माळशिरस तालुका

भाजप सर्व निवडणुका राम सातपुतेंच्याच नेतृत्वाखाली लढणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा नातेपुते येथील स्नेहमिलन सोहळ्यास प्रचंड गर्दी

नातेपुते येथे दिवाळी स्नेह मिलन कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरेनातेपुते येथील मयुरमिलन मंगल कार्यालय येथे माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका दीपावली स्नेहमिलन सोहळा व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाप्रसंगी गोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अकलूज आता परिवर्तनाच्या वाटेवर आहे. मला एका वर्षाचाहिशोब विचारता ५० वर्षात वांजी काव केले. डीपीडीसीमध्ये मागच्या १० वर्षाचा हिशोब बया त्याच्या दुप्पट पैसे मी एक वर्षात माळशिरस तालुक्याला दिले आहेत. वांचच्या दौगीपणाला तालुक्यातील जनतेने ओळखला आहे. मी कुणाच्या कामाचा हिशोब अर्धवट सोडत जाही. काहीजण र्वाच्च भाषा वापरतात परंतुभी घाबरत नाही, असले लई बघितलेत. आम्ही कंबर मोडायच्या मादी लागत नाही तर कंबरेच्या खाली मारतो. आपण कोणाच्या वाटे जात नाही आपल्या वाटे आला तर त्याला सोडत नाही.बंद पडलेल्या कारखान्याला देवा भाऊ यांनी मदत केली म्हणून कारखाजा सुरू झाला, हे एकच नाही असे अनेक आहेत. माळशिरस तालुक्यातील २२ गावांजा पाणी देण्याची ताकद फक्त देवाभाऊच यांच्याकडे आहे. देवाभाऊ यांनी आम्हाला शिकवलेमागच्या वेळेस आम्ही इकडे होतो आणि आता तिकडे आहे. असे म्हणणाऱ्यांकडे फार लक्ष देऊ नका. माळशिरस तालुक्यातील जनतेने संभ्रम अवस्थेत राहू नये व चिंता करू नये. माळशिरस तालुक्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या या सगळ्या निवडणुका रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखालीच होतील, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी व्यक्त केले.ऑपरेशन लोटस सुरूच राहणार : गोरेमाजी आमदार दिलीप माने यांचा प्रवेश होईल, मुख्यमंत्री स्थानिक नेतृत्वाची चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. राजन पाटील, बबनराव शिंदे, रणजितसिंह शिंदे, यशवंत माने यांचा प्रवेश लवकरच होईल. सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचे प्रवेश होणार आहेत. ऑपरेशन लोटस सुरूच राहणार असल्याचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.आहे राजकारण हे निवडणुकीपुरते व समाजाच्या हितासाठी कनादचे असते. माळशिरस तालुक्यातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम रामभाऊ सातपुते करतावेत.त्यांना १ लाख ८ हजार लोकांनी मते दिली आहेत.त्या लोकांचे आमदार रामभाऊ तुम्हीच म्हणता आहात वा पुढारीनाहीत. माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाला उमेदवार हे रामभाऊ सातपुतेच ठरवतील,माळशिरस तालुक्यात विकास कामासाठी निवी कमी पहणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा व माळशिरस तालुक्याच्या विकास कामासाठी व निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी• माळशिरस तालुक्यातील सगळ्या गावांना मोठ्या प्रमाणात निधी द्यायचे काम कोणी केले असेल तर ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे. भाजप शिपाय विकास नाही म्हणून अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत म्हणून अकलूजकर म्हणाले आम्ही लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत होतो आता विधान परिषदेला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आहोत. परंतु मित्रांनो हा ढोंगीपणा माळशिरस तालुक्यातील जनतेला सहन होणार नाही. एवढी जनता भोळी नाही. वैफल्यग्रस्त असणाऱ्या प्रस्थापितांनी आम्ही भाजपमध्ये जाणार आहोत आम्हाला भाजप मध्ये घेणार आहेत आमचं ठरलंय आम्हाला एबी फॉर्म देणार आहेत अशा पद्धतीच्या बावड्या उठवायला सुरू केल्या आहेत. देवाभाऊ यांनी आमदारकी देण्याचं काम केलं परंतु लोकसभेत त्यांनीच देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला धानिक स्वराज्य संस्थेत आपणा सर्वजणांनी भाजपचेच काम मोठ्या प्रमाणात करायचे आहे. कार्यकत्र्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही सरकार आपले आहे.रामभाऊ सातपुतेरामभाऊ सात्पुते यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे रहा या कार्यक्रमांमध्ये माळशिरस, कचरेवाडी, कळंबोली, अकलूज येथील तरुण कार्यकर्ते व पदाधिकान्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.मोरे, हनुमंत सूक, बाजीराव काटकर, सोपानकाका नारनवर, वुवानेते सोनूभेट्या पराहे संजय देशमुख, देविदास चांगण, मिलिंद सरतापे, सतीश सपकाळ, बाळासाहेब वावरे, राजकुमार हिवरकर पाटील, गणेश पाटील, संगीता मोठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार बाळासाहेब सरगर यांनी केले.वावेळी राम सातपुते, सुजव माने पाटील, सोमनाथ भोसले, आप्पासाहेब देशमुख, शिवप्रसाद फाउंडेशन चे चेअरमन शरद मोरे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळाउद्धव ठाकरे यांची मोदी आणि शाहांवर जोरदार टीका

राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मोर्चे बांधणीला सुरूवात केल्याचं दिसून येत आहे. या अनुषंगानेच आज मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईवर दोन व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचा अप्रत्यक्ष अॅनाकोंडा असा उल्लेख केला.उद्धव ठाकरे काय म्हणाले?आज भाजपा असेल किंवा मिंदे असेल, त्यांच्याकडे पैसे असतील, पण जीवाला जीव देणारे माणसं नाहीत. त्या दिवशी आपला या ठिकाणी मेळावा पार पडला, पण तेव्हा नेमकं पाऊस होता, त्यामुळे काही जण माझ्या फटक्यातून (टीका) वाचले, अन्यथा आणखी फटकवणार (टीका करणार होतो) होतो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.आज आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळांबाबत जे काही सादरीकरण केलं आहे, आपल्याला त्यामध्ये आणखी खोलवर जायचं आहे,उद्धव ठाकरेंकडून शाहांचा अॅनाकोंडा असा उल्लेखआज एकजण मुंबईत येऊन गेले. योगायोग म्हणजे आज मी सामनामध्ये दोन बातम्या वाचल्या. पहिल्या पानावर भाजपा कार्यालयाचं उद्धघाटन आणि दुसऱ्या पानावर एक बातमी होती, त्यामध्ये जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार, आता आपण पेंग्विन आणलं म्हणून लाखो पर्यटक तिकडे वाढले आणि मला त्याचा अभिमान आहे. पण पेंग्विनच्या उंचीची काही माणसे आपल्यावर टीका करतात ते सोडून द्या. पण अॅनाकोंडा म्हणजे सर्व काही गिळणारा साप होय आणि तो आज इकडे येऊन भूमिपूजन करून गेला. त्याला मुंबई गिळायची आहे. मुंबई गिळायची का? पाहतो कशी गिळणार ते. नाही पोट फाडून बाहेर आलो तर नाव सांगणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.हे काम महाराष्ट्रभर करायचं आहे, पण याची सुरुवात मुंबईपासून करायची आहे. कारण मुंबईवर कोणाचा डोळा आहे हे तुम्हाला माहिती आहे. खासकरून दोन व्यापाऱ्यांचा मुंबईवर डोळा आहे. तुमच्या मनातील नावं मला माहिती आहेत, पणते मी आता माईकमध्ये घेत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मोदी आणि अमित शाह यांच्यावर केली.बरं भूमिपूजन करायला आला आहात तर भूमिपूजन करा, डोक्यावर नारळ फोडा किंवा दगडावर.

मंगळवेढा बसस्थानकावरुन महिला प्रवाशाचे १० लाखाचे सोने पळविलेचोरीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पोलीस पथक दाखल

मंगळवेढा बसस्थानकावरुनजाणार्या मंगळवेढा-जत या बसमध्ये चढताना एका ४६ वर्षीय महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले १० लाख ८ हजार रुपये किंम तीच्या सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मंगळवेढा बसस्थानकावरील प्रवाशांचे दागिने चोरण्याची मालिका संपता संपत नसल्यामुळे प्रवाशी वर्ग धास्तावला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी महिला स्नेहा राम चंद्र शिंदे (वय ४६, रा. जुळे सोलापूर) ही तिच्या मुलाबाळासह व तिचा दीर पिराजी शिंदे (रा.यळवी ता.जत) यांच्यासह सोलापूर येथून सकाळी ११.३० वाजता फिर्यादी सोलापूर-सांगोला बसमध्ये बसूनमंगळवेढ्याकडे निघाली होती. यावेळी सीटवर बसल्यानंतर तिच्या पर्समध्ये १० लाख ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे विविध दागिने ठेवले होते. दुपारी १.३० वाजता मंगळवेढा येथील बसस्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये ठेवलेले दागिने आहेत का ? याची खातरजमा केल्यावर दागिने होते. दुपारी २ वाजता मंगळवेढा-जत या बसमध्ये बसल्यावर पर्स मांडीवर ठेवून पर्सची चैन बंद केलेली होती. त्यावेळी फिर्यादीने पर्समध्ये सोने आहे हे पाहण्यासाठी पर्सची चैन उघडून पाहिल्यावर त्यामधील ठेवलेले सोने दिसून आले नाही. यावेळीया घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस हवालदार रवी माने, पोलीस अंमलदार मनोज राठोड, सुरज रामगोंडे यांचे पथक मंगळवेढ्यात सोमवारी दाखल झाले. या पथकाने बसस्थानकामधील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी करुन सदर चोरीचा तपास करण्याचा विशेष प्रयत्न केला. रात्री उशीरा पर्यंत हे पथक बसस्थानकावर ठाण मांडून होते.खात्री पटली की अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडून चोरुन नेले आहे. यामध्ये १ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीचे गंठण, ७० हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण, ७७ हजार रुपये किंमतीच्या बांगड्या, २१ हजार रुपये किंमतीचे कानातील टॉप्स, ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाच्या बांगड्या, १ लाख १९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे ब्रासलेट, १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे लॉकेट, ४२ हजार रुपये किंमतीचे ६ ग्रॅम वजनाचे लॉकेट, १७ हजार ५०० रुपये किंमतीचे वेढणी अंगठी, १४ हजार रुपये किंमतीचे दोन नग वेढणी अंगठी असा एकूण १० लाख ८ हजार रुपये किंमतीचा पर्स मध्ये ठेवलेला सोन्याचा मुद्देमाल चोरुन नेलाअसल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान दुपारी घडलेली चोरीची घटना रात्री उशीरा दाखल झाली आहे. ठाणे अंमलदाराने सुरुवातीला गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याने मोठा विलंब झाला. तक्रारदाराने व अन्य सुज्ञ नागरिकांनी थेट पोलीस अधिक्षक यांना या घटनेबाबत माहिती दिल्यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बसस्थानकावर यापुर्वी अनेक महिलांचे दागिने चोरण्याचा प्रकार घडला असून चोरीची नोंद पोलीसात होते मात्र त्याचा आजतागायत चोरीचा तपास पोलीसांनी न लावल्यामुळे चोरीची मालिका थांबता थांबेना.

विठ्ठलाच्या महापूजेचा मान विद्यार्थ्याला मिळावाशिक्षणमंत्री दादा भुसेंची नवी मागणी, नवा वाद होण्याची शक्यता:

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला विठ्ठल आणि रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होते. दर्शनरांगेतील वारकऱ्याला महापूजेचा मान मिळतो. मात्र, या वेळी जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही हा मान मिळावा, अशी मागणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. आपण याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे, असेही भुसे म्हणाले. भुसे यांच्या या नव्या मागणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे.सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लाखो भाविकांना असते. वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या प्रमुख चार यात्रांपैकी आषाढी आणि कार्तिकी यात्रेला विठ्ठलाची शासकीय महापूजा होते. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्याहस्ते शासकीय महापूजेला सुरुवात झाली. पुढे १९९५ मध्ये युती सरकार आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आषाढी महापूजा मुख्यमंत्री, तर कार्तिकी महापूजा उपमुख्यमंत्री करतील, असा पायंडा पाडला. या महापूजेला विठ्ठलाच्या दर्शनरांगेतील पहिल्या वारकरी दाम्पत्यालामान मिळाला, तो आजतागायत सुरू आहे. यंदा मात्र येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीपुढे पेच निर्माण झाला होता. महापूजेसाठी दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला निमंत्रित करावे, अशी विचारणा समितीला विधी व न्याय विभागाकडे करावी लागली. त्यांच्या शिफारशीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले.वास्तविक एकादशीच्या शासकीय महापूजेच्या वेळी अनेक मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असतात. आणि त्यामुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारकार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेच्या वेळी ज्याप्रमाणे दर्शनरांगेतील भाविकाला सपत्नीक पूजेचा मान दिला जातो. त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही शासकीय महापूजेच्या वेळी मान मिळावा. आपण मंदिर प्रशासनाला विनंती केली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करणार असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले.सर्वांना देवाजवळ जाण्याची इच्छा असते. मंदिराचा गाभारा लहान आहे. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचे कुटुंब, म ानाचे वारकरी दाम्पत्य आणि सोबत मंत्री, अधिकारी असा लवाजमा असतो. यामध्ये कोणाला परवानगी द्यावयाची आणिकोणाला नाही याबाबत मंदिर समितीची अडचण होते. आता त्यामध्ये दादा भुसे यांनी झेडपीच्या विद्यार्थ्यांना मान द्यावा, अशी नवी मागणी केली. यातून पुन्हा म ानापमान रंगणार आहे. तसेच यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे.

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार,

भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली जाण्याच्या मार्गावर आहे. ज्या सरकारी बँकांनी सप्टेंबर २०२५ चे तिमाही निकाल जाहीर केले आहेत, त्यापैकी बहुतांश बँकांचा निव्वळ एनपीए ०.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तथापि, काही एजन्सींनी असा इशारा दिला आहे की, बँका मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करत असल्यामुळे एनपीएची समस्या पुन्हा डोके वर काढू शकते.देशातील दोन प्रमुख सरकारी बँका, पंजाब नॅशनल बँक आणि इंडियन बँक या दोन्ही बँका थकीत कर्जाचे सत्र पुन्हा परत येऊ नये यासाठी विशेषतः आर्टिफिशियलइंटेलिजन्सचा वापर करत आहेत. पीएनबीचे एमडी आणि सीईओ अशोक चंद्र यांनी दावा केला आहे की, त्यांची बँक ज्या तिमाहीत चालेल, त्या तिमाहीत आपला निव्वळ एनपीए शून्य करू शकते.एनपीएमध्ये ९ टक्के घटवर्ष २०१७-१८ मध्ये भारतीय बँकांमवरिष्ठ अधिकार्यांपर्यंत एआयकडून अलर्टवसुलीबाबत बँकेच्या स्तरावरची तत्त्परता पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. यासाठी एआयची मदत घेतली जात आहे. बँकेच्या जोखीम व्यवस्थापन विभागातील प्रत्येक अधिकार्याची स्वतःची जबाबदारी निश्चित केली आहे, ज्यामध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. एआयच्या मदतीने प्रत्येक कर्ज खात्यावर काटेकोरपणे नजर ठेवली जाते.धील एकूण थकीत कर्ज म्हणजेच एकूण एनपीएची पातळी ११.७८ टक्क्यांपर्यंत वाढली होती.एनपीएची ही पातळी अत्यंत वाईट मानली जाते; परंतु गेल्या सात वर्षांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत सरकारी बँकांचा एकूण एनपीए (एकूण मालमत्तेच्या तुलनेत एकूण एनपीएचे प्रमाण) घटून २.५ टक्क्यांवर आणि निव्वळ एनपीए (थकीत कर्जासाठी समायोजित केलेली रक्कम वगळल्यानंतरचे प्रमाण) केवळ ०.६ टक्क्यांवर आला आहे. अनेक जागतिक अहवालानुसार, भारतीय बँकिंग क्षेत्रातील एनपीएची पातळी आता अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटनच्या बँकिंग क्षेत्राच्या जवळपास आहे.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी,महिला डॉक्टरचे चॅटिंगपोलिस तपासातून धक्कादायक खुलासे

या प्रकरणाच्या तपासा संदर्भामध्ये आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. गृह विभागाकडून हा तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा, अशा सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने हा तपास पूर्णपणे निष्पक्षपणे सुरू आहे. सध्याचे सीडीआर आणि चॅटिंग समोर आले आहे. त्याच्यातून असं दिसत आहे की, मृत डॉक्टर आणि आरोपी यांच्यामधील वारंवार चॅटिंग सुरू होतं. डॉक्टर महिला ही आरोपींच्या संपर्कामध्ये होती, अशी माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली. फलटण उपजिल्हारुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येने महाराष्ट्र हादरला असून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या हातावर पेनाने सुसाईड नोट लिहून डॉक्टर महिलेने आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांम ध्ये सुरू असलेल्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज महत्वाचे खुलासे केले आहेत. याप्रकरणी सुरू असलेल्या तपासाची माहिती देताना, मृत महिला डॉक्टर आणि आरोपीयांच्यात वारंवार चॅटिंग सुरू होते असा खळबळजनक दावा पोलिस अधिक्षकांनी केला आहे.फलटण शहर पोलिस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यात आला, तो आत्महत्येचा गुन्हा आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या अटकेत आहेत, दोन्ही आरोपी सध्या पोलिस कस्टडीमध्ये असून त्यांचा डीवायएसपी यांच्यामार्फत तपास सुरू आहे. सीडीआर असेल किंवा इतर पुरावे, यामार्फत आरोपीविरुद्ध काय पुरावे मिळतात याचा तपास सध्या सुरू आहे. सध्या प्राथमिक पीएम रिपोर्ट मिळाले असून फायनल पीएमरिपोर्ट आज किंवा उद्या आम्हाला मिळतील. त्याचबरोबर काही फॉरेन्सिक रिपोर्ट देखील लवकरच हाती येतील. त्यानुसार मयत आणि आरोपी यांचे काही नक्की संबंध होते का हे तपासातून समोर येईल, असे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी म्हटलं. मयत डॉक्टर या ज्यावेळेस हॉटेलमध्ये गेली, त्यावेळेस ती एकटी होती. हे सीसीटीव्हीम ध्ये दिसत असून हॉटेलमधील डीव्हीआर आम्ही जप्त केला आहे. डीव्हीआर तपासला असता, कोणतीही संशयास्पद गोष्ट आम्हाला आढळून आली नाही.

बळीराजा हवालदिल राज्यात पावसाचा मुक्काम वाढला परतीच्या पावसानं द्राक्षांसह कांदा, मका पिकांचे अतोनात नुकसान,

गेल्याआठवडाभरापासून राज्यातील विदर्भ मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे.या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. यामुळे हाता तोंडाशी आलेला कांदा, सोयाबीनसह वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाच्या धसक्यानेरायगडमधील भातकापणी ठप्प पडली असून, पुण्यात भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रियझाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवली आहे. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह महाराष्ट्रात काही भागांमध्येपावसामुळे निफाडला द्राक्ष, कांदा, मका पिकांचे नुकसान निफाड तालुक्यात गेली दोन दिवस रात्रभर सुरुराहिलेल्या बेमोसमी पावसाने द्राक्ष, कांदा, मका, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष पीक रोगांपासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच चिखल तुडवत फवारणीसाठी लगबग सुरु झाली आहे. निफाड तालुक्यातील प्रमुख द्राक्ष उत्पादक भागात शनिवारी व रविवारी रात्रभर बेमोसमी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला आहे. द्राक्षमाल हा अवकाळीच्या तडाख्यात सापडला असून रोगांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळपासूनच फवारणी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. फवारणीसाठी ट्रॅक्टरला पाणी व चिखलाचा मोठा अडसर ठरत आहे. द्राक्षे फवारणीचा खर्च मोठा असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.मोठा पाऊस होऊ शकतो

गोरडवाडी येथे शिवप्रसाद फाउंडेशन व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व चष्मे वाटप शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत.संत बाळूमामा मंदिर, गोरडवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथेशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. यावेळी गोरडवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामध्ये 1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) 2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी5) मोफत रक्त तपासणी6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियाअशा आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा 517 नागरिकांनी लाभ घेतला.मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली. या कार्यक्रमासमा.श्री.शरद (बापु) मोरे, सौ.ऋतुजाताई शरद मोरे,डॉ.लताताई मोरे, श्री.पांडुरंग पिसे (सरपंच) श्री.नवनाथ केंगार (उपसरपंच), श्री. मच्छिंद्र गोरड (सदस्य), श्री.रामचंद्र गोरड (मा.सरपंच), श्री.सच्चीदानंद पिंगळे (कार्यकर्ते), श्री.संतोष गोरड, श्री.दीपक (आबा) गोरड (मा.उपसरपंच) श्री.तुकाराम गोरड (सहकारी), श्री.जगन्नाथ गोरड (सर), श्री.भारत गोरड (सर), श्री.लक्ष्मण (तात्या) गोरड, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी

कार्तिकी वारीसाठी एक कोटींचा निधी मंजूर

दरवर्षी कार्तिकी एकादशीला आळंदी येथे लाखो वारकरी दाखल होतात. यंदाच्या कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीसह विविध विकासकामांना गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठी नगरविकास विभागामार्फत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिंदे यांनी शासन वारकऱ्यांच्या पाठीशी असून, भागवत धर्म, प्रथा आणि परंपरांचा सन्मान राखत असल्याचे अधोरेखित केले.आळंदी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविधविकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि शुभारंभ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधान उपसभापती डॉ. नीलम परिषदेच्या गोहे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ उपस्थित होते.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संत आणि शूरवीरांची भूमी आहे. शासनाने वारकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.

चांदीपाठोपाठ सोनंही स्वस्त; लग्नसराई त सोने खरेदीचा मोठा होणार फायदा

दिवाळीनंतर सर्वसाम ान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. चांदीच्या किमतीत मोठी घट झाल्यानंतर आता सोन्याच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे. काही आठवड्यांपूर्वी १.३२ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलेले सोन्याचे दर आता १.२१ लाखांवर आले आहेत. ही घसरण लग्नसराईच्या हंगामात सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. चांदीच्या किमतीतही १६ ते २५ ऑक्टोबर दरम्यान ३५,००० रुपयांची घट झाली असून, सध्या १०० ग्रॅम चांदी १५,५०० रुपये आणि १ किलो चांदी १,५५,००० रुपये आहे. पण सोन्याच्या किमती आणखी किती खालीयेतील आणि का घसरत आहेत, जाणून घ्या. सोन्याच्या किमती २०२५ मध्ये ५६% वाढल्या होत्या, पण आता तांत्रिक सुधारणेम ळे ३% घसरण झाली आहे. ही सुधारणाबाजार स्थिर करण्यासाठी स्वाभाविक आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या शक्यतेमुळे आणि डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्यावर दबाव वाढला. अमेरिका-भारत व्यापार करार आणि अमेरिका-चीन चर्चे च्या सकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेपासून शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीकडे वळले आहेत.