प्रमोद शिंदे

वकील संघटनेच्या वतीने जागर संविधानाचा ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


26 जानेवारी भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त माळशिरस तालुका वकील संघटनेच्या वतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या दरम्यान माळशिरस वकिल बांधवांनी यांच्यावतीने  आयोजित केलेला जागर संविधानाचा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2023 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी अकलूज येथिल लक्ष्मी बालाजी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर वक्तृत्व स्पर्धा ही ऑनलाइन घेण्यात आली, यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता, महाराष्ट्रातील अमरावती, धाराशिव, अहमदनगर, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड , सिंधुदुर्ग , मुंबई भागातील स्पर्धक सहभागी झाले होते.सदर स्पर्धेमध्ये क्रमांक पटकविलेल्या स्पर्धकांना  मा. , निवृत जिल्हा न्यायाधीश तथा डायरेक्टर ऑफ प्रोसेक्युशन सोपानराव निकम तसेच सरकारी वकील महेश कोळेकर, आक्काताई बडरे,  संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल,प्रमोद शिंदे, शंकर बागडे, हेड, स्मायल एफ एम अकलूज, आणि ॲड. नागनाथ शिंदे, अध्यक्ष, माळशिरस वकिल संघटना यांचे हस्ते देण्यात आले. सदर स्पर्धेची रूपरेषा आणि संकल्पना प्रास्ताविकेच्या माध्यमातून ॲड. सुमित सावंत यांनी मांडली. स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचित्रा कांबळे, गोरेगाव, मुबई, यांना मिळाला असून 11,111/- रुपये, द्वितीय क्रमांक प्रगती गेंड, भांबुर्डी, माळशिरस यांना 7,777/- रुपये, , तृतीय क्रमांक ॲड. अल्ताफ आतार, अकलूज यांना रक्कम रुपये 5,555/- , सर्वांना प्रमाणपत्र  सन्मानचिन्ह  देण्यात आले .तसेच दोन उतेजनार्थ पारितोषिक हर्षद पुडेगे, सोलापूर आणि आदित्य विलांकर, डोंबिवली, मुम्बई यांना प्रत्येकी रक्कम रुपये 3000,  देण्यात आले आहेत.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा.देविदास गेजगे यांनी काम पाहिले.या कार्यक्रमास परसरतील वकिल , विविध  क्षेत्रातील समजिक, राजकीय पक्षांतील  कार्यकर्ते  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲड. रजनी गाडे, ॲड. सुनिता सातपुते, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. धनंजय बाबर, ॲड. भारत गोरवे, ॲड. सुमित सावंत, ॲड. वैभव धाईंजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड.नितीन भोसले, ॲड. धर्याशिल भोसले, ॲड. मनोज धाईंजे यांनी प्रयत्न केले.

नातेपुते शहराला सीसीटीव्ही सर्वे लाईन ने जोडणार- आमदार राम सातपुते

पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-(प्रमोद शिंदे)

नातेपुते शहराला सीसीटीव्ही सर्वे लाईन ने जोडणार असल्याचे प्रतिपादन सुंन्धा स्वीटस अँड रेस्टॉरंट च्या उद्घाटन प्रसंगी आमदार राम सातपुते यांनी केले. नातेपुते शहराला 25 खेडी जोडलेली आहेत व्यापार व गावची सुरक्षितात  महत्वाची आहे.त्या साठी 1.5 कोटीची तरतूद तसेच सर्व रत्यांवर दिवे लवण्याठी 2.65 कोटी तरतूद केली आहे.काम लवकरच सुरू होईल.राव परिवाराने नातेपुते शहराला चांगले रेस्टॉरंट दिली आहे. माजी आमदार अर.जी.रुपणवर  बोलताना म्हणाले की राव कुटुंबाने हॉटेल सुरू करून लोकांची चांगली सोय केली आहे.या प्रसंगी मा.जी. प. उपाध्यक्ष राजे देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, डॉ.मोरे,रघुनाथ कावितके, मा.जी.प.सदस्य शरद मोरे, पं.स.सदस्य माऊली पाटील, नगराध्यक्ष अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,न.पं. बा.सभापती अतुल पाटील, रणवीर देशमुख, सर्व नगरसेवक, पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित.कार्यक्रमाचे आयोजन फत्तेसिंह राव,शैलेश राव,यांनी केले होते.

पिरळे ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी पालखी दिंडी सोहळा उद्घाटन संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
 पिरळे तालुका माळशिरस येथे श्री दत्त जयंती निमित्त  पिरळे ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी पालखी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्याचे सलग सातवे वर्ष असून या सोहळ्यात शेकडो भाविक सामील होतात.या सोहळ्याचे उद्घाटन माझी पंचायत समिती उपसभापती किशोर भैय्या सुळ, व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.19 डिसेंबर रोजी पादुका आगमन व 20 डिसेंबर रोजी पादुका पूजन, विना तुळस ग्रंथ पूजन करण्यात आले. तसेच डीजे, लेझीम, हालगी , टाळ, मृदुंग व पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखीची भव्य मिरवणूक काढून गाव  प्रदक्षणा करण्यात आली.याप्रसंगी सरपंच गणेश दडस, सरपंच अमोल दादा, माजी सरपंच, ज्ञानदेव शिंदे,संदीप नरोळे, महादेव शिंदे, दत्ता रुपनवर, पत्रकार प्रमोद शिंदे, धनंजय महाराज कदम, सुनील माने,अजित महाराज खंडागळे, भाऊसाहेब भिसे सर, हनुमंत फुले सर, दत्ता लवटे, नाथा लवटे, व भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिंडी सोहळ्याचे आयोजन मामासाहेब लवटे, सचिन सूर्यवंशी, काशिनाथ लवटे, यांनी केले.सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केले.याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले.

अंकुश भाऊ सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथे विविध उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठान व विनायक सुर्वे मित्रपरिवार नातेपुते यांच्यावतीने अंकुश भाऊ सुर्वे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये रक्तदान,वृक्षारोपण, जि. प . प्राथमिक शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद शाळांना सुर्वे प्रतिष्ठान नातेपुते यांच्या वतीने जिल्हा परिषद पांढरे वस्ती शाळेस 55 इंच स्मार्ट एलईडी टीव्ही तसेच नातेपुते परिसरातील बोराटे वस्ती,बरड कर वस्ती, केंद्र शाळा, पांढरे वस्ती, कन्या शाळा व पालखी मैदान शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यास स्पोर्ट गणवेश देण्यात आला. आजच्या काळात मराठी शाळांकडे बघण्याचा पालकांचा  दृष्टिकोन बदलावा यासाठी आपण इथून पुढे प्रयत्न करणार आहोत असे सुर्वे प्रतिष्ठानचे प्रमुख विनायक सुर्वे बोलतं म्हणाले.       शाळांना चांगल्या दर्जाचे साहित्य दिल्याबद्दल सर्व शाळांच्या वतीने मा.विनायक सुर्वे यांचा सहपत्नी सत्कार करण्यात सत्कार करण्यात आला.अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठान व विनायक सुर्वे मित्रपरिवार नातेपुते यांनी जि. प. शाळांना केलेल्या मदतीबद्दल परिसरातील पालक व ग्रामस्थांच्या वतीने  कौतुक होत आहे. तसेच माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी देशमुख यांनीही अंकुश भाऊ सुर्वे प्रतिष्ठानचे व विनायक भैय्या सुर्वे यांचे आभार व्यक्त केले.

आमचा शिक्षक हा मेरीट चा शिक्षक आहे, वशिल्याचा शिक्षक नाही-गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

नातेपुते येथे प्रशिक्षण गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय जि प शिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत बोलताना ते म्हणाले की आमचा शिक्षक हा मेरिटचा शिक्षक आहे असल्याचा शिक्षक नाही प्रामाणिकपणे काम करतो. तसेचजी.प. प्राथमिक शाळा कळंबोली येथील आदर्श शिक्षक दादासाहेब साळवे सर यांनी संविधान दिन तसेच संविधान निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापरिनिर्वाण चित्ते साधून अभिवादन म्हणून, तालुका स्तरीय शिष्यवृत्ती शिक्षकांच्या कार्यशाळेत माळशिरस तालुक्यातील सर्व शाळांना 75 रुपयांचे शिष्यवृत्ती पुस्तकांचा संच मोफत दिले.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रसंगी प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी  म्हणाले की  दादासाहेब साळवे हे 2017 पासून शिष्यवृत्ती ची पुस्तक मोफत देत आहेत.आतापर्यंत तीन लाख रुपयाचे पुस्तक त्यांनी तालुक्यामध्ये दिले आहेत.त्यांच्या माध्यमातून खूप मोठं काम होत आहे. तालुक्याच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तसेच पुढे ते म्हणाले की झेड.पी ही सर्व सामान्य लोकांची आहे व ती टिकली पाहिजे.तालुक्यात स्वयंस्फूर्तीने काम करणारे शिक्षक आहेत म्हणून .झेड.पी शाळा टिकली आहे.जे शिक्षक शिष्यवृत्ती मध्ये शंभर टक्के निकाल आणतील त्यांचा विशेष सन्मान केला जाईल., शिक्षकांच्या मुलांसोबत सर्वसामान्यांची मुलं गुणवत्तेत आली पाहिजे. वर्गाचे सामान्य करण झालं पाहिजे. सर्वच मुले गुणवत्ता यादीत आली पाहिजे.अशा प्रकारे ते बोल होते. कार्यक्रमाचे प्रमुखातिथी म्हणून पत्रकार सुनील राऊत ,गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,संतोष शिवणे सर, पत्रकार प्रमोद शिंदे,कोल्हापूर,चांद शेख सर, बा.ज दाते प्रशाला मुख्याध्यापक पिसे सर होते. सुनील राऊत बोलताना म्हणाले की तालुक्यातील शिक्षकांचे काम अतिशय चांगला आहे. पुढेही असंच त्यांनी काम करत राहावं. शिवणे सर यांनी उपस्थित  शिक्षकांना निवृत्ती संदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरुडकर सर,यांनी केले. यावेळी चंद्रशेखर शिवगुंडे सर, चव्हाण सर,दादा साळवे सर. माळशिरस तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

दहिगाव येथे आ.राम सातपुते यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
दहिगाव तालुका माळशिरस येथे जयसिंह मोहिते पाटील  व सामाजिक कार्यकर्ते ते माळशिरस तालुका भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त   विविध कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन  आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, पत्रकार प्रमोद शिंदे, संदीप सावंत, संभाजी फुले, तसेच दहिगाव येथील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील   कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते. 100 रक्तदात्यांनी  रक्तदान रक्तदान केले. ज्ञानदीप ब्लड बँक यांच्यावतीने रक्त संकलित करण्यात आले. रक्तदान यशस्वी होण्यासाठी शिव शक्ती प्रतिष्ठान व बाळासाहेब कदम व संदीप सावंत  मित्र परिवार  साॅईल टच अॅग्रो बारामती  यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले.

बाह्य शरीरासोबत आत्म्याचा सुद्धा उपचार केला पाहिजे- मुनी श्री आचार्य सुयश सागरजी महाराज


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-
*श्री 1008 महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र दहिगाव यांच्यावतीने अलाबाद प्रमाणे आरोग्य मी शिबिर घराच्या आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जैन मुनि आचार्य सुयश सागरजी महाराज यांनी उपस्थितताना मार्गदर्शन करताना म्हणाले बाह्य शरीरासोबत आत्म्याचा सुद्धा उपचार केला पाहिजे.जसे की लोक आजरी पडल्यावर बाह्य शरीराचा दवाखान्यात जाऊन उपचार घेतात असतात आत्म्याचा सुद्धा उपचार घेतला पाहिजे. आत्मा हा शाश्वत आहे. आपले शरीर हे आपले नोकर आहे. आपण सर्वजण मिळून एकत्र असलं पाहिजे तेव्हाच चैतन्य निर्माण होते.या प्रसंगी शुभम कीर्ती महाराज हे सुद्धा उपस्थित होते.. हे 24 वे शिबिर असून आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे.यामध्ये अस्थिरोग, स्त्रीरोग ,मधुमेह, कॅन्सर ,नेत्ररोग या वेळेस हृदयरोग या सारख्या आजारांवर निदान करण्यात आले.शिबिराचे अध्यक्ष बारामती येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ रमेश भोईटे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.तसेच दहिगाव येथील आजी-माजी सरपंच, पदधिकारी ग्रामस्थ व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर तेजस चांकेश्वरा  यांनी केले. डॉ.सौरभ गांधी, डॉ. चिराग होरा,डॉ.विश्वनाथ चव्हाण, माधव लवटे डॉ. आशुतोष बंडगर, अक्षय दोशी डॉ. ,सनी गांधी यांनी रुग्णांना सेवा दिली.या कार्यक्रमास उद्योजक शरद मोरे,सरपंच सोनम खिलारे,संभाजी फुले सर,संदीप सावंत ऍड रणधीर पाटील, बाळासाहेब कदम, व्ही डी पाटील, रामचंद्र पाटील,विठ्ठल मोरे,नरेंद्र भाई गांधी, डॉ. प्रशांत गांधी, डॉ. उदय कुमार दोशी, शितल गांधी, संजय गांधी, वैभव शहा,अमित शहा,अविनाश दोशी तसेच दहिगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सकल जैन बांधवांनी परिश्रम घेतले.

पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने संविधान दिन उत्साहात, केक कापून आनंदोत्सव साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नातेपुते (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज व जि प शाळा पिरळे यांच्या वतीने 74 वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ,शालेय साहित्य संविधान उद्देशिका,मान्यवरांना संविधान ग्रंथ वाटप वृक्षारोपण तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ,राज्यस्तरीय रंग भरण व चित्रकला स्पर्धेचेउद्घाटन करण्यात आले,तसेच भारतीय संविधानाला 75 व वर्ष लागल्यामुळे केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.पुरोगामी महाराष्ट्र व डी.एच.डी मित्रपरिवार दहिगाव हायस्कूल दहिगाव व जि प शाळा पिरळे यांना शाळेचे बांधकाम व सुशोभीकरणासाठी पंधरा हजार रुपये चा धनादेश देण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख,प्रमुख अतिथी म्हणून दक्षता नियंत्रण समितीचे सदस्य विकास दादा धाईंजे, एन डी एम जे राज्यसचिव वैभवजी गीते ,संविधान अभ्यासक एड.सुमित सावंत, प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वंदना देवी मोहिते हे होते. धनंजय देशमुख बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भारतीय संविधानच आहे.वैभव गिते बोलताना म्हणाले भारतीय संविधानावरती आपला देश चालतो बाबासाहेबांना अथक प्रश्न प्रयत्न करून तुमच्या आमच्यासाठी संविधान निर्माण केलं,पी आय प्रवीण संपांगे म्हणाले संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत. आपल्या देशातील लोकांना न्याय देण्याचं काम संविधानाने केला आहे.पुरोगामी महाराष्ट्र काम अतिशय चांगले आहे.ऍड .सुमित सावंत यांनी विद्यार्थ्यांना संविधाना संदर्भात मार्गदर्शन केले .विकासदादा धाईंजे ,संदीप शेठ नरोळे, कवी सु.ग साबळे औदुंबरऔदुंबर बुधावले यांनी संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास महाराष्ट्र विद्युत नियमक मंडळ आयोग सदस्य श्रीकांत बाविस्कर, संपादक अभिमन्यू आठवले सहाय्यक अभियंता दीपक कंकाळ,अवधूत कांबळे, मुख्याध्यापक शंकर शिंगाडे,सरपंच गणेश दडस,मा.उपसरपंच उद्योजक संदीप तात्या नरोळे, अध्यक्ष आनंदराव लवटे,माजी सरपंच संभाजी साळवे, महादेव शिंदे,अशोक तोडकर, ग्रामस्थ तसेच शिक्षक स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसंजय ढवळे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ढवळे सर, निगडे सरजब्बर मुलानी सर,अमोल खरात सर,फुले सर,मुल्ला मॅडम शेंडगे मॅडम सर्व शिक्षक स्टाफ यांनी अथक परिश्रम केलेया कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक प्रमोद शिंदे केले.

आम्हाला राग धरून काम करायचं नाही, ट्रोलिंगला कामातून उत्तर देऊ- खा रणजितसिंह निंबाळकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

नातेपुते ( प्रमोद शिंदे)-
आम्हाला राग धरून काम करायचं नाही तर सर्वांना सोबत घेऊन काम करायचा आहे सोशल मीडियावर ट्रोलिंगकरणाऱ्यांना  कामातून उत्तर देऊ असे प्रतिपादन माढा लोकसभा खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नातेपुते येथे घेतलेल्या दिवाळीनिमित्त स्नेह मेळाव्या दरम्यान मनोगत व्यक्त केले.पुढे बोलताना ते म्हणाले आतापर्यंत रस्ते पाणी रेल्वेचे प्रश्न मार्गी लावले आहेत.आम्ही सर्व जुने सहकारी मिळूनमतदार संघातील चेहरा मोहरा बदलणार आहोत.तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे.काही लोक स्टेजवर नाहीत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पक्षाने मला काम करायला सांगितल आहे.अशाप्रकारे मोहिते-पाटील कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्यामुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी चिमटा काढला.तसेच यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर,आमदार शहाजी पाटील,आ जयकुमार गोरे, मा आमदार दीपक आबा साळुंखे,सदाभाऊ खोत यांनी खासदार रंजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला.याप्रसंगी भाजपचे श्रीकांत भारतीयांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास दूध संघाचे रणजितसिंह शिंदे,ज्योतीताई पाटील चेतनसिंह केदार,राजकुमार पाटील,शिवप्रसाद चे शरद मोरे,महेश चिवटेआप्पासाहेब देशमुख, माऊली पाटील तसेच महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन के.के पाटील,बाळासाहेब सरगर,संजय देशमुखव पदाधिकारी यांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक के के पाटील यांनी केले तर आभार बाळासाहेब सरगर यांनी व्यक्त केले.

– *स्नेह मेळाव्यास स्थानिक  आमदारांची दांडी * 

कार्यक्रम पत्रिकेत नाव असताना आमदारत  रणजीत सिंह मोहिते पाटील,आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक,जयवंतराव जगताप यांची कार्यक्रमाला दांडी  असल्याने , कार्यक्रम संपल्यानंतर दबक्याआवाजात मोहिते पाटील गट व समर्थक नाराज असल्याच्या चर्चांना उधान आले*

दहिगाव हायस्कूलचे संस्थापक विठ्ठलराव पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त दहिगाव हायस्कूल येथे विविध उपक्रम

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

दहीगाव हायस्कूल दहिगाव चे तसेच प्रगत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. विठ्ठलराव पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष वंदना देवी मोहिते यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधान परिषद सदस्य मा.आ.रामहरी रुपनवर तर प्रमुख अतिथी म्हणून  भारतीय सैन्य दलातील कॅप्टन विवेक मोरे हे होते.रामहरी रुपनवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या अंगी जिज्ञासा असली पाहिजे शून्यातून जग निर्माण करता येते.कोणत्याही गोष्टीच स्वप्न पाहिल्या शिवाय ते पूर्ण करता येत नाही.नानांनी नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध खडतर परिश्रम करून संस्थानावारूपाला आणली आहे.तसेच  कॅप्टन विवेक  मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले जीवनात स्वतःला घडवायचा असेल तर चांगल्या सवयी आणि चांगली संगत असली पाहिजे संगत माणसांना घडवते आणि बिघडवते .आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते तसेच माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर महाराज फुले यांनी विद्यार्थी शिक्षक व पालक यांना मोबाईल पासून दूर राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष वंदना मोहिते संचालक वनिता पाटील,सचिव वर्षाराणी पाटील,चेअरमन रामचंद्र पाटील, सत्यशील पाटील ह भ प ज्ञानेश्वर फुले, महाराज मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर, किर्दक सर ,पत्रकार प्रमोद शिंदे,पोलीस पाटील विठ्ठल मोरे, माजी सैनिक महेश चिकणे,धन्यकुमार खिलारे, मुलानी सर,लवटे सर शिक्षक स्टाफ विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed