माळशिरस तालुका

रत्नत्रय मधील बाल दिंडी ने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश *

*रत्नत्रय मधील बाल दिंडी ने दिले पर्यावरण संवर्धनाचे संदेश *

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सालबाद प्रमाणे बालदिंडी चे आयोजन केले होते या बालदिंडीमध्ये पर्यावरण संवर्धनाचे संदेश देण्यात आले.
या दिंडीमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये झाडे लावा झाडे जगवा,बेटी बचाव बेटी पढाव,स्वच्छ भारत सुंदर भारत असे अनेक संदेश लिहिलेले फलक पताका विद्यार्थ्यांच्या हातात दिले होते.फलकाच्या व घोषणा च्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करण्यात आली. तसेच माऊली तुकारामांच्या गजरात टाळ व भगव्या पताका घेवून पारंपारिक वेशभूषेत आषाढी वारी बालदिंडी काढण्यात आली यावेळी संस्थेचे
अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी पालखीतील विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन केले.विद्यार्थ्यांनी
विठ्ठल – रुक्मिणी,संत तुकाराम, संत मुक्ताबाई यांचे वेश परिधान करुन लेझीम पथकाने कला सादर केली.
सदर प्रसंगी साल बाद प्रमाणे जगदीश राजमाने यांनी बालवारकऱ्यांना खाऊ वाटप केले.
या सोहळ्यामध्ये रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी, पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रमोद दोशी संचालक वैभव शहा, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे,बाहुबली दोशी, अजय गांधी, अजितकुमार दोशी,सुरेश धाईजे ,जगदीश राजमाने, तनोज शहा रामदास गोपणे, सुभाष सुदणे, सतीश बनकर वैभव मोडासे,चंद्रकात तोरणे,
पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर राऊत, मुख्यध्यापक शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी पर्यवेक्षक उदय साळुंखे यांनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन केला वाढदिवस साजरा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते येथील कृषी मंडळात कार्यरत असणारे कृषी पर्यवेक्षक पदावर असलेले उदय तुकाराम साळुंखे यांनी गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. शासकीय सेवेत असलेले कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय तुकाराम साळुंखे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर व चर्चेत असतात.पत्नीच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ते अनाथ आश्रमामधील विद्यार्थ्यांना भोजनदान,कपडे व खाऊ देऊन वाढदिवस साजरा करतात.तसेच मुलाचाही वाढदिवस त्याच पद्धतीने करत असतात.वाढदिवसाचा आनाठाई खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत असतात.अशाच प्रकारे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. तसेच झाडे लावा झाडे जगवा अभियानात भाग घेऊन झाडे जगवण्यासाठी वाढदिवसानिमित्त कुंड्या ही भेट दिल्या.

बोलताना ते म्हणाले की आपल्या पगारातील दहा टक्के रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी व सामाजिक कार्यासाठी मी नेहमीच योगदान देईन अशाच पद्धतीचा समाजातील इतर लोकांनी सुद्धा साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून स्वतः पुढे येऊन योगदान द्यावे जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे परिसरात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आदिवासींना लाखो रुपयाने गंडवणाऱ्या बंटी-बबलीच्या टोळीवर फसवणुकीेसह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल.

आदिवासींना लाखो रुपयाने गंडवणाऱ्या बंटी-बबलीच्या टोळीवर फसवणुकीेसह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल..

बंटी फरार तर बबली गजाआड..

संदेश भालेराव ठाणे वार्ताहर

: दिनांक ४ जून रोजी अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशन मध्ये बोहनोली गावातील १२ आदिवासी कुटुंबांना सिएट कंपनीकडून मोफत पुनर्वसन करण्याचे खोटे आमिष देवून कंपनीने पिडीतांना दिलेल्या आर्थिक मदतीमधून ७२ लाख ५० हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात वर्ग करून आदिवासींची फसवणूक केल्याचा गुन्हा येथील स्थानिक कथित समाजसेवीका आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर, ॲड. तृषांत आरडे आणि अशोक भोईर यांच्यावर झाला आहे. गुन्हा क्रमांक १८०/२०२२ नुसार भांदवी कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, १२०-ब, ३४ आणि ॲट्रोसिटी कायदा कलम ३(१)(जी), ३(२)(पाच) आणि ३(२)(पाच-अ) नुसार गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर हिला दिनांक १० जून २०२२ रोजी अटक करून कल्याण येथील न्यायालयात ११ जून रोजी हजर केले असता न्यायालयाने तिला ५ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. इतर दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सविस्तर घटना अशी की, मौजे बोहनोली गांव, अंबरनाथ येथील कणकवाडी या ठिकाणी गावठान जमिनीवरील ९७ गुंठे जागेवर काही आदिवासी कुटुंबे अनेक पिढ्यांपासून वर्षानुवर्षे राहत होते. वर्ष २००६ मध्ये महाराष्ट्र शासनाने बोहनोली गावाच्या गावठानच्या बाजूच्या काही जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास संस्थेला (एम.आय.डी.सी.) दिल्या परंतु त्यामध्ये बोहनोली कणकवाडी (चिंचेवाडी) येथील गावठान जागेवरील ९७ गुंठे जागेचा समावेश न्हवता आणि आज सुद्धा सदर जमिनीच्या ७/१२ वर महाराष्ट्र औद्योगिक विकास संस्थेचा (एम.आय.डी.सी.) शिक्का आढळून येत नाही.

परंतु मागील काही वर्षापासून सिएट कंपनीने सदर गावठान जमीन बेकादेशीररित्या लुबाडून, झोपड्या जाळून, रस्ते उध्वस्त करून व बेकायदेशीररीत्या कंपाउंड उभारून आदिवासींचे राहते घर व गांव सोडण्यास भाग पाडले. तेथे अनधिकृत बांधकाम करून आदिवासी कुटुंबाची इतरत्र जमीन देवून त्यावर घर, रस्ता, वीज व सिएट कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी देवून आर्थिक पुनर्वसन करण्याचे खोटे आश्वासन देवून फसवणूक केली. याकरिता मध्यस्थी करण्या करीता येथील स्थानिक आगरी समाजाच्या आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर या समोर आल्या आणि वकील ॲड.तृषांत आरडे हे गोरगरिबांना मोफत मदत करीत असल्याचे सांगून त्यांची सिएट कंपनीमध्ये बाजू मांडली.

आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर व वकील तृषांत आरडे यांच्या मध्यस्थिने माहे मे २०२१ मध्ये, कंपनीचे अधिकारी अमित तांबे आणि अजय देसाई यांच्यावर कल्याण सत्र न्यायालयात सुरू असलेली जुनी ॲट्रोसिटीची केस व सर्व इतर तक्रारी मागे घेण्याच्या अटीवर १३ आदिवासी इसमांना प्रत्येकी ११ लाख रुपये व शिरवली गावात १७ गुंठे जमिनीवर सर्व सोई सुविधेसह घरे बांधून व नोकरी देवून पुनर्वसन करण्याचे ठरले.

माहे मे २०२१ च्या शेवटच्या आठवडयात आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर, वकिल तृशांत आरडे व अशोक भोईर यांनी सदर १३ आदिवासिंना बदलापूर येथे बोलावुन त्यांना सीएट कंपनीमध्ये नोकरी संदर्भात अर्ज करायचे आहे असे खोटे सांगुन त्यांचे ओरिजनल पँन कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड व फोटो लावून कागदावर अंगठे घेतले व त्यांचे दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे शाखा बदलापूर या बँकेत खाते उघडले तसेच स्वतःचे सुद्धा खाते याच बँकेत उघडले.

दिनांक ३० जून २०२१ रोजी सदर मध्यस्थी मार्फत बाँड पेपरवर अशिक्षित आदिवासींचे अंगठे घेवून बेकायदेशीर तडजोड करण्यात आली व पिढीत संतोष वाघे यांनी मा.दिवाणी न्यायालय कल्याण येथे दाखल दावा क्र.२१/२०१८ आणि त्याची पत्नी भुरी संतोष वाघे हिने मा.सत्र न्यायालय कल्याण येथे दाखल ॲट्रोसिटीची केस क्र.१९३/२०१९ मागे घेण्यास भाग पाडले. याच्या मोबदल्यात सीएट कंपनीने भोलानाथ पांडु वाघ, संतोष सोमा वाघे, पिंटया पांडु वाघ, संगीता हिलम, जाईबाई पांडु वाघे, सिता रघुनाथ वाघ, शनिवार शिवा वाघ, बाळाराम शनीवार वाघ, पिंटया व सिता एकनाथ हिलम, अर्जुन नत्थु वाघ, अरूण पांडु वाघ, लक्ष्मी गज्या वाघे, दर्शना व सोमनाथ व दिपक गजानन वाघे या तेरा कुटुंबांना सीएट कंपनी कडून आर्थिक मदत म्हणून आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या अंधेरी शाखेचे प्रत्येकी ११ लाख प्रमाणे एकूण १कोटी ३२ लाख रुपयाचे १३ डी.डी. आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर यांनी घेतले व प्रत्येकाच्या खात्यात जमा देखील केले. परंतु आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर आणि अँड. तृषांत गंगाधर आडे यांच्या माध्यमातून या सर्व आदिवासी कुटुंबाची बैंक पासबूक घेवून त्यांचे आंगठे घेऊन खोटे दस्तावेज तयार करून तसेच दमदाटी करून त्यांच्या खात्यावर आलेली रक्कम परस्पर खात्यावर वळवली. यात आरोपी किशोरी वाडेकर तथा पाटील हिने एकूण रक्कम रुपये ५८लाख ५०हजार स्वतःच्या दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, ठाणे शाखा बदलापूर या बँकेतील खाते क्र.२४५२७ मध्ये चेकद्वारे ट्रान्स्फर करून घेतली. तसेच आरोपी अँड.तृषांत गंगाधर आरडे याने एकूण रक्कम रुपये रुपये १३ लाख स्वतःच्या खात्यावर ऑनलाईन ट्रान्स्फर केले. अश्याप्रकारे या तिकडी गँगने आदिवासी पिडीतांचे एकूण ७२ लाख ५० हजार रुपये चेक व ऑनलाईन पद्धतीने आणि इतर लाखोंची रोख रक्कम सुद्धा पिडीत आदिवासींचे अंगठे घेवून काढून घेतली. हे सर्व करण्याकरिता आरोपी अशोक भोईर यांनी मदत केली. आरोपींनी आदिवासी पिडीतांना केवळ थोडीफार रक्कम देवून त्यांनी वारंवार विचारणा केली असता अनेक उडवाउडवीची उत्तरे देवून त्यांना पळवून लावले. शेवटी त्यांच्या खात्यात काहीच रक्कम शिल्लक नाही व सर्व पैसे आरोपी किशोरी पाटील उर्फ वाडीकर आणि ॲड.तृषांत आरडे यांनी अशोक भोईर यांच्या मदतीने हे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केल्याचे त्यांना बँकेने कळविल्यावर आपली फसवणूक झाल्याचे आदिवासी पिडीतांच्या लक्ष्यात आल्यावर नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेचे मुंबई ठाणे प्रदेश अध्यक्ष बंदिश सोनावणे यांना माहिती देण्यात आली. संघटनेचे वरिष्ठ ॲड.केवल उके यांच्या मार्गदर्शनात या सर्व आदिवासी पिडीतांना तत्काळ मदतीचा हात दिला व शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी माहितीची शहनिशा करून दिनांक दिनांक ४ जून २०२२ रोजी गुन्हा क्रमांक १८०/२०२२ नुसार भांदवी कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, १२०-ब, ३४ आणि ॲट्रोसिटी कायदा कलम ३(१)(जी), ३(२)(पाच) आणि ३(२)(पाच-अ) नुसार या तिन्ही भामट्यांवर गुन्हा दाखल केला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून नायब तहसीलदार झालेले प्रतीक आढाव आमच्या समाजाचीशानआहे- राज्य सचिव वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-कारुंडे ता माळशिरस नुकतेच राज्यसेवा परीक्षा पास होऊन नायब तहसीलदार पदी विराजमान झाले प्रतीक आढाव यांचा नागरी सत्कार समारंभाचा कार्यक्रम एन डी एम जे संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता

. याप्रसंगी एन डी एम जे चे राज्य सचिव वैभव गिते बोलताना म्हणाले की प्रतीक आढाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानून नायब तहसीलदार झाले आहे आहे ते आमच्या समाजाची शान आहे त्यांनी खडतर परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे.

पुढे ते म्हणाले की ज्या वेळेस तुम्ही खुर्चीवर बसला तेव्हा प्रामुख्याने गरीब वंचित लोकांचे प्रश्न सोडवा वृद्ध व सामान्य माणसांना सन्मान देऊन सौजन्याने वागवा तुम्ही मानाचा व मोक्याच्या जागेवर गेल्यामुळे आम्हाला व समाजाला प्रचंड आनंद झाला आहे तसेच पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे, विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे कुमार लोंढे ऍड सुमित सावंत ऍड वैभव धाईंजे ऍड विशाल साळवे रोहित एकमल्ली सु ग साबळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांची खांद्यावर घेऊन कारुंडे तेथे ढोल ताशे व डीजे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली.

तहसीलातला मोठा नायब झाला या गाण्यावर पुन्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला. यावेळी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच सुरज गायकवाड यांच्या मुलाचे नामकरण करण्यात आले सुरज गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त नूतन नायब तहसीलदार यांचा सत्कार व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश गायकवाड, नाना गायकवाड ,सुरज गायकवाड ,अनिल गायकवाड व कारुंडे येथील एन डी एम जे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

जो समाज राज्य घटनेकडे दुर्लक्ष करेल त्यांना कधीच भविष्य मिळणार नाही- प्रा उत्तम कांबळे

जो समाज राज्य घटनेकडे दुर्लक्ष करेल त्यांना कधीच भविष्य मिळणार नाही- प्रा उत्तम कांबळे 

पुरोगामी महाराष्ट्र योजना नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते तालुका माळशिरस येथील नागलोक विचार  मंच यांच्यावतीने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राध्यापक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

त्यादरम्यान प्रा उत्तम कांबळे म्हणाले की जो समाज राज्य घटनेकडे दुर्लक्ष करेल त्यांना कधीच भवितव्य मिळणार नाही. कोणत्याही आरक्षणासाठी राज्यघटना ही महत्त्वाची असते आणि राज्यघटनेनुसार प्रत्येक घटाला आरक्षण मिळाला आहे. आणि मिळतात राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत सर्व घटकांना आणले आहेत त्यामुळे सर्व घटना घटकांनी राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे.राज्यघटना ही बाबासाहेबांनी दिलेलं नगंजनारे हत्यार आहेत. बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना आपल्या गुरुस्थानी मानले आहे .धर्मानी माणसाला गुलाम केले आहे.

तसेच धर्माचा मनोरा हा सीडी बंद आहे त्याकाळी गुलामांना कसलीही प्रतिष्ठा नव्हती ओबीसींनी मनुस्मृति वाचावी मनूच्या मते सर्व ओबीसी शूद्र आहेत.अशा प्रकारे त्यांनी आपल्या या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच याप्रसंगी लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील रीडिंग क्लब च्या वतीने महाविद्यालयामध्ये ग्रंथ दान उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत कोळेकर सर हे होते.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व नागलोक विचारमंच प्रतिष्ठान चे प्रमुख एन के साळवे यांनी केले होते.कार्यक्रमास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर, प्रा सरुडकर सर, जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष रणजीत कसबे, समीर सोरटे,ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बाविस्कर,प्रमोद शिंदे,सचिन रणदिवे,मुख्याध्यापक आखाडे सर,तसेच प्राध्यापक वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरुडकर सर यांनी केले.आभार सुचित साळवी यांनी व्यक्त केले.

मा.नितीनजी करीर महसूल सचिव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

मा.नितीनजी करीर महसूल सचिव यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन

माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहणार राजकुमार हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग तथा पालखी महामार्ग क .965 चे काम चालू आहे . या कामामध्ये शासकिय तसेच हायवेचे अधिकरी कॉन्ट्राक्टर भौगोलिक परिस्थिीचा विचार न करता काही गावे हायवे ना जोडता ती खंडित केलेली आहेत नातेपुते मांडवे रस्ता हा ब्रिटीश कालीन असल्याने नातेपुतेला जेथे जोडला जातो त्याठिकाणी तो खंडीत करण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकरी विदयार्थी त्या परिसरात राहण्या – या लोंकाना पर्यायी मार्गाचा वापर करवा लागणार आहे बायपासला भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल केल्यास हे अंतर 5 कि.मी. येणार आहे . हा बायपास नेमका कुणाच्या हितासाठी आहे हा जनतेच्या मनात प्रश्न आहे.पुरंदावडे येथील 94 / 260 मध्ये उड्डाण पुल किंवा भुयारी मार्ग करण्यात यावा वरिल चैनेज मध्ये गावाच्या उजव्या बाजूला मुस्लीम दफन भुमी आहे डाव्या बाजूला हिंदूची स्मशान भूमी आहे . एखादा नागरिक मुत्यु झाल्यास अंत्यविधी करणे हे भुयारी मार्ग नसणे अडचणीचे ठरत आहे

तरी काम चालू आहे तोपर्यत भुयारी मार्ग केल्यास त्या ठिकाणी जि.प.प्राथमिक शाळा सुध्दा आहे त्यांचा येण्या जाण्याचा प्रश्न सुटेल . नातेपुते येथील बायपास शहराच्या 5 कि.मी बाहेर गेल्याने येथील जुना पालखी मार्ग नादरुस्त अवस्थेत आहे पूर्वीच्या ग्रामपंचायतीने या कोणत्याही गोष्टींचा भविष्यातील विचार न केल्याने खड्ड्याचे सांम्राज्य झाले आहे . तो तात्कातळ दुरुस्ती करुन खुला करुन द्या . नातेपुते बायपास ते नातेपुते शहराला जोडणा – या सर्व रस्त्याचे डांबरीकरण व्हावे . नातेपुते पालखी महामार्गावरील मा . नितिन गडकरी साहेबांच्या डिम प्राजेक्ट मधील सायकल ट्रॅक जुन्या महामार्गाच्या बाजूने तयार करण्यास वरील कंपनीस आदेश देण्यात यावेत . जुन्या महामार्गावर स्ट्रीट लाईट लावून मिळावेत.

तालुक्यातील महसुली सज्जावर तलाठी व कोतवाल दिवसभर उपलब्ध व्हावेत . तलाठी तालुक्याच्या गावी गेलातरी कोतवाला मार्फत नागरीकाची कामे मार्गी लागतील. ज्या गावासाठी महा ई सेवा केंद्र मंजूर आहेत ते केंद्र त्याच गावा मध्ये चालू असावेत त्यामुळे नागरिकाची सोय त्याच ग्रामीण भागमध्ये होईल बहुताशी महा ई सेवा केंद्र ग्रामीण भाग सोडूण भलत्याच ठिकाणी चालू आहेत.माळशिरस तालुक्यातील सेतू सेवा केंद्र हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास चालवण्यास मिळावे त्यासाठी कायदेशीर दस्तवेज पुर्ण करुण ते नांगरिंकासाठी मोफत चालवली जातील अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांनी मा नितीनजी करीर महसूल सचिव, राजेश कुमार अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले यावेळी प्रकाशबापू पाटील यांच्यासह तालुका जिल्हा प्रशासन उपस्थित होते

अशी माहिती राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिली

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून एन.डी.एम.जे विद्यार्थी संघटनेकडून बांधकाम विभागाचा निषेध

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांकडून बांधकाम विभागाचा निषेध
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –दहिगाव-पिरळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.
पिरळे दहिगाव, हा रस्ता सतत वर्दळीचा असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत
. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नागरिक ये जा करत असतात खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो परंतु पडलेल्या खड्ड्यावर बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने एन.डी.एम.जे.चे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार प्रमोद शिंदे यांनी वेळोवेळी बांधकाम विभागाशी संपर्क करून या संदर्भात रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुळे काल एन डी एम जे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व एन.डी.एम.जे विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे यांच्या नेतृत्वात पिरळे-दहिगाव रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असेही सांगण्यात आले आहे.तात्काळ पिरळे-दहिगाव, पिरळे-फोंडशिरस,नातेपुते-पिरळे या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती 30 जानेवारी च्या आत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्त झाले नाही तर एक फेब्रुवारीला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांकडून बांधकाम विभागाचा निषेध

नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत ५४ उमेदवार रिंगणात तसेच २९ उमेदवारांची माघार


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते(प्रतिनिधी) : नातेपुते नगरपंचायत सर्वसाधारण निवडणूक २०२१ अनुषंगाने आज दिनांक १३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत तीन वाजेपर्यंत होती. निवडणुकीसाठी ८३ उमेदवार पात्र होते. व आज १३ डिसेंबर रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये तब्बल २९ उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडून मिळाली.

५४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तरी त्यांना १४ डिसेंबर रोजी निवडणुकीचे चिन्ह मिळणार अशीही माहिती मिळाली

निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार खालील प्रमाणे

१) सौरभ सावता बोराटे प्रभाग क्रमांक११
२) श्यामल हनुमंत लाळगे प्रभाग क्रमांक १७
३) महेश किसन ननवरे प्रभाग क्रमांक ११
४) अतुल सुभाष बावकर प्रभाग क्रमांक १६
५)राकेश भारत सोरटे प्रभाग क्रमांक ३
६) कन्हैया हनुमंत देवकाते प्रभाग क्रमांक ५
७) असलेशा भारत सोरटे प्रभाग क्रमांक १२
८) विशाल नारायण बोराटे प्रभाग क्रमांक ११
९) कांचन दादा लांडगे प्रभाग क्रमांक १३
११) रणजीत राजाभाऊ पांढरे प्रभाग क्रमांक ६
११) जहिदा रफिक शेख प्रभाग क्रमांक १५
१२) हनुमंत ज्ञानेश्वर लाळगे प्रभाग क्रमांक १६
१३) आम्रपाली अभिजीत वाळके प्रभाग क्रमांक ४
१४) मनिषा संतोष काळे प्रभाग क्रमांक २
१५) स्वाती न्यानेश्वर सर्जे प्रभाग क्रमांक १७
१६) हर्षा राहुल काळे प्रभाग क्रमांक २
१७) स्वाती अतुल बावकर प्रभाग क्रमांक ४)
१८) राहुल शैलेश बोराटे प्रभाग क्रमांक १६
१९)अंकुश लक्ष्‍मण कचरे प्रभाग क्रमांक ६
२०) वंदना विनायक पदमन प्रभाग क्रमांक १४
२१) शशिकांत मल्लाप्पा कल्याणी प्रभाग क्रमांक ६
२२) धोंडीराम पांडुरंग काळे प्रभाग क्रमांक १
२३) प्रवीण शिवाजी काळे प्रभाग क्रमांक १
२४) सचिन मुरलीधर भोजने प्रभाग क्रमांक १६
२५) सागर विलास बोराटे प्रभाग क्रमांक १६
२६) सागर बाबुराव बिचुकले प्रभाग क्रमांक ६
२७) अमरजित शंकर जानकर प्रभाग क्रमांक १६
२८) अश्विनी सचिन लांडगे प्रभाग क्रमांक १३
२९) अजय चंद्रशेखर भांड प्रभाग क्रमांक १६

या उमेदवारांनी नगरपंचायत निवडणुकीतून माघार घेतली असून उर्वरित उमेदवार निवडणूक लढवणार अशी सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडून प्राप्त झाली

उंबरे पागे ग्रामसभा शांततेत पार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धनाजी शिव पालक पंढरपूरदिनांक 1/11/ 2021 रोजी उंबरे पागे तालुका पंढरपूर येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते यासाठी ग्रामसभेचे अध्यक्ष कांताबाई शिंदे सरपंच होत्या ग्रामसेवक पांढरे यांनी लोकांचे स्वागत करून ग्रामसभेला सुरुवात केली असता नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक यांनी ग्रामसभा तहकूब करावी अशी सूचना मांडली कारण ग्रामसभेमध्ये अवघ्या पंचवीस लोक उपस्थित होते जोपर्यंत शंभर लोक उपस्थित असतील तर ग्रामसभा घ्या तोपर्यंत ग्रामसभा घेऊ नये असा ग्रामसभेमध्ये शिव पालक यांनी सूचना मांडली त्यानंतर काही वेळ ग्रामसभेचे कामकाज थांबले बराच वेळाने लोक जमा झाल्यानंतर ग्रामसेवकाने मागील आराखडा वाचून दाखवला पांदन रस्त्याचे कामे काँक्रिटीकरण डांबरीकरण सभामंडपाचे काम हाय मस्त दिवा कनेक्शन शासन निर्णय असे सर्व विषय ग्रामसेवक पांढरे यांनी वाचून दाखवले पुढे covid-19 च्या काळामधील लोकांचे पाणीपट्टी घरपट्टी ग्रामपंचायतीने वसुलीसाठी तगाटा लावू नये व गावामध्ये चिकनगुनिया सारख्या आजाराने लोक त्रस्त आहेत गावामध्ये ज्या ठिकाणी सांड पाणी साठले आहे आशा ठिकाणी कीटकनाशक फवारून जेणेकरून डास मरतील असे औषध धुरळणी करावी असे अनेक जनतेचे प्रश्न धनाजी शिव पालक यांनी लावून धरले त्याचबरोबर प्रहारचे तालुकाध्यक्ष नानासो इंगळे यांनी ग्रामसेवक माहिती अधिकारांमध्ये माहिती देत नसल्याबाबत खंत व्यक्त केली ग्रामपंचायतीची विकास कामे सर्व मेंबरांना वाटून द्या आणि आम्हाला पण द्या अशी अजब मागणी बापू मोहिते यांनी केली तसेच बाळासाहेब उर्फ केरु कसबे व माऊली लक्ष्मण गायकवाड उमेश गायकवाड यांनी आपल्या समस्या ग्रामसभेमध्ये मांडल्या परंतु ग्रामसभेला आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग तलाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वायरमेन असे शासकअधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते परंतु ग्रामसभे मधील प्रमुख मागणी लावून धरल्यामुळे तात्काळ उंबरे गावचे सरपंच कांताबाई शिंदे व ग्रामसेवक पांढरे यांनी अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण गावामध्ये कीटकनाशक धुरळणी करून घेण्यात आली आम्हाला ग्रामसभा माहीत नव्हती असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने ग्रामसभा दवंडी देऊन घेण्यात यावी असा सूर जनतेतून उमटू लागला

नातेपुते येथे उद्या होणार मोहिते कलेक्शनचे उद्घाटन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)नातेपुते दहिगाव रोड येथे उद्या दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दिवाळी आगमनानिमित्त भव्य मोहिते कलेक्शनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटनास नातेपुते व परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित असणार आहेत.यामध्ये माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,उत्पन्न बाजार समिती मामासाहेब पांढरे, माजी उपसरपंच अतुल पाटील,माऊली पाटील, रणधीर पाटील, दयानंद काळे, मानसिंग मोहिते ,सुरेश मोहिते,शिवाजी पिसाळ,सदाशिव ननावरे,वालचंद काळे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास निखील मोहिते, प्रशांत मोहिते यांनी प्रियजनांना जाहीर निमंत्रण दिले आहे. या दिवाळीच्या खरेदीसाठी मोहिते कलेक्शन ला आवश्य भेट द्या

You may have missed