आंतरराष्ट्रीय

रशिया युक्रेन संघर्ष वाढलेले इंधन व खताचा किमंती व त्यावरील उपाय !! – कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे

रशिया युक्रेन संघर्ष वाढलेले इंधन व खताचा किमंती व त्यावरील उपाय !! – कृषी मंडल अधिकारी सतीश कचरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –

आज आपन सर्व शेतकरी बांधव शोशल मेडीया वर्तमान पत्र न्युज चॅनेल चर्चा मध्ये अनुभवतोय की इंधन वाढ व रशिया युक्रेन संघर्ष मुळे खताचा तुटवडा भासणार किमंती गगनाला भिडणार ह्या बाबी आपले नियंत्रणा बाहेरील आहेत पण या वर आपणाकडे बरेच उपाय व पर्याय उपलब्ध आहेत .

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा
जागा मर्यादित

रासायनिक खते सहज उपलब्ध होती व ती वापरणे सोपे होते परंतू प्राप्त परिस्थिती उपलब्ध साधनसामुग्री व उपलब्ध बाबी चा वापर करून पीकाचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे . आज मिथीस पीक अन्नद्रव्ये उपलब्धता साठी खालील पर्याय उपलब्ध आहेत याचा वापर करणे गरजेचे आहे . हिरवळीचे खत उदा :ताग धैंचा बोरू चवळी गवार सुबाभूळ करंज पानाचा वापर करणे . ऊस पाचट कल्चर चा वापर ‘ कंपोस्ट ‘ शुगरफॅक्टरी प्रेस मड केक ‘ व कंपोस्ट ‘ विविध प्रकारच्या पेंडी ‘ मासळी खत ‘ गांडूळ खत कोंबडी खत ‘लेंडी खत ‘सिटी कंपोस्ट पशुपक्षी विष्ठा मुत्र ‘ मानवी विष्ठा मुत्र ‘ व्हर्मीवॉश शहरी अथवा मानवी वस्ती सांडपाणी बोनमील ‘ फिश मिल ‘ नाडेफ कंपोस्ट इएम द्रावन, अझोला ‘ केफ्र द्रावन ‘ निळे हिरवे शेवाळ ‘ दशपर्णी अर्क ‘ व्हर्मीवॉश ‘ जीवामृत बीजामृत अमृतपाणी ‘ गोमुत्र शीग खत खुरांचे खत, भुईमुग पेंड ‘करडई पेंड, एरंडी पेंड करंजपेंड निमपेंड मोहाचीपेड रकताचे खत गव्हाचे काड बाजरीचे सरमाड तुरकाड्या सुर्यफुल काड्या भाताचे तुस कापुस काड्या फुले येण्यापूर्वीचे सर्व प्रकारचे गवत ‘ बाबुचा पाला ‘ शेतातील पालापाचोळा खत ‘ केळी पाने व बुधा खत, लिंब जगली झाडे शेवगा आंबा पालापाचोळा खत नारळ व सर्व प्रकारच्या झाडया चे फांद्या कुजविलेले खत शेत तलाव मस्त्य पालनाचे पाणी ‘ जीवाणू संवर्धने जी हवेतील नत्र व जामिनितील स्कुरद व पालाश उपलब्ध करून देता ती अझीटोबॅक्टर रायझोबीएम असिटोबॅक्टर के. एसबी पी एसबी अशा १२ प्रकारच्या बॅक्टेरिया इत्यादी तसेच बाजारात उपलब्ध असलेला द्रवरूप युरिया ‘ फॉस्फरिक अँसीड . उपलब्ध असलेली विविध ग्रेड मधील द्रवरूप खते ‘ सोडीयम क्लोराईड जीप्सम इत्याचीचा उपलब्धता निर्मिती चा वापर करून आपन सर्व पीकाचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन समाधानकारक रित्या करू शकतो . म्हणून शेतकरी बंधूनी गोधळून न जाता विचारांचे वादळ थांबवून उपलब्ध साधने व साधनसामुग्रीचा वापर केला तर निसर्गाशी प्राणी पशुपक्षी मानव सुक्ष्म जीव यांचे बरोबर जिओ जीवस्य जीवनम !!या उक्तीप्रमाणे पीक उत्पादन घेता येईल यात काय शंका नाही .

बजेटचा कायदा करावा म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन

बजेटचा कायदा करावा म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्ली

राजस्थान सरकारने नुकताच बजेटचा कायदा मंजूर केला असून महाराष्ट्रात सुद्धा बौद्ध,अनुसूचित जाती अनुसूचित जमातींच्या योजनांचा प्रगतीचा हक्काचा निधी वळवू नये म्हणून बजेटचा कायदा करावा याकरिता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रात्री उशिरा दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.


नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके,राज्य सचिव वैभव गिते,राज्य संघटक पंचशीलाताई कुंभारकर यांनी महाराष्ट्रातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत योजनांची अधोगती अंमलबजावणीमधील अडथळे त्यामधील जाचक अटी आणि त्रुटी याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी सखोल चर्चा केली.आणि बजेटचा कायदा जर संसदेने मंजूर केला तर भारतभर लागू होईल आणि सर्व राज्यांवर बंदधनकारक असेल म्हणून निधी वळवू नये,निधी अखर्चित ठेऊ नये म्हणून संसदेत चर्चा करून बजेटचा कायदा मंजूर करण्याची मागणी करून महाराष्ट्र शासनास देखील निर्देश द्यावेत अशी महत्वपूर्ण मागणी एन.डी.एम.जे संघटनेच्यावतीने शिष्टमंडळाने केली.

नातेपुते नगरपंचायत च्या वतीने 2.40 कोटी च्या विकास कामांचे उद्घाटन

नातेपुते नगरपंचायत च्या वतीने 2.40 कोटी च्या विकास कामांचे उद्घाटन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- नगरपंचायत च्या वतीने 2.40 कोटीच्या विकास कामांचे उद्घाटन व पूजन माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटनाची सुरुवात नगरपंचायत च्या समोर स्वच्छ सुंदर नातेपुते या उपक्रमाच्या माध्यमातून सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी सफाई कर्मचारी यांच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचे 15 अत्याधुनिक प्रत्येकी सहा डबे आलेल्या कचरा घंटा हातगाड्या देण्यात आल्या.

नातेपुते नगरपंचायत च्या वतीने 2.40 कोटी च्या विकास कामांचे उद्घाटन करताना माजी जिप उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व मान्यवर

तसेच शासनाकडून पालखी मुक्काम गावासाठी अध्यावत सुविधा असलेले बाजारतळ येथे 20 युनिट चे भव्य सौचालय व पालखी मैदान येथे 20 युनिटचे शौचालय मंजूर झाले. असून त्याचा भूमिपूजन व पालखीतळ विकास योजनेअंतर्गत 35 लाख रुपये किमतीचे 10 हायस्ट लॅम्प बसवून तसेच नातेपुते नगर पंचायत स्वागत फलक त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमादरम्यान शिंगणापूर पाटी ते नातेपुते गावातून जाणारा प्रमुख रस्ता बायपास रोड पर्यंत हा रस्ता केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात यावा तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात यावा अशी मागणी नगरसेवक ऍड बी.वाय राऊत व नागरिक यांच्याकडून मुख्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

यावेळी माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,मुख्य अधिकारी माधव खांडेकर,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, बांधकाम विभाग सभापती अतुल पाटील माजी सरपंच तथा नगरसेवक ऍड बी. वाय.राऊत ,दादासाहेब उराडे ,अविनाश भाई दोशी ,उद्योजक अतुल बावकर, शक्ती भैय्या पलंगे,नगरसेवक रंजीत पांढरे,सुरेंद्र सोरटे,अण्णा पांढरे,दीपक काळे तसेच ज्येष्ठ ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत आनंद लोंढे मनोज राऊत आनंद जाधव सचिन रणदिवे व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

पालखी मैदान तेथे शौचालय युनिट बांधकाम भूमिपूजन करताना मान्यवर
नगरपंचायत स्वागत फलक उद्घाटन करताना मान्यवर
35 लाख रुपये चे 10 हायमास्ट दिव्यांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
भूमिपूजन करताना माजी सरपंच तथा विद्यमान नगरसेवक ऍड बी वाय राऊत साहेब

जातीय अत्याचारातील सहा कुटुंबीयांना नोकरी मिळवून दिल्याबद्दल एन.डी.एम.जे.ठाणे जिल्ह्याच्या वतीने डॉ.केवल उके व वैभव गीते यांचा करण्यात आला सत्कार …

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी)-  संदेश भालेराव
जिल्ह्यातील जातीय अत्याचारात बळी पडलेल्या सहा कुटुंबांना शासकीय नोकरी मिळवून दिल्याबद्दल एन डी एम जे चे राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके राज्य सचिव मा.वैभवजी गिते यांचा ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजय काबंळे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष मा .ॲड.प्रविण बोदडे यांच्या वतीने जाहीर  सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभव गीते बोलताना म्हणाले की  आदरणीय ॲड. डॉ. केवलजी  उके  साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत वंचित शोषित पिडीत घटकाला जिवंत असेपर्यंत न्याय मिळवून देणार.
हे काम कार्यकर्त्यां शिवाय शक्य नाही. या अगोदर सुद्धा आपण ११२ लोकांना पाचशे स्क्वेअर फुट जागा घर बांधण्यासाठी मिळवून दिली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील १७ कुटुंबीयांना व कोल्हापूर जिल्ह्यातील ९ कुटुंबीयांना पाच हजार रुपये पेन्शन मंजूर करून देण्यास यश आले आहे.
या अगोदर सुद्धा अनेक जाती अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना जमीन,पेन्शन,नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे.आणि यापुढेही अशाच प्रकारचं काम सुरू राहील.
       यावेळी मुंबई प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे मुख्मंत्री ग्राम विकास योजने अंतर्गत मु. कारखेल पो. धामणगाव ता. आष्टी जी. बीड या ठिकाणी रोड चे काम सुरू झाले तीन वर्षा पुर्वी ऐन डी एम जे ने या  संधर्भात मुख्यमंत्री यांना ऐक निवेदन सादर केले होते  झाल्याबद्दल  सत्कार केला.
व मुंबई  प्रदेश संघटक मा शशिकांत वाघ,  यांनी पीडितांना मदत केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .
यावेळी ठाणे जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ उत्कृष्ट प्रसिद्धीच काम मा.संदेश भालेराव हे करत आहेत म्हणून  त्यांचा ही सत्कार करण्यात आला यावेळी एन.डी.एम.जे.मुंबई प्रदेश सचिव मा.शशिकांत खंडागळे ,संघटक शशिकांत वाघ, ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.अध्यक्ष मा.विजय काबंळे ,क.डो.जिल्हा एन.डी.एम.जे.


अध्यक्ष ॲड. प्रविण बोदडे,ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव, आपला संवाद न्युज चॅनल चे संपादक  मा.किरण किरतकुडवे, मा.ज्योती किरतकुडवे आणि मा.अभिषेक जाधव तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते

जातीय अत्याचारआतील सहा सहकुटुंब यांना नोकरी मिळवून दिल्याबद्दल होलार समाजाच्या वतीने वैभव गीते यांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील जातीय अत्याचारात बळी पडलेल्या सहा कुटुंबांना शासकीय नोकरी मिळवून दिल्याबद्दल एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गिते यांचा होलार समाजाच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी वैभव गीते बोलताना म्हणाले की ऍड डॉ केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटपर्यंत वंचित शोषित घटकाला जिवंत असेपर्यंत न्याय मिळवून देणार.हे काम कार्यकर्त्यां शिवाय शक्य नाही. या अगोदर सुद्धा आपण 112 लोकांना पाचशे स्क्वेअर फुट जागा घर बांधण्यासाठी मिळवून दिली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सातारा कुटुंबीयांना व कोल्हापूर जिल्ह्यातील 9 कुटुंबीयांना पाच हजार रुपये पेन्शन मंजूर करून देण्यास यश आले आहे.

या अगोदर सुद्धा अनेक जाती अत्याचाराला बळी पडलेल्या लोकांना जमीन,पेन्शन,नोकरी मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे.आणि यापुढेही अशाच प्रकारचं काम सुरू राहील.यावेळी ऍड.अमोल सोनवणे यांची विशेष सरकारी वकील नियुक्ती झाल्याबद्दल व ऍड किरण शिंदे यांची बारामती बार असोसिएशन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ,ऍड.बापूसाहेब शीलवंत यांनी पीडितांना मदत केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी बारामती,फलटण,नातेपुते, वालचंदनगर,इंदापूर,पंढरपूर तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.

फुलेनगर येथे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत तुकाराम महाराज महाबीज उत्सव संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी ) –फुलेनगर दहिगाव येथे अर्जुंसिंह मोहिते पाटील व वैष्णवी देवी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज महाबीज उत्सव संपन्न झाला.सालाबाद प्रमाणे फुलेनगर फुलेनगर येथे तुकाराम बीजउत्सव संपन्न झाला या उत्सवास 42 वर्ष  पूर्ण झाली असून. या कार्यक्रमाची सुरुवात नातेपुते येथील माजी सरपंच व नगरपंचायत चे नगरसेवक ऍड बी वाय राऊत यांच्या हस्ते ध्वज पूजन करून सुरुवात करण्यात आली.

दैनंदिन सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहा, तसेच गाथा पारायण, हरिपाठ ,कीर्तन पहाटे काकड आरतीचे आयोजन केले गेले होते.परंपरेने या कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प बाबा काळे महाराज व ह.भ.प रामानंद महाराज दसुरकर यांनी केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे.

या बीज सोहळ्यास माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील,सरपंच रणधीर पाटील,उदयसिंह पाटील,शरद मोरे, संदीप सावंत, धनंजय महाराज कदम ,भीमराव फुले,तसेच दहिगाव व पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. अर्जुनसिंह मोहिते पाटील त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज यांची महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमास पंचक्रोशीतून हजारो भाविक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ,यांच्यावतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वामन महाराज फुले,अशोक महाराज फुले, ज्ञानेश्वर महाराज फुले,धनंजय महाराज कदम,संभाजी महाराज फुले सर,हनुमंत महाराज फुले सर,विजय महाराज फुले,मारुती फुले,मेजर आजिनाथ फुले,भाऊसाहेब फुले,भाऊसाहेब भिसे तसेच भजनी मंडळ व कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

डाळीब दशा आणि दिशा – भाग – १ – सतीश कचरे कृषी मंडल अधिकारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रतिनिधीउजाड माळावर काटेरी झुडपे बोर पीक हो ज्या जमिनित येत नाही तिथे डाळीब पीक सुक्ष्म सिंचनावर चांगले येऊन माळाचे नंदनवन करणारे महाराष्ट्रातील दुष्काळी पटटयातील शेतकऱ्यांचे आयुष्य सुजलाम सुफलाम करणाऱ्या राहणीमान ‘ वाढविणाऱ्या दरडोई उत्पन्न वाढविणारे व राष्ट्रीला परकीय चलन मिळवून देणाऱ्या या . कल्पवृक्ष पिकाला सध्या डाळीब पिक मर रोग ‘ तेल्या रोगा फळकुजव्या . व डाळीब खोड किडा /पीन होल बोरर यांच्या दशाने पिडून जाऊन बरेच क्षेत्र कमी झाल्याने परत माळे उजाड होऊ लागली आहेत. आजच्या लेखात डाळीब खोडकिडा / पीन होल बोरर या किडीचे एकात्मीक नियंत्रण वर उहापोह करुया !! – वर्षभर सक्रिय असणाऱ्या या किडीचा प्रौढ डाळीब ‘ पेरु आंबा ‘ साग या पिकाची उघडी मुळे खोड व फाद्या वर टाचणी पीन आकाराचे छिद्र घेऊन आतील लाकडाचा भुसा बाहेर टाकतात . यामुळे खोड फादया व मुळ यातील रसवाहिन्या व जलवाहिन्या खंडीत होतात व अन्नद्रव्य व पाणी कमतरता मुळे पाने पिवळी पडणे कोम्याजतात यामुळे फाद्या खोड वाळतात व मर होते

. या पिन होल मध्ये मादी आंडी घालतात ४ दिवसात अळी तयार होऊल तयार झालेल्या अॅम्बेसिया बुरशीबर अळी जगून ७ – ९ दिवसात कोष तयार होऊन ४दिवसात किडी तयार होते . अशा प्रकारे एक अठवड्यात जीवन क्रिया होऊन किडीचा उर्द्रक होतो पीन होल मध्ये बुरशी वाढून ही पीक प्रार्दुभाव ग्रस्त होते यावर उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाय खालील प्रमाणे करावा . १ -एकात्मिक अ न्नद्रव्ये सह पोषण करणे २ – अतिपाणी व अवर्षण ताण पासून बागेचा बचाव . ३ तण मुक्त पिक ठेवणे ४ – प्रार्दुभाव ग्रस्त झाडे फादया खोड गोळा करून जाळून टाकने . ५ – स्वयंचालित सौर / इलेक्ट्रीक प्रकाश साफळे प्रति हेक्टर एक ६ – बांधावरील आंबा पेरू एरंडी साग पिकावरही लेप देणे व फवारणी करणे ७ – वर्षातून २ वेळा बहार धरल्यावर व संपल्यानंतर ईमामेक्टीन बेझोएट ५% -२ग्रैम प्रति लिटर प्रमाणे पाण्याची फवारणी . ८ – ईमामेक्टीन बेझोरोट ५% २ ग्रॅम + कॉपर ऑक्लोराईट २ग्रॅम + ४ किलो गेरु + १० लिटर पाणी चे पेस्ट करून मुळे फाद्या खोड या वर लेप देणे . उपाचारत्मक उपाय मध्ये १- ईमामेक्टीन बेझोऐट ५% २ग्रॅम + प्रोपकोनॅझोल १०% २ग्रॅम प्रति लिटर पाणी पहिले ड्रेचिग / आळवणी वयानुसार ५ -१० लि पाणी सह द्यावे २ – या पद्धतीने दुसरी आळवणी १५ .दिवसानी व तिसरी ३० दिवसांनी द्यावी . ३ – -थायमेथोक्झीम २५% २मिली + आझाडीरेक्टीन १० हजार पी.पी.एम ३मिली + २ मिली स्टिकर सह फवारणी करावी . अशा प्रकारे उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाय केले तर नक्कीच खोड किडा पीन होल बोरर ही दशा घालविता येईल म्हणून शेतकरी बंधूनी एकात्मिक किड नियंत्रणाचा वापर करावा !!

अकलूज येथील डॉक्टर इनामदार देव माणसाच्या अश्विनी हॉस्पिटल मानवता मंदिराचा आज वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा


 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम. के. इनामदार या देव माणसाच्या अश्विनी हॉस्पिटल मानवता मंदिराचा आज वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने डॉक्टर एम के इनामदार डॉक्टर अनिकेत इनामदार व अश्विनी हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांना प्रमोद शिंदे व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

डॉक्टर एम के इनामदार हे गेल्या 40 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तसेच सांगली, सातारा, सोलापूर, पुणे अशाअनेक जिल्ह्यातील पीडित रुग्णांवर यशस्वी पणे उपचार करून त्यांची अविरत पणे सेवा करून आज पर्यंत हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे त्यामुळे येथील लोक त्यांना माणसातील देव मानतात जर कोणी मला विचारलं तुम्ही देव पाहिला का तर मी सांगेल हो मी दगडाचा नाही तर जिवंत देव माणूस पाहिला आहे ते पण डॉक्टर एम के इनामदार यांच्या स्वरूपात

अकलूज मध्ये अश्विनी हॉस्पिटल च्या माध्यमातून गेली  40 वर्ष विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या लोकांवर अश्विनी हॉस्पिटल मध्ये ईलाज केला जातोय.

चाळीस वर्षापासून डॉक्टर इनामदार रुग्णसेवा करीत आहेत. चाळीस वर्षापासून त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ सुद्धा काम करत आहे क्रिटिकल रुग्णांसाठी खात्रीदायक हॉस्पिटल म्हणजे अश्विनी हॉस्पिटल हे पश्चिम भागातील एकमेव हॉस्पिटल आहे.

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा प्रवेश मर्यादित

या हॉस्पिटल ची सुरुवात छोट्याशा जागेमध्ये करण्यात आली होती आता भव्य भलीमोठी इमारत अत्याधुनिक सोयल युक्त व रुग्णांसाठी 24 तास माफक दरामध्ये सेवा या ठिकाणी दिली जाते पुणे मुंबई सारख्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये अतिशय मापक दरामध्ये दिल्या जातात प्रत्येक रुग्णांची वैयक्तिक रित्या डॉक्टर एम के इनामदार व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे डॉक्टर अनिकेत इनामदार साहेब हे दोघेही पिता-पुत्र रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत डॉक्टर एम के इनामदार हे हृदय रोग तज्ञ तसेच M.D.,FACC,FSAI,FEAC,FISC,FIMAMS आहे तर

डॉक्टर अनिकेत इनामदार M.D.(Med)D.C.C critical care consultant आहेत डॉक्टर अनिकेत इनामदार यांना लहानपणापासूनच डॉक्टर एम के इनामदार यांच्याकडून रुग्णसेवेचे धडे मिळाले आहेत

त्यामुळे ते उत्तम रित्या रुग्णसेवा देत आहेत. ऋग्नसेवा बरोबर समाज सेवेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो सढळ हाताने ते अनेक गरजू लोकांना माणुसकीच्या नात्याने मदत करत असतात परस्थिती नसलेल्या गरीब रुग्णांना बिलामध्ये सवलत दिली जाते. आपुलकीने ऋग्नसेवा देणाऱ्या डॉक्टर इनामदार व अश्विनी हॉस्पिटल मधील सर्व परिवारास पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा

परीक्षा केंद्रावर कॉपी व पेपर फुटी आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मंत्रालय मुंबईपरीक्षा केंद्रावर कॉपी व पेपर फुटी आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सध्या सुरू असलेल्या  परीक्षा केंद्रावर जर पेपर फुटी व कॉपी प्रकरण आढळल्यास त्या शाळांवर कायदेशीर कारवाई करून मान्यता रद्द करणार असल्याचा थेट इशारा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

परीक्षा केंद्रावर कॉपी व पेपर फुटी आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवा
आपल्या विद्यार्थ्याला गुणवत्ताधारक बनवायचे तर मग रत्नत्रय इंग्लिश स्कूल व माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आजच प्रवेश घ्या प्रवेश मर्यादित

सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीविधान परिषदेत मुद्दा मांडला आहे. पुढे त्या म्हणाल्या शाळेत कॉपी आढळल्यास त्या शाळे ला परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. राज्यात परीक्षेदरम्यान काही केंद्रात कॉपी प्रकार आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले. 

एन.डी.एम.जे च्या मागणीला यश14 वित्त आयोगातून पिरळे येथील समाज मंदिर सुशोभिकरण काम सुरू


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- पिरळे तालुका माळशिरस येथील बौद्ध वस्ततील समाज मंदिर  सुशोभीकरण व दुरुस्ती एन.डी.एम.जे च्या मागणीला यश आले असून ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने 14 वित्त आयोगातून समाज मंदिर शोभे करणाचे काम सुरु करण्यात आले.दिनांक 26 जानेवारी रोजी एन.डी.एम.जे च्या वतीने मोडकळीस आलेले समाज मंदिर तात्काळ दुरुस्त करून सुशोभीकरण करण्यात यावे.अशी मागणी प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे व समाज बांधव यांच्या कडून ग्रामपंचायत यांच्याकडे  निवेदनाद्वारे करण्यात आली होती. हे समाज मंदिर वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी बांधले असून त्याची दुरावस्था झाली होती.या समाज मंदिरात महापुरुषांच्या जयंती असे अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात.

रत्नत्रय इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये आजच प्रवेश घ्या मर्यादित प्रवेश

या समाज मंदिरात परदेशी धातूची संगमरवरी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ समाज मंदिर दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत यांच्याकडे करण्यात आली होती.यावर सरपंच,उपसरपंच ग्रामसेवक व सर्व सदस्य यांनी दखल घेत.समाज मंदिर दुरुस्त करण्याचा निर्णय घेत संदीप नरोळे व मान्यवर यांच्या हस्ते नारळ फोडून दुरुस्तीचा शुभारंभ केला.यावेळी उद्योजक सरपंच संदीप सेठ नरोळे,उपसरपंच उमेश भैय्या खिलारे, ग्रामसेविका शैला साळवे मॅडम, सरपंच महादेव शिंदे,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लवटे-पाटील,सुनील दडस,बाळू शिंदे पांडुरंग साळवे,दत्तात्रेय लवटे,राजेंद्र बल्लाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी संदीप नरोळे म्हणाले की गावच्या विकास कामांसाठी हयगय केली जाणार नाही.गावातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून, प्रसंगी आमदार फंड ,खासदार फंड ची मोठ्याप्रमाणात मागणी करून राहिलेली विकास कामे झपाट्याने करणार आहोत. सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

2
1

You may have missed