प्रमोद शिंदे

तब्बल सत्तावीस वर्षांनी जुन्या आठवणी घेऊन भेटले दहिगावचे मित्र-मैत्रिणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दहावीची परीक्षा दिली की अनेक विद्यार्थी आपापल्या करिअरच्या शोधात सोयीनुसार आपल्या जुन्या सवंगड्यांना सोडून गगन भरारी घेण्यासाठी नव्या दिशा शोधण्यासाठी बाहेर पडतात. त्यानंतर उच्च शिक्षण, नोकरी,व्यवसाय, नंतर कुटुंबाची जबाबदारी त्याचबरोबर सामाजिक कार्यात सामील होता होता कसे भरभर दिवस निघून जातात कळतच नाही. त्यात अनेक वर्षांनी जुन्या मित्रांची कुठेतरी भेट होते. आणि ठरतं सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र यायचं असेच दहिगाव हायस्कूल दहिगाव चे 1997 इयत्ता दहावी चे सर्व  माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्नेह मेळावा व शिक्षकांचा कृतज्ञता मिळावा चैतन्य कार्यालय शिंदेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात माजी शिक्षक श्री चंद्रकांत दीक्षित सर, क्षीरसागर सर, नामदेव राऊत सर, निर्मळ सर , मुकुंद मोरे सर ,श्रीमती ढोबळे मॅडम, अंकुश राऊत सर, ढोबळे सर, पानसरे सर तसेच बनकर मामा, सुळके मामा यांना  फेटा,  शाल ,सन्मान चिन्ह आठवणीचे आंब्याचे रोप आणि पुष्पगुच्छ गुरूंचा सन्मान करण्यात आले.यावेळी जुन्या मित्र-मैत्रिणींच्या खूप सार्‍या गप्पा झाल्या.तो / ती सध्या काय करते? मुलं काय करतात? माझं बरं चाललंय,तुझं कसं आहे? अशा अनेक गोष्टी झाल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.या स्नेह मेळाव्यास ५५ विद्यार्थी उपस्थित होते.तसेच दत्ता कदम ,गीतांजली दीक्षित , दादा किर्दक यांनी मनोगत व्यक्त केले.किसन ढोबळे सर , क्षिरसागर सर व दीक्षित सर यांनी मार्गदर्शन केले. उमेश खिलारे यांनी दोस्ती वर गीते गायली.या कार्यक्रमासाठी शहाजान शेख ,नितीन पाटील ,संतोष फुले, वैशाली सोरटे यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि प शिक्षिका दिलशाद काझी यांनी केले.आभार प्रदर्शन भिमराव नरळे सर यांनी केले .

राज्यघटना मोडली तर राष्ट्र कोलमडेल : डॅा. रावसाहेब कसबे

संदेश भालेराव मुंबई पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फूले आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव

भारतीय स्वातंत्र्याच्या पर्वावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना भारत देशाने स्वीकारली. त्यामुळेच आज अठरापकड जाती, धर्माचे १४० कोटी लोक एकत्र नांदत आहेत व आपला देश एक संघ आहे. विविध प्रांत, चालिरीती, भाषा, प्रथा, परंपरा सांभाळून आपण एक आहोत. जर का, राज्यघटनेत छेडछाड केली, तर आपले राष्ट्र कोलमडेल असे परखड मत प्रख्यात विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी मंत्रालयात झालेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त संयुक्त जयंती उत्सव समिती २०२४ द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मांडले.
अनुसूचित जाती / जमाती / भज-विजा / इमाव / विमाप्र शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई च्या विद्यामाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचित्य साधून संयुक्त जयंती उत्सव समिती २०२४ च्या वतीने मा. श्री. सिद्धार्थ खरात सहसचिव, गृह विभाग मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.२६ एप्रिल, २०२४ रोजी मंत्रालय, मुंबई येथे बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य ज्योतिबा फूले आणि छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रसंगी मा. डॉ. श्री नितीन करीर, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व मा. श्रो. दिनेश वाघमारे प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण उपस्थित होते. बाबासाहेब व महात्मा गांधी यांचे वैचारीक मतभेद होते. बाबासाहेबांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मंजूर झाली. गोलमेज परिषदेत भारतासाठी जो कायदा तयार करण्यात येत होता त्या कायद्याच्या स्ट्रक्चरल कमीटीचे डॉ. बाबासाहेब अध्यक्ष होते. सन १९३५ मध्ये हा कायदा भारतात अंमलात आला. बाबासाहेबांच्या कायदेविषयक ज्ञानाची माहीती महात्मा गांधी यांना होती. भारताला स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना निर्मितीचे काम सुरू होते. महात्मा गांधी यांच्यासमोर बाबासाहेबांचे नाव होते. भारतीय संविधान निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा सहभाग असायला हवा याबद्दल त्या काळात ब्रिटीश विदुषी म्युरियल लेस्टर यांनी बाबासाहेब व महात्मा गांधी यांच्या दरम्यान मध्यस्थीची भूमीका पार पाडल्याचे सांगून त्या वेळी पंडीत जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींचे वर्णन प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. शेवटी संविधानातील समता, बंधुता व भातृभावाचे तत्व समजून घेऊन सामाजिक जबाबदारीची भूमीका मंत्रालय व शासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. डॉ. नितीन करीर यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता, महात्मा फुले यांचा दलित, अस्पृश्य व शेतक-यांसाठीचा संघर्ष तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य हे गुण घेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.. संविधानामुळेच आपण सर्वजण जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती करू शकलो असे सांगून महापुरूषांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले. तसेच प्रधान सचिव मा. श्री. दिनेश वाघमारे यांनी बाबासाहेबांनी केलेल्या खडतर विद्यार्थी जीवनाची माहिती सांगितली. विपरीत परिस्थितीतही उच्च शिक्षणाच्या पदव्या मिळविण्यात बाबासाहेब यशस्वी झाले. त्यांचे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या मंत्राने अस्पृश्यांचे जीवन बदलले. गुणवत्ता हा बाबासाहेबांचा मुख्य गुण असून मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी तो अंगीकारावा असे प्रतिपादन त्यांनी केले. संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण, उच्च शिक्षण, गुणवत्ता, चारित्र्य, स्वाभिमान व राष्ट्राभिमान ही गुणवैशिष्ट्ये आहेत असे सांगून ते सिम्बॅाल ॲाफ नॅालेज आहेत असे सांगितले. तसेच महात्मा फुले हे समता व समानतेबाबत लेव्हल फिल्डींगचा आग्रह धरणारे होते. तर ध्येय , निती, शौर्य आणि रयतेचा विचार छत्रपती यांनी मांडलेला असून महाराष्ट्र ही संतांची व महापुरुषांची भूमी आहे, मंत्रालय, पॅावर हाऊस मधून त्यांचे विचार आणि वारसा आपण चालवला पाहिजे असे विचार व्यक्त केले आणि संघटनेच्या कार्याचा गौरव केला.
अनुसूचित जाती / जमाती / भज-विजा / इमाव / विमाप्र शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई चे अध्यक्ष भारत वानखेडे, यांनी राज्यभर कार्यरत असलेल्या संघटनेच्या कार्याची माहीती देऊन दरवर्षी घेण्यात येत असलेल्या संयुक्त जयंती कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहीती दिली. डॅा. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय सुट्टी देण्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या प्रयत्नांची व त्यानंतर मिळालेल्या यशाची माहीती सांगितली. तसेच गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मा. सुजाता सौनिक मॅडम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून त्यांनी दिलेल्या सुचनेनुसार पुस्तके प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्याची व पुस्तक विक्रीला प्रचंड प्रतिसादा मिळालेल्याबद्दल ची माहीती दिली…
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती .शिल्पा नातू यांनी केले, पाहुण्यांचा परिचय श्री. संतोष साखरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन करताना श्री. सी. आर. निखारे यांनी महापुरुषांचा विचाराचा प्रचार व प्रसारही करण्याचे कार्य संघटनेच्या अशा प्रकारच्या कार्यक्रमातून करीत असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी सुभाष गवई, अंबादास चंदनशिवे, भास्कर बनसोडे, सुबोध भारत, विजय नांदेकर, सी.आर. निखारे, एन. डी. पाटील, सविता शिंदे,, प्रिया रामटेककर, डी.के.खाडे, , श्रीम. चि. नि. सूर्यवंशी, अशोक आत्राम, राजेंद्र सवणे, अजित तायडे, रामदास शेळके, सुनील सरदार, गोपीनाथ कांबळे, नितीन सुर्वे, मनोहर बंदपट्टे, सविता साळुंखे, विकास थोरात, राजेश साळुंके, , प्रशांत सदांशिवे, देविदास भगुरे, रवींद्र पेटकर, सुनील सामंत, पूजा भोसले, विलास थोरात,सपना चव्हाण, राजेंद्र खरात, रविंद्र पवार, दयानंद कांबळे, रसिक खडसे, , मनोज कांबळे, , अरुण कसबे, ,संजय जाधव, विशाल घाडगे, विशाल जोंधळे, विलास थोरात, , विलास धायजे, विकास कांबळे, रविंद्र बोर्डे, संजय कुऱ्हे, बिकेन ठाकूर, विजय अंभोरे, तुषार पैठणकर, , , दीपक बैले मुरलीधर आढाव, , गजानन सारुकते, नरेंद्र शेजवळ, अश्विनी मेंढे, सुनील जाधव, योगेश वासनिक, विजय भोसले, प्रभू कदम, सुनील खाडे, मनीषा जमदाडे,महेश वालदे, प्रदीप खडसे, , , संध्या सोनवणे, श्रीराम गवई, मारुती फड, रोहित गमरे, भारती कोरगावकर, नितीन साखरे, अभिजीत कांबळे, , मिलिंद कांबळे, संदीप कांबळे, मनोज जोगदंड, विजय भोसले, मदन सोंडे, राजेंद्र बच्छाव, , सुरेंद्र सोनकांबळे, सुशील कांबळे विनायक कांबळे, कैलास मुंगरे, प्रकाश जाधव, , अमोल जल्हारे, कैलास शेलार, अशोक जाधव, रत्नप्रभा बेले, संभाजी जाधव, प्रविण पवार, संतोष साखरे, सुगंधा पवार, निलिमा मेश्राम, ज्ञानेश्वर पाटमासे, , डी. के. खाडे, किरण गावतुरे, दिलीप देशमुख, रवींद्र मिठबावकर, इत्यादी पदाधिकारी तसेच इतरही मंत्रालयीन अधिकारी / कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरीच्या देवगड हापूस आंब्याचे नातेपुते मध्ये आगमन .

कर्नाटक राज्यांतील कमी दर्जाचा हापूस ग्राहकांना स्वस्तात मिळत असल्याने देवगड, रत्नागिरीच्या हापूसची मागणी घटून उत्पादकांना दर कमी मिळतोय. परंतु देवगड आणि रत्नागिरी भागातील हापूस आंब्याची चव ग्राहकांना आकर्षित करत आहे…

वामान बदलामुळे राज्यातील हापूस आंबा बागायतदार समस्येच्या गर्तेत बुडाले आहेत. या हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे आंब्याचे सर्वसाधारण उत्पादन मिळविण्यासाठी उत्पादकांना कीडनाशके, खते यांवर वाढीव खर्च करावा लागतोय. या वर्षी कोकणातील हापूससाठी सुरुवातीला वातावरण अनुकूल आहे, असे वाटत होते. त्यामुळे यंदा हापूस आंबा लवकर सुरू होईल, उत्पादनही चांगले मिळेल, अशी भाकिते वर्तविली होती. परंतु हापूसला मोहर लागल्यानंतर सततच्या ढगाळ वातावरण आणि आता वाढत्या उष्णतामानाने फळगळ होतेय. फळाची वाढ आणि पक्वतेतही अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच या वर्षी हापूस आंबा लवकर येऊनही उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नाही. दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र हापूसचे दर वाढलेलेच आहेत. अर्थात, ग्राहक पातळीवर होणाऱ्या अधिक दराचा फायदा हा मधस्थ, व्यापाऱ्यांच्या खिशात जातोय. हापूसला योग्य दर न मिळण्याचे एक कारण कर्नाटक, गुजरात येथून येणारा हापूस आंबादेखील आहे. बाहेरील राज्यांतून येणाऱ्या या तुलनात्मक कमी गुणवत्तेच्या हापूस आंब्याचा धुडगूस पणनच्या हापूस आंबा महोत्सवात पण पाहायला मिळतो. एवढेच नाही तर पुणे, मुंबई या शहरांबरोबर आता अलिबाग, रत्नागिरी, चिपळूणपर्यंत बाहेरचा हापूस जाऊन पोहोचला आहे. बाहेरच्या राज्यांतील हापूस स्वस्तात मिळत असल्याने देवगड, रत्नागिरीच्या हापूसची मागणी घटून त्यास दरही कमी मिळतोय. समस्या केवळ हापूस आंबा फळविक्रीतच नाही, तर कॅनिंगमध्ये देखील आहे.

दरवर्षी , बारामती,सांगोला, सांगली, सोलापूर, फलटण, या भागात शाली ट्रेड अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत देवगड – रत्नागिरी भागातील हापूस आंबे विक्री साठी आणले जातात …यंदाही येत आहेत. पूर्ण उन्हाळ्यापर्यंत हा आंब्याचा हंगाम चालणार असल्याची माहिती शाली ट्रेड अँड एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर शोएब तांबोळी,सलमान काझी , सैफ अली तांबोळी यांनी दिली.

गेल्या वर्षी राज्यात हापूस आंब्याचे उत्पादन कमी होते. त्यामुळे आंब्याचे तसेच पल्पचे दरही अधिक होते. या वर्षी मात्र हापूस आंब्याचे उत्पादन अधिक असल्याने दर कमी आहेत. त्यामुळे पल्पचे दरही कमी होत आहेत. त्यातच गेल्या वर्षीचा २५०० कंटेनर पल्प शिल्लक असल्याने कॅनिंग व्यावसायिकांना तो कमी दरातच विकावा लागतोय, आंबा पल्प प्रामुख्याने आंबा बर्फीसह इतरही प्रक्रियायुक्त उत्पादनांना वापरला जातो. बाजारात आंबा बर्फीचे दर वाढले असून, ते काजू कतलीबरोबर आले आहेत. ग्राहक आंबा बर्फीऐवजी काजू कतलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आंबा बर्फीची पर्यायाने पल्पची मागणी घटली आहे. असेच आंब्याच्या प्रत्येक प्रक्रियायुक्त पदार्थांबरोबर झाले आहे. त्यामुळे हापूस आंबा प्रक्रिया उद्योजक, कॅनिंग व्यावसायिकांचे अर्थकारणही कोलमडले आहे. हापूस आंबा पल्पची मोठ्या प्रमाणात निर्यातही होते. निर्यातीसाठी पुन्हा कर्नाटक, गुजरातच्या हापूसचा पल्प कमी दराने उपलब्ध होतोय. बाहेर देशातील ग्राहक रत्नागिरी, देवगड हापूसचा पल्प का कर्नाटक-गुजरातच्या हापूसचा पल्प एवढे बारकाईने पाहत नाहीत. त्यांना फक्त आंबा पल्प हवा असतो. म्हणून कर्नाटक-गुजरातच्या आंबा पल्पची निर्यातही वाढत आहे. कोकणात पल्पच्या माध्यमातून हजार कोटींच्या वर उलाढाल होत असताना त्यासही चांगलाच फटका बसत आहे. एकंदरीत काय तर रत्नागिरी, देवगड हापूसचा गोडवा कायम ठेवायचा असेल तर कर्नाटक, गुजरात येथून येणाऱ्या आंब्याची सरमिसळ थांबविली पाहिजे. कर्नाटक, गुजरात येथून राज्यात आंबा यायला काही हरकत नाही. परंतु त्याची ओरिजनल हापूस म्हणून राज्यात होत असलेली विक्री थांबली पाहिजेत. यासाठी कृषी, पणन विभागासह राज्य शासनाने काळजी घ्यायला हवी. कोकणातील हापूस आंबा उत्पादकांनी बागेवरील आपला उत्पादन खर्च कमी करायला हवा. त्याचबरोबर रत्नागिरी आणि देवगड हापूसची थेट विक्री तसेच मूल्यसाखळी उत्पादकांनीच विकसित करायला हवी. असे केल्यास यात होत असलेली भेसळ कमी होऊन हापूसचा प्रिमीयम दर उत्पादकांच्या हातात पडणार आहे .

रत्नत्रय संस्थेकडून गरीब विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय या शिक्षण संस्थेकडून मांडवे .यांच्या वतीने विद्यार्थी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे.      यामध्ये  २०२४ – २५ वर्षाकरिता गरीब व गरजू  हुशार विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना रत्नत्रय स्कॉलरशिप प्रदान करण्यात येणार आहे . त्यासाठी रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी स.नगर ,विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात आलेली आहे. यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. त्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सातारांकडून केला जाणार आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल दोशी व सचिव प्रमोद दोशी यांच्याकडून योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत अनेक दातारांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरवले आहे.यामध्ये सौ सुनीता अनिल दोशी – माढा १ विद्यार्थी दत्तक घेतलाश्री सचिन केंगार- सांगोला* १ विद्यार्थी दत्तक,श्री मिहीर बाहुबली गांधी – अकलूज* १ विद्यार्थी दत्तक,  चंद्रशेखर हरि थोरात- गोवा १ विद्यार्थी दत्तकअश्विनी गांधी- वेळापूर  विद्यार्थी दत्तक,आणि गुप्त दान करून सुद्धा पाच विद्यार्थी दत्त घेण्यात आले आहे. या दत्तक योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांना लाभ होणार असून. दानशूर दातारांनी यात दत्तक योजनेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे सचिव प्रमोद भैया जोशी यांनी केले आहे. रत्नत्रय विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये सहभागी झालेल्या  दातारांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे. दत्तक योजनेसाठी संपर्कप्रमोद अनंतलाल दोशी 989006352,मिहीर गांधी,वैभव शहा, अभिजीत दोशी , अभिजीत दोभाडा,रामदास  गोपने अमित पाटील ..

जिजाऊ सावित्रीची लेक असल्याचा अभिमान असला पाहिजे…. राजकुमार हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
शिवसेना भवन येथे नातेपुते पंचक्रोशीतील दहिगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत केला यावेळी महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे श्री अविनाश सुरवसे शिवसेनेचे नेते संतोषजी गोरे दहीगाव शहर प्रमुख विजय सरवदे उपप्रमुख दत्ता बोडरे नातेपुते शहरप्रमुख पोपटराव शिंदे भाजपचे मनोज जाधव भाजपचे सुनील बनकर अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे नातेपुते महिला शहर प्रमुख
यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले एकविसाव्या शतकात देशामध्ये स्त्री पुरुष समानता कायदा आणून समाजात महिलांना हक्क प्राप्त झाल्याची दिसून येते त्याचाच प्रत्येक म्हणून आज आजच्या कार्यक्रमाला सासू पण आहे सून पण आहे मुलगी पण आहे स्वतः पण उपस्थित आहेत म्हणजे मुलींमध्ये कुठेही भेदभाव असल्याचे दिसून येत नाही जिजाऊंनी जर बलिदान दिलं नसतं तर स्वराज्य घडलं नसतं आणि सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जर जातीपातीच्या भिंती पाडून स्त्री शिक्षणावर काम केलं नसतं तर कदाचित आज आपण एकमेकांच्या समोर या शिवसेना-भवना मध्ये प्रवेश करताना दिसला नसता म्हणून आपण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचार आचरणात आणला पाहिजे.
तालुकाप्रमुख महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे म्हणाल्या आज मला खरं भाग्य माझ्या माता माझ्या भगिनी वेगवेगळ्या कुटुंबातून असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्यामुळे त्यांच्या कोणत्याही दुःखाच्या सुखाच्या प्रसंगात मी स्वतः शिवसेनेचे रणरागिनी म्हणून सहभागी होईन.
यावेळी अनेक महिलांना शिवसेनेची नियुक्तीपत्र देण्यात आली दहिगाव महिला शाखाप्रमुख म्हणून स्वप्नाली केंगार सीमा अनिल कांबळे जिल्हा परिषद गट प्रमुख राणी अनिल राणी माने शाखा संघटक रेशमा बेंद्रे उपशाखाप्रमुख प्रणाली वेदपाठक तालुका उपप्रमुख रूपाली कांबळे कार्यकारणी सदस्य कोमल सरवदे सर्कार्यकारणी सदस्य रोहिणी सोनवणे. दहिगांव कार्यकारणी सदस्य श्रीमती विद्या भोसले सदस्य.अमृता सरवदे गोडसेवस्ती प्रमुख. सोनाली सोनवणे पंचायत समिती गणप्रमुख ज्योती चिकणे उपशहर प्रमुख नातेपुते अमृता सरवदे शाखाप्रमुख गोडसे वस्ती माया ढेकळे शाखाप्रमुख गोडसे वस्ती मनीषा माने कार्यकारी सदस्य स्नेहा बोडरे कार्यकारणी सदस्य सीमा आईवळे सदस्य कार्यकारणी सदस्य दिपाली झेंडे कार्यकारणी सदस्य साधना पावणे गोडसे वस्ती कार्यकारणी सदस्य रंजना शेंडे कार्यकारणी सदस्य धोंडाबाई ढेकळे कार्यकारणी सदस्य अनिता सोनवणे शेअर संघटक नातेपुते अलका शेंडे सदस्य सरस्वती शेंडे सदस्य राणी माने शाखा संघटक दहेगाव काजल झेंडे सदस्य रोहिणी झेंडे सदस्य कुमारी सानिया काटे तालुका मीडिया प्रमुख महिला आघाडी ची नियुक्तीपत्र शिवसेनेच्या रणरागिनींना देण्यात आली खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेनेविषयीच हक्काचे व्यासपीठ म्हणून हक्काचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येत आहे यावेळी सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे यांनी केलं.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा 2024 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागणीसाठी आव्हान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुरोगामी महाराष्ट्र  न्यूज चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा 2024 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव नामांकन मागणीसाठी संपादन शिंदे  पात्र व्यक्तींना आव्हन करण्यात येत आहे.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचा ७वा वर्धापन दिना मोठ्या दिमाखात नेहमीप्रमाणे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व विशेष काम करणाऱ्या मान्यवरांचा  राज्यस्तरीय पुरस्कार सिने कलाकार तसेचआय ए एस,आय पी एसअधिकारी व बड्या मान्यवरांच्या उपस्थितीत.दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त  स्मृती भवन/ कृष्णप्रिया लॉन्स अकलूज या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. 2024 राज्यस्तरीय  या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी. आपली अवश्य ती माहिती देऊन नाव नोंदणी करून प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण केलेल्या कार्याचा आढावा फोटो,बातम्या पुराव्यासह देण्यात यावा. या पुरस्कारासाठी समाजात उत्कृष्ट काम करणारे सामाजिक संघटना पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, पोलीस कर्मचारी अधिकारी, खेळाडू, पर्यावरण पक्षी,प्राणी प्रेमी, आजी-माजी सरपंच, नेते मंडळी, ग्रामसेवक, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, सामान्य नागरिक, पत्रकार, कलाकार, शास्त्रज्ञ,अशा लोकांपैकी वेगवेगळ्या क्षेत्रात अलौकिक काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन मोठ्या दिमाखात गौरवण्यात येणार आहे.हे पुरस्कार मर्यादित लोकांसाठीच असणारा सून*आपले नामांकन प्रस्ताव पाठवण्याचा अंतिम दिनांक 1एप्रिल 2024 ते 20 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे.*  प्रस्ताव नामांकन व माहिती पाठवण्यासाठी संपर्क-*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल कार्यालय ठोंबरे बिल्डिंग दहिगाव रोड नातेपुते ता माळशिरस जिल्हा सोलापूर या पत्त्यावर पाठवावे. व्हाट्सअप नंबर-9975903040,*
संपर्क मुख्य संपादक प्रमोद शिंदे-9975903040कार्यकारी संपादक-प्रशांतजी खरात-+91 77700 76737
.प्रथम येणाऱ्या नामांकचा प्रस्तावाचा  प्रथम पुरस्कारासाठी विचार केला जाईलआतापर्यंत शेकडो पुरस्कर्त्यांनी याचा लाभ घेतला आहे.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज पुरस्कार सोहळ्या बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, आतापर्यंत झाडे लावा झाडे जगवा अभियानांतर्गत दीड लाख वृक्ष लागवड केली आहे. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे. तसेच पूरग्रस्त कोरोनाग्रस्त यांना मदत केली आहे. गेली सलग 10 वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गरजूंना शासकीय योजनेतून दवाखान्यात उपचारासाठी मदत केली आहे*सामाजिक प्रश्न तारांकित केले आहेत. प्रामुख्याने रस्ते वीज पाणी या लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. विद्यार्थ्यांना खाजगी संस्थांमध्ये मोफत प्रवेश मिळवून दिले आहेत. आतापर्यंत लाखो वाचक हितचिंतक आमच्याशी जोडले गेले आहेत.अनेक नेते मंडळी मोठमठे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहिले आहेत.आपणही याचा भाग होऊ शकता. असे आवाहन संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांनी केले आहे.

मोटरसायकल व मंगळसूत्र चोरास नातेपुते पोलिसांनी ठोकल्या बेड्या


पुगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -प्रमोद शिंदे
नातेपुते आणि परिसरात वारंवार मोटर सायकल चोरी करणारा व मंगळसूत्र चोरणाऱ्या संशयत चोरास नातेपुते पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की,
नातेपुते पोलीस ठाणे येथे दि, 25 /03/2024 रोजी फिर्यादी नामे. अभिनंदन अरविंद जोशी रा. नातेपुते यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की त्यांची मोटरसायकल MH 45 B 1117 हिरो होंडा कंपनीची सीडी डाऊन 25,000/ रुपये किमतीची अक्षय शिक्षण संस्था नातेपुते येथे गेट समोर लावलेली असता दि. 18/03/2024 रोजी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 99/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पोलीस हवालदार धोत्रे हे करत होते तसेच 13/03/2024 रोजी फिर्यादी नामे – सौ कमल बाळासाहेब घनवट रा. नातेपुते ह्या नातेपुते ते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी एसटी स्टँड नातेपुते येथून प्रवासाठी बस मध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील 10,000/ रुपये किमतीचे दोन डोरले असलेले मुळे मंगळसूत्र कुणीतरी आज्ञा चोरट्याने चोरून नेले बाबत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2024 IPC 379 अन्वये आज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याचा तपास पोलीस हवालदार /718 भगत हे करत होते तसेच यापूर्वी दहिगाव चौक नातेपुते येथून 10,000/ रू किमतीची मोटरसायकल चोरी झाले बाबत तक्रारदार नामे – दशरथ सिद्धू शिंदे रा. दहिगाव यांची तक्रारीवरून नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2024 IPC 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वारंवारं होणाऱ्या मोटरसायकल चोरी बाबत , सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरिश सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी अकलूज विभाग नारायण शिरगावकर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली
नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे, पोलीस हवालदार धोत्रे, अमित भगत, अमोल वाघमोडे, नितीन तळेकर,पोलीस कॉन्स्टेबल, रणजीत मदने, सोमनाथ मोहिते यांनी वरिष्ठांच्या प्राप्त सूचना मार्गदर्शन व सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक व विश्लेषण करून 2 आरोपी यांचेकडून 3 गुन्हे उघड झाले असून त्यामधील दोन मोटरसायकल व दोन डोरले असलेले मनी मंगळसूत्र असे एकूण किंमत 45,000/ रुपये किमतीचा चोरीतील मुद्देमाल आरोपी उमेश पोपट लोंढे राहणार बरड ता.फलटण जिल्हा सातारा यास अटक करून त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडी रीमांड मध्ये असुन गुन्ह्याचा तपास चालू आहे.
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविषयी गुन्हे घडू नये यासाठी पोलिस पेट्रोलिंग मध्ये वाढ करण्यात आलेले आहे…
त्यामुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांन कडून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

जि प शाळा पिरळेतील शिक्षकांनी शाळेच्या परिस बागेत फुलवला भाजी पाल्यांचा मळा.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
जि प शाळा पिरळे येथील शिक्षक यांनी शाळेच्या परिसरात अनोखा उपक्रम राबवला आहे.
शाळेच्या परिसरात परिस बागेसाठी पुरेशी जागा असल्याने त्याचा पुरेपूर उपयोग कसा केला पाहिजे याचे उदाहरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथील मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर व सर्व शिक्षक यांनी एक आदर्श संपूर्ण महाराष्ट्र समोर ठेवले आहे. शाळेमध्ये मध्यान भोजन योजना सुरू आहे. या यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्य अन्नासाठी दररोज बाहेरून पालेभाज्या आणाव्या लागतात. ह्या पालेभाज्या आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा बराचसा वेळ व पैसे खर्च होतात. तसेच तो भाजीपाला ऑरगॅनिक पद्धतीचा व विषमुक्त मिळत नाही. बाजारामध्ये रासायनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खरेदी करावा लागतो. यावर मुख्याध्यापक व काही शिक्षकांना एक भन्नाट संकल्पना सुचली ती म्हणजे शाळेच्या परिसरात ऑरगॅनिक पद्धतीचा भाजीपाल्याचा मळा तयार करण्याची.मुख्याध्यापक शंकर शिंगाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली. संजय ढवळे सर, हनुमंत फुले, जब्बर मुलाणी सर, अमोल खरात सर, सचिन निगडे सर, शिक्षिका, शेंडगे मॅडम, मुलाणी मॅडम, व नामदेव मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने परिश्रम घेत.शाळेच्या परिस बागेत अक्षरशा भाजीपाल्याचा मळा फुलवला.यामध्ये प्रामुख्याने शेवगा ,वांगी , टोमॅटो, दुधी भोपळा , घोसावळे , फ्लॉवर , मिरची ,कोबी, कढीपत्ता ,कोथिंबीर,मेथी , पालक , घेवडा , दोडका ,अशा ऑरगॅनिक विषमुक्त पाल्या भाज्यांचा समावेश आहे. या उपक्रमाने महाराष्ट्र भरात शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे

तू है सुंदर फुल इस संसार का हॅपी बर्थडे टू यू च्या जल्लोषात जि प पिरळे शाळेच्या विद्यार्थ्याकडून आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटर्क प्रमोद शिंदे-

माळशिरस तालुक्याचे विधानसभा सदस्य आमदार राम सातपुते यांचा जि प शाळा पिरळे येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जि प शाळा पिरळे  येथील विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या सागर मे लहर उठे तेरे नाम की तुझे मुबारक खुशिया आत्मज्ञान की तुझको है आनंद मे मिल जाना.तू है सुंदर फुल संसार का. हॅपी बर्थडे टू यू.. च्या जल्लोषात विद्यार्थ्यांनी गीत गाऊन आमदार राम सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकार प्रमोद शिंदे, नरवीर उमाजी नाईक क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष अजित शिरतोडे ,पप्पू बुधावले ,सुदाम बुधवले, आनंद लवटे, बाजीराव दडस, प्रल्हाद नरोळे, विश्वास बनकर,पांडुरंग दडस,करीम मुलानी. तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमोद शिंदे म्हणाले की आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत. विविध योजना राबवल्या आहेत.गोरगरीब लोकांना आरोग्यासाठी मदत केली आहे तसेच ते गरजू रुग्णांसाठी आरोग्य दूत बनले आहेत.आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक व पप्पू बुधावले मित्रपरिवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर, सूत्रसंचालन संजय ढवळे सर यांनी केला, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुलानी सर खरात सर, निगडे सर, मुल्ला मॅडम, शेंडगे मॅडम, नामदेव मॅडम, यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तब्बल 25 वर्षानंतर दहिगाव हायस्कूलचे मित्र -मैत्रिणी एकत्र भेटले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेदहिगाव हायस्कूल दहिगाव विद्यार्थी मित्र-मैत्रिणी तब्बल पंचवीस वर्षानंतर भेटले.दहिगाव हायस्कूल दहिगाव 1998-99 इयत्ता दहावी च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी इ.10 वी पूर्ण होऊन 25 वर्षपूर्ती तसेच रोप्य महोत्सवानिमित्त एकत्र येण्याचा निर्णय घेतला.माजी शिक्षक यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कोरोना काळात कोरोनाशी लढताना शहीद झालेला वर्गमित्र महेश किर्दक याससामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच मजी शिक्षक,इ.10 वी 1999 बॅचमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैशाली कदम, दुतीय क्रमांक उत्तरा शिराळकर,तृतीय क्रमांक अतुल लुंगारे, वर्गातील भारतीय सैन्य दलातून देश सेवा करून निवृत्त झालेले जवान मेजर अजिनाथ फुले, शंकर बनकर, महेश चिकणे, शिवाजी दडस, यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्याआठवणींना उजाळा देत हास्य कल्लोळा सह मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रसाद फुले,सुनील कदम,अंबरनाथ किर्दक ,पांडुरंग मोरे,राजेंद्र पाटील,मल्हारी ऐवळे ,महेश चिकने ,अनंत साळवे ,शंकर खडे व सर्व सहकारी मित्र-मैत्रीण यांनी केले होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हभप दीक्षित सर, किर्दक सर,नगणे सर, क्षीरसागर सर, मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर, निर्मळ सर,पानसरे सर, ढोबळे सर, चव्हाण सर, आदी शिक्षक होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी  होते.संजय किर्दक-पांडुरंग सुतार/मोरे – शंकर खाडे- महेश गुजर-सुप्रिया पानसे उत्तरा शिराळ सुवर्णा खाडे संदीप काकडे-सुजाता चिकणे आशा शिराळकर,आप्पा बुधावले,अतुल लुंगारे, ताहेर शेख-अजित पाटी अजय कदम सुनिल सुळके सोपान मोरे,राम सरवदे, वैशाली सावंत-मोरे,सतीश नाकुरेउमेश पाटील-गणेश पाटील,सचिन शिंदे ,सारिका मोरे ,शितल सोरटे,वैशाली कदम,शरद नलवडे-शिवाजी दडस,कैलास मोरे शंकर चिकणे,महेश चिकणे,किरण चिकणे -आजिनाथ फुले, भारत फुले -1999 इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed