आंतरराष्ट्रीय

श्रीकांत बाविस्कर यांच्या सतर्कतेमुळे दहिगाव रोड वरील टळला अनर्थ


पुरोगामी महाराष्ट्र नेटवर प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी) नातेपुते तालुका माळशिरस येथील दहिगाव रोड येथे विद्युत नियामक आयोग मंडळाचे सदस्य महाराष्ट्र पत्रकार संघ राज्य संपर्कप्रमुख पत्रकार श्रीकांत उत्तम बाविस्कर यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. यासंदर्भात हकीकत अशी की काल सायंकाळी पाच वाजता दरम्यान उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली ने दहिगाव रोड वरील असलेल्या विद्युत वितरण च्या विद्युत वाहक तार ओढली गेली. त्यामुळे ती तार खाली लोंबू लागली त्या ताऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होतात पाठीमागून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये वरती काही ऊस तोड मजुर बसले होते व तार खाली लोंबत असलेले अर्थिंगची तार समजून हाताने बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात श्रीकांत बाविस्कर यांनी मोठ्याने ओरडून सांगितले त्याला हात लावू नका व ट्रॅक्टर चालक मजूर जागेवर थांबले अन्यथा त्या मजुराचा हात लागून अनर्थ झाला असता तात्काळ घटनास्थळी जाऊन श्रीकांत बाविस्कर यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली तात्काळ विद्युत वितरण चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत विद्युत प्रवाह बंद करून लगेच ती तार बांधण्यात आली.स्वतः उभे राहून त्यांनी विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या कडून तार बांधून घेतली. विद्युत वितरण कर्मचाऱ्यांनी सुद्धा आभार व्यक्त केले. त्यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ होता होता टळल्यामुळे परिसरात श्रीकांत बाविस्कर यांचे कौतुक होत आहे.

श्रीकांत बाविस्कर यांच्या सतर्कतेमुळे दहिगाव रोड वरील टळला अनर्थ

नातेपुते नगरपंचायत वर बाबाराजे देशमुख गटाचे वर्चस्व 17 पैकी 11जागांवर विजय

नातेपुते नगरपंचायत वर बाबाराजे देशमुख गटाचे वर्चस्व 17 पैकी 11जागांवर विजय

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-सोलापूर जिल्ह्यातील शेवटचे टोक मानले जाणारे माळशिरस तालुक्यातील नातेपुते नूतन नगरपंचायत पूर्वीची ग्रामपंचायत चे 88 वर्षानंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाले व सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी निवडणूक धुमधडाक्यात झाली या निवडणुकीत बाबाराजे देशमुख यांच्या जनशक्ती विकास आघाडीला 17 पैकी 11 जागा चे आघाडी मिळाली असून नगरपंचायत वर बाबाराजे देशमुख गटाचे वर्चस्व झाले आहे तसेच ऍड. बी.वाय.राऊत यांच्या नागरी विकास आघाडीचे 5 उमेदवार निवडून आले आहेत व एक उमेदवार अपक्ष निवडून आला आहे. तर इतर पॅनल ला खाते उघडता आले नाही. उमेदवार यादी व पडलेली मते पुढीलपमाणे
प्रभाग क्र १ अतुल पाटील२९०(विजयी) जनशक्ती विकास आघाडी ,राहुल काळे (नागरी विकास आघाडी) २०७, प्रभाग २ संगीता काळे ३१५ (विजयी)(जनशक्ती विकास आघाडी),रत्नप्रभा काळे १११ (नागरी विकास आघाडी), सीमा बाविस्कर ४७ (समाजभुषण पॅनल), प्रभाग क्र ३ सुरेश सोरटे १२३ (विजयी)(जनशक्ती विकास आघाडी), अभिजीत वाळके १०७(अपक्ष) अविराज सोरटे १०१(अपक्ष) हनमंत सोरटे ४१(अपक्ष) सुहास सोरटे ३०(अपक्ष) समीर सोरटे २२(अपक्ष) समीर नलावडे२० (वंचित बहुजन आघाडी), धवल कसबे १७ (अपक्ष)उत्कर्ष सोरटे ६(समाजभुषण पॅनल) शुभम सोरटे २(अपक्ष) प्रभाग ४ क्र भारती पांढरे२६३ (विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,दिपाली सातपुते ६०(समाजभुषण पॅनल),कोमल पवार ५०(नागरी विकास आघाडी),सुनिता सावंत ३७(वंचित बहुजन आघाडी),प्रभाग क्र ५ मालोजीराजे देशमुख५३३(विजयी)जनशक्ती विकास आघाडी , विजय देवकाते ४६८(नागरी विकास आघाडी),राजदीप देशमुख ४५(अपक्ष),शिवशंकर पांढरे २७(समाजभुषण पॅनल),नयन कुचेकर १०(वंचित बहुजन आघाडी),प्रभाग ६ क्र आण्णा पांढरे२९४ (विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,सुरेश पांढरे २७५(नागरी विकास आघाडी),दत्तात्रय कचरे ११३(अपक्ष),सलमान शेख १८(वंचित बहुजन आघाडी),प्रदीप ननवरे ६(मनसे),प्रभाग ७ सविता बरडकर२८८(विजयी)नागरी विकास आघाडी ,स्वाती बरडकर २२७(जनशक्ती विकास आघाडी),प्रभाग ८ क्र रणजीत पांढरे २१७ (विजयी) जनशक्ती विकास आघाडी,चंद्रकांत काळे ७९(समाजभुषण पॅनल),अमोल भोसले ५७(अपक्ष), अंकुश कचरे ४३(अपक्ष),दत्तात्रय वायदंडे २१(अपक्ष),पारूबाई बरगडे १५(अपक्ष),विठ्ठल ठोंबरे १४(अपक्ष),शेखर साळवे ०(अपक्ष),प्रभाग ९ क्र दिपक काळे४१३(विजयी)नागरी विकास आघाडी,वैभव कवितके ३१८(जनशक्ती विकास आघाडी,रविंद्र काळे २७(समाजभुषण पॅनल),प्रभाग क्र १० स्वाती बावकर५०१(विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,पल्लवी माने १४१(नागरी विकास आघाडी),सुनिता बोडरे १११(अपक्ष),रतन सरक ६८(समाजभुषण पॅनल),नंदिनी ठोंबरे २७(अपक्ष),प्रभाग क्र ११ भानुदास राऊत१८८(विजयी)(नागरी विकास आघाडी) ,बाळू बोराटे १३२(जनशक्ती विकास आघाडी), अशोक राऊत ४६(समाजभुषण पॅनल),प्रभाग क्र १२ उत्कर्षाराणी पलंगे३३८(विजयी)(जनशक्ती विकास आघाडी) ,संध्या सोरटे २४२( नागरी आघाडी ),ज्योस्ना साळवे १७ समाजभुषण पॅनल,प्रभाग १३ अनिता लांडगे२९१ (विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,ज्योती लांडगे १९०(नागरी विकास आघाडी),कोमल साळवे १४८(समाजभुषण पॅनल),प्रभाग १४ शर्मिला चांगण२९७(विजयी)अपक्ष ,अनारकली बागवान १५७(जनशक्ती विकास आघाडी),मंगल इंगोले ९७(अपक्ष),शहीदा काझी ५०(अपक्ष),प्रभाग क्र १५ माया उराडे३५०(विजयी)नागरी विकास आघाडी ,दिलशाद नदाफ ३३०(जनशक्ती विकास आघाडी),प्रभाग क्र १६ राजेंद्र उराडे४१३(विजयी)नागरी विकास आघाडी,अक्षय भांड ४००(जनशक्ती विकास आघाडी),राहुल पदमन ६७(अपक्ष),धवल कसबे ६(अपक्ष),अमोल लंबाते ३(वंचित बहुजन आघाडी),संजय नाचण ०(अपक्ष),प्रभाग क्र १७ दिपिका देशमुख४६५(विजयी)जनशक्ती विकास आघाडी ,ज्योती साळुंखे २३७(नागरी विकास आघाडी),राफिया आतार ११६(समाजभुषण पॅनल),गीतांजली पिंपळनेरकर ४४(वंचित बहुजन आघाडी) अशा प्रकारे मतदान पडलेली उमेदवारांची यादी असूनया निवडणुकीत जनशक्ती विकास आघाडीला एकूण-११ जागा मिळाल्या तर नागरी विकास आघाडीला एकूण-५ जागा मिळाल्याअपक्ष-१ जागा मिळाली असे एकूण 17 उमेदवार निवडून आले आहेत तसेच या निवडणुकी मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने सुद्धा ताकत लावली होती स्वतः रष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेवजी जानकर यांनी प्रचार रॅली काढली होती.तसेच अनेक घटकांना घेऊन राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली समाजभूषण पॅनल च्या माध्यमातून उमेदवार उभे केले होते.परंतु या पॅनला एकही जागा मिळाली नाही तसेच वंचित बहुजन आघाडी व मनसे व अपक्ष उमेदवार यांनीही प्रयत्न केला परंतु त्यांना ही जागा मिळवता आली नाही. या निवडणुकीच्या निकालाचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर यांनी चोखा पार पाडली निवडणूक पार पाडण्यासाठी परिसरातील तलाठी प्रशासकीय कर्मचारी व नगर पंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.तसेच पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय मनोज सोनकर व पोलीस कर्मचारी यांनी पोलिस बंदोबस्त कायदा व सुव्यवस्था राखत शांततेत निवडणूक पार पडली. निवडून आलेल उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळण करून आनंद व्यक्त केला .आता नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या आकर्षण म्हणजे सत्तर वर्षात पहिल्यांदाच वडार समाजाला प्रतिनिधित्व मिळाला आहे त्यामुळे वडार समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

जनशक्ती विकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर नातेपुते येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजेंद्र पाटील व बाबाराजे देशमुख यांच्यासमवेत आनंदोत्सव साजरा करताना विजयी उमेदवार
70 वर्षात पहिल्यांदा वडार समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे वडार समाजातील कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

दहिगाव रोडला घाणीचे साम्राज्य, गटारी तुंबल्या रस्त्यावर कचरा,कचरा कुंडीची नागरिकांची मागणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी) नातेपुते तालुका माळशिरस येथे दहिगाव रोडवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तसेच गटारी तुंबल्या आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. दहिगाव रोड येथील येथील नागरिकांच्या आरोग्या चा प्रश्न निर्माण झाला आहे.दहिगाव रोडला एक ही कचराकुंडी नसल्याने कचरा टाकण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याचे काम हे अनेक दिवस रखडल्याने गटारी तुंबल्या जात आहेत.तात्काळ कचराकुंडी व गटार सफाई चे काम करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या नगरपंचायत चे इलेक्शन सुरू आहे परंतु कोणाचेही लक्ष या समस्यांकडे नसल्याचे दिसून येत आहे.

दहिगाव रोडला घाणीचे साम्राज्य, गटारी तुंबल्या रस्त्यावर कचरा,कचरा कुंडीची नागरिकांची मागणी
दहिगाव रोड वरील तुंबलेल्या गटारी

नातेपुते नगरपंचायत निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचे उद्या मतपेटीतून उघडणार नशीब, जनसेवा करण्याची मिळणार सुवर्णसंधी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते प्रतिनिधी : नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 20 22 हे ऐतिहासिक निवडणूक मानली जाते निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे नशीब मतदारांच्या हातून उद्या मतपेटीच्या माध्यमातून उघडले जाणार उद्या सकाळी दहा वाजता निकालास प्रारंभ होईल.कोणाचे पारडे जड होणार हा उद्याचा येणारा दिवस सांगू शकेल नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १३ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उरलेल्या ४ प्रभागासाठी ‌‌‌‌आज दिनांक १८/०१/२०२२ रोजी ८१.५७ % मतदान ‌‌‌ झालेले आहे ३१८० पैकी २५९४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला‌‌ असून शांततेत व ‌‌‌‌चोख पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली
‌‌‌‌प्रभागनिहाय झालेले मतदान खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक ( ७ ‌‌‌‌) साठी एकूण पुरुष मतदान 320 पैकी 272 झालेले मतदान,स्त्री एकूण मतदान 285 पैकी 252 झालेले मतदान, या प्रभागात ६०५ पैकी ‌५२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला 
प्रभाग क्रमांक ( ८ ) साठी एकूण पुरुष मतदान 263 पैकी 225 झालेले मतदान,स्त्री एकूण मतदान 261 पैकी 221 झालेले मतदान व इतर 1 या प्रभागासाठी ५२५ पैकी ‌४४७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
प्रभाग क्रमांक ( ९ ) साठी एकूण पुरुष मतदान 489 पैकी 407 झालेले मतदान, स्त्री मतदान 439 पैकी 356 झालेले मतदान ९२८ पैकी ‌७६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
प्रभाग क्रमांक ( १० ) साठी एकूण पुरुष मतदान 570 पैकी 443 झालेले मतदान, स्त्री 552 पैकी 407 झालेले मतदान या प्रभागात ११२२ पैकी ‌८६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
उद्या दिनांक १९/०१/२०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. असून सर्वांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार.

ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिस निरीक्षक गट अ व ब दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रधान करण्याचा गृह विभागाचा प्रस्ताव असंविधानिक- ॲड.डॉ.केवल उके

असंविधानिक चुकीचा प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन करणार-वैभव तानाजी गीते



पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा गृह विभागाचा प्रस्तावित असंविधानिक प्रस्ताव असून तो प्रस्ताव ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणी एन डी एम जे चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके व राज्य सचिव वैभव गिते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे .
, दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याबाबत विधी व न्याय विभागाच्या सहमतीने निर्गमित करावयाच्या अधिसूचनेचे प्रारूप शासनास तात्काळ सादर करण्या बाबतच्या सूचना राज्य पोलीस महासंचालक यांना केल्या आहेत. परंतु सदर निर्णय हा चुकीचा असून तसे झाल्यास अॅट्रॉसिटीच्या खटल्यात येणाऱ्या काळात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊन खटले निर्दोष सुटतील यात मुळीच शंका नाही आणि याचा परिणाम म्हणून राज्यातील अनुसूचित जाती-जमातींवर अन्याय करणारे सरकार म्हणून आघाडी सरकारची प्रतिमा निर्माण होईल याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ व सुधारती अधिनियम २०१५ हा कायदा केंद्रीय कायदा असून महाराष्ट्र शासनासह देशातील सर्वच राज्यांनी आहे तसाच स्वीकृत केला आहे. या मध्ये संपूर्ण देशात केवळ बिहार राज्याच्या मा. राबडीदेवी सरकारने यात काही बदल करण्याचा प्रयत्न वर्ष २००२ मध्ये पोलिस उपधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे तपासात विलंब होत असल्याच्या कारणास्तव केला होता जो अनेक तांत्रिक अडचणीत अद्याप फसला आहे. बिहार सरकारने अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ च्या कलम ९ चा वापर करून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला केसेस मध्ये तपास करण्याचा अधिकार दिल होता परंतु सदर निर्णयाच्या संवैधानीकतेवर अनेक याचिका मा.पटणा उच्च नायलयात दाखल झाल्या होत्या. दिनांक १८ जानेवारी २०११ रोजी मा. पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या.श्रीमती रेखा दोषीत व न्या.श्री ज्योती सरण यांच्या खंडपीठाने “अनिल कुमार वि. बिहार राज्य व इतर” या खटल्यात दिलेल्या निर्णयानुसार ३१ मार्च १९९५ पासून तर ९ ऑगस्ट २००८ पर्यंतच्या हजारो ॲट्रॉसिटीच्या केसेस रद्दबाद करण्याचा आदेश बिहार सरकारला दिला होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे ३ जुन २००२ रोजी बिहार सरकारने निर्देशित केलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला ॲट्रॉसिटी केसेस मध्ये चौकशी करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता व सदर आदेशाला पूर्वलक्षित वर्ष १९९५ पासून लागू करण्यात आले होते. मात्र सदर आदेश राज्याच्या राजपत्रात दिनांक ९ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. ॲट्रॉसिटी नियमावलीच्या नियम ७ नुसार तसे तपासाचे अधिकार फक्त पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच आहेत. म्हणून चौकशी योग्य अधिकाऱ्याने न केल्याच्या तांत्रिक कारणामुळे दिनांक ३१ मार्च १९९५ पासून तर ९ ऑगस्ट २००८ पर्यंतच्या हजारो हजारो अट्रोसिटीच्या केसेस रद्द करून तेथील हजारो अनुसूचित जाती-जमातींच्या पिडीतांना न्याय नाकारला होता ज्याचा राजकीय परिणाम अद्याप बिहार राज्यात अनुभवण्यात येतो. सदर खटल्यात मा. पटना उच्च न्यायालयाने मा.सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास भारतीय संविधानाच्या कलम १३४-अ नुसार आवश्यक असलेली परवानगी नाकारल्यामुळे मुद्दा तिथेच थांबला असला तरीही सदर अन्याय भारतीय अद्याप विसरले नाहीत.

अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९९५ व सुधारित नियम २०१६ च्या नियम ७ नुसार तपासाचे अधिकार उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे आहेत. पोलिस निरीक्षक आणि तत्सम अधिकारी हे स्थानिक दबावात असण्याच्या शंके मुळे तपास निपक्षपाती व गुणवत्तेच्या आधारावर होऊन शिक्षेचे प्रमाण वाढविण्याकरिता ॲट्रॉसिटीच्या केसेसचा तपास उच्चपदस्थ पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडूनच व्हावा असे कायद्याच्या उद्देशीकेतच नमूद आहे. महाराष्ट्र सरकारला अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ व सुधारती अधिनियम २०१५ च्या कलम ९ नुसार तपासाचे अधिकार बहाल करण्याचे मर्यादित अधिकार आहेत परंतु त्यांची व्याप्ती केवळ एखाद्या जिल्हयापूरती व काही केसेस करिता आणि पोलिस अधिकारी व्यतिरिक्त विशेष अधिकारी किंवा पोलिस विभागाव्यतिरिक्त त्यांच्या पेक्षा वरिष्ठ दर्जाच्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्याला किंवा विशेष तपास यंत्रणेच्या अधिकारी वर्गास बहाल करावे असे अपेक्षित आहे. परंतु स्वतःच्या अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन वेगळे नियम बनविण्याचा व नियम ७ मध्ये असा खोडसाळपणा करून बदल करण्याचा अधिकार नसून हे असंविधानिक आहे. यामुळे अत्याचार करणाऱ्यांचे मनोबल वाढणार असून अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींच्या नागरिकांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढणार आहे. तसेच शिक्षेचे प्रमाण सध्या आहे त्यापेक्षाही कमी होणार व तपासात राजकीय हस्तक्षेप सुद्धा वाढणार आहे.

महाराष्ट्र राज्याची प्रतिमा ही पुरोगामी असून महाराष्ट्र आणि बिहार मध्ये फरक आहे. बिहार राज्यात ३८ जिल्हे असून वर्षाला जवळपास ६००० ते ७००० गुन्हे दाखल होतात आणि महाराष्ट्रात वर्षाला जवळपास २५०० ते ३००० गुन्हे दाखल होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो च्या क्राइम इन इंडिया रिपोर्ट २०२० नुसार बिहार राज्यात वर्ष २०२० मध्ये एकूण अनुसूचित जातीवरील अत्याचारचे दाखल गुन्हे ७३६८ इतके तर महाराष्ट्रात २५६९ एवढे आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात एकूण १ लाख ८० हजार एवढी पुरेशी पोलिस यंत्रना असून पोलिस उपाधिक्षक दर्जाचे अधिकारी सुद्धा मुबलक आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गट-ब) दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रदान करण्याचा गृह विभागाचा प्रस्तावित असंविधानिक व अन्यायकारक प्रस्ताव नाकारण्यात यावा ही विनंती. अशाप्रकारे एन डी एम जे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आल्या असून हे निवेदन राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, सामाजिक न्याय मंत्री खासदार रामदास आठवले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना सुद्धा देण्यात आले आहे या निवेदनावरतीॲड.डॉ.केवल उके(राज्य महासचिव),वैभव तानाजी गिते(राज्य सचिव),मा.पी.एस.खंडारे(राज्य सहसचिव), पंचशीला कुंभारकर (राज्य महिला संघटक), प्रमोद शिंदे (राज्य प्रसिद्धीप्रमुख), यांच्या सह्या आहेत

कष्ट, मेहनत,जिद्द व चिकाटी अंगी असावी- माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख-

कष्ट, मेहनत,जिद्द व चिकाटी अंगी असावी- माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख-
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांच्या अंगी कष्ट मेहनत जिद्द व चिकाटी असावी हे असेल तर यश सहज संपादन करता येते शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतेवेळी ते म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती केली आहे.आपण प्रतिकूल परिस्थिती वर मात करून यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा मागे राहिले नाहीत या मुलांना घडविण्यात महिलांचे मोठे योगदान आहे. कोरोनामुळे शासनाने घेतलेल्या शाळा बंद निर्णयाला आमचा सुद्धा विरोध आहे. राज्यातील सर्व शिक्षण संस्थाचालकांनी एकत्र येऊ शाळा सुरु करण्यास शासनास पत्र देणार असून सर्वांनी कोरोनाचं पालन करावं नातेपुते परिसरातील सर्व क्षेत्रातील जीवन संघर्षमय आहे.अशाप्रकारे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
तसेच मुख्याधिकारी माधव खांडेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे अवांतर वाचन आहे ज्ञानार्जन घेता येते वाचनाने शब्दसंपत्ती नेते विद्यार्थ्यांनी रोजनिशी लिहायला शिकलं पाहिजे तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर मार्गदर्शन करताना म्हणाले की शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेची सुरुवात आहे चांगला प्रयत्न केला तर अधिकारी होऊ शकतो. तसेच शिक्षक संघाचे सचिव संभाजी फुले म्हणाले की कोरोना च्या नावाखाली फक्त शाळाच बंद आहे बाकीच्या सर्व गोष्टी सुरू आहेत शाळेला बंधने का शाळा तात्काळ सुरु करावी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास बाबाराजे देशमुख ,मुख्याधिकारी माधव खांडेकर ,एपीआय मनोज सोनवलकर ,संभाजी फुले सर, ज्ञानदीप संस्थेचे मारुती ढोबळे, सर, ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत,लतीफ नदाफ, अभिमन्यू आठवले,विलास भोसले,मनोज राऊत आनंद जाधव श्रीराम भगत महाराज पालक विद्यार्थी शिक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमा चे आयोजन ITSC2020 इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम संस्थेने केले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार आनंद लोंढे,पल्लवी लोंढे,मॅडम सारिका वाघ मॅडम,अंकुश कर्चे यांनी परिश्रम घेतले .

कष्ट, मेहनत,जिद्द व चिकाटी अंगी असावी- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी जि.प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख-
शिष्यवृत्ती यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना नगरपंचायत चे मुख्य अधिकारी माधव खांडेकर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नातेपुते पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी मनोज सोनवलकर
शाळा सुरू झाली पाहिजे असं मनोगतात मागणी करताना शिक्षक संघाचे सचिव संभाजी फुले सर

एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सहसचिव मा .सुनिल ठेंगे यांची सेंट्रल रेल्वे मुंबईओ.एच.ई शाखा चे मुंबई मंडळच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर झाली निवड…!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव कल्याण

ऑल इंडिया एस.सी/एस.टी रेल्वे एम्पलाॅईज असोसिएशन मुंबई झोन दिं.१२/०१/२०२२ ला डॅशिंग जोशीले कार्यतत्पर ओ.एच.ई शाखा चे अध्यक्ष मा.सुनिल ठेंगे यांना मुंबई मंडळच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर निवडून दिल्या बदल सुनिल ठेंगे यांच्या वर शुभेच्छांचा झाला वर्षाव
या वेळेस एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य महासचिव आदरणीय.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेब,
राज्य सचिव आदरणीय वैभवजी गिते साहेब,राज्य सहसचिव मा.पी.एस.खंदारे साहेब,राज्य
प्रसिद्धीप्रमुख मा.प्रमोदजी शिंदे साहेब , मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनवने,सचिव शशिकांत खंडागळे,
ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजयजी कांबळे, ठाणे जिल्हा सचिव मा.विनोद रोकडे ,जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण, मा.संतोष बनसोडे, प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव,
कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष मा.ॲड.प्रविणजी बोदडे,
सचिव मा.संदिप घुसळे,व
.सेंट्रल रेल्वे झोन चे झोनल अध्यक्ष आद.बी.के खोईय्या साहेब
झोनल कार्याध्यक्ष आद. हेमंत जाधव साहेब
झोनल सचिव आद.सतिश केदारे साहेब
झोनल अति सचिव आद.अशोक खरे आणि उपस्थीतत
मुंबई मंडळ नव निर्वाचित पदाधिकारी व ओ. एच. ई. शाखा सचिव भगवान डी राम, कोषाध्यक्ष रविन्द्र कापडे,ओपन शाखा सचिव जे.के आर्या ,जी.रनिंग शाखा अध्यक्ष वी.के गौतम ,
सुनिल ठेंगे यांना शुभेच्छा दिल्या
प्रतिनिधि संदेश भालेराव

पिरळे-दहिगाव रस्ता बनतोय विद्यार्थ्यांच्या अपघाताचे कारण, बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

एन डी एम जे विद्यार्थी संघटना करणार आंदोलन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेपिरळे- दहिगाव हा रस्ता खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात सध्या कोरोना प्रादुर्भाव सुरू असल्याने दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहे पिरळे वरून दहिगाव नातेपुते जाण्यासाठी एसटी नसल्यामुळे विद्यार्थी सायकल वरून शाळेला जातात परंतु या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता सतत खचलेला असतो रस्त्याने जाताना विद्यार्थी व नागरिकांना मोठी जीव घेऊन तारेवरची कसरत करावी लागते अनेकदा या रस्त्याची डागडुजी निकृष्ट दर्जाची व तात्पुरत्या स्वरूपात केली जाते. सतत या रस्त्याचे काम ठेकेदारांना दिले जाते व ठेकेदारांकडून हे काम चांगल्या प्रकारे केले जात नाही सतत रस्त्या मध्ये खड्डे पडतात व रस्ता खचतो या खड्डे भरणे मध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं नागरिकांकडून बोलले जात आहे. पिरळे फोंडशिरस या रस्त्याची सुद्धा तशीच अवस्था आहे गेला महिन्यांमध्येच या रस्त्याचे खड्डे बुजवले आहेत तरीसुद्धा पुन्हा खड्डे पडले आहेत. याला जबाबदार पीडब्ल्यूडी चे अधिकारीच असल्याचं बोलले जात आहे. पिरळे-दहिगाव हा रस्ता सतत वर्दळीचा रस्ता असून नेहमीच वाहनांची ये-जा असते या रस्त्याने जात असताना खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात अपघातामुळे विद्यार्थी व नागरिकांना दुखापत होत आहे भविष्यात या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण?असा सवाल जनसामान्य मधून विचारला जात आहे. तात्काळ रस्ते दुरुस्त करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा एन.डी एम.जे विद्यार्थी संघटनेचे प्रज्ञेश कांबळे यांच्या वतीने करण्यात आला आहे

माळशिरस तालुका ग्राहक पंचायत यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

माळशिरस तालुका ग्राहक पंचायत यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-माळशिरस तालुका ग्राहक पंचायत संघटना यांनी राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद,यांची जयंती साजरी केली तसेच त्यांच्या विचारांचे चिंतन केले त्याचप्रमाणे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या कार्याचे स्मरण करुन आदरांजली वाहीली.प्रमुख पाहुणे श्रीकांत बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रम तालुकाआध्यक्ष श्री दत्तात्रय थोरात यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला , यावेळी समाज भूषण पॅनलचे मार्गदर्शक धैर्यशील भाऊ देशमुख अशोक राऊत उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत दस्तगीरभाई मुलाणी तालुका संघटक यांनी केले.सुत्रसंचालन तालुका सचीव राजेंद्र शिंगटे यांनी केले ,समारोप व मान्यवरांचेआभार श्री शब्बीरभाई काझी तालुका उपाध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमांचे व्यस्थापन प्रज्योत डुडु व मोहन पानस्कर यांनी केले. राजमाता जिजाऊ यांचेवर डॉ.थोरात यांनी सुश्राव्य व्याख्यान दिले त्याचप्रमाणे श्री शिंगटे यांनी स्वामी विवेकानंद यांचेवर व्याख्यान दिले.तर श्री बावीस्कर यांनी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व ग्राहक चळवळ यावर व्याख्यान दिले. यावेळी पत्रकार बॅरिस्टर अभिमन्यू आठवले पत्रकार विलास भोसले पत्रकार प्रमोद शिंदे पत्रकार श्रीराम भगत उपस्थित होते यावेळी उपस्थित पदाधिकारी सर्व सदस्यांचा सत्कार करणेत आला.कार्यक्रमाचे नियोजन अमीत शहा व सनी बावीस्कर यांनी केले .

नातेपुतेत संक्रातनिमित्त व्यापाऱ्याकडून भाजी पेंडी 100 ला विकून शेतकऱ्याची फसवणूक तर ग्राहकांची लूट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-

नातेपुतेत संक्रातनिमित्त व्यापाऱ्याकडून भाजी पेंडी 100 ला विकून शेतकऱ्याची फसवणूक तर ग्राहकांची लूट

नातेपुते ता.माळशिरस येथे मकर संक्रांतीच्या भोगी सणानिमित्त व्यापाऱ्याकडून भाजी पेंडी शंभर रुपयाला विकून शेतकऱ्याची फसवणूक तर ग्राहकांची लूट झाल्याचं निदर्शनात आला आहे. परंपरेनुसार मकर संक्रांतीच्या अगोदर आदल्या दिवशी भोगी असते आणि या भोगी सणानिमित्त सर्व प्रकारच्या भाजीपाला एकत्र करून त्याची गर्गोटी(खेंगाट)भाजी व तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवण्याची परंपरा आहे या भाज्यांमध्ये विटामिन ए बी सी मोठ्या प्रमाणात असते.यामध्ये प्रामुख्याने चाकवताची भाजी, चुका,पालक,गाजर,बोरे,पावटा ,घेवडा,शेंगा,तीळ हरभरा,जवळपास बारा भाज्यांना एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते.आणि ती भाजी करावीच लागते असं सांगितलं जातं.त्यामुळे बाजारातून सामान्य ग्राहक वाट्टेल ती किंमत मोजून भाजीपाला आणत असतो.परंतु बुधवार बाजारात या भाजीपाल्याचा कहर झाला आहे.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून चार ते पाच रुपयाला भाजीची पेंडी घेऊन त्याचे शॉर्टेज करून शेवटी भाजी 100 रुपया पर्यंत विकून शेतकऱ्यांची फसवणूक व सामान्य नागरिकांची लूट केली आहे
पावटा सुद्धा एरवी 40 रुपये किलो विकला जातो बुधवारी बाजारात 200 रुपये किलो पावटा विकला गेला. तर ओला वाटाणा 120 रुपये किलो विकला गेला. आंबट बोरे सुद्धा 200 रुपये किलो पर्यंत विकली गेली. व्यापाऱ्यांना विचारले असता एवढे महाग भाजीपाला का ? व्यापाऱ्याकडून उत्तर देण्यात आले.”आजचा दिवस असतो,महागाई वाढली आहे” परंतु महागाईच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून कष्टकरी शेतकऱ्यांची त्यांची फसवणूक केली जाते व त्यासोबत ग्राहकांची लूट केली जाते यावरून दिसून येत आहे. अशा धूर्त व्यापाऱ्यांवर वेळीच आवर घातली पाहिजे.

You may have missed