माळशिरस तालुका

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने 26 नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते नातेपुते पोलीस स्टेशन व ज्ञानदीप ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने नातेपुते येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन तसेच 26 /11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानाने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे सर्व कर्मचारी व ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष सीडी ढोबळे हनुमंत माने यांनी केले आहे.

दहिगाव हायस्कूल दहिगावचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे), दहिगाव ता,माळशिरस येथील,प्रगत शिक्षण संस्थेच्या दहिगांव हायस्कूल दहिगांव येथे संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त तसेच संस्थापक कै.विठ्ठलराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९६८ते२०१५ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांसाठी प्रीतीभोजन स्नेह व मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. वंदनादेवी मोहिते म्हणाल्या की ,या मेळ्याव्याला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील्यात त्याबद्दल धन्यवाद,या संस्थेसाठीआपल्या मदतीचीगरज आहे,आपल्यात स्नेह,प्रेम निर्माणव्हावे,तसेच शाळेसाठी,पिण्याचे पाणी,ग्रथालय,प्रयोगशाळा,स्छच्छपाग्रह,सभोवताली कूंपण,प्रोजेक्ट रूम,ईमारत या भौतिक सूविधा अपूरा पडत आहेत माजी विद्यार्थानी तन,मन,धनाने मदत करूण आपले उत्तरदायित्व द्यावे,या सूविधा मिळ्याल्यास,मूलाच्या गूणवत्तेत सूधारणा,तसेच मूलांना चांगल्या सूविधा देणे शक्यहोणार आहे.
यावेळी सस्थेचे माजी अध्यक्ष कै.विठ्ठलराव पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेतील मूलींनी राष्ट्रगीत स्वागतगीताने माजी विद्यार्थाचे स्वागत केले तसेच कोविडमध्ये दुःखद निधन झालेल्या शिक्षक व माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी शिवप्रसाद डेअरीचे चेअरमन शरद मोरे,दहीगांवचे सरपंच रणधिर पाटील,अलका चिकणे,सतिश किर्दक,प्रमोद शिंदे,ज्ञानेश्वर फूले,बी.डी,पाटील,फूलन शिंदे,विठ्ठल मोरे,बी.टी.गायकवाड, दीक्षित सर,किर्दक सर,वनिता संभाजी फुले,योगेश चिकणे,सत्यशील पाटील,संभाजी फूले, मुलाणी सर अमरसिंह पाटील, समाधान पाटील, भाऊसाहेब भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या
कार्यक्रमास,सचिव वर्षाराणी पाटील ऍड वनिता पाटील,संदिप सावंत,दिनकर माने संचालक आशिष मोहिते ,प्रमोद शिंदे,महेश पाटील,हणमत चिकणे, हनुमंत फूले,अलका चिकणे,सपना गांधी, धनंजय खिलारे, विजयसिंह पाटील भंडारे मॅडम, पत्रकार पवार सर,विजय गोसावी मुख्याध्यापक मुकुंद मोरे तसेच सर्व माजी शिक्षक,माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या सख्येने उपस्थित होते,सूञसंचालन औदूबर बूधावले,सय्यद यांनी केले व आभार मूख्याध्यापक मूकूंद मोरै यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.अनेक दिवसातून भेटलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी एकमेकांची विचारपूस केली व बरेच दिवसातून मित्रांना भेटायला मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले विद्यार्थ्यांनी शिक्षक तसेच आपल्या मित्रांसोबत सेल्फी फोटो चा ही आनंद घेतला. संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व विद्यार्थी व मान्यवरांना स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती

याप्रसंगी हायस्कूल साठी,शिवप्रसाद डेअरीचे चेअरमन शरद मोरे व परीवाराकडूण,१ लाख५१ हजार रू,१९९४ च्या माजी विद्याकडून १ लाख रू,१९९५ च्या माजी विद्यार्थाकडून५१ हजाररू. धनाजी ढगे या माजी विद्यार्थ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्कृष्ट माथाडी कामगार पुरस्कार मिळालेले 51 हजार रुपये शाळेसाठी त्याने दिले,तसेच दहीगांवचे सरपंच रणधीर यांनी१ लाख रू सी.सी.टि.व्ही बसवून शाळेसाठीदेण्याचे जाहीर केले शंकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी उदयसिंह पाटील यांनी एक महिन्याचा पगार संस्थेला देण्याचे जाहीर केले.

दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

दहिगाव रथोत्सव उत्साहात संपन्न*

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क नातेपुते प्रमोद शिंदे

 संपूर्ण महाराष्ट्रातील जैन बांधवांचा मानबिंदू असलेला दहिगाव येथील रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात व मोठ्या प्रमाणात सलग तीन दिवस वेगवेगळे उपक्रम घेऊन रथोत्सव साजरा करण्यात आला. रथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाच मजली लाकडी धर्म रथामध्ये श्री 1008 भगवान महावीर यांची मूर्ती ठेवून भव्य दिव्य अशी वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली काढण्यात आली.या धर्म रथाला हार तुरे पताका लावून रथाचे सुशोभीकरण करण्यात आले होते.गाव प्रदक्षिणा करून तो रथ पंडितांच्या माळावर परंपरेनुसार नेण्यात आला. व श्री 108 शुभंकीर्ती महाराज यांच्या सानिध्यात संस्थेचे माजी अध्यक्ष सी.आर.दोशी यांना मरणोत्तर समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.व याच ठिकाणी पुढच्या वर्षीच्या रथोत्सव कार्यक्रमाच्या विविध चढावांच्या संगीतमय बोली घेण्यातआल्या.या कार्यक्रमास माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी सुद्धा हजेरी लावली व श्री महावीर दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव मंदिरास 25 लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. जैन बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपंगे व अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधव श्रावक श्राविका यांनी परिश्रम घेतले.

आदर्श शिक्षिका कु सविता साळवे मॅडम यांच्या जाण्याने, शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान

  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे या शाळेतील उपशिक्षिका व सध्याच्या एकशिव शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका कु.सविता भालचंद्र साळवे मॅडम यांचे दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी मध्यरात्री वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
    त्या अतिशय कामसू ,कर्तव्यनिष्ठ विद्यार्थी प्रिय आदर्श शिक्षिका तसेच इंग्रजी गणिताच्या उत्तम शिक्षिका होत्या व स्वतः महाविद्यालय काळात क्रिकेट कबड्डी खो-खो राज्यस्तरीय खेळाडू असल्यामुळे उत्तम क्रीडा शिक्षिका सुद्धा होत्या. त्यांनी पिरळे कळंबोली एकशिव शाळेतील कार्यकाळात त्यांच्या उत्कृष्ट अध्यापनामुळे अनेक विद्यार्थी घडले अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदस्थ आहेत. त्यांचं मुळगाव एकशिव पूर्ण शिक्षण वालचंद नगर येथे झाले सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे उल्लेखनीय काम पाहायला मिळाले आहे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा रुजवण्याचं काम त्यांनी केले आहे ग्रामीण भागात स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता स्त्रियांवर होणाऱ्या अन्य अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती स्वतःचा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता सतत शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान दिले आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आई-वडील भाऊ व त्यांचे पाठोपाठ यांचे निधन त्यांच्या पश्चात बहिण भाऊ असा परिवार आहे. 29 वर्षाच्या सेवाकाळात सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडल्या.त्यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण शिक्षण विभाग गहिवरून गेला आहे.माळशिरस तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचेमोठे नुकसान झाले असून.अनेक विद्यार्थी व सहकारी यांनी त्यांच्याप्रती भाव व्यक्त केले त्यांना पुरोगामी महाराष्ट्र परिवाराच्यावतीने मरणोत्तर सावित्रीबाई फुलेे आदर्श शिक्षिका जाहीर करण्यात आला आहे .

भास्कर जाधव यांनी नाभिक समाजाप्रती अपशब्द वापरल्याबद्दल माळशिरस तालुका अध्यक्ष किशोर साळुंखे याचा एल्गार

भास्कर जाधव यांनी नाभिक समाजाप्रती अपशब्द वापरल्याबद्दल माळशिरस तालुका अध्यक्ष किशोर साळुंखे याचा एल्गार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे आ.भास्कर जाधव यानी नारायण राणे ताच्यावर ठीका करताना नाभिक समाजावरती अपशब्दाचा वापर केला आहे या विषयावर वारंवार सरकार दरबारी लेखी स्वरूपात पाठपुरावा करूनसुध्दा कोणतीही दखल घेतली जात नाही राष्ट्रीय नाभिक सघंटनेच्या
वतीने माळशिरस तालुका- अध्यक्ष किशोर साळुंखे व नवनाथ राऊत सुदाम जाधव योगेश जाधव निलेश शिदेशिवाजी कोरटकर धर्मराज खंडागळे रणजीत खंडागळे विकी क्षीरसागर पवन क्षीरसागर अजिक्य खंडागळे याच्या उपस्थित जोपर्यंत भास्कर जाधव समाज्याची माफी मागत नाहीत व्यापक आदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला

माऊली बहु . संस्थेने केला सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ यांचा सत्कार

माऊली बहु . संस्थेने केला सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ यांचा सत्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क विजय कुचे अकोला शहरातील प्रत्येक वस्तीत शासनाने सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध द्यावी तसेच प्रत्येक वस्तीत गरीब असलेल्या नागरिकांना प्राधान्याने शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घ्यावा यासह इतर समाजोपयोगी उपक्रम राबविले आणि प्रसंगी आंदोलने करणारे सामाजिक कार्यकर्ते शंकर कंकाळ यांची धडपड पाहता त्यांचा उत्साह वृद्धिंगत व्हावा यासाठी माऊली बहु . संस्थेने एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला आहे
त्यांच्याच अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर पोलीस प्रशिक्षण केंद्र बँड पथकाच्या द्वारे वादनकला विकसित करून नवयुवकाना प्रोत्साहित केल्याबद्दल महादेव सदांशिव यांचा आणि ,आरोग्य क्षेत्रात गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या रेखाताई घरडे आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी आनंद इंगळे,मिलिंद बनसोड ,दिलीप सिरसाट,मीनाक्षी तायडे,शोभा वानखडे,शिवना डोंगरे, जयदीप पाळसपगर, गणेश सपकाळ,हेमंत उके, रजनी गवई, निलेश खडसान, कल्पना घुगे,आशीष सोनोने, वैशाली सिरसाट,विजय माला पाईकराव, शीला उके,आकाश इंगळे, दीपक सिरसाट,प्रमोद पांडे,पवन कनोजिया, इर्शाद अहमद, सागर इंगळे ,आकाश वानखडे आदींचा समावेश होता . कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली बहु . संस्थेच्या अध्यक्षा वर्षा गजभिये यांनी केले तर सूत्र संचालन शोभा वानखडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन शिवानी डोंगरे यांनी केले

डॉ.बा.ज दाते प्रशालेतील संजय पवार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

बा.ज दाते प्रशालेतील संजय पवार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –

सोलापुर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ याच्यावतीने या वर्षिचा  देण्यात येणारा आदर्श शिक्षक पूरस्कार नातेपुते येथील डाॅ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला  येथील सांस्कृतिक विभाग संजय पवार यांना देण्यात आला  हा पुरस्कार सांगोला येथील  फॅबटेक काॅलेजमध्ये माजी आमदार दिपकआबा सांळूखे  पाटील याच्या हस्ते देण्यात आला,  संजय पवार सर यांच्या सामाजिक ,शैक्षणिकाम,कोरोना काळात उल्लेखनीय काम,शालेय सहल, पर्यावरण संर्वधन याबद्दल हा पूरस्कार देण्यात आला   या कार्यक्रमास माजी आमदार दिपक सांळूखे पाटील, माजी अध्यक्ष शिवाजीराव जमाले .भारत इंगवले,सागर पाटील, सचिन झाडबूके ,प्रबूद्दचंद्र झपके,भाऊसाहेब रूपनर ,प्रविण बडवे,राजें द्र काळे, विकास काळे,हनूमंत वाघमोडे,अनिल सावंत, हनूमंत बनसोडे, तूकाराम भोमाळे,धवल गांधी, अमोल पिसे, संभाजी कोकाटे,यशवंत चव्हाण, पोपट डोईफोडे,सूधाकर भोमाळे,विनोद काळे, रोहीत उराडे, नितीन काळे, सचिन ठोबरे हे उपस्थित होतै. संजय पवार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल बा.ज दाते प्रशालेचे चेअरमन डॉ एम पी मोरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व संचालक मंडळ तसेच शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

नातेपुते येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना यां अभिवादन

      पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी : नातेपुते येथे दरवर्षी परंपरेने श्रावण महिन्यात चतुर्दशी दिवशी समाज बांधवांच्या व भजनी मंडळ नातेपुते यांच्या वतीने तिथीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी दि. २६ ऑगस्ट रोजी  सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या हस्ते प्रतिमापूजन व भजनाचा कार्यक्रम होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर आरती होऊन पसायदान घेऊन अभिवादन करून प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली     यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार मनोहर महाराज भगत, हनुमंतराव धालपे, दत्तात्रयभाऊ उराडे, प्रभाकरभाऊ चांगण,दिलीप उराडे, दत्तात्रय हुलगे,बिट्टू अण्णा काळे, विनायकराव उराडे,विजयराव डफळ, संजय मामा उराडे, गणेश बापू उराडे, सोपान उराडे, दिलीपराव ठोंबरे, अमर भिसे, प्रेमभैया देवकाते,अवधूत अण्णा उराडे, महेश ठोंबरे, दर्शन उराडे, पवन उराडे, जयपाल ठोंबरे, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत, विलासराव लाळगे, दिलीपराव लाळगे, माऊली राऊत भाजप अनुसूचित जाती मोर्चेचे तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे,भजनी मंडळाचे जगन्नाथ सोनवळ, साहेबराव देशमुख, तुकाराम ठोंबरे, सुभाष उराडे, भागवत चांगण, नारायण चांगण, दशरथ चांगण, भागवत साळी, दत्तात्रय लांडगे, विठ्ठल पिसे, दयानंद लाळगे, एकनाथ उराडे, लक्ष्मण महाराज, पिंगळे दशरथ, पवार माऊली, कवितके तसेच गावातील समाज बांधव व दत्त प्रसादिक भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी व  भजनी मंडळ नातेपुते यांनी परिश्रम घेतले, याप्रसंगी नातेपुते गावातील पत्रकार बंधू विलासराव भोसले, अभिमन्यू आठवले, बापूसाहेब बाविस्कर, प्रमोद शिंदे, श्रीराम भगत, उपस्थित होते

गोगल गाय उपद्रव व एकात्मिक नियंत्रण – सतीश कचरे ता. कृषि अधिकारी ‘

गोगल गाय उपद्रव व एकात्मिक नियंत्रण – सतीश कचरे ता. कृषि अधिकारी ‘

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पावसाळा हंगामात प्रामुख्याने जून ते सप्टेबर या कालावधीत गोगल गाय पपई ‘ केळी ‘ वाल ‘ दोडक्याचे वेल ‘वागी ‘ भेंडी काकडीवर्गीय फळे ‘मिरची ‘ पानकोबी ‘ फुलकोबी व सर्वप्रकारच्या पालेभाज्या सोयाबीन ‘ कापुस ‘ ऊस रोपवाटीकेतील रोपे ऊगवून आलेली नवती यांचे पाने फुले कंद मध्ये खाण्यासाठी छिद्र करतात

तसेच बीयापासून अंकुरीत कोवळे टोब यांना कुरतडतात खातात यामुळे उपद्रव होऊन तसेच कुरतडलेल्या ठिकाणी बुरशीचा प्रार्दुभाव होऊन लहान रोपे मरतात यामुळे लाक्षणीक उत्पादनात घट येते.

जमिनीवर व गोडया पाण्यात राहणाऱ्या गोगल गा यच्या पंसतीस हजार प्रजाती आहेत . गोगल गायचा वापर युरोपात खाण्यासाठी कोबडीखादया व विविध पदार्थ करण्यासाठी केला जातो . हिंदू धर्मात गोगल गाय शंख पुजन व शंख नाद साठी महत्व आहे. गोगल गाय रात्रीच्या वेळी पिकाला उपद्रव करते व सुर्यादयनंतर लपून बसते . उत्पादनातील घट व मालाचा ( भाजीपाला ) दर्जा राखणेसाठी गोगल गायचा एकात्मिक प्रतिबंध खालील प्रमाणे करावा .

१ ) उन्हाळ्यात खोल नागरट करावी . २ ) पिवळट पांढऱ्या रंगाची शाबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत . ३ ) शेताभोवती कॉफी ची झाडे लावावीत . ४) शेतावरील बांध स्वच्छ ठेवावेत .५ ) शेताभोवती २मीटर पटटयात राख मोस्चूद व चुना यांचे मिश्रण पसरावे . ६ ) शेतामध्ये ७ते १० मीटरवर वाळलेले गवत ‘ पपईचा पाला ‘ गोणपाट ‘ कुजलेली लाकडे ‘ भाजीपाला यांचे ढीग ठेवावेत रात्री नंतर सुर्यादयापूर्वी गोगलगाय या ठीगाखाली आश्रय घेतात . या ढिगाखालील गोगल गाय मीठाच्या किंवा साबणाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात

. ७ ) फळबागेतील उपद्रव टाळणेसाठी १०% बोर्डोपेस्ट बुध्याला लावावी . ८) लहान गोगलगाय नियत्रणासाठी मीठ ५% द्रावण फवारणी ची शिफारस आहे . ९ ) कापूस ‘सोयाबीन पीकावरील गोगलगाय नियंत्रणासाठी मेलाल्डिहाईड २किलो प्रतिएकर + १०लिटर पाणी + २किलो गुळ + २५ ग्रॅम यीस्ट + ५० किलो गव्हाचे काड १० -१२ तास भिजत घालून त्यामध्ये ५० ग्रैम थायमिथोक्झीन मिश्रण करून पटट्यास छोटे छोटे ढीग केल्यास प्रभावी नियंत्रण करता येते तरी गोगल गाय पासून होणाऱ्या १०% नुकसान व १००% भाजीपाला दर्जा व प्रत राख णेसाठी वरील प्रमाणे एकात्मिक नियंत्रण उपाय अमलबजावणीचे अहवान तालुका कृषि कार्यालयाने केले आहे.

माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना वैभव गीते यांच्याकडून जन्मदिनाच्या हटके शुभेच्छा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे माझी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस राज्याचे सचिव वैभव गिते यांनी सोशल मीडियाद्वारे हटके गांधीगिरी स्टाईलने त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकालाचा त्यांच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचत नाराजी वजा जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

     शुभेच्छा देताना ते म्हणाले की अडीज वर्ष सामाजिक न्यायमंत्री असताना सुद्धा महात्मा जोतिबा फुले,साहित्यरत्न लोकशाहीर आन्नाभाऊ साठे,संत रोहिदास महाराज महामंडळाचे अध्यक्ष नियुक्ति करुण कर्ज प्रकरने दिली नाहीत.(त्यामुळे कर्ज माफ करण्याचा प्रश्नच येत नाही)अडीज वर्षात क्रांतिगुरु लहुजी साळवे आयोगच्या शिफारशी मातंग समाजास लागू केल्या नाहीत.
अडीज वर्षात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदुमिल येथील स्मारक पूर्ण झाले नाही.
अडीज वर्षात जातीय अत्याचारात खून झालेल्या एकाही कुटुंबाचे पुनर्वसन केले नाही. शिवाय राज्यातील अन्याय अत्याचाराच्या ठिकाणी भेटी दिल्या नाहीत.
अडीज वर्षात अहमदनगर जिल्ह्यातील नीतीन आगे खून प्रकरणात फुटिर साक्षीदरांवर करवाई करण्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकीलांची नियुक्ति केली नाही.
अडीज वर्षात मिनी ट्रैक्टर च्या योजनेला कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले नाही.
अडीज वर्षात बौद्ध, दलित आदिवासी यांच्या हक्काचा निधि इतर विभागाना वळवू नये,निधि अखर्चित राहु नये म्हणून बजेटचा कायदा केला नाही.
          डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नावाने विशेष अनुदान योजना सुरु करण्याची घोषणा करुण 10 वी 12 वी मधील विद्यार्थी यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास 1 लाख रूपये शिष्यवृत्ति देण्यात येईल अशी घोषणा केली साडेचार हजार विद्यार्थि यांनी बार्टी मार्फत अर्ज भरले परंतु एकाही विद्यार्थि यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा केली नाही.अडीज वर्षात atrocity act च्या अंमलबजावणीसाठी मंत्रालयात प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ति केली नाही.अडीज वर्षात आकस्मिकता योजना जी समाजिक न्याय विभागात आहे ती लागू केली नाही.अशी दैदीप्यमान कामगिरी जी मागासवर्गीय जनता कधीही विसरनार नाही माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी करुण दाखवली आहे.त्यामुळे मी त्यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा देत आहे अशाप्रकारे त्यांनी धनंजय मुंडे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत वैभव गीतेने यांनी या अगोदर सुद्धा धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री असताना अत्याचार पिढीतांचे पुनर्वसनासंदर्भात व बजेटचा कायदा लागू करा यासाठी अनेक वेळा त्यांना त्यांच्या मंत्रालयाच्या दालनात भेटून निवेदन दिले आहेत.तसेच त्यांचा सोशल मीडियाद्वारे समाचार सुद्धा घेतला आहे.या शुभेच्छांची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच ते म्हणाले की यापुढील सामाजिक न्यायमंत्र्यांनी जर अशाच प्रकारचे काम केले तर त्यांना सुद्धा वेळोवेळी वेगळ्या पद्धतीने आम्ही शुभेच्छा देऊ असे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे त्यांच्या दालनात नभेटल्याने नितीन आगे चे वडील पिढीत राजू आगे यांनी दैनिक सम्राट त्यांच्या दालनासमोर लावून सरकारचा निषेध केलेला क्षण

You may have missed