माळशिरस तालुका

पाच डिसेंबरला होणाऱ्या मुख्यमंत्री शपथविधीला एन डी एम जे कडून विरोध-वैभव गीते.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

5 डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री तथा तर मंत्र्यांच्या शपथविधीला एन डी एम जे संघटनेच्या वतीने विरोध करत आहोत असे मत एन डी एम जे चे राज्याचे सचिव वैभव गीते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचे शपथविधी होणार आहे. परंतु या शपथविधीला एन डी एम जे या सामाजिक संघटने कडून विरोध केला जात आहे.याचे कारण आशिकी सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण दिन आहे.त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भारतभरातून चैत्यभूमी दादर येथे लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येत असतात.ते भीम अनुयायी दिनांक 4 डिसेंबर पासूनच मुंबई मध्ये मोठ्या संख्येने दाखल होण्यास सुरुवात होते.व शिवाजी पार्क,चैत्यभूमी दादर परिसर, मुंबईतील मोकळ्या मैदानावर विसाव्यासाठी थांबतात.त्यामुळे आंबेडकर अनुयायी यांची अडचण होऊ नये.6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 डिसेंबरला शपत विधी असल्याने या कार्यक्रमाला सुद्धा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व लोक मुंबईत उपस्थित राहतील.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.कायदा सुव्यवस्था अबाधित आखण्याचा मोठा प्रश्न मुंबई पोलिसांच्या पुढे उभा राहणार आहे.त्यातून काही अडचण निर्माण होऊ नये, कोणत्याही प्रकारचा पथविधी व 6 डिसेंबरच्या कार्यक्रमाला काल बोट लागू नये याची दक्षता राज्यशासनासह मुंबई पोलीस यांनी घेण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे एनडीएमजी च्या वतीने 5 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या शपथविधीला विरोध करण्यात येत आहे.तो कार्यक्रम तीन तारखेपूर्वी वा 6 तारखेच्या नंतर घेण्यात यावा.जरी प्रशासनाने कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला.तरी 6 डिसेंबरच्या कार्यक्रमाला काल बोट लागणार नाही किंवा  अनुचित प्रकार घडणार नाही ची खबरदारी व संपूर्ण जबाबदारी घेऊन कार्यक्रम पार पाडावा.अशा प्रकारचे आव्हान शासन व मुंबई पोलीस प्रशासनास व वैभव गीते यांनी केली आहे.

तीन तारखेला मारकडवाडीत फेर मतदान


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे


 मौजे मारकडवाडी ता.माळशिरस येथे फेर मतदान   चाचणी निवडणूक (एक्झिट पोल) घेण्यासंदर्भात ग्रामस्थांनी ठराव करून तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीन वर आक्षेप घेत मतदान प्रक्रियेत घोळ झाला असून फेर मतदान घेण्यात यावे असा सूर लावला आहे. याबाबत मा. तहसीलदार यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की. मारकडवाडी गावात विधानसभा निवडणूक- २०२४ मध्ये संपूर्ण गावाने श्री.उत्तमराव जानकर साहेब यांना मतदान केले आहे. तरीही मतमोजणीनंतर श्री.उत्तमराव जानकर  यांना ८४३ मते तर श्री. राम सातपुते यांना १००३ मते पडलेली आहेत. आमचे गावचे यापूर्वीचे ही मतदान २००९,२०१४,२०१९, व पाच महिन्यांपूर्वीची २०२४ लोकसभा या निवडणुकीतील मारकडवाडी गावचे मतदान पाहिले असता ८० टक्के मतदान हे श्री.उत्तमराव जानकर साहेब किंवा ते सांगतील त्या उमेदवाराला मिळालेले होते. असे असताना आत्ताच्या २०२४ विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठे घोटाळे झाले आहेत किंवा कसे ? याबाबत खात्री करण्यासाठी आपली शासकीय यंत्रणा मिळणेसाठी, आम्ही सर्व गावकरी आपला असणारा संपूर्ण शुल्क भरणेस तयार आहे, तरी मंगळवार दि.०३/१२/२०२४ रोजी चाचणी मतदानासाठी (एक्झिट पोल) आम्हास शासकीय कर्मचारी मिळावेत अशा प्रकारचे निवेदन देण्यात आला आहे. या निवेदनावरती मारकडवाडी येथी लसरपंच व  ग्रामस्थ  यांच्या सह्या आहेत तसेच ग्रामस्थांनी प्रसार माध्यम प्रतिनिधी  यांच्या समोर पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असा आग्रह धरला आहे.मतदान करण्याची मागणी करणारे हे राज्यातील पहिलेच गाव आहे.

अभिनेत्री माधुरी पवार यांच्या उपस्थितीत यश लाईफस्टाईल चा लकी ड्रॉ ओपन, विजेत्यांना टू व्हीलर सह शेकडो बक्षीसे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रमोद शिंदे

नातेपुते येथील नावाजलेले यश लाइफस्टाईल चा  दिवाळी डबल धमाका लकी ड्रॉ माधुरी पवार यांच्या उपस्थितीत ओपन करण्यात आला. लकी ड्रॉ विजेत्यांना जाहीर केलेली पक्षाचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. लाईफस्टाईल चे मालक रोनक शेठ  चंकेश्वरा परिवाराच्या वतीने दरवर्षी दिवाळी व इतर सणांच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विविध स्कीम ची घोषणा केली जाते यावर्षी 2024 दिवाळी निमित्त डबल धमाका लकी ड्रॉ दिवाळी ऑफर ठेवण्यात आली होती.यामध्ये विजेत्यांसाठी  टू व्हीलर हिरो स्प्लेंडर एक, हिरो डिस्टनी स्कुटी एक, एलईडी टीव्ही, कुलर,मोबाईल, तसेच प्रत्येक ग्राहकाला आकर्षक गिफ्ट अशी शेकडो बक्षीस ठेवण्यात आली होती. त्यामध्ये पुढील प्रमाणे विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.     *डीस्टीनी हिरो स्कुटी चे विजेते* 🎁नाव : शुभांगी कैलास नरुटे  गाव : गिरवी  मो नं : 7499704395
 *हिरो स्प्लेंडर चे भाग्यवान विजेते* 🎁  नाव : दिपक पवार   गाव : पिरळे   मो नं : 8459460546*LED TV चे विजेते* 📺🎁नाव : रणजित महावीर मदने गाव :   बांगारडेमो नं : 9970933622 नाव  : श्रीमंत नारायण सूर्यवंशी गाव  : पिराळे मो नं : 9130208042
नाव : सानिका विकास बडवे गाव : नातेपुते मो नं : 99236759750
  *कुलर चे विजेते* 🎁 
 नाव : बाळासाहेब कदम  गाव : चिखली मो नं : 9579624831
 नाव : ओमप्रकाश शेषाराव पाटील  गाव : नातेपुते  मो नं : 9561051180
 नाव : सागर गोरे  गाव : नातेपुते  मो नं : 9022972265
 नाव : अशोक माने गाव : कण्हेर  मो नं : 7447425005
*मोबाईल चे विजेते* 📱🎁  नाव : तेजस श्रीकांत पांढरे  गाव : नातेपुते  मो नं : 7387481960
  नाव : तिर्थक प्रकाश बंडगर   गाव : नातेपुते  मो नं : 9604571665
  नाव : विठ्ठल नारायण सरगर   गाव : गिरवी  मो नं : 9763625005
  *फ्रिज चे विजेते* 🎁
  नाव : श्रद्धा धूळदेव गोरड   गाव : इस्लामपूर   मो नं : 7822831653विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. या बक्षीस समारंभासाठी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, तसेच सिने अभिनेत्री माधुरी पवार नातेपुते व पंचक्रोशीतील दिग्गज अनेक मान्यवर ग्रामस्थ ग्राहक या संख्येने उपस्थित होते.

पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्यावतीने पिरळेत घर घर संविधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


पिरळे तालुका माळशिरस येथे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने एन डी एम जे जि प शाळा पिरळे यांच्या वतीने 26 नोव्हेंबर भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाइंजे ऍड सुमित सावंत हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन सामूहिक संविधान प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली,गावातून संविधान रॅली काढून घरो घरी संविधान उद्देशिका देण्यात आली.तसेच उपस्थित मान्यवरांचा भारतीय  संविधान व संविधान उद्देशिका देऊन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात ए पी आय परजणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, केक कापून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.तसेच राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. ए पी आय  महारुद्र परजणे बोलताना म्हणाली की पुरोगामी महाराष्ट्र न्यूज हे नावाप्रमाणेच पुरोगामी विचारांचे काम करत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी  जगातील सर्वात महान संविधान आपल्याला दिले आहे  भारतीय संविधानाने आपल्याला सर्व अधिकार दिले आहेत.त्यामुळे संविधानाचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. तसेच एडवोकेट सुमित सावंत यांनी संविधान आणि संविधानाने दिलेले आपणास अधिकार याविषयी मार्गदर्शन केले.माजी उपसरपंच संदीप नरोळे,मा.विस्तार अधिकारी प्रल्हाद साळवे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले, संपादक प्रमोद शिंदे,समता दूत किरण वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.उद्देशिकेचे वाचन मुख्याध्यापक संजय  ढवळे सर यांनी केले. सूत्र संचालन हनुमंत फुले सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र परिवाराचे प्रमुख प्रमोद शिंदे यांनी केले.या कार्यक्रमास का संपादक प्रशांत खरात,सरपंच विद्याताई लवटे,ग्रामसेवक हनुमंत वगरे, मा.सरपंच ज्ञानदेव शिंदे,महादेव शिंदे,गणेश दडस, पॅंथर जिल्हाध्यक्ष सदस्य दादासाहेब शिंदे,गोरख साळवे, काशिनाथ दडस, अशोक तोडकर,भारत पवार,ग्रामसेवक,विश्वास बनकर,अमोल वाघ,संजय पाटील, मोहन पवार, अध्यक्ष उज्वला बुधवले,आरोग्य सेविका विजय शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता सूर्यवंशी,सीमा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक ढवळे सर, निगडे सर,शेंडगे मॅडम, नामदे मॅडम,जब्बर मुलाणी सर, अमोल खरात सर सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

अतिशय क्षेत्र दहिगाव येथे रथोत्सव व पंचवार्षिक मानस्तंभ 125 वर्षपूर्ती होत्सव उत्साहात संपन्न,

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातील जैन बांधवांचा मानबिंदू असलेला दहिगाव येथील रथोत्सव व पंचवार्षिक मानस्तंभ 125 वर्ष पूर्ती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पंचवार्षिक मानस्तंभ दर्शन पायाड करण्यात आले होते.भाविकांनी कलश घेऊन मानस्तंभाचे दर्शन घेतले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी रथोत्सव मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन रथोत्सव साजरा करण्यात आला.रथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाच मजली लाकडी धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर यांचे मूर्ती ठेवून भव्य दिव्य अशी वाजत गाजत गावातून मिरवणूक  काढण्यात आली.या धर्म रथाला हार तुरे पताका लावून रथाचे सुशोभीकरण करण्यात आले होते.गाव प्रदक्षिणा करून सर्व जाती-धर्माच्या लोकांनी तो रथ पंडितांच्या माळावर परंपरेनुसार मानवी साखळी करत दोरीच्या साह्याने ओढत नेला.व श्री 108आचार्य  सुयश सागरजी महाराज ससंघ व्यासपीठावर उपस्थित होते.यांच्या सानिध्यात बालब्रह्मचारी रेवती ताई दोशी यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला सागरजी महाराज व रेवती ताई यांनी भाविकांना मार्गदर्शन केले.याच ठिकाणी पुढच्या वर्षीच्या रथोत्सव कार्यक्रमाच्या विविध चाढाव्यांच्या संगीतमय बोली घेण्यातआल्या. या कार्यक्रमास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे,पीएसआय विक्रांत दिघे व अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधव श्रावक,श्राविका यांनी परिश्रम घेतले.

दहिगाव येथे रथोत्सवानिमित्त 25 वे सर्वरोग निदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –


श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव येथे रथ उत्सवानिमित्त भव्य मोफत नेत्र व सर्व रोग निदान शिबिर संपन्न झाले.प्रथम कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत,व भगवान महावीर प्रतिमापूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली. हे शिबिर ऍड श्री धन्यकुमार मोहनलाल दोशी फाउंडेशन मुंबई, स्वर्गवासी सौ. कमल धन्यकुमार दोशी यांचे स्मरणार्थ माजी अध्यक्ष विजयकुमार मोहनलाल दोशी यांचे संयुक्त विद्यमाने 25 वा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. या शिबिरात नेत्र तपासणी, मधुमेह, रक्त तपासणी,इसीजी, हाडांचे आजार, मोतीबिंदू, रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. या शिबिरास डॉक्टर अजिंक्य होरा, डॉक्टर चिराग होरा,सौरभ गांधी, डॉ. अक्षय दोशी,डॉ.उत्कर्ष गांधी,डॉ.सनी गांधी, डॉ. सुनय गांधी,डॉ. तेजस चंकेश्वर,डॉ.अनुजा दोशी, गोमटेश दोशी आधी डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सेवा दिली. याप्रसंगी सेक्रेटरी संजय कुमार दोशी, सरपंच पूनम खिलारे, रामचंद्र पाटील,ए.पी.आय.महारुद्र परजणे, पीएसआय विक्रांत दिघे, नरेंद्र गांधी, डॉक्टर अमृता कामते, शितल गांधी,वैभव शहा, संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी, विश्वस्त, खजिनदार, उपस्थित होते.डॉ. चिराग होरा बोलताना म्हणाले की शिबिरासाठी डॉक्टर्स, लॅब, मेडिकल सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे अनेक रुग्णांना त्याचा फायदा होतो. भविष्यातील अशा प्रकारचे काम सुरू राहील.नरेंद्र गांधी बोलताना म्हणाले आरोग्य शिबिर 25 वर्षापासून सुरू आहे. आज मानस थांबायला 125 वर्षे पूर्ण होतात. असेच भगवान महावीरांच्या मूर्तीला 175 वर्षे पूर्ण झालेले आहेत. सर्व ग्रामस्थांच्या व समाज बांधवांच्या मदतीने सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात.570 रुग्णांची तपासणी करण्यात आली.270 रुग्णांचे डोळे तपासणी करून 100 चष्म्यांचे वाटप करण्यात आले,41 रुग्णांची स्पायरोमॅटिक, ECG, रक्त तपासणी करण्यात आली,फुफूसाची चाचणी करण्यात आली रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले.अमित शहा,अमोल गांधी,दीपक दोशी,गोमटेश दोशी, अमित गांधी, अमोल गांधी,नातेपुते व अकलूज मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधांचा  पुरवठा करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी  होण्यासाठी सकल जैन समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

संविधान दिन साजरा न करणाऱ्या कार्यालयीन प्रमुखाच्या तोंडाला काळे फासणार-वैभव गीते (एन.डी. एम.जे राज्य)

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे-
संविधान दिन साजरा न करणाऱ्या प्रशासकीय कार्यालयीन प्रमुखाच्या तोंडाला काळ फासून कर्तव्यात कसूर केल्याबाबत बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे अशा प्रकारचे निवेदन आयुक्त समाजकल्याण महाराष्ट्र राज्य यांना वैभव गीते यांनी दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की. 26 नोव्हेंबर 2024 हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा करून संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 “घर घर संविधान” अभियान राबवण्याचे सर्व विभागांना आदेश देऊन जो विभाग संविधान दिन, व संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” अभियान साजरा करणार नाही त्यांच्या कार्यालयीन प्रमुखांना बडतर्फ करण्यात यावे. शासन निर्णयाचे संदर्भ देण्यात आले 1) सामान्य प्रशासन विभाग 24 नोव्हेंबर 2008 शासन निर्णय2) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 4 नोव्हेंबर 2013 शासन निर्णय2) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग 10 ऑक्टोंबर 2024 शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24 नोव्हेंबर 2008 च्या शासननिर्णयानुसार भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी. याकरिता राज्यात दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या शासन निर्णयात नमुद आहे की,सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये जिल्हा परिषद पंचायत समित्या, नगरपालिका,महानगर पालिका, ग्रामपंचायती महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा व महाविद्यालयांमध्येसंविधान दिवस पुढीलप्रमाणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व शासकीयनिमशासकीय विभागांमध्ये संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात यावे.संविधानाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सर्व शाळा महाविद्यालयांमार्फत त्या दिवशी संविधान यात्रा काढण्यात यावी. प्रभात फेरी काढावी. संविधानाचा घोषणा द्याव्यात. व त्यामध्ये संविधानाची प्रास्तावीका मूलभूत हक्क, कर्तव्य, व जबाबदाऱ्या, इत्यादी संविधानातील महत्वाची कलमे ठळक रित्या दिसतील असे बॅनर, पोस्टर वापरावेत.याबाबत शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध/भित्तीपत्रके /सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत संविधानाबाबत जनजागृती करणारी व्याख्याने, कार्यक्रम आयोजित करावेत. संपूर्ण कार्यक्रमाचा वस्तुनिष्ठ अहवाल व्हिडिओ शूटिंग, फोटो, काढून 5 डिसेंबर पर्यंत अहवाल जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनास पाठवावा. असे 24 नोव्हेंबर 2008 च्या शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासनाने म्हणजे शासनाने सर्व विभागांना आदेशित केलेले आहे.तसेच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 10 ऑक्टोंबर 2024 रोजी भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणे बाबत निर्णय घेतलेला आहे.संविधान अमृत महोत्सव हा 26 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होत आहे.यामधे संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, पथनाट्य व पोष्टर प्रदर्शन याचा समावेश करावा. संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे. असे आदेश आहेत.यासाठी शासनाने जिल्हास्तरीय समिती गठित केली आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव आहेत.जिल्हास्तरीय समितीने संविधान मंचाच्या कार्याची वार्षिक योजना तयार करणे ज्यामध्ये विविध उपक्रम, कार्यक्रम, चर्चा सत्रे, आणि स्पर्धा आयोजित करण्याचे नियोजन करावे.तारखावार तसेच महिनावार वेळापत्रक आखुन विशेष कार्यक्रम आयोजित करने. सदर समितीने उपरोक्त मार्गदर्शक सूचना व्यतिरिक्त आपल्या स्तरावरून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश करून अधिक चांगल्या रीतीने कार्यक्रमांच्या अंमलबजावणी करावी. असे देखील शासन निर्णयामध्ये नमूद आहे. या सर्व बाबी समिती सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावे.संविधान अमृत महोत्सव सन 2024 25 घर घर संविधान हा कार्यक्रम दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पासून पुढील प्रत्येक वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी करावी तसेच संबंधित जिल्ह्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे खात्री व सनियंत्रण संबंधित विभागीय आयुक्त यांनी करावे या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मूल्यमापन करून त्याबाबतची नोंद संबंधित जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त यांच्या वार्षिक मूल्यांकन अहवालात घेण्यात यावी. असे देखील शासनाने आदेशित केलेले आहेत्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर 2024 पासून संविधान अमृत महोत्सव सन 2024 पंचवीस घर घर संविधान या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी तात्काळ वार्षिक वेळापत्रक तयार करावे व अंमलबजावणी करावी.वार्षिक वेळापत्रकामध्ये जनतेचा सहभाग, संस्था संघटनांचा सहभाग, पत्रकार, जेष्ठ सामाजिककार्यकर्ते यांचा सहभाग, ग्रामपंचायती, तलाठी, यांच्यासह म्हणजे ग्रामपातळीपासून ते तालुकास्तरावर (प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी) व जिल्हास्तरावर सर्व शासकीय निमशासकीय विभाग यामध्ये येतील, व शासन धोरणानुसार कार्यक्रम आयोजित करतील अशा जबाबदाऱ्या कर्तव्य निश्चित करव्यात.सदर समितीचे सदस्य सचिव हे निवासी उपजिल्हाधिकारी असल्याने त्यांनी तात्काळ या समितीची बैठक बोलावून वार्षिक वेळापत्रक संविधान अमृत महोत्सवाची अंमलबजावणी करावी.सर्व जिल्हाधिकारी यांनी संविधान दीन साजरा केल्याचा अहवाल त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागांचा वस्तूनिष्ठ अहवाल घेण्यात यावा. अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयीन प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधीकारी 26 नोव्हेंबर दिनी कार्यालयात संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून संविधान दिन साजरा करीत नाहीत. शासनाच्या आदेशानुसार, शासन निर्णयानुसार संविधान दिन साजरा करीत नाहीत.आशा कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी.26 नोव्हेंबर 2024 या संविधान दिनाच्या महत्त्वाच्या दिवसावर निवडणूक आचारसंहितेचा, निवडणूक निकालांचा कोणताही प्रभाव पडणार नाही. याची दक्षता जिल्हाधिकारी व कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.अनेक कार्यालयीन प्रमुख जाणून बुजून रविवारी 26 नोव्हेंबर दीन साजरा करणार नाहीत. याच्यावर जिल्हाधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, यांनी व्यवस्थित लक्ष द्यावे. अशा कार्यालयीन प्रमुखांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी. सर्व विभागांचा वस्तुनिष्ठ अहवाल संविधान दिन साजरा केल्याचा व्हिडीओ चित्रीकरण करावे म्हणून आदेश देण्यात यावेत.ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये व सर्व प्रकारच्या शाळा महाद्यिालयांमध्ये, आश्रम शाळांमध्ये, वसतीगृहांमध्ये संविधान यात्रा प्रभात फेरी काढणार नाहीत त्यांची मान्यता रद्द करावी. शासकीय अधिकाऱ्यांनी कसुरी केल्यास देशद्रोही समजून सेवेतून बडतर्फ करावे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा. यामध्ये कसुरी केल्यास संघटनेच्या माध्यमातून जे कार्यालयीन प्रमुख संविधान दिन साजरा करणार नाहीत अशांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल याची नोंद घ्यावी.अशा प्रकारचे निवेदन एन डी एम जे राज्यसचिव वैभव गिते यांनी  युक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिले आहे.निवेदनावरती एन डी एम जे कायदेशीर सल्लागार विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत,एडवोकेट अमोल सोनवणे,ऍड.नवनाथ भागवत, राज्य संघटिका पंचशीला ताई कुंभारकर, यांच्या सह्या आहेत.

पिरळे येथे मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देत शांततेत मतदान.


पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क प्रमोद शिंदे


पिरळे तालुका माळशिरस येथे उस्फुर्त प्रतिसाद देत मतदारांनी शांततेत मतदान केले.मतदारांनी लोकशाहीचा उत्सव चांगला प्रतिसाद देत साजरा केला.माळशिरस तालुका 254 अनुसूचित जाती विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना मतदार संघातील मतदारांनी स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे . पिरळे येथे एकूण तीन बुथ होते तीन बूथ वरील एकूण मतदान 3008
पैकी 2154 मतदान पोल झाले आहे 69.33% मतदान झाले असून. बुथ क्रमांक 61- 951 पैकी-महिला-332, पुरुष-373 व इतर दोन-2 एकूण=707,बुत क्रमांक-62-एकूण मतदान-1047, पैकी-711, महिला-317, पुरुष 394, एकूण=711, बुथ क्रमांक-63- 1110, पैकी-महिला-361, पुरुष 375, एकूण=736, अशाप्रकारे मतदान झाले असून. वृद्ध अपंग व महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून. आता मतदारांना 23 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे.

१२५ वर्ष पूर्ती पंचवार्षिक मानस्तंभ महोत्सवानिमित्त दहिगाव येथे विविध कार्यक्रम.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे

सालाबाद प्रमाणे श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र दहिगाव ता माळशिरस जि. सोलापूर येथे वार्षिक रथोत्सवास  कार्तिकी वद्य पंचमी निमित्त बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर2024 रोजी रथोत्सवाची सुरुवात होत आहे. तसेच 125 वर्ष पूर्ती पंचवार्षिक मानस्तंभ अभिषेक महोत्सव निमित्त अतिशय क्षेत्र दहिगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 10 वा.पर्यंत भगवान श्री यांचा अभिषेक संपन्न होणार असून 11ते 2 मंदिरामध्ये संगीतमय भक्ताम्बर विधान मध्यान दुपारी 2 वाजता श्री 1008 जिनेन्द्र देवाधिदेव यांची पालखी शोभायात्रा,पंडित चंद्रगुप्त वाटिका येथे संगीतमय बोली वअभिषेक.गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ श्री 1008 बाहुबली भगवान यांचा अभिषेकब्रह्म महतीसागर चरण पादुका अभिषेक  सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत संगीतमय शांतिनाथ विधान तसेच सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत सर्व रोगनिदान शिबिराच्या आयोजन. मधुमेह, मोतीबिंदू, मणक्याचे पाठीचे आजार असणाऱ्या रुग्णांनी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता मानस्तंभ पायाड उद्घाटन ,8 वा.मानस्तंभ अभिषेक,पाच मजली भव्य लाकडी धर्म रथामधून श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांची भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघेल दुपारी बारा वाजता सभामंडप उद्घाटन, सभा मंडपामध्ये रथा  मधून मूर्ती घेण्याचा कार्यक्रम संगीताचा कार्यक्रम होणार असून या रथउत्सवात महाराष्ट्रातून व इतर राज्यातून अनेक भाविक येत असतात. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त जैन बांधव व मंदिर समितीच्या वतीने करण्यात येते.या कार्यक्रमासाठी मंदिर विश्वस्त कमिटी कार्यकारणी सदस्य महावीर सेना नातेपुते महती सेना दहिगाव विशेष परिश्रम घेत आहेत.

दहिगाव येथे वार्षिक रथयात्रा महोत्सवानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न-

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क-प्रमोद शिंदे

दहिगाव येथे वार्षिक रथयात्रा महोत्सव 2024 निमित्त ब्रह्ममहती सागर महाराज भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 17 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी एक ते पाच या वेळेत दहिगाव येथे जैन गुरुकुल मध्ये संपन्न झाली. स्पर्धेमध्ये पहिली ते खुल्या गटात एकूण 271 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये 24 तीर्थंकर लांछन गीत, अरिहंत स्तुती, निर्माण कांड, शांतीसागर महाराज यांच्या जीवनावरील कथा अहिंसा धर्म,पर्यावरण अशा विषयांवर स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेचे संयोजक म्हणून अनुराधा महिला मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली.यावेळी मंदिर चे विश्वस्त व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.