आंतरराष्ट्रीय

रियल लाइफ चे हिरो हे मेजरअनिल मानेंसारखे असतात- आय आर एस समीर वानखडे


नातेपुते (पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे)- बीएसएफ मधून नुकतेच रिटायर झालेले नातेपुते चे सुपुत्र मेजर अनिल माने यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल नातेपुते कर यांच्यावतीने सन्मान सोहळा आयोजित केला होता. या सन्मान सोहळ्यास सुप्रसिद्ध आय आर एस समीर वानखडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
बोलताना ते म्हणाले की रियल लाईफरियल लाइफ चे हिरो हे मेजर अनिल माने यांच्यासारख्या असतात अनिल माने यांनी माझ्यासोबत ड्रग्स मिशनमध्ये तीन वर्ष काम केले आहे.अनिल हा जिगरबाज पोलादी व धाडसी होता.अनिल ने त्याच्यासोबत अनेक बीएसएफ मधील जवान आमच्या सोबत जोडले व आतापर्यंत कुख्यात 357 गॅंगस्टर आम्ही पकडले आहेत.70 गुंडांना फक्त पाच जवानांनी अडवले होते. त्यात अनिल माने एक होता.अशाप्रकारे मेजर अनिल माने यांचे कौतुक त्यांनी केले.सध्या मुलांना खरा राष्ट्रवादी समजून सांगितला पाहिजे व मुलांना आयएस आयपीएस अधिकारी बनवले पाहिजे.
प्रसंगी मा आमदार रामहरी रुपनवर, शिवामृत दूध संस्थेचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच समीर वानखडे यांच्या पत्नी सिने अभिनेत्री क्रांति रेडकर बोलताना म्हणायला पाहिज अनिल माने हा माझ्या भावासारखा आहे.साहेबांची सावली बनून तो नेहमी राहिला आहे.अशा देशासाठी रक्त वाहणाऱ्यालोकांची गाथा मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.सह पत्नी मेजर अनिल माने यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना मेजर अनिल माने भाऊक झाले व म्हणाले हा माझा एकट्याचा सन्मान नसून माझे आई-वडील व माझे सर्व गुरु यांचा सन्मान आहे.याप्रसंगी बा.ज.दाते प्रशालेचे चेअरमन धर्यशील भाऊ देशमुख,रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष एन के साळवे,माजी सरपंच डी वाय राऊत,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मा पं समिती सदस्य माऊली पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,एडवोकेट पिसाळ,पंचक्रोशीतील माजी सैनिक,ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले.

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ॲट्रॉसिटीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना


पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क संदेश भालेराव मुंबई

वैभवजी गीते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला ऐतिहासिक यश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारी आहोत…ऍड.डॉ.केवल उके

ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यासाठी नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले होते.
राज्य महासचिव ऍड.डॉ. केवल उके यांच्या नेतृत्वात ऍड.अनिल कांबळे,विनोद जाधव,पी.एस.खंदारे, पंचशीला कुंभारकर,शरद शेळके,बंदिश सोनवणे,शशिकांत खंडागळे,संदेश तुकाराम भालेराव यांनी महामहीम राज्यपाल यांना भेटून निवेदन दिले होते.
तसेच जंक्शन ता.इंदापूर जी.पुणे येथे दलीत पँथरच्या वर्धापन दिनी वैभव गिते यांनी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला होता.
मुंबई मराठी पत्रकार संघात परिषदेत बोलताना ही समिती नसल्याने शासनाच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
पुणे येथे जाती तोडो समाज जोडो या मॅक्स महाराष्ट्र आयोजीत कार्यक्रमात बोलताना वैभव गिते यांनी या समितीची स्थापना नसल्याने अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे सांगून सरकारला घेरले होते.
मावळ जी.पुणे येथील जाती तोडो समाज जोडो या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत समिती नसल्याने कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे उदाहरणांसह सांगीतले.महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पत्रकार परिषदा घेत ही समिती स्थापन करून बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती.याची दखल घेऊन
शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 24 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत शासनाने राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना केली आहे.
या समितीची कार्ये खालील प्रमाणे

1) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय,२०१५) व सुधारित नियम, २०१६ ची अंमलबजावणी राज्यात योग्य रितीने व काटेकोरपणे होते किंवा कसे याचा आढावा घेणे तसेच या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

2) अत्याचारग्रस्त,अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य / मदत नियमांनुसार देण्यात येते किंवा कसे, याबाबतच्या प्रकरणांचा आढावा घेणे.

3) अत्याचारग्रस्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व्यक्तींचे पुनर्वसन इ. नियमानुसार व तात्काळ करण्यात येत आहे किंवा कसे, या संदर्भातील प्रकरणांचा आढावा घेणे.

4) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ (सुधारित अधिनिमय, २०१५) व सुधारित नियम, २०१६ अंतर्गत पोलिसात दाखल करण्यात आलेले गुन्हे/न्यायालयात दाखल करण्यात आलेली प्रकरणे यांचा आढावा घेणे. या अधिनियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी संबंधित संस्था / अधिकारी/
कार्यालयाकडून होते आहे किंवा कसे याचा आढावा घेणे.

5) या अधिनियमांतर्गत नियमांचे उल्लंघन अथवा अंमलबजावणीसंबंधी शासनास प्राप्त अहवालांवर कार्यवाही करणे
समितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री,अनुसूचित जातीतील खासदार,आमदार व सर्व वरिष्ठ अधिकारी असे एकूण 25 जन आहेत.
या समितीच्या एका कॅलेंडर वर्षात जानेवारी व जुलै या महिन्यांत १-१ अशा २ बैठका आयोजित कराव्यात.
यापूर्वी दि. ८ जानेवारी, २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीचे पुनर्गठण करण्यात आले होते.याची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत दिनांक.
झाली होती.तेव्हापासून आजतागायत या कायद्याच्या अंमलजावणीसाठी मुख्यमत्र्यांनी एकही बैठक घेतलेली नाही.सध्या
समिती स्थापन झाल्याने तात्काळ बैठक आयोजित करून कार्यवाही करावी अशी मुख्यमंत्री यांच्या कडून अपेक्षा आहे.यासाठी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले व त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे,संविधान प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे,
व एन.डी.एम.जे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व पत्रकार बांधवांचे सहकार्य व मार्गर्शन मिळाल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना वैभव गिते यांनी दिली.

पिरळेत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन


  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
    पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सोमवार दिनांक 17जुलै रोजी सकाळी दहा वाजता जि प शाळा परळी येथे
    ग्रामपंचायत पिरळे व द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्था यांचे संयुक्त विद्यमाने
    *भव्य रांगोळी स्पर्धा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे ब्रिलियंट संस्थेच्या वतीने महिलांसाठी मोफत शिवण क्लास घेण्यात आले होते अनेक महिलांनी या शिवण क्लास प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवला होता प्रशिक्षण शिबिराचा समारोप तसेच प्रमाणपत्र वाटपासोबत रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यातत आले आहे या स्पर्धेसाठी
    *प्रथम बक्षीस**
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
    द्वितीय वक्षिस*
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह
    तृतीय बक्षिस*
    माझी वसुंधरा सन्मानचिन्ह अशाप्रकारे बक्षीस असून स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियम राहतील
    स्पर्धा नियम*
    (१) स्पर्धेसाठी रांगोळी स्वतःची आणावी.
    (२) रांगोळी काढताना त्यातून सामाजिक संदेश गेला पाहिजे
    (३) रांगोळी काढताना स्वतः चे नाव टाकायचे नाही संयोजक कडून नंबर घेउन टाकायचा.
    (४) रांगोळीचे बक्षिसाचे नंबर हे तुमच्या रांगोळीतून सामाजिक संदेश, आकृती, रंगरंगोटी कशी आहे यावर अवलंबून असते. यावर तक्रार चालणार नाही.
    *(५) रांगोळी स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे **
    (६) रांगोळी स्पर्धेत कोर्स करणाऱ्या महिलांनी व बाहेरील महिलांनी ही सहभाग घेऊ शकतात.
    (७) रांगोळी स्पर्धाचे परीक्षक हे बाहेरील असतील. त्यामुळे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
    दिनांक १७जुलै २०२३वार सोमवार वेळ सकाळी १०.००वाजता*
    ठिकाण :- जि.प.प्राथमिक शाळा पिरळे*
    तरी सर्वांनी रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्याचे आव्हान पिरळे गावचे सरपंच सुनिल दडस, उपसरपंच अमोल शिंदे ,ग्रामसेवक हनुमंत वगरे द ब्रिलियंट हेल्थ अँन्ड अँग्री संस्थेचे संस्थेच्या अध्यक्षा मनिषा शिंदे यांनी केले आहे.

विद्यार्थी हितासाठी धडपडणारे शिक्षक अभिजीत वाळके यांनी स्वखर्चातून विद्यार्थी हजेरी साठी बसवली बायोमेट्रिक मशीन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
नातेपुते येथील
नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विभागांमध्ये इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक अभिजीत वाळके यांनी स्वखर्चातून विद्यार्थी हजरीसाठी बायोमेट्रिक मशीन बसविली. गेली पंचवीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग तसेच विद्यार्थ्यांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमाची ओळख निर्माण करणारे अभिजीत वाळके सर यांनी यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. इयत्ता चौथी पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा असताना आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 50 विद्यार्थी शिष्यवृत्ती आणले आहेत. तसेच गतवर्षी इयत्ता दुसरीचा वर्ग असताना एकही रविवार सुट्टी न घेता व दिवाळी उन्हाळी सुट्टी मध्ये शाळा घेऊन कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिन्यात एकही दिवस गैरहजर न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन पर वेगवेगळी बक्षिसे पॅड, वॉटर बॉटल, कंपास पेटी ,टिफिन बॅग स्वखर्चातून देऊन विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्यास प्रेरित केले तसेच. यावर्षी इयत्ता तिसरीच्या वर्गासाठी स्वखर्चातून बायोमेट्रिक मशीन बसवून नवीन उपक्रम सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यात हा इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक पद्धतीवर हजरी घेण्याचा पहिलाच प्रयोग आहे. या गोष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बायोमेट्रिक पद्धतीवर हजेरी देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे कुतूहल मनाला खूप समाधान देत होते असे वर्गशिक्षक अभिजीत वाळके यांनी सांगितले. आज सदर बायोमेट्रिक मशीनची अनावरण करण्यासाठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कूडलिक इंगळे , ज्येष्ठ शिक्षकं संजय जाधव,दादासाहेब देवकाते मनोज पवार, रवी ननवरे , मारूती भांगरे , सूनिल कदम , इंगोले, किशोर,भरते, संतोष वाघमोडे , सागर बरडकर, शिक्षकेतर कर्मचारी विनायक चांगन हे सर्व उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक कूडलिक इंगळे यांनी उपक्रमाचे कौतुक करून शिक्षकांनी सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या प्राथमिक विभागाचे नाव उज्वल करावे असे आवाहन सर्व शिक्षक बांधवांना केले.

माळशिरस येथे शाहूमहाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न

माळशिरस येथे शाहूमहाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न
नातेपुते (प्रतिनिधी)


माळशिरस येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूमहाराज यांची जयंती नालंदा बुध्द विहार ट्रस्ट च्या वतीने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवात सा.गटशिक्षणाधिकारी करङे, जि प सदस्य बाळासाहेब धाईजे , नुतन कृषी अधिकारी पंकजजी लोंढेसाहेब यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 10 व 12 वी मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थीनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक मुला मुलींना एक झाङ भेट देण्यात आलं तसेच जिल्हा परिषद शाळेतील गरीब व होतकरू पहिली ते सातवीतील मुला मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नूतन कृषी अधिकारी पंकज लोंढे, सुहानी पोपट गेजगे या मुलीने पुणे येथे झालेल्या तायकांदो कराटे स्पर्धेत ब्राॅज पदक मिळविल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. छत्रपती शाहूमहाराज यांच्या जीवनावर प्रा दिपक धाईजे सर , ङाॅक्टर कुमार लोंढेसाहेब, प्रदिप धाईजे व जि प सदस्य बाळासाहेब धाईजे यांनी मनोगत व्यक्त केले नालंदा बुद्ध विहार परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांनी केले. या कार्यक्रमास जेष्ठ नेते आबाजी सावंत, अशोकबापु धाईजे ट्रस्टचे अध्यक्ष विकासदादा धाईजे, मिलींद सरतापे ,विशाल साळवे , दशरथ नवगीरे , सरपंच रजनीश बनसोङे , दादा नामदास , रणजीत सातपुते , राम कांबळे , चंद्रकांत कांबळेगुरूजी , रमेश धाईजे , रणजीत सरवदे , ङाॅक्टर राहुल केंगार , मोहन करङे , मिलींद गायकवाड, किरण धाईजे , बुध्दभूषण धाईजे , अतुल धाईजे ,अक्षय जाधव, लखन बेंद्रे ,बुध्दभूषण बनसोङे , तसेच जि प शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. रणजीत धाईजे उपस्थित आमच्या आभार व्यक्त केले.

नितीन आगे चे वडील राजू आगे यांचा संघर्ष महाराष्ट्रातील इतर पीडितांना सदैव प्रेरणा देत राहील…वैभव गिते

मुंबई मंत्रालय येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या केबिनला सम्राट पेपरच्या आलेली बातमी लावून प्रशासनाचा निषेध करताना पीडित राजू आगे व सोबत एन डी एम जे राज्यसचिव वैभव गीते
आय एआय ए एस नोडल ऑफिसर हर्षदीप कांबळे साहेब यांची मंत्रालय येथे भेट घेताना पीडित राजू आगे श्रावण उदागे व राज्यसचिव वैभवव गीते

राजू आगे यांनी मृत्यू स्वीकारला पण आरोपींच्या दबावाला व अमिषाला बळी पडले नाहीत…..अमोल सोनवणे (विशेष सरकारी वकील)

नातेपुते प्रतिनिधी (प्रमोद शिंदे)-
दिनांक पाच जून 2023 रोजी खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणातील फिर्यादी नितीनचे वडील राजूू आगे यांचं अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यासाठी एन डी एम जेराज्यसचिव वैभव गीते व विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे व कार्यकर्ते खर्डा येथे उपस्थित होते.
त्याप्रसंगी बोलताना वैभव गीते म्हणाले की राजू आगे साहेबांचा संघर्ष महाराष्ट्रातील इतर पीडीतांना सदैव प्रेरणारणा देत राहील. पुढे ते म्हणाले की
खर्डा ता.जामखेड जि.अहमनगर येथे 2014 मध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयावरून शाळकरी विद्यार्थी नितीन आगे यास हाल हाल करून ठार मारून गळफास घेतल्याचा बनाव करण्यात आला. परंतु नितीन चा निरखून खून झालेली वृत्तपत्रांच्या माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यावेळेस अनेक संघटनांनी व नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या व प्रशासनावरती दबाव येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपींना अटक करण्यात आली. त्यावेळी राजू आगे यांना अनेक आंबेडकरी नेत्यांनी मदत केली. त्यानंतर त्यांच्याकडे कोणी पाहिलं नाही परंतु एन डी एम जे चे राज्यसचिव वैभव गीते यांनी


ऍड.डॉ. केवल उके यांच्या आदेशाने व मार्गर्शनाखाली खर्डा गावात त्याच म्हणजे दिवशी भेट दिली.गुन्हा दाखल झाला.
जामखेड पोलिस स्टेशन,कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी, अहमनगर पोलिस अधीक्षक,जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा केली चार वेगवेगळ्या संघटनांनी स्वतःच्या लेटर हेडवर विशेष सरकारी वकील मिळण्यासाठी निवेदने दिली.आणि प्रत्येकाने स्वतःचा एक वेगळा वकील विशेष सरकारी वकील म्हणून मिळावा यासाठी निवेदने दिली.सरकारच्या समोर पेच पडला की कोणता अर्ज मंजूर करायचा यामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती रखडली.यास राजू आगे जबाबदार नसून भेटी देऊन भाषणे करून जाणारे अध्यक्ष त्यांच्या संघटना व पक्षांचे स्वयंघोषित नेतेच कारणीभुत होते
राजू आगे यांना समाजकल्याण विभागाची आर्थिक मदत मिळण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे न्हवती.ती कागदपत्रे काढण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे न्हवते. वैभव गीते यांनी त्यांना घेऊन रेशनकार्ड, जातीचा दाखला काढण्यासाठी मदत केली आणि कागदपत्रे काढली.त्यांना मदत मिळवून दिली.काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या परीने आर्थिक मदत केली.राजू आगे यांना आंबेडकर प्रतिष्ठान दिल्ली येथील अनुदान मिळण्यासाठी दिल्लीला घेऊन जाऊन मदत मिळवून दिली जोपर्यंत राजू आगे यांच्याकडे पैसे होते तोपर्यंत नातेवाईकांनी व अहमनगर मधील काही स्थानिक नेत्यांनी आगे यांना अक्षर शः लुटले.
आगे यांची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने माझ्या कुटुंबाचे पुनर्वसन करा माझ्या मुलीला नोकरी लावा अशी विनंती आगे यांनी माझ्याकडे केली.परंतु अट्रोसिटी ॲक्ट मध्ये कमवता व्यक्तीची हत्या झाली तरच पुनर्वसन करण्याची तरतूद असल्याने पुनर्वसन करण्यात अडचणी येत होत्या जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अनेकवेळा आगे यांचे पुनर्वसन करता येणार नाही म्हणून फाईल रिजेक्ट केली होती. पाठपुराव्यासाठी येण्या जाण्यासाठी सुद्धा आगे यांच्याकडे पैसे नसायचे आम्ही त्यांना येण्याजण्यासाठी थोडीफार मदत करायचो पुढे जाऊन आयुक्त समाजकल्याण पुणे या कार्यालयाच्या पुढील आंदोलने,राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग,राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्ली,मंत्रालयात मंत्री,सचिवांच्या भेटी घेणे नित्याचे झाले.adv.केवलजी उके साहेबांचे मार्गदर्शन मिळायचे कायद्यातील बारकावे उके साहेब समजावून सांगायचे त्यामुळे अधिक सुलभता येत गेली.यादरम्यान अनेक वेळा पाठपुरावा करताना राजू आगे व माझा छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन गिरगाव चौपाटीवर मुक्काम झाला.राजू आगे घरून येताना चटणी व ज्वारीची भाकरी बांधून आणायचे आम्ही दोघेजण एकत्र बसून जेवायचो त्यांनी घरून आणलेली चटणी व भाकरीतील चव अन्य कोणत्याही जेवणास येणार नाही.


पुनर्वसनाचे काम जर मुख्यमंत्र्यांनी स्पेशल केस म्हनून सही केली तरच काम होईल अन्यथा होणार नाही हे समजताच सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला रामदास आठवले यांनी व त्याचे स्विय सहाय्यक यांनीही खूप मदत केली. अधिवेशनात मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वेळ मिळावा म्हणून रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्याकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजकुमार बडोले यांनी त्यांच्या दालनात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली यामध्ये नितीन आगे,सागर शेजवळ,माणिक उदागे या तीन गुन्ह्यांवर चर्चा होती.पीडित कुटुंबाच्या बाजूने ॲड.डॉ. केवल उके,वैभव गिते,पी.एस.खंदारे हे तर अधिकारी म्हणून आयुक्त समाजकल्याण पुणे मिलिंद शंभरकर,प्रधान सचिव दिनेश वाघमारे,अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सी.एल.थुल हे उपस्थित होते.आमचा युक्तिवाद कायदेशीर व परीणामकारक ठरला कायद्यातील बारकावे दाखवत आम्ही अधिकाऱ्यांवर भारी पडलो.आणि तीनही कुटुंबांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आदेश मंत्रालयातून स्पेशल फाईल द्वारे निघाले.एकावेळी तीन कुटुंब उभा करू शकलो याचा आनंद झाला.पुढे राजू आगे यांना जामखेड मधील शहरातील जागा घरकुल बांधण्यासाठी मिळवली घरकुल मंजूर करून त्यामध्ये घर बांधले.राजू आगे यांची मुलगी मुलींचे वसतिगृह येथे शासकीय नोकरीवर जाऊ लागली आणि राजू आगे यांची उपासमार थांबली.
पुढे केसमध्ये आरोपी यांनी जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु आम्ही त्यांना जामीन मिळू दिला नाही.राजू आगे यांना मदत करण्यासाठी ॲड.विलास लोखंडे अंबाजोगाई हे टूव्हीलर वर अहमनगर कोर्टात यायचे.दरम्यान माझ्यावर खोटी केस दखल करून मला जेलमध्ये टाकून माझा एनकाऊन्टर करण्याचा प्रयत्न झाला
मला जेलमध्ये टाकताच नितीन आगे यांचा खटला सुरू झाला आणि मी जेलमधून जामिनावर बाहेर येईपर्यंत हा खटला निर्दोष झाला होता.महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याने राजू आगे यांना या दरम्यान मदत केली नाही.साक्षीदार फितूर झाले.आणि खटला निर्दोष झाला
आम्ही आंदोलन सुरू केले महाराष्ट्रातून तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या चैत्यभूमी दादर येथे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना भेटून निवेदन दिले.बडोले यांनी या खटल्यात अपिलात जाण्याचे आदेश दिले.मंत्रालयात बैठक झाली या बैठकीस मी उपस्थित होतो राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सी.एल. थूल यांना पुन्हा नितीन आगेंच्या घरी जाऊन माहिती घेण्याचे आदेश दील्याने आयोग खर्डा येथे आला त्याचवेळी ॲड.नितीन सातपुते यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली नंतर महाराष्ट्र सरकार च्या वतीने मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अपील दखल करण्यात आले.फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर कोर्टात दाखल झाला.राजू आगे यांना धमक्या येऊ लागल्याने पोलीस संरक्षणाची गरज भासू लागली.आम्ही सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना रात्रीच्या 1 वाजता सोलापूरच्या शासकीय विश्रागृहावर भेटलो.तेथून पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना फोन झाले व राजू आगे यांना पोलिस संरक्षण मिळाले.नवीन सरकार येताच राजू आगे यांचे पोलिस संरक्षण काढण्यात आले आम्ही पुन्हा मंत्रालयीन पाठपुरावा करून पोलिस संरक्षण मिळवले.याचवेळी उच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी साठी आम्ही गेल्यावर कळले की या खटल्यात शासनाने नेमलेले विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी अचानक या खटल्यातून माघार घेतली.आत्ता नवीन बाका प्रसंग उभा राहिला नवीन विशेष सरकारी वकील नियुक्ती करणे त्याचवेळी फितूर साक्षीदारांवर कारवाईचा खटला अहमनगर कोर्टात सुरू होता.आणि दोन्ही केसमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली न्हवती अशा कठीण प्रसंगात राजू आगे यांना विविध आजारांनी घेतले.अनेकवेळा मला फोन करून बोलायचे मी त्यांना उपचारासाठी माळशिरस तालुक्यात बोलावले होते नंतर जास्त आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. आम्ही नांदेड येथे अक्षय भालेराव खून प्रकरणात भेट देण्यासाठी गेलो असता तिथे राजू आगे हे जग सोडून गेल्याची बातमी समजली आणि आम्ही खर्डा या गावी निघालो
स्मशानभूमीत जाऊन राजू आगे यांना सेल्यिट केला.श्रद्धांजली दिली.

राजू आगे यांच्या कार्याला सॅल्यूट करताना वैभव गिते विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे अनिकेत मोहिते आजिनाथ राऊत प्रमोद भोसले गोरख साळवे नवनाथ भागवत यांच्यासह पदाधिकारी
माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले याची पहाटे भेट घेऊन राजू आगे यांना पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली
माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून राजू आगे श्रावण उदागे व आकाश शेजवळ यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात वैभव गीते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
पिढीतांचे पुनर्वसन व्हावे म्हणून विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालया पुढे वैभव गीते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर राजू आगे यांची मुलगी दुर्गा आगे सागर शेजवळ चा भाऊ आकाश शेजवळ माणिक उदागे चा भाऊ श्रावण उदागे त्यांना नोकरी मिळाली वतुकाराम दानाने यांना चार एकर जमीन मिळाली या आंदोलनात संघटक अंपल खरात पंचशीला ताई कुंभारकर संजय झेंडे दलित टिपके पुणे सोलापूर सातारा येथील कार्मयकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

या सर्व लढाईत राजू आगे गरीब असताना सुद्धा आरोपींच्या आर्थिक अमिषाला बळी पडले नाहीत.मुलाच्या आरोपींना शिक्षा होण्यासाठी राजू आगे यांनी शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत लढत राहिले,लढत राहिले,लढत राहिले या पाठपुराव्यात मला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व त्यांचे स्विय सहाय्यक प्रवीण मोरे यांचे विशेष सहकार्य मिळाले राजू आगे हे खरे संघर्ष योद्धा आहेत.नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली.अशाप्रकारे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंत्रालयात पुनर्वसना संदर्भात पीडित राजू आगे सागर शेजवळ चा भाऊ आकाश शेजवळ माणिक उदागे चा भाऊ श्रावण उदागे व या पिढीताना सोबतसोबत घेऊन एनडीएनजे राज्यसचिव वैभव गीते
खर्डा येथे राजू आगे यांच्या कुटुंबाची भेट घेताना राज्य सचिव वैभव गीते राज्य संघटक अंपलजी खरात प्रमोद शिंदे व एन डी एम जे टीम
अनुसूचित जाती आयोग सदस्य सी एल थूल यांची भेट घेताना
डॉक्टर केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य माझी न्यायाधीश सी एल लथूल नोडल ऑफिसर दिनेश वाघमारे
यांची भेट घेऊन पुनर्वसना संदर्भात चर्चा करताना शिष्टमंडळ

माळशिरस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान सशक्त नारी समृद्ध भारत शिबिराचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- समिती माळशिरस येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान, सशक्त नारी समृद्ध भारत शिबाराचे उद्घाटन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , माळशिरस नगर पंचायतीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, भाजपा किसान जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, तहसीलदार तुषार देशमुख साहेब , गट विकास अधिकारी विनायक गुळवे साहेब माविम चे सोमनाथ लामगुंडे साहेब, ICDS विभागाचे बालाजी अलडवार व विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे – फडणवीस सरकार च्या वतीने माता – भगिनीना असणाऱ्या अडचणी जागेवर सोडवण्यासाठी  व महिलांचे सक्षमीकरण  होईल या दृष्टीने या शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महिला मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

पिरळे-फोंडशिरस रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचं नागरिकांची तक्रार

पिरळे-फोंडशिरस रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचं नागरिकांची तक्रार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपिरळे-फोंडशिरस रस्त्याचं काम सध्या सुरूआहे.जवळपास तीन कोटी रुपये रस्त्याचं  काम असून सुरुवातीलाच निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचं स्थानिक नागरिकांमधून तक्रार होत आहे.या अगोदर सुद्धा पिरळे-नातेपुते फडतरी आठ किलोमीटर रस्ता सुधारणा कामासाठी एक कोटी ५० लाख रुपये चा रस्ता असून तो देखील निकृष्ट दर्जाचा झाल्याचा नागरिकांमधून बोललं जात आहेत या  संदर्भात पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटीलयांना देखील गाव भेटी दरम्यान रस्त्या संदर्भात लोकांनी तक्रार केली होती.सध्या माळशिरस तालुक्याला दोन आमदार असल्यामुळे माळशिरस तालुक्यात रस्त्यांसाठी  आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व आमदार रामभाऊ सातपुतेयांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.परंतु या निधीचा व्यवस्थित वापर होत नसल्याची तक्रार नागरिकांमधून होत आहे.सदर रस्त्यांच्या कामासाठी इस्टिमेट प्रमाणे काम होत नाही व रस्त्यामध्ये डांबर कमी प्रमाणात वापरलं जात आहे.अशाही तक्रारी लोकांकडून होत आहेत बऱ्याच वर्षापासून पश्चिम भागातील रस्ते प्रलंबित आहेत व त्या रस्त्यांची दुरावस्था झाली होती.सदर रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यास एन डी एम जेसंघटनेच्या वतीनेतीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.कामा संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका सुद्धा होत असल्याच दिसून येते.

पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे असे प्रतिपादन ऍड. डॉ.केवल उके यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्र च्या झाडे लावा झाडे जगवा, माजी वसुंधरा,जलशक्ती बेटी बचाव अभियानांतर्गत.महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.याप्रसंगी उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध शाळेला आदर्श शाळा पुरस्कार तसेच विविध संस्था आदर्श ग्रामपंचायत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे कार्यकर्ते,अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  याप्रसंगी चॅनलचे संचालक  विवाह  कायदा मसुदा  समिती सदस्य महाराष्ट्र शासन एन डी एम जे राज्य महासचिवडॉ केवल उके म्हणाले की .डॉ.केवल उके बोलताना म्हणाले आम्ही हे छोटस रोपट म्हणून लावलं होतं.आता त्याचा वटवृक्ष होतानाचा दिसतोय पुढे सुद्धा पुरोगामी महाराष्ट्रची  अशाच पद्धतीने प्रगती होत राहील.


 माजी आमदार रामहरी रुपनवर बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र चे काम हे उल्लेखनीय आहे.त्यांनी शोध पत्रकारिते सोबत समाज उपयोगी अनेक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबवले आहेत त्यांच्या माध्यमातून दीड लाख वृक्ष लागवड झाली आहे. हे कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एम के इनामदार, एन डी एम जे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके,आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, उद्योजक विनोद जाधव तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बुद्धवासी आदर्श शिक्षिका कुमारी सविता साळवे मॅडम सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी  डॉ.एम के इनामदार बोलताना म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनलअतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देत आहे. ,उद्योगपती विनोद जाधव म्हणाले पुरोगामी महाराष्ट्र ने  महाराष्ट्रात चांगले नाव केले आहे आपल्यासारखे पत्रकारमंडळी देशभरात तयार झाली पाहिजे चॅनलच्या उभारण्यासाठी ल्यापिंग ग्रुपच्या वतीने लागेल ती मदत करू.           आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, अरुण तोडकर मा.सरपंच संदीप नरोळे यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पत्रकाराच्या जीवनावरतीआधारित चित्रपट अहम सिनेमा अभिनेता अमीर भाई शेख,अभिनेत्री मृणालीकुलकर्णी हे होते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी मुंबई प्रदेशाध्यक्ष बंदिश सोनवणे,राज्य महिला संघटक पंचशिलाताई कुंभारकर,ए एस आय,शैला साळवे मॅडम,ऍड.सुमित सावंत,प्रशांत खरात,मुंबई ठाणेविभाग प्रमुख संदेश भालेराव संपादक भीमसेन उबाळे, रिपाई तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे सोनवणे सरअंगणवाडी सेविका जि.प व विविध संस्था शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक स्टाफ, आशा स्वयंसेवीका,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेच विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शन सादर केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रशांत खरात यांनी केली होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी,वलेकर सर यांनी केले.पुरोगामी महाराष्ट्रन्यूज चॅनल ही पुरोगामी विचारांची चळवळ आहे-ऍड डॉ.केवल उके

You may have missed