचा परिणाम प्रशासनाच्या तिजोरीवर होत असतो हाच वेळ आणि पैसा जर ग्रामपंचायतीला मिळाला तर ती ग्रामपंचायत लोकांसाठी अनेक योजना राबवून सक्षम व आदर्श ठरू शकते याउलट पिरळे येथील गेली पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर पाच वर्षात जवळपास पाच ते सहा सरपंच बदलले गेले आहेत. नाही म्हटलं तरी याचा परिणाम गावच्या विकास कामावर होतो त्यामुळे गावची प्रगती थांबल्याचे दिसून येते.उमेदवार हा महिन्यासाठी सरपंच झाल्यास त्या उमेदवाराला ग्रामपंचायत समजून घेण्यासाठी तीन ते चार महिने जातात राहिला दोन महिन्याचा कार्यकाल या दोन महिन्याच्या कार्यकाळात विकास कामे होऊ शकत नाही म्हणून येणाऱ्या निवडणुकीत पाच वर्षासाठी एकच सरपंचपद असावे असे पिरळे ग्रामस्थांच्यावतीने बोलले जात आहे. आदर्श ग्रामपंचायत व्हायचे असेल तर निवडणुकी बिनविरोध व्हायला हवे जर उमेदवारांना निवडणूक ही स्वतःच्या विकासासाठी न लढवता गावच्या विकासासाठी लढवायची असेल तर ग्रामपंचायत निवडणूक ही निस्वार्थी आणि बिनविरोध झाली पाहिजे अशी अपेक्षा अनेक मतदारांनी व्यक्त केली आहे.

एन.डी.एम.जे ची वार्षिक आढावा बैठक संपन्न

एन.डी.एम.जे ची वार्षिक आढावा बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमोरगाव बारामती येथे नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस एन.डी.ए.या सामाजिक संघटनेचे वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. ही बैठक एन.डी.एम.जे  संघटनेचे स्वराज्य महासचिव अडवोकेट डॉ.केवल उके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये संघटनेच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले तसेच राज्याचे सचिव वैभव गिते यांनी वर्षभरात लॉकडाऊन च्या काळामध्ये सामाजिक हिताचे संघटनेने व  व कार्यकर्त्यांनी कोणकोणती कामे केली याचा आढावा घेतला. त्यामध्ये अत्याचार पीडितांचे प्रश्न , दिव्यांगांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील बांधकाम मजुरांचे प्रश्न कार्यकर्त्यांच्या अडचणी असतील व या वर्षीच्या गाव स्तरीय,तालुकास्तरीय,जिल्हास्तरीय,पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती तसेच गाव तिथे शाखा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  तसेच वर्षभरात चांगले काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा सन्मान तसेच क्वेस्ट फॉर जस्टीस या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं.यावेळी राज्य कार्यकारणी पदाधिकारी डॉक्टर केवजी उके, वैभवजी गीते,रमाताई अहिरे,अँपलजी खरात,प्रमोद शिंदे,बीपी लांडगे,निवृत्ती तात्या रोकडे, ऍड.अमोल सोनवणे  ऍड.बापूसाहेब शीलवंत,पंचशीलाताई कुंभारकर, महानंदाताई डाळिंबे,शशी खंडागळे, शरद शेळके, दिलीपजी आदमाने,तसेच संजय झेंडे, बाबासाहेब सोनवणे, दादा जाधव,संजय माकेगावकर,वर्षा शेरखाने,पंकज काटे, विलास ढगे, सचिन वाघमारे,डॉक्टर बाबासाहेब सोनवणे, विनोद रोकडे, ऍड.विजय बागडे, ऍड हर्षल.भोसले ऍड विजय मस्के, संदेश भालेराव,भीमसेन चव्हाण,दत्ता कांबळे,सचिन मोरे,तसेच पुणे,सातारा,सांगली,सोलापूर,लातूर, उस्मानाबाद,रायगड,मुंबई,कल्याण,विदर्भ,मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र,येथील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सोनवणे यांनी केले.

केपीजेएस नागरी अर्बन च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बावन्न लाख रु विम्याचे सभासदांसाठी वाटप!

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे केपीजेएस नागरी अर्बन बँकेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त  सभासदांना बावन्न (५२) लाख रु  विम्याचे वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष चळवळीचे नेते मा.विकास दादा धाइंजे व प्रमुख पाहुणे भांब गावचे माजी सरपंच जेष्ठ नेते मा.गोपाळ शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी विकास धाइंजे म्हणाले " आत्मविश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे.सभासद,संचालक व ठेवीदार यांचा विश्वास अल्पावधीत संपादित करून बँक चांगले कार्य करीत आहे. जेष्ठ पत्रकार दामू लोखंडे म्हणाले बँकेने ग्राहक मेळावे घ्यावेत व महिला उद्योगांना प्राधान्य द्यावे.*
  *बँकेचे चेअरमन डॉ.कुमार लोंढे बोलताना म्हणाले " बँकेचा सभासद असणारा व्यक्ती गरीब राहू शकत नाही कारण त्या व्यक्तीस बचतीची सवय लागणार आहे.तुमच्या उद्योगास,मुलांच्या शिक्षणास,घर बांधण्यास व तुमच्या प्रत्येक अडचणीत बँक तुम्हाला सहकार्य करणार आहे.एवढेच नव्हे तर बँकेने वर्धापन दिनानिमित्त दोनशे सभासदास दोन कोटी रु विम्याचे वाटप या महिना अखेर करणार असल्याचे नमूद केले त्याचप्रमाणे मोबाईल बँकिंग,क्रेडिट कार्ड,विमा कवच,सुकन्या समृद्धी  योजना,शेतकरी सन्मान योजना राबवून सभासदाचे दारिद्र दूर करण्याचे आणि मध्यमवर्गीय,छोटे व्यावसायिक यांना स्वतःच्या पायावर उभा करणार असल्याचे सांगितले.*

  कार्यक्रमास केपीजेएस नागरी अर्बन चे मा.माणिक (शेठजी) मगर, मा.शशिकांत शेंडगे ( कॉन्ट्रॅक्टर) धना (शेठ) मगर,युवा नेते मा.मारुती सरगर,बाळासाहेब काटे व क्लार्क  गोरड तरंगफल चे उपसरपंच शशी साळवे,रिपाइंचे रणजित सातपुते,मामा मगर,अशोक पाटील,पत्रकार सुजित सातपुते,प्रा.वायदंडे, इ सह सूळेवाडी,पिलीव,चांदापुरी कण्हेर इ भागातील सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुंडलिक साठे यांनी केले तर आभार सागर फडतरे यांनी मानले.

केपीजेएस नागरी अर्बन च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त बावन्न लाख रु विम्याचे सभासदांसाठी वाटप!

जांबुड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ प्रीती पिसाळ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क श्रीपुर राज बनसोडे. माळशिरस तालुक्यातील जांबुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच नारायण पाटील यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लागली होती या उपसरपंच पदाच्या जागेसाठी प्रीती नितीन पिसाळ यांनी आपला अर्ज दाखल केले होता तर त्यांना पुरवणी म्हणून ग्रा.प.सदस्य राजकुमार बाबार यांचा अर्ज दाखल केला होता.बाबर यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने आणि विरोधकांचा अर्ज नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी.मुडफणे व ग्रामसेवक बी.पी.कुंभार यांनी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले त्यामुळे उपसरपंच पदाची जागा ग्रा.पं.सदस्या सौ प्रीती नितीन पिसाळ यांनी बिनविरोध पटकावीली जांबुड ग्रामपंचायतीमध्ये १३ सदस्य असुन जनतेतून सरपंच निवड झालेली आहे. जागेसाठी नारायण पाटील यांच्या गटाच्या सौ.प्रीती नितीन पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य तसेच जांबुड गावचे किंग मेकर मा.मुरलिधर कचरे, रविराज बनसोडे, महेश धुमाळ, दिनकर केचे
धनाजी कचरे,ज्ञानोबा चंदनशिवे,विजय केचे, आप्पा हांडे, अनिल पाटील, शिवाजी नाईकनवरे, गणेश माने,लखन गायकवाड,बळीराम भोसले, संजय भोसले, रामभाऊ यजगर, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

नरभक्षक सैराट बिबट्याचा अकलूजच्या सिंहाने केला गेम

नरभक्षक सैराट बिबट्याचा अकलूजच्या सिंहाने केला गेम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)-माढा करमाळा भागात थैमान घातलेला  नरभक्षक  सैराट बिबट्या ताने आतापर्यंत बारा लोकांचे प्राण घेतले  तो बिबट्या वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत लपून बसला असता त्या बिबट्याला  वन विभागाने सापळा रचून अखेर ठार केले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून बिबट्याला पकडण्याच्या ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अचूक नेमबाजी मुळे बिबट्या चा गेम करण्यात यश आले  . तसेच गेली सतरा दिवस वनविभाग अधिकारी व कर्मचारी या त्याच्या शोधात दिवस-रात्र मेहनत घेत होते

पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात ऊसाचा ट्रैक्टर कोसळला…..

पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात ऊसाचा ट्रैक्टर कोसळला…..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पटवर्धन कुरोली येथील  बंधार्‍यावरून  भीमा नदीच्या पात्रात  उसाचा ट्रॅक्टर कोसळला याबाबत हकीकत अशी की चालकाचा ताबा सुटला अन् ट्रॅक्‍टर ट्रॉलींसह भीमा नदीत कोसळला ; चालक गंभीर जखमी; “दलित महासंघ युवा आघाडी माळशिरस तालुका प्रमुख “प्रदीप नाईकनवरे यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखाना, लि श्रीपुरचे कार्यकारी संचालक मा यशवंत कुलकर्णी यांना आवे ते जांभुड बंधा-यावरून होत. असलेली ऊस वाहतुक बंद करण्याचे लेखी निवेदन दि 6/11/2020,तसेच दि 13/12/2020 निवेदन दिले होते व दि 7/12/2020 रोजी धरणे आंदोलन केले होते परंतु कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी वाहतुक बंद करण्याचे  लेखी अश्वासन दिले होतो परंतु या उलट यशवंत कुलकर्णी हे वाहतुकदारास पाठीशी घालत असुन  पदाचा गैरवापर करत आहे .अशी माहित प्रदीप नाईकनवरे यांनी दिली व कारखाना प्रशासना विरूद्ध आंदोलनाचा  इशारा दिला आहेकोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावरून जड वाहतूकीसाठी बंदी असताना ही जड वाहतुक  सुरू आहे  यामध्ये चालक सतीश कडाळे (रा.भोसे, ता. पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.मंगळवारी (ता. 15) दुपारी अडीचच्या सुमारास हा ट्रॅक्‍टर बंधाऱ्यावरून जात होता. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये ट्रॅक्‍टर व दोन ट्रॉलींसह उसाचे मोठे नुकसान झाले आहे.खेडभोसे येथील शेतकरी धनाजी विठ्ठल साळुखे यांचा हा ट्रॅक्‍टर असून, तो ऊस घेऊन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे जात होता. पटवर्धन कुरोली बंधाऱ्यावर आल्यानंतर दोन्ही ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस भरल्याने उतारावर चालकाचा ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटला. त्यामुळे तो सरळ बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात पडला. या ट्रॅक्‍टरचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रॅक्‍टर चालक बराच काळ उसाने भरलेल्या ट्रॉलीखाली अडकून पडला होता. अपघात झालेला पाहून बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी त्याला बाहेर काढले. त्याच्यावर पंढरपूर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.बंधाऱ्यावरून जड वाहतुकीसाठी बंदी असताना सुद्धा येथून मोठ्या प्रमाणात मुरूम, खडी, ऊस वाहतूक केली जाते. या वाहतुकीमुळे या बंधाऱ्यावर अनेक वेळा अपघात घडले आहेत. या बंधाऱ्यावरील जड वाहतूक बंद करावी यासाठी दलित महासंघ युवा आघाडी माळशिरस तालुका प्रमुख प्रदीप नाईकनवरे यांनी  अनेक वेळा निवेदनेही दिली आहेत; मात्र प्रशासनाने अद्यापही लक्ष घातलेले नाही.दलित महासंघ  आक्रमकबंधाऱ्यावरून वाळू, खडी, मुरूम व दगड आदींचे वाहतूक होत आहे. यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या वाहतुकीमुळे बंधाऱ्याला भेगा पडलेल्या आहेत. या बंधाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा. जड वाहतूक बंदी करावी, अशी मागणी वेळोवेळी पाटबंधारे विभागाकडे करूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. जड वाहतूक बंद न केल्यास दलित महासंघ व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.असा इशारा प्रदीप नाईकनवरे यांनी दिला

पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात ऊसाचा ट्रैक्टर कोसळला…..

माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष उदय साळुंखे यांना मातृशोक.

माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष उदय साळुंखे यांना मातृशोक.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –महाळुंग  (ता. माळशिरस) येथील माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना तालुकाध्यक्ष उदय साळुंके साहेब यांच्या मातोश्री शालन तुकाराम साळुंखे यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. १७/१२/२०२० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार  महाळुंग पायरी पूल येथे करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या दुःख निधनाने माळून परिसरात शोकाकुल पसरले आहेत.

स्कायवॉकवर तरुणीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १० संशयित ताब्यात

स्कायवॉकवर तरुणीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १० संशयित ताब्यात

कल्याण पश्चिम व पूर्वेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर तरुणीची छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर जागे झालेल्या कल्याण पोलिसांनी या स्कायवॉकवर कोम्बिंग ऑपरेशन करून १० संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव कल्याण ठाणे – सरकार कोणाचेही असो त्यांच्याकडून महिला सुरक्षेबाबत केवळ हमी देण्यात येते, मात्र अध्यापही महिलांचे असुरक्षीततेचे भय संपलेले नाही. त्यामुळे आजही महिलांना ‘पावला पावला वर असते भय, अन म्हणे संरक्षणाची केली सोय’ असा परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार कल्याण पश्चिम व पूर्वेला जोडणाऱ्या स्कायवॉकवर समोर आला होता. या स्कायवर एका तरुणीची छेड काढल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी रात्री पोलिसांनी स्कायवॉकवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यामध्ये ८० पोलिसांच्या ताफ्याने १० संशयितांना ताब्यात घेतेले. मात्र आजही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे असल्याचे दिसून आले आहे.

.. मात्र कायद्याचा धाक नराधमांना नाहीच-

देशासह राज्यात महिलांवरील अत्याचार, छेडछाडी, अन्याय प्रकणारात दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर देशभर संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा केला. मात्र कायद्याचा धाक नराधमांना नसल्याचे समोर आले आहे.

स्कायवॉक गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे साम्राज्य –
कल्याण पूर्व पश्चमेला जोडणारा स्कायवॉक गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे साम्राज्य बनला आहे. परवा रात्रीच्या सुमारास स्कायवॉकवरून जाणाऱ्या एका तरुणीचा गर्दुल्ल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने केलेल्या आरडाओरडामूळे जमा झालेल्या नागरिकांनी या गर्दुल्ल्याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार समोर आला होता. परवाचा छेडछाडीचा हा प्रकार घडून 24 तासही उलटत नाहीत तोच स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल चोरून त्याला मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला होता.
कल्याण स्कायवॉकवर लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्कायवॉक आणि त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत वारंवार नागरिकांकडून मागणी केली जात आहे. मात्र रात्रीच्या वेळेस घडलेल्या या दोन्ही गुन्हेगारीच्या गंभीर घटनांनंतर तरी प्रशासन जागे आणि बुधवारी सायंकाळच्या सुमारास ८० पोलीस कर्मचाऱ्याच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन १० संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती कल्याण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.

You may have missed