माळशिरस तालुका

सासरे उत्तम जानकर यांच्या प्रचारासाठी जावई राहुल पाटील व कार्यकर्ते यांचा गाव भेट दौरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे


पिरळे तालुका माळशिरस येथे सासरे उत्तमराव जानकर त्यांच्या प्रचारासाठी उत्तमराव जानकर यांचे आळंदी येथील जावई राहुल पाटील मैदानात उतरले असून. गाव दौरा भेटी दरम्यान पिरळे येथे माजी विस्तार अधिकारी प्रल्हाद साळवे त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन बोलकी संदर्भात चर्चा केली आहे .यावेळी अशोक दडस, दादा पाटील, पांडुरंग दडस, आनंदराव दडस यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि भेट दिली.

उत्तमराव जानकर यांच्या प्रचारानिमित्त पश्चिम भागात विकास दादा धाईंजे यांचा गाव भेटी दौरा.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

254 अनुसूचित जाती माळशिरस विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचारा निमित्त आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे यांचा पश्चिम भागात कार्यकर्ते व गाव भेटी दौरा संपन्न झाला.माळशिरस , पिरळे फोंडशिरस,शिवपुरी,एकशिव, कुरबावी,देशमुखवाडी,धर्मपुरी,भीमनगर,शिंदेवाडी, कारंडे,कोथळे या गावांमध्ये झंजावत दौरा करण्यात आला. यावेळी विकास दादा बोलताना म्हणाले की भविष्यात गावात व समाजात असणाऱ्या अडीअडचणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोडवले जातील.त्यासाठी उत्तमराव जानकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून देऊया.याप्रसंगी पिरळे येथे माजी विस्तारधिकारी प्रल्हाद साळवे सर,शिवाजी लवटे पाटील,पत्रकार प्रमोद शिंदे, गोरख साळवे, प्रमोद भोसले,माजी सरपंच संभाजी साळवे, पत्रकार प्रशांत खरात,नाथा साळवे, महादेव बल्लाळ, हनुमंत धाइंजे,सोमनाथ साळवे, रोहन खरात,प्रतीक कांबळे तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित.

मुलं म्हणजे देवाघरची फुलं, मुलं म्हणजे देशाचे उज्वल भविष्य: अनंतलाल दोशी


आज आपल्या सभोवताली पाहिले तर मुलांचे मोबाईल मध्ये हरवलेले बालपण आपण अनुभवतो, तर त्यांना योग्य ते मार्गदर्शन आज फक्त आई-वडीलच नाही तर समाज, शिक्षक ,शाळा, मोबाईल, टीव्ही , समाजतील प्रत्येक व्यक्तीची, घटकाची ,माध्यमांची जबाबदारी आहे की त्यांनी उद्याचा उज्वल , महासत्ता भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे त्यासाठी मुलांवर योग्य शिकवण व शिक्षण देणे गरजेचे आहे कारण मुले म्हणजेच उद्याचा उज्वल भारत आहे प्रतिपादन अनंतलाल दोशी यांनी केले.
लहानपणीचा काळ आनंदाचा खजिना होता, चंद्राला गवसणी घालण्याची इच्छा होती तर रंगीबेरंगी फुलपाखराची आवड होती.
आईच्या गोष्टी होत्या, परीकथा होत्या, पावसात कागदाची होडी होती आणि प्रत्येक ऋतू छान होता. मैदानी खेळ होते, सागर गोटे, सुरपाट होते पण आज मुलं मोबाईल मध्ये रमताना दिसतात, म्हणून आजच्या बाल दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाला आव्हान की प्रत्येक घटकाने या देशातील प्रत्येक मुल आपलेच आहे असे समजून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे. आणि आई वडील व शिक्षकांचा यात मोलाचा वाटा आहे. असे आवाहन केले.
गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मांडवे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस ‘(बालदिन’) तसेच रेड डे साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी हसत, खेळत, नाचत, गात उत्कृष्ट सजावटीमध्ये बाल दिनाचा आनंद लुटला, सर्व विद्यार्थी , शिक्षक लाल रंगांमध्ये उपस्थित होते.बाल दिना विषयी , पंडित नेहरू यांच्या बद्दल माहिती सांगण्यात आली, या कार्यक्रमासाठी उपस्थित रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, रत्नत्रय प्री स्कूल, नातेपुतेचे सभापती वैभव शहा, स्कूलचे कमिटी मेंबर, सुरेश धाईंजे, दत्ता भोसले उमेश गोरे, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कोरे तर आभार प्रदर्शन मेघा सुतार यांनी केले

श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र संस्थान च्या वतीने रविवारी भव्य वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा

श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र संस्थान च्या वतीने रविवारी दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी वार्षिक रथोत्सव तसेच श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव संचलित,श्री ब्रह्महतीसागर महाराज पुण्यतिथी निमीत्त वक्तृत्व व पाठांतर स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व गटांसाठी असून स्पर्धा रविवार दि.१७-११-२०२४ कार्तिक वद्य २ रोजी दुपारी १.०० ते ५.०० वा. या वेळेत खालील विषयावर स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेसाठी माहिती पुढील प्रमाणे

पिरळे येथे नारायण मंदिरात नारळ फोडून उत्तमराव जानकर यांच्या प्रचारास प्रारंभ

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

पिरळे ता.माळशिरस येथे हा विकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर हे 254 अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघातून हा विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. यांच्या प्रचारानिमित्त विष्णू नारायण मंदिरामध्ये मोहिते-पाटील व उत्तमराव जानकर दोन्ही गट एकत्र येत नारळ फोडून प्रचारास प्रारंभ केला.यावेळी सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष कदम सर, माजी विस्तारधिकारी प्रल्हाद साळवे सर, माजी उपसरपंच,दशरथ जाधव,संदीप तात्या नरोळे, उमेश खिलारे, पॅंथर जिल्हाध्यक्ष दादासो शिंदे सर, संदीप वाघ सर,प्राचार्य दीपक शिंदे सर,आदींनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की सर्व हेवे देवे बाजूला ठेवून मोहिते-पाटील आणि जानकर यांच्याकडे पाहून आपल्याला पूर्ण ताकतीने 90 ते 95 टक्के मतदान करायचा आहे. जेणेकरून उत्तमराव जानकर हे राज्यात एक नंबर निवडून येतील पूर्वी दोन गट असल्यामुळे काम करताना अडचणी होत्या.पण आता मोहिते-पाटील व जानकर गट एकत्र आल्याने तालुक्याचा मोठा प्रमाणात विकास होणार आहे. गावचा व तालुक्याच्या विकासासाठी उत्तमराव जानकर यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणूया अशा प्रकारचा नारळ फोडून एकमताने ग्रामस्थांकडून ठराव करण्यात आला. तसेच रॅली काढत होम टू होम प्रचार करण्यात आला.या प्रचारादरम्यान माजी सरपंच ज्ञानदेव शिंदे,शिवाजी लवटे,महादेव शिंदे,महादेव होळकर,गणेश दडस,मेजर किर्दक,दत्तात्रय लवटे,पांडुरंग साळवे, प्रमोद डूड्डू, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.

तर भारताचा जगात नावलौकिक व्हायला वेळ लागणार नाही……. ! डॉ. उदय निरगुडकर.


रत्नत्रय शैक्षणिक संकुलात शिक्षकांशी संवाद .


भारत हा विकसनशील देश आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होते. माणसाची प्रगती झाली की देशाची प्रगती होणार आहे. त्यामुळे भारताचा नावलौकिक जगात होईल. शिक्षणाने माणसाची जीवनशैली सुधारते. प्रत्येक शिक्षकाने शास्त्रज्ञ म्हणून स्वतःचा वर्ग ही एक प्रयोगशाळा आहे असे समजून विविध प्रयोग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले मोबाईल मुक्त विद्यार्थी तयार करणे गरजेचे आहे. भारतीय शिक्षण पद्धती व परदेशातील शिक्षण पद्धती मधील फरक सांगून शिक्षकांनी कोणत्या प्रकारे अध्यापन करावे याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जगाच्या तुलनेत भारतात शिक्षकांची परंपरा खूप मोठी आहे. आर्य चाणक्य त्यापैकी एक होते. उद्याचा विश्वगुरू भारत घडवायचा असेल तर शिक्षकांची भूमिका खूप मोठी आहे. शिक्षकांना राष्ट्रसेवा करण्याची खूप मोठी संधी असते. शिक्षकांनी या क्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन केले पाहिजे. त्याच माध्यमातून विद्यार्थी घडला तर उद्याचा विश्वगुरू असणारा भारत निश्चित घडेल. शिक्षणातून बेकारी निर्माण होईल असे शिक्षण देण्यापेक्षा सुसंस्कृत विद्यार्थी घडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मा.डॉ. उदय निरगुडकर, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे सचिव, इंग्लिश मेडियम स्कूल चे चेअरमन व विलासचंद्र एम. मेहता आयटीआयचे दहिगाव चे मार्गदर्शक मा. श्री. प्रमोद भैया दोशी, मा. श्री. अभिजीत पाटील, मा. श्री. महादेव सर,रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक श्री दैवत वाघमोडे, विलासचंद्र एम. मेहता आयटीआयचे प्राचार्य श्री. गजेश जगताप, दहिगाव अकॅडमीचे मुख्याध्यापक श्री. सतीश हांगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यात कसं? दादा म्हणतील तसं-खा. डॉ. अमोल कोल्हे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

254 अनुसूचित जाती माळशिरस विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचारा निमित्त नातेपुते येथे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची प्रचार सभा संपन्न झाली.बोलताना डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की पडत्या काळात सोलापूर जिल्ह्याचा ढाण्या वाघ विजयसिंह मोहिते पाटील पवार साहेबांच्या सोबत उभे राहिले, आणि महाराष्ट्राच चित्र पालटलं. पुढे बोलताना म्हणाले माळशिरस तालुक्यात कसं? तेव्हा समोर बसलेल्या जनतेतून आवाज आला दादा म्हणतील तसं.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या रूपाने आपण सर्वांनी संसदेमध्ये ढाण्या वाघ पाठवला आहे. तुमची बॅग तपासली असा प्रश्न विचारला असता कोल्हे म्हणाले आमच्या बॅगेत निष्ठा आणि विश्वास याशिवाय काय सापडणार?
तसेच त्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर टीका करत उत्तम जानकर यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.याप्रसंगी विधानसभा उमेदवार उत्तमराव जानकर म्हणाले या तालुक्यातील बौद्ध,मुस्लिम,मातंग,धनगर, मराठा,हिंदू खाटीक सर्व जाती धर्माच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे.मी जातीच्या धर्माच्या पलीकडचा माणूस आहे. मा.आमदार आर.जी आप्पा रुपनवर म्हणाले भाजपने संविधानाच्या मूळ ढाच्याला हात घातला आहे. संविधान बदलण्याचा प्रयत्न भाजप करतोय.,लक्ष्मण ढोबळे म्हणाले या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम पवार साहेब यांनी केला आहे,.प्रास्ताविकेत मा.जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख म्हणाले दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन लोकसभा लढवली विधानसभा ही त्याच ताकतीने लढून उत्तमराव जानकर यांना महाराष्ट्रात एक नंबर मताधिक्याने निवडून देऊ.सर्व नेत्यांनी भाजपवर टीका करत उत्तमराव जानकर यांना निवडून देण्याबाबत आवाहन केले. तसेच याप्रसंगी बौद्ध समाज, वडार समाज, मातंग समाज, हिंदू खाटीक, मुस्लिम समाज,यांनी उत्तमराव जानकर यांना जाहीर पाठिंबा दिला.या सभेसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,अर्जुनसिंह मोहिते पाटील, विकास दादा धाईंजे, नगराध्यक्ष अनिता लांडगे,मालोजीराजे देशमुख, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,अजय सकट,संदीप ठोंबरे, विशाल साळवे, सागर बिचुकले,तसेच परिसरातील अनेक नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
.

गद्दाराला क्षमा नाही, गुवाहाटीचा डोंगर पाहिला आता गद्दारांना टकमक टोक दाखवायचे-उद्धव ठाकरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कधीही गद्दारांना क्षमा करत नाही. त्यांना हेच सांगायचे आहे की, त्यांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, पण त्यांनी रायगडावरचे टकमक टोक बघितले नाही. ते त्यांना २३ तारखेला दाखवायचे आहे. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी २३ तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढून द्यावे, कारण एकाला तिकडे पाठवायचे आहे. मग त्यांनी तिथे झाडे, डोंगर मोजत बसावे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी शहाजीबापू यांचे लगावला. नाव न घेतापंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात फिरत आहेत. लगे रहो मुन्नाभाईम धील सर्किटसारखी त्यांची अवस्था झाली आहे. इथे येऊन शेतकऱ्यांच्या मुद्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील अनुच्छेद ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना, आम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत, असे ते म्हणतात.मोदी-शहा यांनीशिवसेनेचा घात केलाकदाचित अमित शाह यांना स्मृतीभ्रंश झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झाले, त्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले होते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. केंद्रातील नेते, पदाधिकारी राज्यात येऊन प्रचार करत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विमानतळ, वेअर हाऊस आदी मोठे प्रकल्प अदानी यांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्राचे अदानीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. सर्व उद्योग गुजरातला जात आहेत. महाराष्ट्राला विकू पाहणाऱ्या भाजपला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. महाराष्ट्राचे गद्दारी करणे हे माझ्या रक्तात नाही. मी लढतोय, मंजूर असेल तर सोबत या ? नाहीतर मी एकटा आहेच. मोदी आणि शहा यांनी शिवसेनेचा घात केला आणि चोर कंपनी घेऊन माझ्यावरच वार करायला येत आहात. हे कदापि शक्य होणार नाही. वार करायला येणार असाल तर माझा शिवसैनिकच तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी सोलापुरातील जाहीर सभेत दिला.

शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी देणार : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी जनतेसमोर महायुती सरकारच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार प्रस्थापित करण्यासाठी मतदारांना आवाहन केले.ते म्हणाले की, महायुती सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आणि युवकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या आहेत. पुढे सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी दिली जाईल, अशी म ोठी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, वाशीम शहरातील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.याचा लाभ पक्षाला या निवडणुकीत मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.फडणवीस म्हणाले की, ग्यायक पाटणी यांनी भाजपाची उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांच्या राजकीय अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांना अजून थोडा वेळ मतदारसंघात काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे असंतुष्ट झालेल्या पाटणी यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिकिटाची मागणी केली. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पाटणी यांनी निवडलेला मार्ग कठीण आहे, आणि त्यांचा निर्णय त्यांच्या भविष्यासाठी आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेच्या भावना गवळी (रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ), भाजपचे श्याम खोडे (वाशीम) आणि सई प्रकाश डहाके (कारंजा) या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.

शरद पवारांचे दाऊद इब्राहिमबरोबर संबंध प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचेअध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शनिवारी दुपारी ते सोलापुरात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेतून मोठा आरोप केला आहे.ते म्हणाले, ‘शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत.’ व्होरा कमिटीचा रिपोर्ट समोर का आला नाही, त्याबाबत अनेक खुलासे समोर आले असते. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध आहेत की नाहीत याबाबत अधिक माहिती घ्यावयाची असल्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून घ्यावी, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमधील वंचितच्याप्रकाश आंबेडकरमेदवारांसाठी प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या आधी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेट झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे. दाऊदचा शोध घेताना तिसऱ्या दिवशी दिल्लीत ब्लास्ट झाला. इसिसला माणसं पुरवण्याचे काम जगभरातून झाले. १९९० ते २००० देशात ब्लास्ट होतं गेले. त्यामुळे शरद पवार आणि दाऊद यांच्याशी भेटीचा काही संबंध आहे का हे तपासले पाहिजे हे मला म्हणायचं आहे, असा खळबळजनक’देवेंद्र फडणवीसांनी संविधानाचा मूळ रंग सांगावा’राहुल गांधी महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या सभेमध्ये लाल रंगाचं संविधान दाखवत भाषण केले आहे. लाल रंगाच्या संविधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताच आता राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणीचा खेळ रंगला आहे. यातच प्रकाश आंबेडकरांनीही आता देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले आहे. ‘संविधानाचा मूळ रंग काय आहे ते फडणवीसांनी सांगावे,’ असे आंबेडकर म्हणाले.दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.किंवा मतदारांमध्ये आहे, असं मी मानतो. सोलापूर शहर दुर्लक्षित आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर स्वीकारावे.प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुणे आणि सोलापूर दोघात साम्य आहे. दोघांनी सर्वांत जास्त मंत्री पद भोगली. पण एक आणखी साम्य पाणी असून तहानलेले जिल्हे आहेत. सोलापूरला पाण्यासाठी नऊ दिवस थांबणायची गरज नाही असं मी उमेदवार असताना म्हटलेलं होतं. पाच वर्ष झाली नवीन खासदार आले पण परिस्थिती तशीच आहे. दोष एकतर लोकप्रतिनिधीमध्ये आहेतपुढे बोलताना प्रकाश आंबडेकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला तर लाडकी बहीण योजना सारख्या योजना आणण्याची गरज पडणार नाही. टेकस्टाईल उद्योगामुळे सोलापूरचे नावं जगाच्या पाटलावर आहे. सोलापुरात टेकस्टाईल कमिशन ऑफिस असायला हवं.

You may have missed