माळशिरस तालुका

कृषी दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कृषी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- कृषी दिन व माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच कृषी सप्ताह चे औचित्य साधून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक शेतकरी व कोरणा काळात प्रशासनासोबत चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सर्व कृषी सेवक,कृषी पर्यवेक्षक,कृषी अधिकारी व कर्मचारी यांचा कोरणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.तसेच सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.तसेच कृषी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,पंचायत समिती सभापती शोभा ताई साठे,पंचायत समिती सदस्य ऍड ऍड.हसीना शेख मॅडम,हनुमंत आबा पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे संपादक प्रमोद शिंदे,कार्यकारी संपादक प्रशांत खरात,पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण साहेब, कृषी मंडलाधिकारी गुलाबसिंह वसावे,तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक,कृषी सेवक, कृषी पर्यवेक्षक,मंडलधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडलाधिकारी सतीश कचरे, यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यक अमित गोरे,रणजीत नाळे व कर्मचारी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे चे सचिन दुधाळ औदुंबर पवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक ऍड डॉ केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली संपादक प्रमोद शिंदे कार्यकारी संपादक,प्रशांत खरात यांनी केले.

कृषी मंडळ कार्यालय नातेपुते यास महाराष्ट्रातील पहिले आय एस ओनामांकन झाल्याबद्दल मंडलाधिकारी सतीश कचरे साहेब यांचा विशेष सत्कार करताना आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईजे सभापती शोभाताई साठे,पंचायत समिती सदस्य ऍड.हसीना शेख मॅडम,संपादक प्रमोद शिंदे
तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे साहेब यांचा विशेष सत्कार करताना संपादक प्रमोद शिंदे
ट्राफिक हवालदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण साहेब यांचा सन्मान करताना
कृषी साहेब रंजीत नाळे साहेब यांचा सन्मान करतान
तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
सभापती शोभाताई साठे यांच्या हस्ते वृक्षारोपण
पंचायत समिती सदस्य हनुमंत आबा पाटील वृक्षारोपण करताना

आमदार संजय गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा -एनडी एम जे मागणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव- रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेबांच्या अदेशा नुसार व मा.विजयजी कांबळे ठाणे जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
ॲड. प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध वेक्त करून कल्याण तहसीलदार कार्यालयात व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण यांना दिले निवेदन पत्र
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा चितोड येथे आक्षेपर्ह विधान केल्यामुळे दोन समाज्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच तेथे चिथावाणीखोर भाषण केल्यामुळे समाज्या मध्ये सम्रभ निर्माण झाला आहे.

म्हणून त्याच्यावर अट्रॉसिटी अक्ट नुसार 3(1)RU व 3(1)U व ipc 504,505,506 नुसार गुन्हा दाखल व्हावा.
म्हणून आज साह्यक पोलीस आयुक्त (Acp) कल्याण यांना व तहसीलदार कार्यालयात सुध्दा निवेदन पत्र दिले
उपस्थित पदाधिकारी मा. विजयजी कांबळे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मा.ॲड.प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष, मा.शशिकांतजी खंडागळे , मुंबई ठाणे प्रदेश सचिव,
मा विनोदजी रोकडे ठाणे जिल्हा सचिव,
मा.संदेशजी भालेराव ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
मा.प्रकाशजी जाधव उल्हासनगर जिल्हाअध्यक्ष, मा.दादुजी चव्हाण उल्हासनगर उपाध्यक्ष, व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

राष्ट्रीय ओबीसी बीग्रेड संघटने च्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड

राष्ट्रीय ओबीसी बीग्रेड संघटने च्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड
प्रतिनिधी नातेपुते – ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मूलभूत प्रश्नासाठी सदैव लढा देणारी राष्ट्रीय ओबीसी बिग्रेड या संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय श्री किशोरजी शेटे सर यांनी पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी आप्पासाहेब कर्चे यांची निवड केलेली आहे आप्पासाहेब कर्चे गेली 15 वर्ष मनसेच्या माध्यमातून समाजसेवेचे व राजकारणाचे काम करीत आहे तसेच लोणारी समाज सेवा संघाचे स्टार प्रचारक व रवींद्र भाऊ धंगेकर युवा मंच संस्थापक अध्यक्ष या माध्यमातून त्‍यांचा तरुण युवकांमध्ये दांडगा जनसंपर्क आहे त्यांची काम करण्याची पद्धत व व सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका अन्यायावर तुटून पडणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे ओबीसी समाजाच्या राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड संघटने ची पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येत आहे या निवडी दरम्यान आप्पासाहेब कर्चे बोलताना म्हणाले ही संघटना माननीय किशोर जी शेटे सर विद्याताई आदमाने मॅडम काकासाहेब बोराडे निर्मलाताई कदम ज्ञानेश्वर काळे मल्लिनाथ चौधरीसाहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र भर युवा आघाडी जाळे उभारून गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता अशा प्रकाराचे काम उभा करून एक आदर्श संघटने समोर उभा करीन व त्यासाठी सदैव प्रामाणिकपणे काम करीन

एन डी एम जे चे वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस न करता गरिबांना दिला मदतीचा हात

वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस न करता गरिबांना दिला मदतीचा हात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे) राज्य सचिव वैभव गिते यांनी स्वतःचा जन्मदिन साजरा न करता गरिबांना मदतीचा हात देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता कोरोना मुळे इतर राज्यातील व जिल्ह्यातील गोरगरीब मजूर लोक नातेपुते व परिसरात अडकल्याचे लक्षात घेऊन वैभव गिते यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेऊन वाढदिवसाला होणारा खर्च हे गरीबांसाठी गरजू मजूर वर्ग यांना मदत म्हणून माळशिरस तालुक्यातील चंद्रपुरी तांबेवाडी येथे मध्य प्रदेशमधील ऊसतोड मजूर कुटुंब यांना गहू,तांदूळ,तेल,साबण,माचिस,
कपड्याचा व अंगाचा साबण,खोबरेल तेल,मीठा सह जीवनावश्यक वस्तू दिल्या तसेच बोलताना वैभव गिते म्हणाले की ऍड. डॉ.केवलजी उके साहेबांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत जोपर्यंत मध्यप्रदेशातील हे कुटुंब माळशिरस तालुक्यात आहे तोपर्यंत त्यांची जबाबदारी एन.डी.एम.जे चे कार्यकर्ते घेतील.तसेच माळशिरस चे माजी सरपंच विकास धाईंजे म्हणाले की माळशिरस तालुक्यातील प्रत्येक अडकलेल्या मजुरा पर्यंत मदत पोहोचवली जाईल.मजुरांना कामगारांना जीवनावश्यक वस्तूंची गरज भासल्यास कोणताही संकोच न करता त्यांनी आमच्याशी संपर्क करावा मजुरांची अडचण सोडवली जाईल अन्न धान्य वाटप करताना शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्स चा नियम पाळून वाटप करण्यात आले तसेच यावेळी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले आहे. यावेळी वैभव गिते, विकास धाईंजे,विशाल साळवे मारुती सरगर, प्रमोद शिंदे,संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे उपस्थित होते. तसेच वैभव गिते यांना ब्ल्यू जीन्स ॲप च्या माध्यमातून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे ऍड केवल उके यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातून मुंबई पुणे ठाणे कल्याण वाशिम हिंगोली लातूर उस्मानाबाद सोलापूर इत्यादी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्हिडीओ कॉलिंग द्वारा वाढदिवसाच्या वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. तसेच या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रेणुका परिवाराच्यावतीने नातेपुते येथे पंधराशे कुटुंबांना मदतीचा हात

रेणुका परिवाराच्यावतीने नातेपुते येथे पंधराशे कुटुंबांना मदतीचा हात
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे) येथील रेणुका परिवाराच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच रेणुका परिवाराचे सर्वेसर्वा बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नातेपुते शहरात गरजू पंधराशे कुटुंबीयांना गृह उपयोगी साहित्यांचे वाटपाचा प्रारंभ नातेपुते येथील समाजभूषण नगर येथून माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.गावाला कुटुंब माणुन गावामध्ये असणाऱ्या गरजू गोरगरीब कुटुंबाला धान्य,तांदूळ तसेच त्यासोबत लागणाऱ्या अन्य वस्तूंचे पॅकेट करून शहरांमध्ये वार्ड नुसार घरपोच देण्याचे नियोजन रेणुका परिवाराने केलेले आहे.संपूर्ण शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या घरपोच सेवेच्या या उपक्रमामुळे विविध सामाजिक संघटना,तरुण वर्ग या सर्वांना प्रेरणा मिळून भरपूर मदतीचे हात येऊन मानवा कडूनच मानवतेचे दर्शन घडावे.यासाठी रेणुका परिवार सततच अग्रेसर आहे.आज देशावर संकट आलेले आहे ते घालविण्यासाठी सरकारने घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहावे.आरोग्याच्या दृष्टीने लागणारे मास्क,निर्जंतुकीकरणासाठी चे लागणारे साहित्य वाटप करण्यासाठी गावातील प्रत्येक वार्ड नुसार रेणुका परिवाराचे सदस्य कामकाज पहात आहेत असे बाबाराजे देशमुख यांनी सांगितले.गरजू गोरगरिबांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्यासाठी विविध वॉर्डामध्ये अमरशिल देशमुख,बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,महेश शेटे,उत्तम बरडकर,अतुल बावकर,मालोजीराजे देशमुख,धनाजी देशमुख,रणविरसिंह देशमुख,दादासाहेब लाळगे,राहुल पदमन,धनाजी पांढरे,अजित बाविस्कर,महावीर साळवे,नवाज सोरटे,शशी कल्याणी,समीर सोरटे,सागर बिचुकले,बाळासाहेब पांढरे,रोहित शेटे,शक्ती पलंगे,प्रवीण राऊत सदरील उपक्रमात सहभागी होऊन मामासाहेब पांढरे मित्र मंडळाच्या वतीने परिश्रम घेतले जात आहे. या उपक्रमाचा नातेपुते व परिसरात लोकांच्या कडून कौतुक होत आहे.

नातेपुतेत महावीर जयंतीनिमित्त अत्यावश्यक वस्तूंचे वाटप*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस येथे सकल जैन समाज नातेपुते व महावीर सेना यांच्या वतीने अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्री भगवान महावीर जयंती चे औचित्य साधून  ग्रामीण रुग्णालयात व नातेपुते पोलीस स्टेशन तसेच सर्व नातेपुते परिसरातील दवाखान्यात फळे, बिस्कीट, मास्क सॅनिटायझर असे 200 किट चे वाटप करणात आले. यावेळी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, पोलीस नाईक शिवकुमार मदभावी. महावीर सेनेचे राहुल गांधी, संजय गांधी, वैभव शहा,अमित गांधी ,राजू डुडु, सुयोग दोशी, विनोद दोशी,सौरभ दोशी,हितेश दोशी, सुकुमार दोशी उपस्थित होते तसेच महावीर सेनेच्या कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

माळशिरस तालुक्यात पत्रकार व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा लोकांचे पेट्रोल विना गैरसोय

तालुक्यात पत्रकार व कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवा लोकांचे पेट्रोल विना गैरसोय
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) माळशिरस तालुक्यामध्ये पत्रकारांसह कर्मचारी वर्ग व अत्यावश्यक सेवा करणाऱ्या लोकांची पेट्रोलपंप वाले पेट्रोल देत नसल्या कारणाने गैरसोय होत आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो तसेच पत्रकार मुळे परिसरातील चालू घडामोडी तळागळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असतात सध्या कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव असल्यामुळे पत्रकार स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रोगाविषयी जनजागृती करीत आहेत. तसेच बातम्या कव्हरसाठी पत्रकारांना बाहेर पडावे लागते. पत्रकार सुद्धा अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात परंतु पंप चालकांच्या आडमुठेपणामुळे पत्रकारांना पेट्रोल मिळत नाही. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय मिलिंद शंभरकर साहेब यांनी दिनांक 27 मार्च 2020 रोजी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात पत्रकार अत्यावश्यक सेवेत मोडतात त्यांना पेट्रोल देण्याचे आदेश परिपत्रकात दिले आहेत.तरीसुद्धा त्यांच्या आदेशाला पेट्रोल पंप चालकाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. यावर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी पेट्रोलपंप चालकांना पत्रकारांना पेट्रोल देण्याचे आदेश करावेत अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्याकडून होत आहे. पत्रकारांसह अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी अडवले जात आहे. याची दखल आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष या नात्याने मा.उपविभागीय प्रांत अधिकारी यांनी घ्यायला हवी. व यासंदर्भात पेट्रोल पंप वाल्यांना आदेश द्यावेत दिनांक 27 मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष प्रांत सो यांनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी पेट्रोल देण्यासंदर्भात आदेश काढले होते परंतु आज त्यांनासुद्धा पेट्रोल पंपावर ती पेट्रोल दिले गेले नाही. ही बाब गंभीर असून यावर मा.उपविभागीय दंडाधिकारी प्रांत व मा.तहसीलदार साहेब यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

*धर्मपुरी ग्रामपंचायत च्या वतीने मागासवर्गीय मुलींना सायकल वाटप व कुस्ती केंद्राचे उद्घाटन

*धर्मपुरी ग्रामपंचायत च्या वतीने मागासवर्गीय मुलींना सायकल वाटप व कुस्ती केंद्राचे उद्घाटन*

*नातेपुते (प्रमोद शिंदे) -धर्मपुरी ता.माळशिरस  येथे ग्राम निधी 15 टक्के मागासवर्गीय निधी मधून मागासवर्गीय विद्यार्थिनींना 25 सायकल वाटप करण्यात आले तर दहा टक्के महिला बालकल्याण निधी मधु अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना 240 ड्रेस वाटप करण्यात आले. व पाच टक्के अपंग निधी तून 19 लाभार्थ्यांच्या खात्यावर  प्रत्येकी २००० रुपये जामा करण्यात आले. तसेच स्वर्गवाशी मा.आमदार हनुमंतराव डोळस यांच्या फंडातून कुस्ती केंद्र उभारण्यात आले. जय हनुमान कुस्ती केंद्र धर्मपुरी कुस्ती केंद्राचे उद्घाटन नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.युवराज खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय. युवराज खाडे कुस्ती निवेदक युवराज केचे, 1988 महाराष्ट्र केसरी नाना मगर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.उमेश सूळ , दादा जवळकर आदी मान्यवर होते. ए.पी.आय.खाडे बोलताना म्हणाले की, कुस्ती हा खेळ पूर्वीसारखा राहिला नाही आता कुस्तीकडे खेळाडूंनी करिअर म्हणून पाहिले पाहिजे कुस्तीमुळे शरीर आणि मन तंदुरुस्त राहते. तरुणांनी नियमित व्यायाम केला पाहिजे तसेच या कुस्ती केंद्राचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या ताकतीचा उपयोग चांगल्या कामासाठी व वाद मिटवण्यासाठी केला पाहिजे. तसेच पै.उमेश सुळ, युवराज केचे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकात सरपंच बाजीराव काटकर म्हणाले की इलेक्शन होऊन दोन वर्षे झाली गावामध्ये अनेक विकास कामे झाली आहेत गावात सीसीटीव्ही कॅमेरे, पाणी व्यवस्थापन, रस्त्याची कामे, 225 एलईडी, बसवण्यात आले आहेत .तसेच हाय मस्ट लॅम्प सुद्धा बसवण्यात आले आहेत. दरवर्षी पालखीचे जंगी स्वागत करण्यात येते. या कार्यक्रमासाठी दादासाहेब काटकर, पैलवान शंकर काळे, पांडुरंग कर्चे, दादा जवळकर,पत्रकार बंधु  ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत धर्मपुरी यांच्यावतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

*नानासाहेब राऊत यांचे वृद्धापकाळाने निधन *

 *नानासाहेब राऊत  यांचे वृद्धापकाळाने निधन *नातेपुते (प्रतिनिधी)-नातेपुते नगरीतील सकाळचे ज्येष्ठ  पत्रकार सुनील राऊत यांचे  वडील नानासाहेब मारुती राऊत वय 80 यांचे वृद्धापकाळाने आज दिनांक 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी दुःखद निधन झाले येथील श्री.शंभु महादेव मंजूर सोसायटी चे ते अध्यक्ष होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली,नातू व्यसन मुक्त संघटनेचे सचीव विवेक राऊत असा परिवार आहे. सदर घटनेमुळे नातेपुते परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुर येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धा संपन्न

आमदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुर येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धा संपन्न
  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज( प्रमोद शिंदे )-मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्या वाढदिवसानिमित्त शिवपुरी तालुका माळशिरस येथे भव्य पथनाट्य व लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा वाय .व्ही .माने ग्रुप चे श्रींकांत दादा माने यांच्या सहकार्याने घेण्यात आली या स्पर्धेला आमदार यशवंत (तात्या ) माने चषक 2020 असे नाव देण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन  पत्रकार प्रमोद शिंदे  यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात  स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतिमेचे पूजन करून व मैदानावर श्रीफळ फोडून करण्यात आले . यामध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पथनाट्य लेझीम स्पर्धा गायन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेसाठी पंढरपूर, इंदापुर, व पंचक्रोशीतील स्पर्धकांनी  भाग घेतला होता. इंदापूर व पंढरपूर  येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती व शेतकऱ्यांची सद्यस्थिती व सामाजिक संदेश देणारे पथनाट्य सादर केले या स्पर्धेत  प्रथम क्रमांक एस बी पाटील इंजीनियरिंग कॉलेज इंदापूर, दुतिय क्रमांक सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पंढरपूर ,लेझीम स्पर्धा प्रथम क्रमांक मोरची विद्यालय, दुतिय क्रमांक प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय शिवपुरी, यांनी पटकावला, छोटा गट लेझीम स्पर्धा प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक एकशिव, दुतिय क्रमांक हनुमान वाडी कुरबावी यांनी पटकावला  स्पर्धे साठी यशवंत विठ्ठल माने कन्ट्रक्शन ग्रुप यांनी  विशेष सहकार्य केले तसेच एकशिव, शिवपुरी येथील माध्यमिक व प्राथमिक  शाळेतील विद्यार्थ्यांनी  नयना दीप असा लेझीम खेळ सादर केला यावेळी पत्रकार प्रमोद शिंदे, एकशिव गावचे चे माजी सरपंच शहाजी दादा धायगुडे, पत्रकार प्रशांत खरात, वाघमोडे सर, झोडगे सर, शिंदे सर, प्रेम देवकाते,कसबे सर, साळवे मॅडम, शैलेश नारोळे आदी मान्यवर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे आयोजन निखील जानकर  यांनी केले होते  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  येथील  मित्र  मंडळ  यांनी विशेष परिश्रम घेतले.

You may have missed