गोगल गाय उपद्रव व एकात्मिक नियंत्रण – सतीश कचरे ता. कृषि अधिकारी ‘

गोगल गाय उपद्रव व एकात्मिक नियंत्रण – सतीश कचरे ता. कृषि अधिकारी ‘

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पावसाळा हंगामात प्रामुख्याने जून ते सप्टेबर या कालावधीत गोगल गाय पपई ‘ केळी ‘ वाल ‘ दोडक्याचे वेल ‘वागी ‘ भेंडी काकडीवर्गीय फळे ‘मिरची ‘ पानकोबी ‘ फुलकोबी व सर्वप्रकारच्या पालेभाज्या सोयाबीन ‘ कापुस ‘ ऊस रोपवाटीकेतील रोपे ऊगवून आलेली नवती यांचे पाने फुले कंद मध्ये खाण्यासाठी छिद्र करतात

तसेच बीयापासून अंकुरीत कोवळे टोब यांना कुरतडतात खातात यामुळे उपद्रव होऊन तसेच कुरतडलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रार्दुभाव होऊन लहान रोपे मरतात यामुळे लाक्षणीक उत्पादनात घट येते.

जमिनीवर व गोडया पाण्यात राहणाऱ्या गोगल गा यच्या पंसतीस हजार प्रजाती आहेत . गोगल गायचा वापर युरोपात खाण्यासाठी कोबडीखादया व विविध पदार्थ करण्यासाठी केला जातो . हिंदू धर्मात गोगल गाय शंख पुजन व शंख नाद साठी महत्व आहे. गोगल गाय रात्रीच्या वेळी पिकाला उपद्रव करते व सुर्यादयनंतर लपून बसते . उत्पादनातील घट व मालाचा ( भाजीपाला ) दर्जा राखणेसाठी गोगल गायचा एकात्मिक प्रतिबंध खालील प्रमाणे करावा .

१ ) उन्हाळ्यात खोल नागरट करावी . २ ) पिवळट पांढऱ्या रंगाची शाबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत . ३ ) शेताभोवती कॉफी ची झाडे लावावीत . ४) शेतावरील बांध स्वच्छ ठेवावेत .५ ) शेताभोवती २मीटर पटटयात राख मोस्चूद व चुना यांचे मिश्रण पसरावे . ६ ) शेतामध्ये ७ते १० मीटरवर वाळलेले गवत ‘ पपईचा पाला ‘ गोणपाट ‘ कुजलेली लाकडे ‘ भाजीपाला यांचे ढीग ठेवावेत रात्री नंतर सुर्यादयापूर्वी गोगलगाय या ठीगाखाली आश्रय घेतात . या ढिगाखालील गोगल गाय मीठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात

. ७ ) फळबागेतील उपद्रव टाळणेसाठी १०% बोर्डोपेस्ट बुध्याला लावावी . ८) लहान गोगलगाय नियत्रणासाठी मीठ ५% द्रावण फवारणी ची शिफारस आहे . ९ ) कापूस ‘सोयाबीन पीकावरील गोगलगाय नियंत्रणासाठी मेलाल्डिहाईड २किलो प्रतिएकर + १०लिटर पाणी + २किलो गुळ + २५ ग्रॅम यीस्ट + ५० किलो गव्हाचे काड १० -१२ तास भिजत घालून त्यामध्ये ५० ग्रैम थायमिथोक्झीन मिश्रण करून पटट्यास छोटे छोटे ढीग केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते तरी गोगल गाय पासून होणाऱ्या १०% नुकसान व १००% भाजीपाला दर्जा व प्रत राख णेसाठी वरील प्रमाणे एकात्मिक नियंत्रण उपाय अमलबजावणीचे अहवान तालुका कृषि कार्यालयाने केले आहे.